शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Rain Alert: रेड अलर्ट! महाराष्ट्रातील 'या' जिल्ह्यांना अत्यंत मुसळधार पावसाचा इशारा
2
Lufthansa Flight : 'Lufthansa'च्या विमानाला हैदराबादमध्ये उतरण्याची परवानगी नाकारली, जर्मनीला परतलं; नेमकं प्रकरण काय?
3
Mumbai: गिरगावमध्ये रस्त्याला भगदाड, बेस्ट बस पाच फूट खोल खड्यात, व्हिडीओ बघा
4
डोनाल्ड ट्रम्प यांनी वर्षभरात कमावले ₹५,१०० कोटी, कुठून आला त्यांच्याकडे इतका पैसा?
5
माकडाच्या हाती लागलं नोटांचं बंडल, झाडावर चढून केली ५००-५०० रुपयांच्या नोटांची उधळण, व्हिडीओ व्हायरल
6
इराण-इस्रायल संघर्षामुळे पाकिस्तानवर रडण्याची वेळ! पेट्रोल-डिझेलचे भाव भडकले, काय आहेत दर?
7
तुमच्या अनुभवाचा राज्याला काय उपयोग? कुंडमाळा पूल दुर्घटनेवरुन राज ठाकरेंचा सत्ताधाऱ्यांना सवाल
8
Ritual: अकाली मृत्यू येऊ नये म्हणून रोज झोपण्यापूर्वी करा 'ही' दोन ओळींची प्रार्थना!
9
आमदार, खासदार विकत घ्यायला पैसे आहेत पूल बांधायला नाही? मावळ दुर्घटनेवरुन राऊतांचा सवाल
10
Post Office च्या 'या' स्कीममध्ये हवी तितकी खाती उघडू शकता, हमी परताव्यासह मिळेल Tax मध्येही सूट
11
इंग्लंडविरूद्धच्या टेस्टसाठी शार्दुल ठाकूरला 'प्लेइंग ११'मध्ये संधीची शक्यता, 'या' खेळाडूला डच्चू?
12
Uddhav Thackeray: विधानसभेची चूक पुन्हा करू नका, उद्धव ठाकरेंचा शाखाप्रमुखांना दम!
13
Israel-Iran War : भारताला अडकवण्याचा प्रयत्न करणारा चीनच स्वत:च अडकला, इस्रायलच्या इराणवरील हल्ल्यानं ड्रॅगनलाही फटका
14
"आई कुठे काय करते मला सोडायची नव्हती पण...", संजनाची भूमिका साकारलेल्या दिपाली पानसरेने सांगितलं नेमकं कारण
15
"मंत्रालयातून उडी मारावी लागेल अशी वेळ.."; ज्येष्ठ मराठी अभिनेत्याची बिकट अवस्था, म्हणाला- "वय झाल्यामुळे.."
16
तुमचा पैसा तयार ठेवा! 'या' आठवड्यात ६ नवे IPO बाजारात, बंपर कमाईची संधी?
17
Navi Mumbai Suicide: १२ हजार रुपयांत संपूर्ण कुटुंबाचा खर्च चालवायचा कसा? तरुणीने संपवले जीवन
18
Air India Plane Crash: चित्रपट निर्माता बेपत्ता! विमान पडलेल्या ठिकाणाजवळ मोबाइलचं शेवटचं लोकेशन
19
१०-१५ हजारांत संसाराचा गाडा हाकायचा कसा? राज्यातील शिक्षणसेवकांचा सवाल
20
विशेष लेख: हवाई सुरक्षेबाबत भारत इतका मागास का?

नव्या सरकारसमोर असेल आर्थिक आव्हानांचा मोठा डोंगर

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 9, 2019 06:58 IST

देशात दोन आठवड्यांनी स्थापन होणाऱ्या नव्या सरकारपुढे आठ मोठ्या आर्थिक आव्हानांचा डोंगर उभा असेल. पाच वर्षांत मोदी सरकारने काही तरी नवे करून दाखविताना अर्थव्यवस्थेच्या मुळावर अनवधानाने आघात केले आहेत.

