शहरं
Join us  
Trending Stories
1
Padma Awards: क्रिकेटपटू आर अश्विनला पद्मश्री, हॉकीपटू श्रीजेशला पद्मभूषण; येथे पाहा संपूर्ण यादी!
2
पहलगाम हल्ल्याचा नवीन व्हिडिओ समोर; पर्यटकाच्या कॅमेऱ्यात कैद झाली संपूर्ण घटना, पाहा...
3
'भारतीय सैन्य कधीही हल्ला करू शकते...', पाकिस्तानी संरक्षण मंत्र्याने व्यक्त केली भीती
4
'शरिया कोर्ट', 'कोर्ट ऑफ काजी'ला कायदेशीर मान्यता नाही; त्यांचे निर्देश बंधनकारक नाहीत: सर्वोच्च न्यायालय
5
RR vs GT : गिलचा कॅच सुटल्यावर बहिणीने मानले देवाचे आभार; तिची रिॲक्शन होतीये व्हायरल
6
पावसाळ्याआधी मृदा व जलसंधारणाविषयी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी घेतला 'हा' महत्त्वाचा निर्णय
7
मुलगी आयएएस अधिकारी झाली, आनंदोत्सवात वडिलांना ह्रदयविकाराचा झटका
8
युरोपात ब्लॅकआउट! फ्रान्स, स्पेनसह अनेक देशांमध्ये वीजपुरवठा खंडित; विमान, मेट्रोसेवा ठप्प
9
पहलगाम हल्यानंतर जम्मू-काश्मीरमध्ये ट्रेकिंगवर बंदी; पर्यटकांसाठी सूचना जारी...
10
मुंबईकरांचे जगणेच कठीण व्हावे, असाच सत्ताधाऱ्यांचा विचार; बेस्ट दरवाढीवरून आदित्य ठाकरे संतापले
11
आयपॅडमुळे विमानात उडाला गोंधळ, आणीबाणीची परिस्थिती, करावं लागलं एमर्जन्सी लँडिंग, कारण काय? 
12
कर्नाटकचे मुख्यमंत्री सिद्धारामैय्या भर सभेत पोलीस अधिकाऱ्यावर भडकले, मारण्यासाठी उगारला हात, त्यानंतर...  
13
दिल्ली बिहारपासून लांब आहे का? सर्वपक्षीय बैठकीला उपस्थित न राहिल्याने खरगेंचा PM मोदींवर निशाणा
14
यशस्वी जैस्वालकडे सर्वांचं लक्ष, गुजरातविरुद्ध मोलाचा पल्ला गाठणार
15
भाजपने अध्यक्षपदाची निवडणूक पुढे ढकलली; पहलगाम हल्ल्यामुळे घेतला निर्णय
16
ही खिंड आहे पाकिस्तानचं ‘चिकन नेक’, PoKमधील या एंट्री पॉईंटवर भारताने कब्जा केल्यास होईल जबर कोंडी, कारवायांना लागेल लगाम
17
स्टायलिश लूकसह रॉयल एनफील्ड हंटर ३५० बाजारात; बघताच प्रेमात पडाल!
18
'आता चर्चा नाही, पाकिस्तानशी अखेरची लढाई...', पहलगाम हल्ल्यावरुन फारुख अब्दुल्ला संतापले
19
पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेस नेत्यांच्या विधानांवर राहुल गांधी नाराज; मल्लिकार्जुन खरगे समज देणार
20
मुकेश अंबानी यांच्या एका शेअरने मार्केट फिरवलं; बाजाराची जोरदार उसळी; कुठे सर्वाधिक वाढ?

भाड्याची माणसे जमवून सरकार बनविल्याने कुणी चाणक्य हाेत नाही

By निशांत वानखेडे | Updated: October 19, 2023 22:20 IST

नागपुरात सुषमा अंधारेंनी ताेफ डागली : फडणवीस पुन्हा मुख्यमंत्री हाेऊ शकणार नाहीत

नागपूर : उपमुख्यमंत्री फडणवीस यांना चाणक्य म्हटले जाते. चाणक्य माणसे घडविताे पण फडणवीसांनी काेणती माणसे घडविली? त्यांना आपल्या पक्षात माणसे घडविता आली नाही. उलट बाळासाहेबांनी आणि पवारांनी घडविलेली माणसे फाेडून त्यांनी सरकार बनविले. अशी भाड्याची माणसे जमवून सरकार बनविल्याने कुणी चाणक्य हाेत नाही, अशी घणाघाती टीका शिवसेनेच्या उपनेत्या सुषमा अंधारे यांनी नागपुरात केली.

शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे गट) च्या महाप्रबाेधन यात्रेचा दुसरा टप्पा गुरुवारी उपराजधानीतून सुरू करण्यात आला. यात उद्घाटन करताना सुषमा अंधारे यांनी देवेंद्र फडणवीस यांच्यावर ताेफ डागली. संघ, भाजपच्या ट्राेल आर्मीने काॅंग्रेसच्या नेहरू, गांधी ते राहुल गांधी आणि आता उद्धव ठाकरे यांच्या चारित्र्य मलिन करण्याचे काम चालविले आहे. याच भुंकणाऱ्या आर्मीकडून फडणवीस अभ्यासू आहेत, चाणक्य आहेत, अशी प्रतिमा उंचावण्याचा जाणून प्रयत्न केला जाताे. मात्र फडणवीस पक्षफाेडे आहेत, हे महाराष्ट्राला समजले आहे.

अंधारे यांनी राज ठाकरे यांच्या ‘लाव रे ताे व्हिडीओ’ स्टाईलने फडणवीसांच्या कारभारावर ताशेरे ओढले. विराेधात असले की महाराष्ट्र अस्थिर, अशांत ठेवण्यासाठी ट्राेलर आर्मी व वेगवेगळ्या टीम कामाला लावतात. विराेधात असताना फडणवीस व त्यांच्या समर्थकांनी कंत्राटी आराेग्य कर्मचाऱ्यांना देवदूत म्हटले पण सरकारमध्ये आल्यावर त्यांची सेवा विसरले. जनतेच्या प्रश्नावर विराेधात बाेलल्यावर ईडी, सीबीआयच्या धकम्या दिल्या जातात.

माझ्यावरही व्यक्तिगत आराेप करून धमकाविले जात आहे पण मी घाबरणार नाही. फडणवीसांनी सत्तेसाठी पक्ष फाेडले, राडा केला पण त्यांना मुख्यमंत्री पद मिळाले नाही आणि यापुढेही ते मिळणार नाही. या सरकारने आळंदीत वारकऱ्यांवर, बारशीटाकळीत शेतकऱ्यांवर पाेलिसांकरवी लाठीचार्ज केला. महाराष्ट्राची जनता हे विसरणार नाही. जाती-धर्मात तेढ वाढविणाऱ्या भाजपला २०२४ च्या निवडणुकीत पायउतार व्हावे लागेल, अशी टीका अंधारे यांनी केली.

संचालन किशाेर कुमेरिया यांनी केले. प्रास्ताविक दीपक कापसे यांनी केले. यावेळी दुष्यंत चतुर्वेदी, सुरेश साखरे, सतीश हरडे, प्रमाेद मानमाेडे, शिल्पा बाेडखे, आसावरी देशमुख, बाळा राऊत, विशाल बरबटे, सुरेखा गाडे, सुशीला नाईक, मंगला गवरे, प्रवीण बरडे, नितीन तिवारी, प्रीतम कापसे प्रामुख्याने उपस्थित हाेते.

नागपूरची दुर्दशा कुणामुळे?स्मार्ट सिटी म्हणून नागपूरचा गवगवा केला जाताे. मात्र एका पावसाने नागपूर जलमय झाले, पूल पडले, रस्ते खचले याची जबाबदारी महापालिकेवर ढकलली जाते. मात्र सरकारने कुटनीतीने वर्षभरापासून महापालिका बरखास्त केली असून प्रशासन कारभार पाहत आहे. त्यामुळे ही दुर्दशा सरकारचीच जबाबदारी आहे, अशी टीका अंधारे यांनी केली. मुंबई तुंबली तेव्हा फाेटाे काढणाऱ्या अमृताताईंनी आता सेल्फी का नाही काढला, असा कटाक्ष त्यांनी केला. नागपूरच नाही तर राज्यात क्राईम रेट वाढला असल्याची टीकाही त्यांनी केली.

टॅग्स :Sushma Andhareसुषमा अंधारेnagpurनागपूर