शहरं
Join us  
Trending Stories
1
नगरपरिषद निवडणुकीत नवी समीकरणे; बहुजन विकास आघाडी अन् मनसेची युती होणार? नेते म्हणाले...
2
अंजली दमानियांकडून राजीनाम्याची मागणी; मला योग्य वाटेल ते मी करेन, अजित पवारांची प्रतिक्रिया
3
६ डिसेंबरला करायचा होता स्फोट, पण अटकसत्रामुळे उधळला कट, ‘कार बॉम्ब’ची सुरू होती तयारी, नेटवरून घेतले धडे
4
डरानेवालो को डराओ! 'शिवतीर्थ'समोर बॅनरबाजी; उत्तर भारतीय सेनेने मनसे प्रमुख राज ठाकरेंना डिवचलं
5
KL Rahul: द.आफ्रिकेविरुद्ध केएल राहुल इतिहास रचणार? मोठ्या विक्रमापासून फक्त १५ धावा दूर!
6
पार्थ पवारांच्या कंपनीकडून आणखी एक फसवणूक; जमीन खरेदीचा १४७ कोटींचा नजराणाही बुडवला
7
कर्मचाऱ्यांना दररोज ऑफिसला येण्याचा आदेश, ६०० जणांनी राजीनामा दिला; कंपनीला बसला ₹१,५३५ कोटींचा फटका
8
२० क्विंटल स्फोटकांची खरेदी अन् पैशांवरुन वाद; ४ शहरांमध्ये IED हल्ला करण्याचा होता दहशतवाद्यांचा प्लॅन
9
Share Market Today: Nifty ची सुस्त सुरुवात, सेन्सेक्सच्या ३ दिवसांच्या तेजीवर ब्रेक; IT शेअर्स धडाम
10
दिल्ली कार हल्ल्याचा मास्टरमाईंड डॉ. उमर कुणाकडून घेत होता आदेश? धक्कादायक माहिती आली समोर
11
Groww IPO Listing: Google सारखीच आहे Groww ची कहाणी! एक चूक आणि बनलं ओळखीचं नाव, शेअर बाजारातही केलं अवाक्
12
दिल्ली स्फोटाचे गुपित उघडले; कारमधील मृतदेह डॉ. उमर नबीचाच, DNA रिपोर्ट समोर
13
आजचे राशीभविष्य,१३ नोव्हेंबर २०२५: कामाच्या धावपळीत कुटुंबाकडे दुर्लक्ष; सरकारकडून लाभाची शक्यता
14
'३ इडियट्स'मधील मिलीमीटर पत्नीसोबत दिसला दिल्लीच्या रस्त्यावर, १६ वर्षांनंतर त्याला ओळखणं झालं कठीण
15
“नगरपालिका निवडणुकीत सर्वाधिक जागा लढवण्यावर असेल भर, सत्तेची नाही विचारांची लढाई”: सपकाळ
16
५०० वर्षांनी गुरु-शनिचा शुभ योग: १० राशींना चौफेर चौपट लाभ, समस्या संपतील; पद-पैसा-भाग्योदय!
17
Datta Jayanti 2025: यंदा दत्त जयंती गुरुवारी, अत्यंत शुभ दिवस; पाहा, महत्त्व अन् महात्म्य!
18
वोटचोरीसह सरकार नोकरी चोर निघाले, वर्षाला २ कोटी नोकऱ्या देण्याचे आश्वासनाचे काय?: काँग्रेस
19
FREE मध्ये अपडेट होतंय Aadhaar Card, वर्षभरासाठी माफ झाली फी; पाहा कोणाला मिळणार फायदा?
20
Dharmendra Health Update : "आता सगळं देवाच्या हातात आहे...", धर्मेंद्र यांच्या तब्येतीबाबत बोलताना हेमा मालिनी भावुक, म्हणाल्या- "मुलं रात्रभर..."

१८०० टन ई-वेस्टचे नागपूरच्या पर्यावरणावर संकट

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 18, 2021 04:07 IST

आज विश्व रिसायकल डे निशांत वानखेडे नागपूर : नवनवीन तंत्रज्ञानाच्या संशाेधनाने मानवी जीवन अधिक सुकर केले असले तरी त्यातून ...

