शहरं
Join us  
Trending Stories
1
कबुतरखान्यांबद्दल 'सर्वोच्च' निर्णय आला, आता सरकार काय करणार? CM फडणवीसांनी सांगितला पुढचा प्लॅन
2
Donald Trump's Tariffs : मोठी तयारी! कर लादणाऱ्या अमेरिकेला धक्का बसणार! भारत या शस्त्राचा वापर करणार
3
नाशिकमध्ये शिंदेसेनेच्या बैठकीत अहिल्यानगरचे दोन गट भिडले; शरद पवार गटाचा पदाधिकारी बैठकीत शिरल्याचा दावा
4
Bank Job: बँकेत नोकरी करण्याचे स्वप्न पूर्ण होणार; आयओबीमध्ये भरती, महाराष्ट्रासाठी 'इतक्या' जागा राखीव
5
Dadar Kabutarkhana Ban : मोठी बातमी! कबुतरखान्यांवरील बंदीबाबत सुप्रीम कोर्टाने दिला महत्वाचा निर्णय
6
Ramdas Athawale : Video - "राहुल गांधी निवडणूक आयोगाला घाबरतात, म्हणूनच ते..."; रामदास आठवलेंचा हल्लाबोल
7
अरेरेरे! तीन वर्षांच्या लेकीलाच बापाने खाऊ खातले विषारी बिस्किट; पत्नीचा पतीवर गंभीर आरोप
8
सोन्याचं नक्षीकाम, एकधारी पातं, मुल्हेरी मूठ... महाराष्ट्राने लिलावात जिंकली 'फिरंग' तलवार (PHOTOS)
9
Rahul Gandhi's Allegations Against Election Commission : 'मी सही करणार नाही, हा निवडणूक आयोगाचा डेटा..', राहुल गांधींचे प्रत्युत्तर, म्हणाले- निवडणूक आयोग दिशाभूल करतेय
10
'आम्ही अशा धमक्यांपुढे झुकणार नाही', असीम मुनीरच्या धमकीवर भारताचे सडेतोड उत्तर
11
ट्रेनच्या फूटबोर्डवर बसताच गर्दुल्ल्याचा हल्ला; तोल जाऊन खाली पडलेल्या प्रवाशाने पाय गमावला, आरोपीला अटक
12
ChatGPT चा सल्ला घेणं बेतलं जीवावर, मिठाऐवजी खाल्लं 'विष', नेमकं काय आहे हे प्रकरण?
13
शेकडो वाहनांचा ताफा, फुलांचा वर्षाव, इंग्लंड दौरा गाजवणाऱ्या आकाश दीपचं घरी जंगी स्वागत
14
लंडन: शूर मराठा सरदार रघुजी भोसले यांची ऐतिहासिक तलवार महाराष्ट्र सरकारच्या ताब्यात
15
याला म्हणतात शेअर...! 39 दिवसांपासून सातत्याने लागतंय अप्पर सर्किट, ₹63 वर आलाय भाव; करतोय मालामाल
16
भाजपच्या उपमुख्यमंत्र्यांकडेच दोन मतदान ओळखपत्र; निवडणूक आयोगाची नोटीस, बिहारमध्ये काय घडलं?
17
"माझं घर वाचवा...", कवी सौमित्र यांची मुख्यमंत्र्यांना कळकळीची विनंती, बिल्डरकडून फसवणुकीचा आरोप
18
Uddhav Thackeray: निवडणूक आयोग हे राष्ट्रपतींपेक्षाही मोठे झाले का? उद्धव ठाकरेंचा कडवट सवाल!
19
दिवसाढवळ्या बँकेवर दरोडा, बंदुकीच्या धाकावर हिसकावू लागला पैसे, पण कर्मचाऱ्यांनी हिंमत दाखवली आणि...  
20
राहुल गांधींविरोधात वक्तव्य भोवले; काँग्रेसच्या मंत्र्याला द्यावा लागला राजीनामा, नेमकं काय म्हणाले?

नागपूर विद्यापीठ : परीक्षा केंद्रांची संख्या वाढवावी लागणार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 9, 2020 00:37 IST

विद्यापीठ अनुदान आयोगाच्या दिशानिर्देशांचे पालन करायचे की नाही यासंदर्भात महाराष्ट्रात स्थिती स्पष्ट झालेली नाही. यासंदर्भात प्रशासनाचे राज्य शासनाकडे लक्ष लागले आहे. जर परीक्षा झालीच तर त्याचे नियोजन कसे करायचे याबाबतदेखील मंथन सुरू आहे.

