शहरं
Join us  
Trending Stories
1
काँग्रेसच्या झेंड्याला ठाकरेंच्या मताची काठी; तब्बल दहा वर्षानंतर लोकसभेसाठी काँग्रेसला मुंबईत खाते उघडण्याची संधी
2
पैशांच्या अवैध वाहतुकीवर तिसरा डोळा; निवडणूक आयोगाचे मुंबई आणि परिसरातील रेल्वे स्थानकांवर विशेष लक्ष
3
भर समुद्रात पाकच्या बोटीवरून ६०० कोटींचे ड्रग्ज जप्त; भारतीय तटरक्षक दल, एटीएस व एनसीबीची मोठी कारवाई
4
निवडणुकीत जातीपातीच्या जाणिवा टोकदार ; एकाच जातीचे उमेदवार; तिथे पाहतात पोटजात
5
ठाण्यातील ‘त्या’ सव्वातीन लाख मतांचे मालक कोण? अजित की शरद पवार?
6
देवेगौडांचा नातू ‘सेक्स स्कँडल’मध्ये; विदेशात पलायन? एसआयटी चौकशी
7
साताऱ्यातील प्रचारात मुंबई बाजार समितीतील भ्रष्टाचाराचा मुद्दा ‘हॉट’ ; उदयनराजे भोसले आणि शशिकांत शिंदे यांच्यात थेट लढत
8
1 मे ध्वजारोहण : उमेदवार मंत्री वगळले, पण नातलग ?
9
राष्ट्रीय स्वयंसेवक संघ नेहमीच आरक्षणाचा समर्थक राहिला : मोहन भागवत
10
मोटारीला चपलांचा हार आणि आरोप-प्रत्यारोपांचे प्रहार; जरांगे पाटलांनी केला आरोप
11
यापूर्वीही आरक्षणाला संघाचा विरोध : राहुल गांधी
12
तरुणाई का संतापली? निराश तरुण मतदानाकडेच पाठ फिरवताना दिसताहेत
13
निवडणूक आहे, जिभेला लगाम घाला !
14
दुबईत साकारतेय जगातील सर्वात मोठे विमानतळ; प्रथमच नवीन विमान वाहतूक तंत्रज्ञानाचा होणार वापर
15
त्यांच्या कारकिर्दीत ‘ते’ म्हणतील ते सगळं केलं, आता भावनिक व्हायच नाही; अजित पवारांचा वार
16
IPL 2024 GT vs RCB: RCB चा 'विराट' शो! विल जॅक्सचे ४१ चेंडूत शतक; ४ ओव्हर राखून विजय
17
बारामती, शिरुरमध्ये पोलिसी बळाचा वापर, मतदारांना धमक्या; संजय राऊतांचा गंभीर आरोप
18
"मुस्लीम लोक सर्वाधिक कंडोम वापरतात..."; ओवेसींनी दिला केंद्राच्या डेटाचा हवाला, PM मोदींवर पलटवार
19
बीडमध्ये पंकजा मुंडे, मनोज जरांगे एकाच व्यासपीठावर; दोघांचाही एकमेकांना नमस्कार
20
BANW vs INDW: भारताची विजयी सलामी! बांगलादेश त्यांच्याच घरात ढेर; पाहुण्यांची सांघिक खेळी

नदीत नाही पाणी अन् लाखोंची उधळपट्टी!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 13, 2019 1:36 AM

हिवाळ्यातच कन्हान नदीचे पात्र कोरडे पडले आहे. शहरातील काही भागातील नागरिकांना पाण्यासाठी संघर्ष करावा लागत आहे. समस्या सोडविण्यात महापालिका अपयशी ठरली आहे. असे असतानाही महापालिकेच्या जलप्रदाय विभागाने कन्हान नदीतून पाणी उचलून गोरेवाडा व गोधनी जलशुद्धीकरण केंद्रापर्यंत पोहोचविण्याच्या प्रकल्प अहवालाचा अभ्यास व विस्तृत आराखडा तयार करण्यासाठी महापालिका प्रकल्प प्रबंधन सल्लागार(पीएमसी) यावर लाखो रुपये खर्च करण्याची तयारी के ली आहे. नदीत पाणी नसताना सल्लागारावर लाखोंची उधळपट्टी कशासाठी, असा प्रश्न निर्माण झाला आहे.

