शहरं
Join us  
Trending Stories
1
श्रीनगरमध्ये जप्त केलेल्या स्फोटकांचा स्फोट, ९ जणांचा मृत्यू; दिल्ली कनेक्शनच्या चौकशीदरम्यान ब्लास्ट
2
भाजप बनला सर्वांत मोठा पक्ष, तरी नितीश कुमार दहाव्यांदा मुख्यमंत्री? डावलणे अशक्य, हे आहे कारण
3
एनडीएच्याच गळ्यात पुन्हा विजयाचा (बि)हार; अब की बार... २०० पार; महाआघाडीचा फ्लाॅप शो; भाजप प्रथमच नंबर १
4
'फर्स्ट पास्ट द पोस्ट'चा धक्का; राजदच्या मतांची टक्केवारी भाजपपेक्षा अधिक; पण पराभूत
5
आजचे राशीभविष्य,१५ नोव्हेंबर २०२५: मित्रांसाठी खर्च करावा लागण्याची शक्यता; शक्यतो आज बौद्धिक चर्चा टाळा
6
पाच मुद्द्यांमधून जाणून घ्या एनडीएचा विजय आणि महाआघाडीच्या पराजयाची कारणे...
7
मेगाब्लॉक, जम्बोब्लॉकमुळे रेल्वेच्या तिन्ही मार्गांवर उद्या होणार प्रवास खोळंबा
8
बीबीसीने मागितली अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांची माफी
9
बिहारच्या विजयाने स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांत सत्ताधारी महायुतीला बळ ! मतचोरीचे आरोप चालले नाहीत
10
मुंबईत राहून मिळत आहे माथेरानच्या थंडीचा आनंद, पारा १८ अंशांवर; तापमान १६ अंशांवर उतरणार?
11
बिहारप्रमाणे पश्चिम बंगालमधील ‘जंगलराज’ हटवणारच, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी व्यक्त केला निर्धार
12
लोका सांगे ब्रह्मज्ञान, स्वतः कोरडे पाषाण; प्रशांत किशोर यांच्या ‘जन सुराज’ला भोपळा
13
ऑफलाइनही भरता येणार उमेदवारी अर्ज
14
डाळी, भाज्या, इंधनामुळे येऊ लागले स्वस्ताईचे दिवस, घाऊक महागाई घटून उणे १.२१ टक्क्यावर; २७ महिन्यांचा गाठला नीचांक
15
दुर्बल लोकांविरुद्ध गुन्हा करणाऱ्यांना दया नाही, विशेष पॉक्सो न्यायालयाने सुनावले; तरुणाला १० वर्षांची शिक्षा
16
शिल्पकार राम सुतार यांच्या माध्यमातून जगभरात भारताचा लौकिक, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे कौतुकौद्गगार
17
कैमूरमध्ये मतमोजणीदरम्यान मोठा हिंसाचार; पोलिसांचा लाठीचार्ज, दगडफेकीत ३ पोलीस जखमी, स्कॉर्पिओ जाळली
18
तिरंदाजी: अंकिता भकत, धीरज बोम्मादेवराने पटकावली सुवर्णपदके
19
मुंबई विद्यापीठाच्या प्राध्यापकांचे १७ नोव्हेंबरपासून आंदोलन
20
कोपरगावजवळ भीषण अपघात; लक्झरी बसच्या धडकेत कार जळून खाक, चालकाचा जागीच मृत्यू
Daily Top 2Weekly Top 5

नागपूर विमानतळाजवळील २२ इमारतींवर संक्रांत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 2, 2019 10:50 IST

डॉ. बाबासाहेब आंबेडकर आंतरराष्ट्रीय विमानतळाजवळील २२ इमारतींना एअरपोर्ट अथॉरिटी ऑफ इंडियाने (एएआय) सन २०१५ पर्यंत दिलेले ना हरकत प्रमाणपत्र आता विमानतळाचे संचालन करणाऱ्या मिहान इंडिया लिमिटेडने (एमआयएल) परत मागितले आहे.

