शहरं
Join us  
Trending Stories
1
Devendra Fadnavis: ४८ तासात पाकिस्तानी लोकांनी देश न सोडल्यास कारवाई करण्यात येणार; मुख्यमंत्र्यांचा इशारा
2
सिंधूच्या पाण्याचा एक थेंबही पाकिस्तानात जाणार नाही...! पण एवढं पाणी भारत कसं वापरणार? ३ पर्यायांवर होतोय विचार
3
CM पदाबाबत आता खुद्द फडणवीसांनी मनातील इच्छा बोलून दाखवली; बावनकुळेंच्या विधानावर म्हणाले...
4
दहशतवाद्यांचे कंबरडे मोडण्याची तयारी, अनंतनागमधून १७५ जण ताब्यात, लष्कराची मोठी कारवाई
5
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
6
VIDEO: सीमेवर युद्धाची तयारी? लोकांकडून जमिनीखालील सरकारी तळघरांची साफसफाई
7
कधी सारा, कधी अनन्या, अनेक अभिनेत्रींसोबत जोडलं गेलं नाव, शुभमन गिल म्हणतो, "मागच्या ३ वर्षांपासून मी…”  
8
पहलगाम हल्ला: पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेणे हाच पर्याय!; ठाकरे गटाची स्वाक्षरी मोहीम
9
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार
10
आता तेही नको! भारत-पाक क्रिकेट संदर्भात गांगुलीचं मोठं वक्तव्य; म्हणाला...
11
पहलगामचा हल्ला, भारताचा पाकवरील 'स्ट्राईक' आणि तिसरं महायुद्ध; नॉस्ट्रॅडॅमसचे भाकित काय?
12
पाकिस्तानला ड्रोन हल्ल्याची भीती! सैनिकांना फोन बंद करण्याचे दिले निर्देश
13
इराणच्या राजाई बंदरात भीषण स्फोट; ४०६ जखमी, अनेकांचा मृत्यू झाल्याची भीती
14
पाकिस्तानींना देश सोडण्याचे आदेश, अदनान सामी सोशल मीडियावर झाला ट्रोल, अखेर संतापून म्हणाला...  
15
"सीमा हैदर भारताची सून, तिला पाकिस्तानात पाठवू नका", राखी सावंतची विनंती, म्हणाली...
16
“२०३४ नंतरही फडणवीस CM असावेत, भाजपाची सत्ता अविरत राहावी”; भाजपा नेत्यांची ‘मन की बात’
17
भारताजवळ आहेत दोन शक्तिशाली ब्रह्मास्त्रं, पाकिस्तानमधील लाहोर, कराचीसारखी शहरं क्षणार्धात करू शकतात नष्ट
18
Mumbai Fire: अंधेरीत आठ मजली इमारतीत अग्नितांडव, १ महिलेचा मृत्यू; ६ जण जखमी
19
पाकचे पंतप्रधान आता तटस्थ चौकशीस तयार, CM ओमर अब्दुल्लांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले...
20
पहलगाम हल्ल्याची आधी जबाबदारी घेतली, आता भारताने कारवाई सुरू केल्यावर टीआरएफचा 'यू-टर्न'

कन्हारगाव अभयारण्याची अधिसूचना जारी : राज्यातील ५० वे अभयारण्य 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 9, 2021 00:04 IST

Notification of Kanhargaon Sanctuary चंद्रपूर जिल्हयातील कन्हारगाव अभयारण्याची अधिसूचना जारी करण्यात आली आहे. कन्हारगाव हे राज्यातील ५० वे अभयारण्य ठरले आहे.

ठळक मुद्देराज्य वन्यजीव मंडळाच्या बैठकीत मिळाली होती मान्यता

लोकमत न्यूज नेटवर्क

नागपूर : चंद्रपूर जिल्हयातील कन्हारगाव अभयारण्याची अधिसूचना जारी करण्यात आली आहे. कन्हारगाव हे राज्यातील ५० वे अभयारण्य ठरले आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या अध्यक्षतेखाली राज्य वन्यजीव मंडळाची गेल्या डिसेंबर महिन्यात बैठक झाली होती. यात हे अभयारण्य घोषित करण्यास मान्यता देण्यात आली होती.

व्याघ्र भ्रमणमार्ग सुरक्षित होण्यासाठी आणि वनसंपदेचे जतन व संवर्धन करण्यासाठी शासनाने हा महत्वाकांक्षी निर्णय घेतला असल्याचे मुख्यमंत्र्यांनी म्हटले आहे. विदर्भ ही देशाची व्याघ्र राजधानी मानली जाते. वाघांचे सुरक्षित स्थलांतर होणे आणि त्यांचा नैसर्गिक अधिवास जपणे याला शासनाने नेहमीच प्राधान्य दिल्याचेही त्यांनी सांगितले आहे.

असे आहे कन्हारगाव अभयारण्य

२६९ चौरस किलोमीटर क्षेत्रात कन्हारगाव अभयारण्य असेल. हे चंद्रपूर जिल्ह्यातील ताडोबा-अंधारी व्याघ्र प्रकल्पाच्या दक्षिणेकडील अत्यंत महत्वाच्या समजल्या जाणाऱ्या व्याघ्र भ्रमणमार्गाच्या महाराष्ट्र, तेलंगणा व छत्तीसगड राज्याच्या सीमेला जोडणारा तसेच या राज्याच्या वनक्षेत्रास सलग असलेले वनक्षेत्र आहे. वाघांच्या भ्रमणमार्गांच्या दृष्टीने हे महत्वाचे पाऊल आहे.

येथे वाघ व इतर वन्यजीव मोठया प्रमाणात असल्याने वन्यजीवांच्या शिकारीसाठी ब्रिटिशांनी खास ‘शूटिंग ब्लॉक’ घोषित केले होते. पूर्वी इंग्रज अधिकारी, नंतरही बरेच राजे महाराजे शिकारीसाठी यायचे. या वनक्षेत्रातील कन्हारगांव, वामनपल्ली व देवई ही ब्रिटिशांचे ‘शुटींग ब्लाॅक’ आता राज्य शासनाच्या निसर्ग संवर्धनाच्या धोरणामुळे ‘अभयारण्य’ म्हणून ओळखले जातील.

२०१३ पासूनची मागणी पूर्ण

कन्हारगांव अभयारण्य घोषित झाल्याने २०१३ पासून पर्यावरण प्रेमींनी रेटलेली मागणी पूर्ण झाली आहे. चंद्रपूर जिल्ह्यातील मानव-वन्यजीव संघर्ष कमी करण्याच्या दृष्टीने आश्रयस्थळे सुरक्षित ठेवणे गरजेचे होते. त्या दृष्टीने हा एक महत्त्वाचा निर्णय मानला जात आहे.

टॅग्स :wildlifeवन्यजीवforestजंगल