शहरं
Join us  
Trending Stories
1
नाशिकमध्ये महायुतीचा उमेदवार ठरला? शांतीगिरी महाराजांच्या अर्जावर शिंदे शिवसेना असा उल्लेख, अर्ज भरला
2
आता कळेलच की जनता कोणासोबत, असली कोण आणि नकली कोण; गजानन कीर्तीकरांचे वक्तव्य
3
“औरंगजेब-याकुबचा उदो उदो करण्यापेक्षा रामराम करणे कधीही चांगले”; बावनकुळेंची ठाकरेंवर टीका
4
Rahul Gandhi : "कोणत्याही महिलेला मंगळसूत्र गहाण ठेवावं लागणार नाही"; राहुल गांधींचं 25 लाखांचं आश्वासन
5
आईवडिलांच्या घटस्फोटावर पहिल्यांदाच व्यक्त झाली क्षिती जोग, म्हणाली, "मला आनंद झाला..."
6
"मोदींनी छत्रपतींचे विचार आत्मसात केले", उदयनराजेंनी सांगितलं 'पॉलिवूड', मोठ्या चुकीची कबुली
7
काँग्रेसला दुसरा धक्का: उमेदवाराने ऐनवेळी अर्ज मागे घेत भाजपमध्ये केला प्रवेश
8
“देशात परिस्थिती बदलली, भाजपाविरोधी लाट, महायुती अडचणीत”: बाळासाहेब थोरात
9
Shiv Puja: महादेवाला नेहमी बेल आणि पांढरे फुल वाहावे, पण केतकीचे फुल कदापि नाही; वाचा कारण!
10
VIDEO: मुलाने १५ सेकंदात वडिलांना २५ बुक्के मारले; हार्ट अटॅकने जन्मदात्याचा मृत्यू
11
Vastu Tips: जिथे कमळ फुलते तिथे सौभाग्यलक्ष्मी नांदते; पहा चुंबकाप्रमाणे पैसा आकर्षून घेणारी रोपं!
12
Mumbai Local News BREAKING: हार्बर रेल्वे ठप्प! सीएसएमटी स्थानकाजवळ लोकलचा डबा घसरला, प्रवाशांची तारांबळ
13
PM कुणीही असला तरी भारतीय अर्थव्यवस्था..., मोदींनी फुकट बढाया मारू नयेत, चिदंबरम यांचा टोला
14
अखेर इस्रायल-हमास भीषण युद्ध संपणार? तीन देशांच्या प्रयत्नानंतर आज महत्त्वाची घोषणा होण्याची शक्यता
15
“ते म्हणजे महाराष्ट्र या मानसिकतेतून ठाकरेंनी बाहेर यावे”; देवेंद्र फडणवीसांचा पलटवार
16
'देवेंद्र फडणवीसांना खोटं बोलण्यात गोल्ड मेडेल मिळेल'; रोहित पवारांचा खोचक टोला
17
नारायण राणे जिंकले नाहीत तर प्रचार कायमचा सोडणार; कट्टर राणे समर्थकाने घेतली शपथ, केला मताधिक्याचा दावा
18
चिंताजनक! जास्त मीठ खाणं ठरू शकतं मृत्यूचं कारण; वेळीच व्हा सावध, धडकी भरवणारा रिपोर्ट
19
"काँग्रेसनं नसीम खान यांना उमेदवारी दिल्यास पूर्ण ताकदीनं त्यांना निवडून आणू"
20
T20 World Cup साठी न्यूझीलंडचा संघ जाहीर; अनोख्या पद्धतीने घोषणा, नव्या जर्सीत किवी संघ

नागपूर जि. प. निवडणूक : सभापतीसाठी डावलल्यामुळे काँग्रेसमध्ये धुसफूस

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 30, 2020 10:38 PM

सभापतिपदाच्या शर्यतीत असलेल्या काँग्रेसच्या ज्येष्ठ सदस्यांना ऐनवेळी डावलल्याने काँग्रेसमध्ये आता नाराजीचा सूर उमटला आहे.

