शहरं
Join us  
Trending Stories
1
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
2
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
3
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
4
विधानसभा निवडणुकीच्या रणधुमाळीत चार राज्यांमध्ये तब्बल ६५० कोटींची रोख रक्कम-मद्य जप्त
5
Gaurav More: 'हास्यजत्रा' फेम गौरव मोरेने गुपचुप केलं लग्न? ऋतुजा बागवे लिहिते- "Mr. & Mrs मोरे"
6
लेख: शिक्षिकेऐवजी नेत्याचा, पोलिसाचा मुलगा असता तर..? चार वर्षांच्या विघ्नेशची उपचारासाठी फरफट
7
राज्याच्या अर्थ खात्यातील बडा मासा गळाला; सहा लाखांची लाच घेताना एसीबीने ठोकल्या बेड्या
8
पोहायला पाण्यात उतरा... पण तुमच्या जबाबदारीवर! तलावावर जीवरक्षक, दारात ॲम्ब्युलन्स तरीही मृत्यूच्या घटना
9
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
10
कंगाल पाकिस्तानात जनावरांवरही ‘गोबर टॅक्स’! आपल्याच देशातल्या गोरगरीबांनाही सोडलं नाही...
11
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
12
अग्रलेख: चलो, चांद के पार चलो...! ओरियन यानाचा नवा इतिहास, पण कहाणी सुफळ संपूर्ण नाही!
13
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
14
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
15
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
16
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
17
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
18
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
19
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
20
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
Daily Top 2Weekly Top 5

Nagpur: वाघांना माणूस खाऊ घालणारी ही कसली वनपर्यटनाची नीती? दहशतीत जगणाऱ्या विदर्भातील माणसांचा सवाल

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 8, 2025 12:50 IST

Tiger Attack in Vidarbha: टायगर सफारी, वनपर्यटनासाठी वाघांचे संरक्षण व संवर्धन करण्याच्या नादात आता हे वाघ ज्यांनी शेकडो, हजारो वर्षे जंगले जपली, वाढवली ते आदिवासी व शेतकऱ्यांच्याच नरडीचा घोट घेऊ लागले आहेत.

नागपूर : वाघांची संख्या वाढली. त्यांना जंगल अपुरे पडू लागले. बिबट्यासारखे मार्जार कुळातले प्राणी मानवी वस्तीत शिरू लागले. नागरी भाषेत मानव-वन्यजीव संघर्ष की काय तो उभा राहिला. समाजातल्या शहाण्या माणसांनी वर्णन केलेल्या या नव्या समस्येची दुसरी बाजू ही आहे की, टायगर सफारी, वनपर्यटनासाठी वाघांचे संरक्षण व संवर्धन करण्याच्या नादात आता हे वाघ ज्यांनी शेकडो, हजारो वर्षे जंगले जपली, वाढवली ते आदिवासी व शेतकऱ्यांच्याच नरडीचा घोट घेऊ लागले आहेत. विधिमंडळाच्या गेल्या वर्षीच्या हिवाळी अधिवेशनापासून यंदाच्या हिवाळी अधिवेशनापर्यंत विदर्भात तब्बल ६९ शेतकरी, आदिवासी स्त्री-पुरुषांचे बळी गेले असून प्रामुख्याने वाघांनी ५७ व १२ बळी बिबट्यांनी घेतले आहेत. किड्यामुंग्यांचे आयुष्य वाट्याला आलेली विदर्भातील दुबळी माणसे वाघांना खाऊ घातली जात आहेत.

याशिवाय रानटी हत्ती, रानडुक्कर व अस्वलांच्या मिळून सहा बळींसह वन्यप्राण्यांच्या बळीचा आकडा ७९ वर जातो. पर्यटकांना जंगल व वाघ पाहायला मिळावेत म्हणून जंगलात राहणाऱ्या गरीब, दुबळ्या लोकांनी वाघांच्या जबड्यात त्यांची मानगुट का द्यायची, हा विदर्भातील भोळ्याभाबड्या माणसांचा सरकारला, व्यवस्थेला सवाल आहे. व्याघ्र प्रकल्प आणि अभयारण्यासाठी आधी विदर्भातील अरण्यप्रदेशावर विस्थापनाचे संकट होते. त्यातून कशीबशी सुटका होत नाही तोवर आता हे वाघांचे संकट उभे राहिले आहे.

वाचण्यासाठी क्लिक करा - अधिवेशन ते अधिवेशन ७९ बळी...

पंचवीस लाख दिले की जबाबदारी संपली का?

वन्यजीव संरक्षणाची, वाघ सांभाळण्याची गरज आहेच. कारण, वाघ ही एक संकटग्रस्त प्रजाती आहे. पर्यावरणाच्या संतुलनासाठी वाघ महत्त्वाचे आहेत. वाघांची संख्या वाढल्यामुळे पर्यटन वाढले हेदेखील खरे. वन्यजीव पर्यटन स्थानिक अर्थव्यवस्थेला चालना देते. नोकऱ्या निर्माण करते. तथापि, माणसाच्या जिवाचे मोल या सगळ्या फायद्यापेक्षा अधिक आहे. व्याघ्रसंवर्धन, पर्यटन आणि स्थानिकांचे जीव असा संतुलित दृष्टिकोन गरजेचा आहे. तथापि, तसे होताना दिसत नाही. आम्ही माणसांच्या जिवाचीही काळजी करतो असे दाखविण्यासाठी वन्यजीवांच्या बळींना पंचवीस लाख रुपये देऊन शासन व प्रशासन नामानिराळे होते. दुर्दैव हे की, अशी मृतदेहांवर २५ लाखांची मदत फेकणे हा त्या सामान्य जिवांचा अपमान आहे, याचेही भान कुणाला नाही. 

एका जिल्ह्यात ४५ लोक वाघाचे भक्ष्य बनत असतील तर ते दुर्दैव

मानव वन्यजीव संघर्ष थांबविण्यात वनविभागाला अपयश आले आहे हे मान्यच करावे लागेल, यासाठी वन विभागाने एआय तंत्रज्ञानाचा वापर करून काही उपाययोजना प्रभावीपणे करणे गरजेचे आहे. सोबतच पीआरटी कमिट्यांची संख्या वाढवावी. अधिकाधिक वाघांचे इतर अभयारण्यात स्थानांतरण करायला हवे. एका जिल्ह्यात ४५ च्या आसपास लोक वाघाचे भक्ष्य बनत असतील तर ते दुर्दैव आहे. मी वनमंत्री असताना २५ लाखांची मदत जाहीर केली होती. ती आता ५० लाख करण्याची गरज आहे. पण, मुळात मदत देण्याची वेळच होऊ नये अशा उपाययोजना व्हाव्यात. माणसांचा जीव वाचवणे हे अधिक महत्त्वाचे, असे माजी वनमंत्री सुधीर मुनगंटीवार म्हणाले.

English
हिंदी सारांश
Web Title : Nagpur: Are Tiger Safaris Worth Human Lives in Vidarbha?

Web Summary : Vidarbha's villagers question if tiger conservation justifies human deaths. 79 died near tiger reserves. Locals ask why they must sacrifice for tourism. Ex-minister suggests better solutions than compensation.
टॅग्स :nagpurनागपूरWinter Session Maharashtraविधानसभा हिवाळी अधिवेशनTigerवाघDeathमृत्यूforestजंगल