ठळक मुद्देएमआयएलची नोटीसएएआय अधिकाऱ्यांचे मौनजिओग्राफिकल सर्वेक्षणात त्रुटी

वसीम कुरैशी ।लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : डॉ. बाबासाहेब आंबेडकर आंतरराष्ट्रीय विमानतळाजवळील २२ इमारतींना एअरपोर्ट अथॉरिटी ऑफ इंडियाने (एएआय) सन २०१५ पर्यंत दिलेले ना हरकत प्रमाणपत्र आता विमानतळाचे संचालन करणाऱ्या मिहान इंडिया लिमिटेडने (एमआयएल) परत मागितले आहे. या संदर्भात एमआयएलने संबंधित इमारतींचे बिल्डर आणि सोसायटीच्या सचिवांना नोटिसा दिल्या आहेत.सन २०१८ मध्य नागरी उड्ड्यण मंत्रालयाची अधिसूचना आणि नवीन कायदा जीएसआर ७५१ (ई) अंतर्गत विमानतळ ऑपरेटरला एरोनॉटिकल ऑब्स्टिकल्सचे नियंत्रण करण्याची जबाबदारी दिली होती. यासह विमानांचे ये-जा होताना प्रभावित करणाऱ्या इमारतींच्या एनओसीच्या संदर्भात नवीन निर्देश जारी केले होते. उंचीची काही मर्यादा वाढविली होती. या संदर्भात एएआयने वर्कशॉप आणि एमआयएलने जागरुकता कार्यक्रम राबविले होते. त्यानंतर एमआयएलने मान्यताप्राप्त एजन्सीकडून इमारतींचे सर्वेक्षण केले होते.त्यांच्या अहवालाद्वारे या इमारतींना नोटीस जारी करण्यात येत आहे.एअरपोर्ट सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार एएआयने सन २०१५ पर्यंत एनओसी दिली आणि १ जानेवारी २०१६ ला एमआयएलला सांगितले की आता या कामाची जबाबदारी त्यांची आहे. एनओसी जारी करणे आणि रद्द करण्याची जबाबदारी एएआयची आहे, पण त्याची निगराणी विमानतळ ऑपरेटर करेल, असे कायद्यात स्पष्ट केले आहे. खासगीकरणानंतर या प्रकरणी नव्याने वाद उद्भवू शकतो. नोटीस दिलेल्या इमारती हिंगणा आणि सोनेगांव परिसरात आहे. यामध्ये तीन निर्माणाधीन आणि तीन जुन्या आहेत. पूर्वी सहा इमारतींना नोटीस देण्यात आले आहे तर १० इमारतींची एनओसी रद्द करण्यात आली आहे. पूर्वी कारवाई करण्यात आलेल्या विमानतळासमोरील प्रोझोन पाम इमारतींचे संचालक दुसऱ्यांदा नागरी उड्डयण मंत्रालयाकडे अपील करण्याच्या तयारीत आहे. तर जयताळा येथील ‘रेणुका एन्क्लेव्ह’चे बिल्डर अपील करणार आहे.

नवीन प्रकरणात त्रुटीजबाबदारी मिळाल्यानंतर आणि सर्वेक्षण केल्यानंतर एमआयएलची चमू सर्वेक्षणात सहभागी इमारतींच्या तपासणीसाठी साईटवर जात आहे. तपासणीत डीजीपीएस व टॉटल स्टेशन उपकरणांच्या माध्यमातून सत्यस्थिती पाहत आहे. पूर्वी कशाप्रकारच्या सर्वेक्षण अहवालाला मान्यता देण्यात आली आणि एनओसी देण्यात आली, यावर प्रश्नचिन्ह उभे राहिले आहे. या संदर्भात एएआयच्या विमानतळ संचालकांसोबत संपर्क होऊ शकला नाही. आता नव्याने एनओसी मंजूर करण्यासाठी ऑब्स्टिकल मॉनिटरिंग ग्रुप तयार केला आहे. यामध्ये एएआयसह एमआयएल आणि अन्य एजन्सीचा समावेश आहे.

शुल्काच्या भागीदारीवरून होणार वादविमातळाच्या सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार एमआयएल साईटवर जाऊन तपासणी करीत असल्यामुळे एनओसीकरिता मिळणाऱ्या शुल्कात एमआयएल भागीदारी मागू शकते. खासगी भागीदार आल्यानंतर नवीन वाद उद्भवण्याची शक्यता आहे.

टॅग्स :Dr. Babasaheb Ambedkar International Airportडॉ. बाबासाहेब आंबेडकर आंतरराष्ट्रीय विमानतळ नागपूर