शहरं
Join us  
Trending Stories
1
'भारताने इस्रायलवर जाहीर टीका करावी, दबाव टाकावा...', इराणची भारताला विनंती
2
कामावरून परतणाऱ्या चाकरमान्यांचे हाल; ओव्हर हेड वायर तुटल्याने पश्चिम रेल्वेची वाहतूक ठप्प
3
Ahmedabad Plane Crash : नियतीचा क्रूर खेळ! दुसऱ्याच्या जागी ड्युटीवर गेलेली केबिन क्रू लॅमनुनथेम, मन सुन्न करणारी घटना
4
बेपत्ता महिला स्वयंपाकी अन् तिच्या नातीचा विमान अपघातात मृत्यू; DNA चाचणीतून खुलासा
5
'शुभ आरंभ'...जिथं धावांसाठी संघर्ष केला तिथं पहिल्यांदा कॅप्टन्सी करताना ठोकली पहिली फिफ्टी
6
धनुष्यबाणासोबत स्वप्नांच्या दिशेने; जालन्याच्या तेजल साळवेचा आशिया कपमध्ये सुवर्णवेध!
7
नारिंग्रेत रिक्षा-एसटी अपघातात; आचरा येथील चार रिक्षा व्यावसायिकांचा जागीच मृत्यू
8
"डोनाल्ड ट्रम्प यांनी फोन केला आणि मला अमेरिकेत येण्याचे आमंत्रण दिले, मी नम्रपणे नाकारले"; पंतप्रधान मोदींनी सांगितलं कारण
9
"मरू तर एकत्रच"; वहिनीचा दीरावर जडला जीव, सासरच्यांनी फटकारताच दोघांनी खाल्लं विष
10
सोलर कंपनीच्या शेअर्समध्ये तुफानी तेजी, करतोय मालामाल; FTSE ग्लोबल इंडेक्समध्ये होऊ शकते कंपनीची एन्ट्री!
11
Operation Sindhu : इराणमध्ये अडकलेले १००० विद्यार्थी मायदेशी परतणार! भारतासाठी खुला केला हवाई मार्ग
12
माता न तू वैरिणी! बॉयफ्रेंडसोबत पळून जाण्यासाठी जन्मदात्या आईनेच २ मुलांना विष देऊन मारलं
13
जैस्वालचा आणखी एक 'यशस्वी' डाव! इंग्लंडमध्ये पहिल्याच टेस्टमध्ये भात्यातून आली बेस्ट खेळी
14
घरातून निघाले पण...; नवविवाहित जोडपे ६ दिवसांपासून बेपत्ता; पोलिसांचा शोध सुरू
15
इराणच्या मदतीला चीन धावला; युद्ध साहित्य घेऊन ड्रॅगनची तीन विमाने तेहरानमध्ये दाखल...
16
कोयनेत साडेचार टीएमसी पाणीसाठा वाढला; धरणातून विसर्ग सुरू 
17
संतापजनक...! ब्रा नसेल तर परीक्षेला बसता येणार नाही, स्पर्शकरून होतेय तपासणी; विद्यापीठाचं अजब फर्मान, VIDEO व्हायरल 
18
फक्त ९९ पैशात जमीन! आधी TCS ला २१ एकरचा भूखंड, आता सरकारचा 'या' कंपनीसोबत करार
19
Tejasswi Prakash : "मला काही फरक पडत नाही"; ४ वर्षांनी नात्याला तडा, तेजस्वी प्रकाश-करण कुंद्राचं झालं ब्रेकअप?
20
IPL मधील टॉपर 'टेस्ट'मध्ये फेल; पदार्पणाच्या सामन्यात पदरी पडला भोपळा!

नागपूर विद्यापीठ : परीक्षा केंद्रांची संख्या वाढवावी लागणार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 9, 2020 00:37 IST

विद्यापीठ अनुदान आयोगाच्या दिशानिर्देशांचे पालन करायचे की नाही यासंदर्भात महाराष्ट्रात स्थिती स्पष्ट झालेली नाही. यासंदर्भात प्रशासनाचे राज्य शासनाकडे लक्ष लागले आहे. जर परीक्षा झालीच तर त्याचे नियोजन कसे करायचे याबाबतदेखील मंथन सुरू आहे.

