शहरं
Join us  
Trending Stories
1
भारताविरोधात बायो केमिकल शस्त्राचा वापर; गुजरातच्या दहशतवाद्याकडून 'रिसिन' जप्त, किती खतरनाक?
2
कोण आहे डॉक्टर आदिल अहमद राठर? ज्याच्या खुलाशातून जप्तकरण्यात आली 350 किलो स्फोटकं अन् AK-47
3
हाफिज सईदबाबत मोठी माहिती समोर आली; ऑपरेशन सिंदूरनंतर भारतावर नव्या मार्गाने हल्ला करण्याच्या तयारीत...
4
"हे निर्लज्ज लोक तुमच्या यशातही..." गावसकरांनी विश्वविजेत्या लेकींसोबत शेअर केला आपला वाईट अनुभव
5
मनसे-मविआची दिलजमाई! ‘या’ ठिकाणी एकत्र निवडणूक लढणार; नेते म्हणाले, “महायुतीला आता शह...”
6
...म्हणून महामुंबईच्या ९ महापालिका भाजपला हव्यात
7
Video - अबब! थारमधून नोटांचा पाऊस, पैसे गोळा करायला लोकांची मोठी झुंबड
8
अनेक ठिकाणी भीषण केमिकल हल्ल्याची योजना; गुजरात ATS ने ISKP संघटनेचा कट उधळला
9
जिओ-एअरटेलमध्ये खळबळ! BSNL लवकरच आपली ५जी सेवा सुरू करणार, 'या' शहरांपासून सुरुवात
10
भूतकाळातील गूढ, थरारक घटना; मराठीतील रहस्यपट 'असंभव'चा ट्रेलर चुकवू नका
11
“मनसे काँग्रेससाठी समविचारी पक्ष नाही, त्यामुळे सोबत घेण्याचा प्रश्नच नाही”; कोणी केला दावा?
12
सर्व गुन्हेगारी प्रवृत्ती थार आणि बुलेटवरच फिरतात; हरियाणाच्या डीजीपींचं खळबळजनक विधान
13
कलंकित अन् काळा भूतकाळ असलेले विश्वास ठेवण्यालायक नाहीत, काँग्रेस-राजद जोडी...! बिहारमध्ये CM योगींची तुफान फटकेबाजी
14
४२ फेऱ्या, ५९ हजार प्रवासी अन् ६.२१ कोटींची कमाई; ‘या’ वंदे भारत ट्रेनची रेकॉर्डब्रेक कामगिरी
15
माली देशात पाच भारतीय नागरिकांचे अपहरण; केंद्र सरकारने दिली महत्वाची माहिती...
16
IND vs SA 1st Test : 'ध्रुव' तारा चमकला! टीम इंडियात ३९ वर्षांनी पहिल्यांदाच असं चित्र दिसणार?
17
Kitchen Hack: गॅस बर्नरवर काळे, चिकट थर जमा झालेत? 'या' दोन वस्तूंनी मिनिटांत करा चकाचक 
18
५०० रुपये उधार घेतले, ११ कोटी जिंकले... भाजीवाल्याला आल्या धमक्या, बंद करावा लागला फोन
19
मोठा अनर्थ टळला! AK 47 ते ३०० किलो RDX जप्त; डॉक्टरच्या मुखवट्यात लपला होता क्रूर दहशतवादी
20
अखंड भारताची 'ही' बॉर्डर, तालिबान-पाकिस्तानच्या वादाचं मूळ कारण; १३२ वर्षांनीही धगधगती आग कायम

सांगली व भिवंडीवरून पटोले यांची नाराजी, आघाडीचा धर्म वरिष्ठ नेत्यांकडूनही पाळला जात नाही

By कमलेश वानखेडे | Updated: April 5, 2024 16:08 IST

महाविकास आघाडीचा धर्म वरिष्ठ नेत्यांकडूनंही पाळला जात नाही, अशी नाराजी नाना पटोले यांनी शुक्रवारी नागपुरात पत्रकारांशी बोलताना व्यक्त केली.

नागपूर: सांगली व भिवंडीच्या जागेवर काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी उद्धवसेना व शरद पवार यांच्यावर नाराजी व्यक्त केली आहे. उद्धव सेनेचे नेते सांगलीत चाचपणी करायला गेले, तेथे अवस्था काय आहे हे दिसून आले. इकडे भिवंडीत शरद पवार यांनी उमेदवार जाहीर केला. महाविकास आघाडीचा धर्म वरिष्ठ नेत्यांकडूनंही पाळला जात नाही, अशी नाराजी नाना पटोले यांनी शुक्रवारी नागपुरात पत्रकारांशी बोलताना व्यक्त केली.

पटोले म्हणाले, परवा आमची सरद पराव यांच्याशी बैठक झाली. तेव्हा त्यांना आम्ही सांगितले की विदर्भात आम्ही लाट तयार केली. तुमच्याकडे उमेदवारही नव्हते. तरी आम्ही तुम्हाला जिंकण्याची व्यवस्था केली आहे. सांगली आणि भिवंडीत काही करु नका, नाही तर तिकडे त्याचे परिणाम होतील, असेही आपण पवार यांना त्या बैठकीत सागून आलो आहे. सांगली व भिवंडी या दोन्ही जागेचा प्रस्ताव आम्ही हायकमांडला दिला आहे. हायकमांड त्यासंदर्भात निर्णय घेतील, असेही पटोले यांनी स्पष्ट केले.

या दोन जागांसह मुंबईतील एका जागेचा प्रश्न होता. हा प्रश्न सामोपचाराने सोडवायला हवा होता. पण ते सोडून एकतर्फी उमेदवार जाहिर करणे योग्य नाही. विदर्भात तुम्हाला आम्ही कसं सांभाळून घेतलं. पण पश्चिम महाराष्ट्र आणि कोकण वेगळे आहे. याचा फरक ते समजायला तयार नसतील तर योग्य नाही. या पद्धतीने उमेदवार जाहिर केल्यास कार्यकर्यांमध्ये रोष वाढेल. अजूनही वेळ गेलेली नाही. त्यांनी यावर विचार करावा, असा सल्लाही पटोले यांनी दिला.

वंचितसोबत आघाडी करण्यास तयार

वंचीतसोबत आघाडी करून दोन जागा देण्यास आम्ही तयार आहोत. मी माझा अधिकार वापरून काँग्रेसकडून दोन जागा देण्यास प्रस्ताव दिला आहे. मतविभाजन करु नका अशी विनंती मी त्यांना केली आहे. अकोला येथील आमचा उमेदवार जिंकत आहे. तरीही प्रस्ताव दिला आहे. माझ्या अपमानापेक्षा लोकशाही महत्त्वाची आहे. मी पण मागास, ओबीसी आहे, असेही पटोले म्हणाले. 

टॅग्स :Nana Patoleनाना पटोलेlok sabha election 2024लोकसभा निवडणूक २०२४nagpurनागपूर