- सोपान पांढरीपांडेनागपूर - देशात दोन आठवड्यांनी स्थापन होणाऱ्या नव्या सरकारपुढे आठ मोठ्या आर्थिक आव्हानांचा डोंगर उभा असेल. पाच वर्षांत मोदी सरकारने काही तरी नवे करून दाखविताना अर्थव्यवस्थेच्या मुळावर अनवधानाने आघात केले आहेत. नोटाबंदीचा निर्णयही आर्थिक मंदीसाठी कारणीभूत ठरला आहे.सरकारपुढे जी आव्हाने असतील, त्यात रोजगार निर्मिती हे प्रमुख असेल. नॅशनल सॅम्पल सर्व्हेनुसार बेरोजगारीचा दर ६.१० टक्के झाला आहे. याचा अर्थ, १३० कोटी लोकसंख्येत ७.८० कोटी बेरोजगार आहेत. हा ४५ वर्षांतील उच्चांक आहे. औद्योगिक मंदीत त्यांना रोजगार देणे, हे सर्वात मोठे आव्हान असेल.औद्योगिक उत्पादन निर्देशांक यूपीए सरकारच्या काळात ९ ते १२ टक्के दराने वाढत होता. एनडीएच्या पाच वर्षांत दरवाढ २ ते ५ टक्क्यांवर आली. औद्योगिक उत्पादन घटल्याने अर्थव्यवस्था मंदावली आहे. त्यासाठी हा दर वाढविणे, हे दुसरे आव्हान आहे.यूपीए सरकारने कृषी उत्पादन वाढीचे लक्ष्य ४ टक्के ठेवले होते; पण ते प्रत्यक्षात २.५० ते ३.७५ टक्क्याने वाढले. एनडीएच्या काळात हा दर सरासरी दीड टक्क्यावर आला. त्यामुळे ग्रामीण अर्थव्यवस्था बळकट करण्यासाठी कृषी उत्पादनाचा दर वाढविणे, हेही आव्हान असेल.देशात सेवा क्षेत्राचा जीडीपीमधील वाटा ५० ते ६० टक्क्यांच्या दरम्यान असतो व त्यामुळे रोजगार निर्मिती होत असते. यूपीएच्या काळात सेवा क्षेत्र वाढीचा दर १० ते १२ टक्क्यांदरम्यान होता. एनडीएच्या काळात ही दरवाढ ९ ते १० टक्क्यांवर आली आहे. ती वाढविण्यासाठी जीएसटीत बदल करणे वत्याचा एक दर निश्चित करणे, हेही आव्हान असेल.गेल्या पाच वर्षांत सरकारने सार्वजनिक उद्योगाचा नफा दुसºया सरकारी कंपन्यांच्या मदतीसाठी वापरला. ओएनजीसीचा राखीव निधी ९,५०० कोटीवरून १६७ कोटी इतका झाला. सरकारी बँकांच्या कर्जवसुलीत ढिलाई केल्यामुळे थकीत कर्ज ९.५० लाख कोटीवर पोहोचले आहे. सार्वजनिक उद्योगांना आर्थिक मदत देणे व थकीत कर्ज वसूल करणे, हे सरकारसाठी आव्हान असेल.आयात-निर्यात व्यापारातील फरक म्हणजे निर्यातीपेक्षा आयात किती जास्त आहे, याला चालू खात्याची तूट म्हणतात. सध्या ही तूट जीडीपीच्या ३.५० टक्के म्हणजे तब्बल ८.४० लाख कोटी झाली आहे. ती सांभाळता येईल अशी २ टक्क्यांवर आणणे, हेही आव्हान असेल.केंद्र सरकारने फिस्कल रिस्पॉन्सिबीलिटी अ‍ॅण्ड बजेट मॅनेजमेंट (एफआरबीएम) अ‍ॅक्टमध्ये अर्थसंकल्पीय तूट जीडीपीच्या ३.५० टक्के असावी, असा निर्णय घेतला. सध्या केंद्र व राज्य सरकारे मिळून ही तूट जीडीपीच्या ७ टक्के म्हणजे १६.८० लाख कोटी झाली आहे. देशाचा अर्थसंकल्प यावर्षी ३० ते ३२ लाख कोटीचा असण्याची शक्यता आहे. हे पाहता हे किती मोठे आव्हान आहे, ते लक्षात यावे.गेल्या पाच वर्षांत जीडीपी वाढीचा दर अस्थिर झाला आहे. सन २०१६-१७ साली हा दर ८.२० टक्के होता तो २०१८-१९ मध्ये ७ टक्के झाला व २०१९-२० साली ६.५० टक्क्यांवर येण्याची शक्यता आहे. त्यामुळे जीडीपी वाढीचा दर स्थिर करणे, हेही मोठे आव्हान नव्या सरकारपुढे असेल.पंतप्रधान कुणी असोविद्यमान पंतप्रधान नरेंद्र मोदी, राहुल गांधी, शरद पवार, मुलायम सिंह, मायावती, नितीश कुमार, ममता बॅनर्जी यापैकी कुणीही पंतप्रधान झाले, तरी नव्या पंतप्रधानांना या आर्थिक आव्हानांना सामोरे जावेच लागेल, हे नक्की! 

टॅग्स :GovernmentसरकारLok Sabha Election 2019लोकसभा निवडणूक