शहरं
Join us  
Trending Stories
1
Mumbai: तोंडाला रुमाल बांधून आला अन् धाड, धाड; धारावीत भर बाजारात महिलेवर गोळीबार!
2
हिंजवडीत इमारतीवरून उडी मारून आयटी अभियंत्याची आत्महत्या, चिठ्ठीत लिहिले...
3
Badlapur: बदलापुरात रासायनिक कंपनीत आग!
4
Russia Ukraine War: 'रशियाकडे युद्ध थांबवण्याची शेवटची संधी' डोनाल्ड ट्रम्प यांचा पुतिन यांना इशारा!
5
मनसे कार्यकर्त्यांकडून कोचिंग सेंटरच्या संचालकाला मारहाण, कल्याण येथील व्हिडीओ व्हायरल
6
Sangli: नागपंचमीनिमित्त सांगलीत भाविकांना जिवंत नागांचे दर्शन घडणार, खेळावर बंदी कायम!
7
निशिकांत दुबेंना घेराव घातल्यानं राज ठाकरेंकडून वर्षा गायकवाड यांचे कौतुक, म्हणाले...
8
महापालिका निवडणुकीत आघाडी असणार की नाही, त्वरीत सांगा! पुण्यातून शरद पवार गटाची जाहीर मागणी
9
तब्बल ३८ तास बंद राहिला टोलनाका, तरीही २४ हजार लोकांनी प्रामाणिकपणे भरला टोल     
10
How To Deal With Heart Attack: घरात एकटे असताना 'हार्ट अटॅक' आला तर स्वत:चा जीव कसा वाचवाल? डॉक्टरांनी सांगितल्या 'या' सोप्या टिप्स
11
'नागपूरची लेक' वर्ल्ड चॅम्पियन दिव्या देशमुखला नितीन गडकरींचा 'व्हिडीओ कॉल', काय झाल्या गप्पा?
12
"महाराष्ट्राकडे 'बुद्धी आणि बळ' दोन्ही ओतप्रोत, ते जेव्हा..."; राज ठाकरेंकडून दिव्या देशमुखचं कौतुक
13
Pune Crime: 'छातीत दुखतंय', इंजिनिअर तरुण मीटिंग रुममधून उठला अन् सातव्या मजल्यावरून मारली उडी
14
वयोवृद्ध महिलेच्या खुनाचे रहस्य उलगडले, सावत्र मुलाला व पतीला अटक, गुन्हे शाखा दोनची कामगिरी
15
नागपुरला मिळाले ३५ वे पोलीस ठाणे; खापरखेडा पोलीस ठाणे आता नागपुरच्या कार्यकक्षेत
16
'अर्थव्यवस्था बंद करावी का?' रशियाकडून स्वस्त तेल खरेदी करण्याच्या वादाला भारताचे प्रत्युत्तर, आरसा दाखवला
17
Divya Deshmukh: बुद्धिबळाच्या पटावर नव्या 'क्वीन'चं राज्य! 'महाराष्ट्राची लेक' दिव्या देशमुख 'वर्ल्ड चॅम्पियन'; कोनेरु हम्पी उपविजेती
18
"ऑपरेशनला सिंदूर नाव देणं म्हणजे भावनांशी खेळ, एकाही देशाने साथ दिली नाही’’, अरविंद सावंत यांचा मोदी सरकारवर हल्लाबोल
19
'लाडकी बहीण योजनेला सुद्धा भ्रष्टाचारातून सुट्टी नाही'; रोहित पवारांचा अजित पवारांवर पलटवार, आदिती तटकरेंच्या खात्याचं प्रकरण काढलं
20
'शत्रूची किती विमानं पाडली, हे त्यांनी कधीच विचारलं नाही'; राजनाथ सिंह यांचा लोकसभेत राहुल गांधींवर निशाणा

भाड्याची माणसे जमवून सरकार बनविल्याने कुणी चाणक्य हाेत नाही

By निशांत वानखेडे | Updated: October 19, 2023 22:20 IST

नागपुरात सुषमा अंधारेंनी ताेफ डागली : फडणवीस पुन्हा मुख्यमंत्री हाेऊ शकणार नाहीत

नागपूर : उपमुख्यमंत्री फडणवीस यांना चाणक्य म्हटले जाते. चाणक्य माणसे घडविताे पण फडणवीसांनी काेणती माणसे घडविली? त्यांना आपल्या पक्षात माणसे घडविता आली नाही. उलट बाळासाहेबांनी आणि पवारांनी घडविलेली माणसे फाेडून त्यांनी सरकार बनविले. अशी भाड्याची माणसे जमवून सरकार बनविल्याने कुणी चाणक्य हाेत नाही, अशी घणाघाती टीका शिवसेनेच्या उपनेत्या सुषमा अंधारे यांनी नागपुरात केली.

शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे गट) च्या महाप्रबाेधन यात्रेचा दुसरा टप्पा गुरुवारी उपराजधानीतून सुरू करण्यात आला. यात उद्घाटन करताना सुषमा अंधारे यांनी देवेंद्र फडणवीस यांच्यावर ताेफ डागली. संघ, भाजपच्या ट्राेल आर्मीने काॅंग्रेसच्या नेहरू, गांधी ते राहुल गांधी आणि आता उद्धव ठाकरे यांच्या चारित्र्य मलिन करण्याचे काम चालविले आहे. याच भुंकणाऱ्या आर्मीकडून फडणवीस अभ्यासू आहेत, चाणक्य आहेत, अशी प्रतिमा उंचावण्याचा जाणून प्रयत्न केला जाताे. मात्र फडणवीस पक्षफाेडे आहेत, हे महाराष्ट्राला समजले आहे.

अंधारे यांनी राज ठाकरे यांच्या ‘लाव रे ताे व्हिडीओ’ स्टाईलने फडणवीसांच्या कारभारावर ताशेरे ओढले. विराेधात असले की महाराष्ट्र अस्थिर, अशांत ठेवण्यासाठी ट्राेलर आर्मी व वेगवेगळ्या टीम कामाला लावतात. विराेधात असताना फडणवीस व त्यांच्या समर्थकांनी कंत्राटी आराेग्य कर्मचाऱ्यांना देवदूत म्हटले पण सरकारमध्ये आल्यावर त्यांची सेवा विसरले. जनतेच्या प्रश्नावर विराेधात बाेलल्यावर ईडी, सीबीआयच्या धकम्या दिल्या जातात.

माझ्यावरही व्यक्तिगत आराेप करून धमकाविले जात आहे पण मी घाबरणार नाही. फडणवीसांनी सत्तेसाठी पक्ष फाेडले, राडा केला पण त्यांना मुख्यमंत्री पद मिळाले नाही आणि यापुढेही ते मिळणार नाही. या सरकारने आळंदीत वारकऱ्यांवर, बारशीटाकळीत शेतकऱ्यांवर पाेलिसांकरवी लाठीचार्ज केला. महाराष्ट्राची जनता हे विसरणार नाही. जाती-धर्मात तेढ वाढविणाऱ्या भाजपला २०२४ च्या निवडणुकीत पायउतार व्हावे लागेल, अशी टीका अंधारे यांनी केली.

संचालन किशाेर कुमेरिया यांनी केले. प्रास्ताविक दीपक कापसे यांनी केले. यावेळी दुष्यंत चतुर्वेदी, सुरेश साखरे, सतीश हरडे, प्रमाेद मानमाेडे, शिल्पा बाेडखे, आसावरी देशमुख, बाळा राऊत, विशाल बरबटे, सुरेखा गाडे, सुशीला नाईक, मंगला गवरे, प्रवीण बरडे, नितीन तिवारी, प्रीतम कापसे प्रामुख्याने उपस्थित हाेते.

नागपूरची दुर्दशा कुणामुळे?स्मार्ट सिटी म्हणून नागपूरचा गवगवा केला जाताे. मात्र एका पावसाने नागपूर जलमय झाले, पूल पडले, रस्ते खचले याची जबाबदारी महापालिकेवर ढकलली जाते. मात्र सरकारने कुटनीतीने वर्षभरापासून महापालिका बरखास्त केली असून प्रशासन कारभार पाहत आहे. त्यामुळे ही दुर्दशा सरकारचीच जबाबदारी आहे, अशी टीका अंधारे यांनी केली. मुंबई तुंबली तेव्हा फाेटाे काढणाऱ्या अमृताताईंनी आता सेल्फी का नाही काढला, असा कटाक्ष त्यांनी केला. नागपूरच नाही तर राज्यात क्राईम रेट वाढला असल्याची टीकाही त्यांनी केली.

टॅग्स :Sushma Andhareसुषमा अंधारेnagpurनागपूर