शहरं
Join us  
Trending Stories
1
बिजापूरमध्ये सुरक्षा दलांची मोठी कारवाई, १७ लाख रुपयांचे बक्षीस असलेले ४ नक्षलवादी ठार
2
Raigad Boat Capsized: रायगडमध्ये मासेमारीसाठी गेलेली बोट समुद्रात बुडाली, ५ जणांनी नऊ तास पोहून समुद्रकिनारा गाठला, ३ जण बेपत्ता!
3
'मी दोन वेळा मरता मरता राहिलोय'; धनंजय मुंडेंनी मन केलं मोकळं; मंत्रि‍पदाबद्दलही बोलले
4
IND vs PAK : भारतीय सेनेचा अभिमान वाटतो, ही फक्त नौटंकी होती का? सोशल मीडियावर BCCI विरोधात संतप्त प्रतिक्रिया
5
Pune Rave Party Crime : रेव्ह पार्टीपूर्वी पुण्यातील या दोन ठिकाणी झाल्या पार्ट्या; नेमकं काय घडलं ?
6
सलमानच्या Ex गर्लफ्रेंडचे आदित्य पांचोली यांच्यावर गंभीर आरोप, म्हणाली- "तुम्ही महिलांना फसवता, त्यांना मारहाण करता..."
7
शेअर बाजारात टाटा-अंबानींना मोठा धक्का! टॉप १० पैकी ६ कंपन्यांचे २.२२ लाख कोटींचे नुकनान; मग कमावले कोणी?
8
पैशाच्या कारणावरून वाद, म्हाडा अधिकाऱ्याच्या पत्नीनं आयुष्यच संपवलं, अंधेरीतील घटना!
9
Video: हिमाचल प्रदेशातील पर्यटनस्थळी भारतीयांनी केला कचरा; परदेशी नागरिकाने केली सफाई
10
"उद्धव ठाकरेंच्या वाढदिवशी असं गिफ्ट..."; पुणे रेव्ह पार्टीवरून भाजपाचा 'मविआ'ला खोचक टोला
11
IND vs ENG: इंग्लंडच्या गोलंदाजावर 'बॉल टॅम्परिंग'चा आरोप, 'त्या' कृतीमुळे चर्चा, VIDEO व्हायरल
12
कोट्यवधींचा व्यवसाय सोडून जपानी अब्जाधीश बनला शिवभक्त! एका रात्री स्वप्नात... आणि संपूर्ण आयुष्य बदललं
13
Mansa Devi Stampede: गुदमरून टाकणारी गर्दी, एक अफवा अन्...; चेंगराचेंगरीपूर्वीचा व्हिडीओ आला समोर 
14
अनुष्का शर्माचा 'चकदा एक्सप्रेस' झाला डबाबंद? सिनेमातील अभिनेत्यानेच दिली प्रतिक्रिया, म्हणाला...
15
Roshni Walia : "कधीकधी काही लोक...", वडिलांनी सोडली आईची साथ, नातेवाईकांनी दिला शाप, अभिनेत्री भावुक
16
मोहम्मद मुइझ्झूंचा चीनला धक्का; भारतासोबत मुक्त व्यापार करार करण्याची व्यक्त केली इच्छा...
17
श्रावण विनायक चतुर्थी: दूर्वागणपती व्रत का करतात? वाचा, बाप्पाला प्रिय अमृतासमान दुर्वा कथा
18
यापेक्षा चांगली संधी मिळणार नाही; ही कंपनी आपल्या कारवर देतेय १ लाख रुपयांची सूट
19
कुठे गेला 'श्वास'मधला चिमुकला 'परश्या'? २९ वर्षीय तरुणाने आता धरली वेगळीच वाट

बुबुळासाठी आता दात्याची वाट पाहणयची गरज नाही, कृत्रिम बुबुळाने पहाता येईल जग

By सुमेध वाघमार | Updated: August 24, 2023 17:38 IST

मेडिकलचा नेत्ररोग विभागात नेत्रदान पंधरवडा

नागपूर : भारतात बुबुळच्या दोषामुळे अंध झालेल्या लोकांची संख्या १ लाख २० हजार इतकी आहे. दरवर्षी यात २५ ते ३० हजार नव्या रुग्णांची भर पडते. मरणोत्तर नेत्रदानाने ही संख्या कमी करणे शक्य असलेतरी वर्षाला बुबुळ प्रत्यारोपणाची संख्या केवळी ३० ते ४० हजार आहे. यावर पर्याय म्हणून कृत्रिम बुबुळ प्रत्यारोपणाला सुरुवात झाली आहे. हा प्राथमिक टप्पा असल्याने ते खर्चिक व यशस्वतीचे प्रमाण २५ टक्केच आहे, अशी माहिती मेडिकलच्या नेत्ररोग विभागाचे प्राध्यापक डॉ. अशोक मदान यांनी दिली.

शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयाच्या (मेडिकल) नेत्ररोग विभागाच्यावतीने नेत्रदानाच्या जनजागृतीसाठी २५ ऑगस्ट ते ८ सप्टेंबर हा कालावधी ‘नेत्रदान पंधरवडा’ म्हणून साजरा केला जात आहे. याची माहिती देण्यासाठी आयोजित पत्रपरिषदेत ते बोलत होते. यावेळी नेत्ररोग विभागाच्या प्रमुख डॉ. मिनल व्यवहारे, डॉ. कविता धाबर्डे व डॉ. निलेश गादेवार उपस्थित होते.

- नैसर्गिक बुबुळ प्रत्यारोपणाचा दर ७५ टक्के

देशात कॉर्निया म्हणजे बुबुळ प्रत्यारोपणासाठी मोठी प्रतीक्षा यादी आहे. बुबुळाच्या दानाने यांच्या जीवनातील प्रकाश परत येऊ शकतो, परंतु मागणीच्या तुलनेत ५० टक्केही बुबुळ दान होत नाही. यामुळे कृत्रिम बुबुळ हा पर्याय पुढे आला आहे. परंतु याला मर्यादा आहेत. कृत्रिम बुबुळाच्या तुलनेत नैसर्गिक बुबुळ प्रत्यारोपण कधीही चांगले असून याचा यशस्वीतेचा दर ७५ टक्क्यांपेक्षा अधिक आहे.

- बुबुळच्या दोषामुळे अंधत्व येण्याचे प्रमाण २४ टक्के

डॉ. मदान म्हणाले,  भारतात बुबुळच्या दोषामुळे अंधत्व येण्याचे प्रमाण २४ टक्के आहे. यात मोतीबिंदुमुळे ६६.२ टक्के, मोतीबिंदुमधील शस्त्रक्रियेत गुंतागुंत निर्माण झाल्यास ७.२ टक्के, वाढत्या वायामुळे ५.९ टक्के तर काचबिंदुमुळे ५.५ टक्केअंधत्व येण्याचे प्रमाण आहे.

टॅग्स :Healthआरोग्यnagpurनागपूर