शहरं
Join us  
Trending Stories
1
वऱ्हाडाचा टेम्पो उलटला, एक ठार, २५ जखमी; अहमदपूर तालुक्यातील घटना
2
भारतानं PoK ताब्यात घ्यावा, तेथील जनतेचीच इच्छा; आता केव्हाही आत घुसू शकतो 'हिंदुस्तान', शाहबाज यांचा खेळ फसला!
3
भिवंडीत खासगी बसला अपघात; आठ वर्षांच्या मुलीचा मृत्यू, १० ते १२ जण जखमी
4
सुरक्षेत त्रुटी, गृहमंत्री राजीनामा देणार का? पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेसचे सरकारला 6 प्रश्न...
5
भारताच्या कारवाईनं पाकिस्तान घाबरला; मित्र देशांकडे मदत मागायला गेला, मिळाला मोठा झटका!
6
पत्नीला प्रियकरासोबत नको त्या अवस्थेत बघितलं, पतीनं १० दिवसांनंतर टोकाचं पाऊल उचललं; मग मेहुणीला केला फोन अन्... 
7
"काश्मीर सुरक्षित नाही हे पहलगाम हल्ल्यानंतर समोर आलं"; जयंत पाटलांचा केंद्र सरकारवर निशाणा
8
२०८० पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री राहिले तरीही आम्हाला अडचण नाही- रामदास कदम
9
अखेर निर्णय झाला! सिंधू पाणी करार स्थगित, पाकिस्तानला एक थेंबही पाणी मिळणार नाही...
10
CSK च्या बालेकिल्ल्यात १७ वर्षांनी 'सूर्योदय'! SRH नं 'करो वा मरो' प्रवासातील पहिली लढाई जिंकली
11
'हिंसाचार पसरवण्यासाठी वारंवार धर्माचा वापर…'; पहलगाम हल्ल्यानं व्यथित बंगाली शिक्षकानं इस्लाम सोडला
12
वैष्णवीदेवीचे तिकीट न मिळाल्याने काही तास अधीच पहलगाम साेडले, पुण्यात पोहोचल्यावर हल्ल्याचे वृत्त धडकले...!
13
“२०३४ पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री असतील”; चंद्रशेखर बावनकुळे यांचे मोठे भाकित
14
पहलगाम हल्ला: २३२ प्रवाशांना घेऊन तिसरे विमान महाराष्ट्रात! आतापर्यंत ८०० प्रवासी सुखरूप परत
15
पहलगाम हल्ल्याचा राग काढला; लातूरची लेक ज्योती पवारने पाकिस्तानचा धुव्वा उडवला..!!
16
अमरावती: १५ वर्षीय मुलीची किडनी 'फेल', वडिलांनी लेकीसाठी केली किडनी दान; शस्त्रक्रिया यशस्वी!
17
देश दु:खात असताना सत्कार करून घ्यायला भाजप नेत्यांना लाज कशी वाटत नाही?- अतुल लोंढे
18
मासेमारीला कृषीचा दर्जा देण्याचा फार काही फायदा नाही, योजना फसवीच- काँग्रेसची टीका
19
पहलगाम हल्ला: अमेरिकेचा मोठा निर्णय, गुप्तचर यंत्रणेने दिली गॅरंटी; भारताला खंबीर समर्थन
20
पहलगाम हल्ल्यातील संशयित खेचरवाला ताब्यात; याने विचारलेला धर्म, महिला पर्यटकाचा दावा

सांगली व भिवंडीवरून पटोले यांची नाराजी, आघाडीचा धर्म वरिष्ठ नेत्यांकडूनही पाळला जात नाही

By कमलेश वानखेडे | Updated: April 5, 2024 16:08 IST

महाविकास आघाडीचा धर्म वरिष्ठ नेत्यांकडूनंही पाळला जात नाही, अशी नाराजी नाना पटोले यांनी शुक्रवारी नागपुरात पत्रकारांशी बोलताना व्यक्त केली.

नागपूर: सांगली व भिवंडीच्या जागेवर काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी उद्धवसेना व शरद पवार यांच्यावर नाराजी व्यक्त केली आहे. उद्धव सेनेचे नेते सांगलीत चाचपणी करायला गेले, तेथे अवस्था काय आहे हे दिसून आले. इकडे भिवंडीत शरद पवार यांनी उमेदवार जाहीर केला. महाविकास आघाडीचा धर्म वरिष्ठ नेत्यांकडूनंही पाळला जात नाही, अशी नाराजी नाना पटोले यांनी शुक्रवारी नागपुरात पत्रकारांशी बोलताना व्यक्त केली.

पटोले म्हणाले, परवा आमची सरद पराव यांच्याशी बैठक झाली. तेव्हा त्यांना आम्ही सांगितले की विदर्भात आम्ही लाट तयार केली. तुमच्याकडे उमेदवारही नव्हते. तरी आम्ही तुम्हाला जिंकण्याची व्यवस्था केली आहे. सांगली आणि भिवंडीत काही करु नका, नाही तर तिकडे त्याचे परिणाम होतील, असेही आपण पवार यांना त्या बैठकीत सागून आलो आहे. सांगली व भिवंडी या दोन्ही जागेचा प्रस्ताव आम्ही हायकमांडला दिला आहे. हायकमांड त्यासंदर्भात निर्णय घेतील, असेही पटोले यांनी स्पष्ट केले.

या दोन जागांसह मुंबईतील एका जागेचा प्रश्न होता. हा प्रश्न सामोपचाराने सोडवायला हवा होता. पण ते सोडून एकतर्फी उमेदवार जाहिर करणे योग्य नाही. विदर्भात तुम्हाला आम्ही कसं सांभाळून घेतलं. पण पश्चिम महाराष्ट्र आणि कोकण वेगळे आहे. याचा फरक ते समजायला तयार नसतील तर योग्य नाही. या पद्धतीने उमेदवार जाहिर केल्यास कार्यकर्यांमध्ये रोष वाढेल. अजूनही वेळ गेलेली नाही. त्यांनी यावर विचार करावा, असा सल्लाही पटोले यांनी दिला.

वंचितसोबत आघाडी करण्यास तयार

वंचीतसोबत आघाडी करून दोन जागा देण्यास आम्ही तयार आहोत. मी माझा अधिकार वापरून काँग्रेसकडून दोन जागा देण्यास प्रस्ताव दिला आहे. मतविभाजन करु नका अशी विनंती मी त्यांना केली आहे. अकोला येथील आमचा उमेदवार जिंकत आहे. तरीही प्रस्ताव दिला आहे. माझ्या अपमानापेक्षा लोकशाही महत्त्वाची आहे. मी पण मागास, ओबीसी आहे, असेही पटोले म्हणाले. 

टॅग्स :Nana Patoleनाना पटोलेlok sabha election 2024लोकसभा निवडणूक २०२४nagpurनागपूर