ठळक मुद्देनागपूर मनपा जलप्रदाय विभागाचा प्रस्ताव : अभ्यासासाठी ‘पीएमसी’वर ९७.६२ लाख खर्च करणार

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : हिवाळ्यातच कन्हान नदीचे पात्र कोरडे पडले आहे. शहरातील काही भागातील नागरिकांना पाण्यासाठी संघर्ष करावा लागत आहे. समस्या सोडविण्यात महापालिका अपयशी ठरली आहे. असे असतानाही महापालिकेच्या जलप्रदाय विभागाने कन्हान नदीतून पाणी उचलून गोरेवाडा व गोधनी जलशुद्धीकरण केंद्रापर्यंत पोहोचविण्याच्या प्रकल्प अहवालाचा अभ्यास व विस्तृत आराखडा तयार करण्यासाठी महापालिका प्रकल्प प्रबंधन सल्लागार(पीएमसी) यावर लाखो रुपये खर्च करण्याची तयारी के ली आहे. नदीत पाणी नसताना सल्लागारावर लाखोंची उधळपट्टी कशासाठी, असा प्रश्न निर्माण झाला आहे.कन्हान नदीपात्रात पाणी नसल्याने कन्हान जलशुद्धीकरण केंद्रातील ‘इन्टेक वेल’मधून पूर्णक्षमतेने पाण्याची उचल करताना अडचणी येत आहेत. गेल्या काही दिवसात २५ एमएलडी पाणी कमी उचलण्यात आले. यामुळे पूर्व, उत्तर व दक्षिण नागपुरातील बहुसंख्य भागाला अपेक्षित पाणीपुरवठा करता आला नाही. खापानजीकच्या कोच्छी गावाजवळ नदीवर बंधारा उभारण्यात आल्याने कन्हान नदीच्या पात्रातील पाण्याची पातळी कमी झाली आहे. परिणामी दररोज २०० एमएलडी पाणीपुरवठा होत नाही. हा पाणीपुरवठ्यासाठी धोक्याची इशारा मानला जात आहे.दरम्यान जलप्रदाय विभागातर्फै स्थायी समितीकडे प्रस्ताव पाठविला जात आहे. या प्रस्तावात जून-जुलै ते डिसेंबर दरम्यान कन्हान नदीत भरपूर पाणी असते. या कलावधीत रोहणा गावाजवळ नदी पात्रातील पाण्याची उचल करुन पेंच प्रकल्पापर्यंत वाहून नेण्यासाठी २३०० मि.मी.व्यासाची जलवाहिनी व तेथून गोरेवाडा व गोधनी जलशुद्धकीरण केंद्रापर्यंत पोहचवण्याचा विचार आहे. याचा अभ्यास करण्यासाठी व संबंधित प्रकल्पाचा विस्तृत आराखडा तयार करण्यासाठी प्रकल्प प्रबंधन सल्लागाराची नियुक्ती करावयाची आहे. याबाबतच्या निविदा काढल्या जातील. त्यानंतर सल्लागाराला ९७ लाख ६२ हजार २१० रुपये अदा करण्यात येतील.विशेष म्हणजे वर्षभरापूर्वी काही नगरसेवक नी कन्हान नदीवर बंधारा उभारण्याची मागणी केली होती. सभागृहात हा मुद्दा उपस्थित करण्यात आला होता. यावर दोन कोटींचा खर्च अपेक्षित होता. परंतु हा प्रस्ताव विचारात घेतला नव्हता.टँकरने पाणीपुरवठ्याचा कालावधी वाढविलामहापालिकेच्या जलप्रदाय विभागातर्फे टँकरद्वारे पाणीपुरवठ्याचे दर निश्चित क रण्यात आले आहेत. निविदा काढून निश्चित दरानुसार काम दिले जाते. ३१ ऑक्टोबर २०१८ला या निविदांचा कालावधी संपला. तो वाढवून ३१ जानेवारी २०१९ पर्यंत करण्याचा प्रस्ताव स्थायी समितीकडे सादर केला जाणार आहे. यात २ हजार लिटर क्षमतेच्या टँकरसाठी प्रतिफेरी ३२८ रुपये, ३ हजार लिटरच्या टँकरसाठी प्रतिफेरी ३५८ रुपये, ४ हजार लिटर क्षमतेच्या टँकरसाठी प्रतिफेरी ३८६ तर ६ हजार लिटर क्षमतेच्या टँकरसाठी प्रतिफेरी ४२४ रुपये दर निश्चित करण्यात आले आहेत.

टॅग्स :Nagpur Municipal Corporationनागपूर महानगर पालिकाWaterपाणी