ठळक मुद्देज्येष्ठ सदस्या शांता कुमरे व नाना कंभाले यांनी व्यक्त केली जाहीर नाराजीमंत्री सुनील केदार यांच्यावर व्यक्त केला संताप

लोकमत  न्यूज  नेटवर्कनागपूर : सभापतिपदाच्या शर्यतीत असलेल्या काँग्रेसच्या ज्येष्ठ सदस्यांना ऐनवेळी डावलल्याने काँग्रेसमध्ये आता नाराजीचा सूर उमटला आहे. काँग्रेसच्या ज्येष्ठ सदस्य शांता कुमरे यांनी काँग्रेसच्या नेत्यांनी अनुसूचित जमातीवर अन्याय केल्याचा आरोप केला आहे तर नाना कंभाले यांनी मंत्री सुनील केदार यांच्यावर थेट तोफ डागत, केदारांनी गटातटाचे राजकारण केल्याचा आरोप केला आहे.शांता कुमरे यांनी प्रसारमाध्यमांशी बोलताना स्पष्ट केले की, सभापती निवडीमध्ये कॉंग्रेस पक्षाने अनुसूचित जमाती प्रवर्गातील एकाही सदस्याला सभापती बनविले नाही. उलट अध्यक्षांसह दोन सभापतिपदी पदावर अनुसूचित जाती प्रवर्गातील सदस्यांना संधी दिली. काँग्रेसच्या नेत्यांनी ही खेळी खेळत अनुसूचित जमाती प्रवर्गावर एकप्रकारे अन्यायच केल्याचा आरोप त्यांनी केला. शांता कुमरे ह्या रामटेक तालुक्यातील वडंबा सर्कलमधून निवडून आल्या आहे. जिल्हा परिषदेत आठ सर्कल हे अनुसूचित जमाती प्रवगार्साठी राखीव होते. त्यापैकी सात ठिकाणी कॉंग्रेसचे उमेदवार विजयी झालेत. शांता कुमरे या अनुसूचित जमाती प्रवर्गात मोडतात. यंदाच्या निवडणुकीमध्ये त्या खुल्या वर्गातून निवडून आल्या आहे. अध्यक्ष पद हे अनुसूचित जाती प्रवर्गासाठी राखीव असल्यामुळे दोन सभापती देण्याची आवश्यकता नव्हती. मलाच नाही तर सातपैकी कुणा एका सदस्याला सभापतिपद द्यायला हवे होते, अशी भावना त्यांनी व्यक्त केली.नाना कंभालेची केदारांवर नाराजीकेदारांनी जिल्हा परिषदेत हस्तक्षेप करून गटातटाचे राजकारण केले असल्याचा आरोप जि.प.चे ज्येष्ठ सदस्य नाना कंभाले यांनी केला. मुकुल वासनिक गटाचा असल्यामुळेच ज्येष्ठ सदस्य असतानाही मला डावलण्यात आल्याचा संताप त्यांनी व्यक्त केला. सुनील केदार हे स्वत:चे वर्चस्व दाखवून पार्टीमध्ये फूट पाडत असल्याचे ते म्हणाले. बाहेरून आलेल्यांना सभापतिपद देऊन निष्ठावंत काँग्रेसींना डावलल्याचे कंभाले म्हणाले. स्वत:बद्दल बोलताना कंभाले म्हणाले की, मला तिकीट कापण्यापासून, पाडण्यापर्यंत षड्यंत्र केदारांनी केल्याचाही आरोप केला. आपल्याच कार्यकर्त्यांना पदावर बसवून इतर नेत्यांचे अस्तित्व संपविण्याचा डाव केदार यांचा आहे. एका सदस्याला दोन पद देण्यावरही कंभाले यांनी आक्षेप घेतला. पत्रकारांशी बोलताना कंभाले यांनी आपली खदखद व्यक्त केली.भाजपने दिले, काँग्रेसला काय अडचण होतीएकाच विधानसभा क्षेत्रामध्ये दोन जणांना पदाधिकारी म्हणून संधी न देण्याची काँग्रेसची भूमिका होती, असे सांगण्यात येत आहे. यावर शांता कुमरे यांनी आक्षेप घेत, भाजपने २०१२ ला एकाच विधानसभेत दोन सभापती दिले. मग काँग्रेसला काय हरकत होती, असा आक्षेप घेतला. २०१२ मध्ये जि.प.वर भाजपची सत्ता आल्यानंतर पहिल्या टर्ममध्ये रामटेक विधानसभा क्षेत्रातून दुर्गावती सरीयाम व वर्षा धोेपटे या सभापती झाल्या. त्यानंतरच्या अडीच वर्षात याच क्षेत्रातुनच शरद डोणेकर व आशा गायकवाड हे पदाधिकारी झाले. त्यामुळे अध्यक्ष पद जरी रामटेक विधानसभेतून दिले असले तरी, एक सभापतिपदही येथून देणे सहज शक्य असल्याचे त्या म्हणाल्या.

टॅग्स :ZP Electionजिल्हा परिषदnagpurनागपूरcongressकाँग्रेस