ठळक मुद्दे‘फिजिकल डिस्टन्सिंग’चे आव्हान : राज्य शासनाकडे प्रशासनाचे लक्ष

लोकमत  न्यूज  नेटवर्कनागपूर : विद्यापीठ अनुदान आयोगाच्या दिशानिर्देशांचे पालन करायचे की नाही यासंदर्भात महाराष्ट्रात स्थिती स्पष्ट झालेली नाही. यासंदर्भात प्रशासनाचे राज्य शासनाकडे लक्ष लागले आहे. जर परीक्षा झालीच तर त्याचे नियोजन कसे करायचे याबाबतदेखील मंथन सुरू आहे. जर सप्टेंबरमध्ये परीक्षा घ्याव्या लागल्या तर विद्यापीठाला परीक्षा केंद्रांची संख्या वाढवावी लागेल. अशा स्थितीत महाविद्यालयांना यासाठी मनविणे हे विद्यापीठासमोरील मोठे आव्हान ठरेल, अशी माहिती सूत्रांनी दिली आहे.विद्यापीठ अनुदान आयोगाने अंतिम वर्षाच्या परीक्षांबाबत दिशानिर्देश जारी केल्यानंतर नागपूर विद्यापीठामध्ये आणखी संभ्रम वाढला आहे. राज्य शासनातर्फे मंगळवारी परीक्षा नकोच, अशी भूमिका घेण्यात आली आहे. त्यामुळे विद्यापीठ अनुदान आयोगाच्या निर्देशांबाबत शासन ठोस कोणता निर्णय घेते यावर विद्यापीठाच्या परीक्षांचे भवितव्य अवलंबून राहणार आहे.असे असले तरी जर परीक्षा झाली तर काय याबाबत आतापासूनच विचार करावा लागणार आहे. परीक्षांचे पेपर नव्याने ‘सेट’ करणे हे काम लवकर होईल. परंतु आमच्यासमोरील सर्वात मोठे आव्हान हे परीक्षा केंद्रांंचे असेल अशी माहिती एका अधिकाऱ्याने नाव न छापण्याच्या अटीवर दिली. परीक्षा केंद्रांवर ‘फिजिकल डिस्टन्सिंग’ पाळणे अनिवार्य असेल. त्यामुळे परीक्षा केंद्रांची संख्यादेखील त्या हिशेबाने वाढवावी लागेल. नागपूर विद्यापीठात ५०३ संलग्नित महाविद्यालये आहेत. यातील २५० हून महाविद्यालये तर ग्रामीण भागात आहेत. सर्वच ठिकाणी ‘फिजिकल डिस्टन्सिंग’ पाळले तर प्रत्येक परीक्षा केंद्रावर विद्यार्थ्यांची संख्या कमी होईल. अशा स्थितीत नवीन परीक्षा केंद्रांचा शोध प्रशासनाला घ्यावा लागेल. ही तारेवरची कसरत ठरेल. परीक्षा केंद्र निश्चित करताना विद्यार्थ्यांना ते केंद्र येण्याजाण्यासाठी सोयीचे आहे का, तिथे इतर सुविधा आहेत का ही बाबदेखील पाहण्यात येते. त्यामुळे हे सर्व नियोजन करताना प्रशासनाची दमछाक होणार आहे. यासंदर्भात परीक्षा व मूल्यमापन संचालक डॉ.प्रफुल्ल साबळे यांच्याशी संपर्क होऊ शकला नाही.महाविद्यालयांची भूमिकादेखील महत्त्वाचीजर परीक्षा घेण्याचा निर्णय झाला तर महाविद्यालयाची भूमिकादेखील महत्त्वाची ठरेल. परीक्षा केंद्र स्थापन करण्यासाठी महाविद्यालये होकार देतील का हा प्रश्न आहे. शिवाय अनेक महाविद्यालयांत आवश्यक संख्येत प्राध्यापक नाहीत. अशा स्थितीत परीक्षा केंद्रांवरील नियोजन कसे राहील याचादेखील प्रशासनाला विचार करावा लागेल.

टॅग्स :Rashtrasant Tukdoji Maharaj Nagpur Universityराष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठexamपरीक्षा