आज विश्व रिसायकल डे

निशांत वानखेडे

नागपूर : नवनवीन तंत्रज्ञानाच्या संशाेधनाने मानवी जीवन अधिक सुकर केले असले तरी त्यातून हाेणाऱ्या कितीतरी पटींच्या प्रदूषणाने समस्याही निर्माण केली आहे. आधी प्लॅस्टिकचा कचरा पर्यावरणासाठी डाेकेदुखी ठरली असताना ‘ई-वेस्ट’ म्हणजेच इलेक्ट्राॅनिक्स कचऱ्याने प्रदूषणाच्या समस्येचे विक्राळ रूप धारण केले आहे. माेबाईल व कॉम्प्युटरच्या अविष्काराने माेठी क्रांती केली पण त्यातून निघणारा ई-कचरा अत्याधिक घातक ठरत आहे. भारत जगातील पाचव्या क्रमांकाचा ई-वेस्ट जनरेटर देश आहे. केंद्रीय प्रदूषण नियंत्रण मंडळाच्या सर्वेक्षणानुसार, नागपूर शहरातून दरवर्षी १८०० ते २००० टन ई-कचरा बाहेर पडताे. विदर्भात हा आकडा २५ हजार टनांच्यावर जाण्याची शक्यता असल्याचे जाणकारांचे मत आहे.

उल्लेखनीय म्हणजे हा डेटा केवळ अधिकृतरीत्या गाेळा हाेणाऱ्या कचऱ्याचा आहे आणि ताे केवळ ५ टक्केच आहे. जाणकारांच्या मते, ९५ टक्के ई-वेस्ट एकतर नियमित कचऱ्यासाेबत फेकले जाते किंवा भंगार विक्रेत्यांना विकले जाते. निरुपयाेगी माेबाईल, सिमकार्ड, लॅपटाॅप, डेस्कटाॅप पीसीज, वेगवेगळे गेम्स डिव्हाईस, फॅक्स मशीन्स, अल्ट्रासाऊंड स्पीकर्स, संगणकाशी संबंधित सर्व साहित्य, व्हिडिओ कॅमेरा, टीव्ही, आयपाॅड, एमपी-३ प्लेयर्स, एलसीडी, एलईडी बल्ब, बॅटरी, चार्जर्स, वायर, सर्किट बाेर्ड, केबल बाॅक्सेस, माेटर जनरेटर, माेठ्या प्रमाणात निकामी झालेले लॅन्डलाईन फाेन्स, सिक्युरिटी इक्वीपमेंट्स, वाॅशिंग मशीन्स, रेफ्रीजरेटर्स, एअर कंडिशनर्स असा २०० च्यावर प्रकारचा ई-कचरा दरराेज लाेकांच्या घरातून बाहेर पडताे. गेल्या १० वर्षांत या कचऱ्याचे प्रमाण भरमसाठ वाढले असून त्यावर नियंत्रण मिळविणे अत्यंत कठीण झाले आहे. हा कचरा केवळ नागपूर शहर किंवा भारतासाठी नव्हे तर जगभरासाठी आव्हान ठरला आहे.

रिसायकल हाेते पण अत्यल्प

नागपूर शहरात सुरीटेक्स्ट प्रायव्हेट लिमिटेड कंपनीद्वारे स्वच्छ नागपूरसारख्या एनजीओच्या सहकार्याने ई-वेस्टचे कलेक्शन केले जाते. सुरीटेक्स्टच्या व्यवसाय विभागप्रमुख महिमा सुरी यांनी दिलेल्या माहितीनुसार त्यांना ३६० टन ई-वेस्ट गाेळा करण्याची परवानगी आहे, जी आता वाढून २००० टन करण्यात येईल. मात्र हा केवळ ५ टक्केच आहे. माेठ्या प्रमाणात हा कचरा भंगारात गाेळा केला जाताे व त्यातून मूल्यवान धातू काढून पुढे ताे जाळला किंवा फेकला जाताे. तर काही सामान्य कचऱ्यात फेकला जाताे. जनजागृतीचा अभाव असल्याने हा प्रकार हाेत आहे. हे धाेकादायक असून प्रदूषणाचे घातक परिणाम हाेत आहेत. संस्थेकडे गाेळा हाेणाऱ्या कचऱ्याचे रिसायकलिंग करून इलेक्ट्राॅनिक्स डिव्हाईस म्हणूनच पुनर्निर्मिती केली जात असल्याचे सुरी यांनी स्पष्ट केले.

ई-वेस्ट १० पट घातक

- इलेक्ट्राॅनिक्स कचऱ्यातून शिसे, कॅडमियम, मर्क्युरी, क्राेमियम, बेरियम, बेरिलियम व इतर धाेकादायक कंपाेनंट बाहेर पडतात.

- हा कचरा तसाच जाळल्यास अत्यंत धाेकादायक वायू प्रदूषणास कारणीभूत ठरताे.

- ई-कचऱ्याच्या प्रदूषणामुळे नर्व्हस सिस्टििम, रक्तसंस्था, किडनीचे न बरे हाेणारे आजार हाेतात.

- बालकांची ब्रेन डेव्हलपमेंट थांबते.

- श्वसनाचे व त्वचेचे धाेकादायक आजार हाेतात.

- डीएनए डॅमेज हाेण्याचा अत्याधिक धाेका. हृदय, यकृतावर घातक परिणाम.

- पर्यावरणावर गंभीर परिणाम.