शहरं
Join us  
Trending Stories
1
इकडे विरोधक टीका करतायत; तिकडे आफ्रिकेचा निवडणूक आयोग पारदर्शक प्रणाली पाहण्यासाठी खासदारांना पाठविणार
2
बिहारमध्ये राडा! उपमुख्यमंत्र्यांच्या ताफ्यावर हल्ला; दुसरीकडे सीपीएम आमदाराला मारहाण, गाडी फोडली
3
Ravi Shastri On Shubman Gill : शुभमन गिल आधीच होतोय ट्रोल, त्यात शास्त्रींच्या कमेंटची भर, म्हणाले...
4
सैनिकी शाळेत १२ वर्षीय मुलाचा गूढ मृत्यू,'त्या' बंद दारामागे काय घडले?; बहिणीचा गंभीर आरोप
5
सोशल मीडियाच्या ट्रॉलिंगचा बळी; माफी मागितली तरी छळ थांबेना, तरुणाने अखेर जीवन संपवले
6
"14 तारखेला 11 वाजेपर्यंत लालू अँड कंपनीचा..."; अमित शाह स्पष्टच बोलले, घुसखोरांसंदर्भात काय म्हणाले?
7
Anil Ambani ED: अनिल अंबानींची पुन्हा चौकशी होणार, ED नं १४ नोव्हेंबरला बोलावलं; प्रकरण काय?
8
विजय देवराकोंडा-रश्मिका मंदाना 'या' महिन्यात लग्न करणार? काही दिवसांपूर्वीच झालेला साखरपुडा
9
बायकोला ब्रेन ट्युमर, नवऱ्याने मृत्यूच्या दारातून परत आणलं; मराठी रीलस्टार कपलच्या रिअल लाइफ स्टोरीवर येतोय साऊथ मुव्ही
10
भाजप कार्यकर्त्याने आधी दिल्लीत नंतर बिहारमध्ये मतदान केले; राहुल गांधींनंतर आप नेत्याने आरोप केला
11
Canada Visa Rules : कॅनडाने व्हिसा नियमांमध्ये केला मोठा बदल, भारतावर काय परिणाम होईल?
12
SBI नं रचला इतिहास, मार्केट कॅप १०० अब्ज डॉलर्सच्या पार; देशातील दिग्गजांच्या यादीत सामील
13
"माझ्या पप्पांना अडकवण्यात आलंय"; वडील जेलमध्ये, लेकीने अभ्यास सोडून केला प्रचार
14
Jara Hatke: चांदीचा वर्ख कसा तयार होतो माहितीय? वर्ख लावलेली मिठाई खावी की नाही? तुम्हीच ठरवा!
15
सोन्याकडे बघण्याचा दृष्टीकोन बदलायला हवा? SBI ची मोठी मागणी, म्हणाले घरांमध्ये पडून असलेलं सोनं..
16
मोठी बातमी! पार्थ पवार जमीन व्यवहार प्रकरणी तहसीलदार सूर्यकांत येवले निलंबित
17
बिहार निवडणूक 2025: व्होटर स्लीपशिवाय मतदान नाही! सकाळी ६.३० वाजल्यापासून रांगेत असलेल्या महिलांना रोखले
18
चारित्र्यावर संशय! रस्त्यात दुसऱ्या तरुणासोबत बोलली म्हणून संतापलेल्या पतीने ब्लेडने कापले पत्नीचे नाक
19
याला म्हणतात ऑफर...! Tata च्या इलेक्ट्रिक कारवर ₹1.30 लाखांपर्यंतची सूट, Curvv EV अन् Punch EV वर मोठा डिस्काउंट
20
तो प्रवास ठरला अखेरचा..; प्रसिद्ध ट्रॅव्हल इन्फ्लुएंसर अनुनय सूदचे 32व्या वर्षी निधन

भाड्याची माणसे जमवून सरकार बनविल्याने कुणी चाणक्य हाेत नाही

By निशांत वानखेडे | Updated: October 19, 2023 22:20 IST

नागपुरात सुषमा अंधारेंनी ताेफ डागली : फडणवीस पुन्हा मुख्यमंत्री हाेऊ शकणार नाहीत

नागपूर : उपमुख्यमंत्री फडणवीस यांना चाणक्य म्हटले जाते. चाणक्य माणसे घडविताे पण फडणवीसांनी काेणती माणसे घडविली? त्यांना आपल्या पक्षात माणसे घडविता आली नाही. उलट बाळासाहेबांनी आणि पवारांनी घडविलेली माणसे फाेडून त्यांनी सरकार बनविले. अशी भाड्याची माणसे जमवून सरकार बनविल्याने कुणी चाणक्य हाेत नाही, अशी घणाघाती टीका शिवसेनेच्या उपनेत्या सुषमा अंधारे यांनी नागपुरात केली.

शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे गट) च्या महाप्रबाेधन यात्रेचा दुसरा टप्पा गुरुवारी उपराजधानीतून सुरू करण्यात आला. यात उद्घाटन करताना सुषमा अंधारे यांनी देवेंद्र फडणवीस यांच्यावर ताेफ डागली. संघ, भाजपच्या ट्राेल आर्मीने काॅंग्रेसच्या नेहरू, गांधी ते राहुल गांधी आणि आता उद्धव ठाकरे यांच्या चारित्र्य मलिन करण्याचे काम चालविले आहे. याच भुंकणाऱ्या आर्मीकडून फडणवीस अभ्यासू आहेत, चाणक्य आहेत, अशी प्रतिमा उंचावण्याचा जाणून प्रयत्न केला जाताे. मात्र फडणवीस पक्षफाेडे आहेत, हे महाराष्ट्राला समजले आहे.

अंधारे यांनी राज ठाकरे यांच्या ‘लाव रे ताे व्हिडीओ’ स्टाईलने फडणवीसांच्या कारभारावर ताशेरे ओढले. विराेधात असले की महाराष्ट्र अस्थिर, अशांत ठेवण्यासाठी ट्राेलर आर्मी व वेगवेगळ्या टीम कामाला लावतात. विराेधात असताना फडणवीस व त्यांच्या समर्थकांनी कंत्राटी आराेग्य कर्मचाऱ्यांना देवदूत म्हटले पण सरकारमध्ये आल्यावर त्यांची सेवा विसरले. जनतेच्या प्रश्नावर विराेधात बाेलल्यावर ईडी, सीबीआयच्या धकम्या दिल्या जातात.

माझ्यावरही व्यक्तिगत आराेप करून धमकाविले जात आहे पण मी घाबरणार नाही. फडणवीसांनी सत्तेसाठी पक्ष फाेडले, राडा केला पण त्यांना मुख्यमंत्री पद मिळाले नाही आणि यापुढेही ते मिळणार नाही. या सरकारने आळंदीत वारकऱ्यांवर, बारशीटाकळीत शेतकऱ्यांवर पाेलिसांकरवी लाठीचार्ज केला. महाराष्ट्राची जनता हे विसरणार नाही. जाती-धर्मात तेढ वाढविणाऱ्या भाजपला २०२४ च्या निवडणुकीत पायउतार व्हावे लागेल, अशी टीका अंधारे यांनी केली.

संचालन किशाेर कुमेरिया यांनी केले. प्रास्ताविक दीपक कापसे यांनी केले. यावेळी दुष्यंत चतुर्वेदी, सुरेश साखरे, सतीश हरडे, प्रमाेद मानमाेडे, शिल्पा बाेडखे, आसावरी देशमुख, बाळा राऊत, विशाल बरबटे, सुरेखा गाडे, सुशीला नाईक, मंगला गवरे, प्रवीण बरडे, नितीन तिवारी, प्रीतम कापसे प्रामुख्याने उपस्थित हाेते.

नागपूरची दुर्दशा कुणामुळे?स्मार्ट सिटी म्हणून नागपूरचा गवगवा केला जाताे. मात्र एका पावसाने नागपूर जलमय झाले, पूल पडले, रस्ते खचले याची जबाबदारी महापालिकेवर ढकलली जाते. मात्र सरकारने कुटनीतीने वर्षभरापासून महापालिका बरखास्त केली असून प्रशासन कारभार पाहत आहे. त्यामुळे ही दुर्दशा सरकारचीच जबाबदारी आहे, अशी टीका अंधारे यांनी केली. मुंबई तुंबली तेव्हा फाेटाे काढणाऱ्या अमृताताईंनी आता सेल्फी का नाही काढला, असा कटाक्ष त्यांनी केला. नागपूरच नाही तर राज्यात क्राईम रेट वाढला असल्याची टीकाही त्यांनी केली.

टॅग्स :Sushma Andhareसुषमा अंधारेnagpurनागपूर