शहरं
Join us  
Trending Stories
1
पाण्यानंतर आता मेडिसीनसाठीही तरसणार पाकिस्तान? आपत्कालीन परिस्थिती टाळण्यासाठी तयारीला लागलं फार्मा सेक्टर
2
'झेलम'ला अचाकच पूर आला, पाकिस्तानात एकच गोंधळ उडाला; पाक मीडियानं भारतावर मोठा आरोप केला! नेमकं काय घडलं?
3
पर्यटकाच्या व्हिडिओमध्ये कैद झाले दहशतवादी...? देहूरोड येथील सामाजिक कार्यकर्त्याचा दावा
4
चोपड्यात थरार...! प्रेमविवाह केलेल्या मुलीला बापानेच गोळी झाडून संपवलं, जावई जखमी  
5
"...तर आपल्या प्रजेचं रक्षण करणं हा राजाचा धर्म! लोक लक्षात ठेवतील"; मोहन भागवत स्पष्टच बोलले
6
अंबाला गावात लग्नाच्या जेवणातून विषबाधा; आठ वर्षीय बालकाचा मृत्यू, अनेकांची प्रकृती चिंताजनक
7
पाकिस्ताननं बांगलादेशात तैनात केले फायटर जेट? PAK पत्रकाराचा मोठा दावा; म्हणाला, यावेळी...
8
Pahalgam Terror Attack: मोठाच पेचप्रसंग! ‘त्या’ महिला आता पाकिस्तानात जाऊ शकत नाहीत; नेमका काय आहे ‘लाँग टर्म व्हिसा’?
9
सर्वार्थ सिद्धी योगात चैत्र अमावास्या: १० राशींवर धनलक्ष्मीची कृपा, लाभच लाभ; भरघोस भरभराट!
10
सिंधूच्या पाण्याचा एक थेंबही पाकिस्तानात जाणार नाही...! पण एवढं पाणी भारत कसं वापरणार? ३ पर्यायांवर होतोय विचार
11
Prabhsimran Singh ची कडक फटकेबाजी; नरेनच्या गोलंदाजीवर 'उलटा' फटका मारला अन्... (VIDEO)
12
Devendra Fadnavis: ४८ तासात पाकिस्तानी लोकांनी देश न सोडल्यास कारवाई करण्यात येणार; मुख्यमंत्र्यांचा इशारा
13
CM पदाबाबत आता खुद्द फडणवीसांनी मनातील इच्छा बोलून दाखवली; बावनकुळेंच्या विधानावर म्हणाले...
14
"एकनाथ शिंदेनी मला पुन्हा जिवंत केलं, कधीच शिवसेना सोडणार नाही"; निलेश राणेंचे विधान
15
दहशतवाद्यांचे कंबरडे मोडण्याची तयारी, अनंतनागमधून १७५ जण ताब्यात, लष्कराची मोठी कारवाई
16
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
17
VIDEO: सीमेवर युद्धाची तयारी? लोकांकडून जमिनीखालील सरकारी तळघरांची साफसफाई
18
पहलगाम हल्ला: पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेणे हाच पर्याय!; ठाकरे गटाची स्वाक्षरी मोहीम
19
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार
20
कधी सारा, कधी अनन्या, अनेक अभिनेत्रींसोबत जोडलं गेलं नाव, शुभमन गिल म्हणतो, "मागच्या ३ वर्षांपासून मी…”  

निधी खर्च करा, अन्यथा कारवाई; पालकमंत्री राऊत यांचा इशारा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 31, 2021 14:27 IST

विकास कामासाठी प्राप्त झालेला संपूर्ण निधी खर्च करण्याची जबाबदारी विभाग प्रमुखांची आहे. ३१ मार्चपूर्वी मंजूर निधी खर्च होईल त्या दृष्टीने नियोजन करा, अशा सूचना पालकमंत्री नितीन राऊत यांनी दिल्या.

ठळक मुद्दे५०.५६ टक्केच निधी खर्च

नागपूर : जिल्हा नियोजन समितीला वितरित करण्यात आलेला संपूर्ण निधी खर्च न करणाऱ्या अधिकाऱ्यांवर कारवाई केली जाईल, असा इशारा पालकमंत्री नितीन राऊत यांनी जिल्हा नियोजन समितीच्या बैठकीत दिला.

गुरुवारी झालेल्या बैठकीत सन २०२२-२३ साठी सादर करण्यात आलेल्या ९९५.३८ कोटी रुपयांच्या प्रस्तावावर चर्चा झाली. राज्य सरकारने ४५८.२५ कोटी रुपयांची मर्यादा निश्चित केली आहे. मात्र, बैठकीत ४९७.१३ कोटी रुपयांची अतिरिक्त मागणी करण्यात आली. सद्य:स्थितीत वितरित करण्यात आलेल्या निधीपैकी ५०.५६ टक्केच निधी खर्च झाला आहे. हा निधी मार्च २०२२ पर्यंत कोणत्याही परिस्थितीत खर्च करण्याच्या सूचना देण्यात आल्या.

कंत्राटदारांवर लक्ष ठेवण्यासाठी समिती

काही कामाचे कंत्राट हे ३० टक्के खाली दरावर गेले आहेत. त्यावर पालकमंत्री राऊत यांनी चिंता व्यक्त करत याचा गुणवत्तेवर परिणाम होत असल्याचे सांगितले. काही कंत्राटदारांना याच कारणामुळे काळ्या यादीत टाकण्यात आले असून संबंधितांवर लक्ष ठेवण्यासाठी जिल्हाधिकाऱ्यांच्या नेतृत्वाखाली समिती नेमण्यात आली आहे, असेही त्यांनी सांगितले.

वीजवाहिनी भूमिगत करण्यासाठी ३५० कोटी

- शहरातील वीजलाईन भूमिगत करण्याच्या निर्णय घेण्यात आला. यासाठी ३५० कोटी खर्च केले जातील. यासंबंधीच्या महावितरणच्या प्रस्तावाला राज्य विद्युत नियामक आयोगाने मंजुरी दिली आहे.

ओमायक्रॉनसाठी स्वतंत्र वॉर्ड

- ओमायक्रॉनबाधितांची वाढती संख्या लक्षात घेता उपचारासाठी स्वतंत्र वॉर्ड तयार करण्याचे आदेश पालकमंत्र्यांनी दिले. मेयो-मेडिकलमध्ये कोविड नियंत्रणासाठी उत्तम काम झाल्याचा दावा करत नागरिकांनी अधिक सतर्क राहून नियमांचे पालन करण्याचे आवाहन त्यांनी केले.

टॅग्स :GovernmentसरकारPoliticsराजकारणfundsनिधीNitin Rautनितीन राऊतSunil Kedarसुनील केदार