ठळक मुद्दे‘फिजिकल डिस्टन्सिंग’चे आव्हान : राज्य शासनाकडे प्रशासनाचे लक्ष

लोकमत  न्यूज  नेटवर्कनागपूर : विद्यापीठ अनुदान आयोगाच्या दिशानिर्देशांचे पालन करायचे की नाही यासंदर्भात महाराष्ट्रात स्थिती स्पष्ट झालेली नाही. यासंदर्भात प्रशासनाचे राज्य शासनाकडे लक्ष लागले आहे. जर परीक्षा झालीच तर त्याचे नियोजन कसे करायचे याबाबतदेखील मंथन सुरू आहे. जर सप्टेंबरमध्ये परीक्षा घ्याव्या लागल्या तर विद्यापीठाला परीक्षा केंद्रांची संख्या वाढवावी लागेल. अशा स्थितीत महाविद्यालयांना यासाठी मनविणे हे विद्यापीठासमोरील मोठे आव्हान ठरेल, अशी माहिती सूत्रांनी दिली आहे.विद्यापीठ अनुदान आयोगाने अंतिम वर्षाच्या परीक्षांबाबत दिशानिर्देश जारी केल्यानंतर नागपूर विद्यापीठामध्ये आणखी संभ्रम वाढला आहे. राज्य शासनातर्फे मंगळवारी परीक्षा नकोच, अशी भूमिका घेण्यात आली आहे. त्यामुळे विद्यापीठ अनुदान आयोगाच्या निर्देशांबाबत शासन ठोस कोणता निर्णय घेते यावर विद्यापीठाच्या परीक्षांचे भवितव्य अवलंबून राहणार आहे.असे असले तरी जर परीक्षा झाली तर काय याबाबत आतापासूनच विचार करावा लागणार आहे. परीक्षांचे पेपर नव्याने ‘सेट’ करणे हे काम लवकर होईल. परंतु आमच्यासमोरील सर्वात मोठे आव्हान हे परीक्षा केंद्रांंचे असेल अशी माहिती एका अधिकाऱ्याने नाव न छापण्याच्या अटीवर दिली. परीक्षा केंद्रांवर ‘फिजिकल डिस्टन्सिंग’ पाळणे अनिवार्य असेल. त्यामुळे परीक्षा केंद्रांची संख्यादेखील त्या हिशेबाने वाढवावी लागेल. नागपूर विद्यापीठात ५०३ संलग्नित महाविद्यालये आहेत. यातील २५० हून महाविद्यालये तर ग्रामीण भागात आहेत. सर्वच ठिकाणी ‘फिजिकल डिस्टन्सिंग’ पाळले तर प्रत्येक परीक्षा केंद्रावर विद्यार्थ्यांची संख्या कमी होईल. अशा स्थितीत नवीन परीक्षा केंद्रांचा शोध प्रशासनाला घ्यावा लागेल. ही तारेवरची कसरत ठरेल. परीक्षा केंद्र निश्चित करताना विद्यार्थ्यांना ते केंद्र येण्याजाण्यासाठी सोयीचे आहे का, तिथे इतर सुविधा आहेत का ही बाबदेखील पाहण्यात येते. त्यामुळे हे सर्व नियोजन करताना प्रशासनाची दमछाक होणार आहे. यासंदर्भात परीक्षा व मूल्यमापन संचालक डॉ.प्रफुल्ल साबळे यांच्याशी संपर्क होऊ शकला नाही.महाविद्यालयांची भूमिकादेखील महत्त्वाचीजर परीक्षा घेण्याचा निर्णय झाला तर महाविद्यालयाची भूमिकादेखील महत्त्वाची ठरेल. परीक्षा केंद्र स्थापन करण्यासाठी महाविद्यालये होकार देतील का हा प्रश्न आहे. शिवाय अनेक महाविद्यालयांत आवश्यक संख्येत प्राध्यापक नाहीत. अशा स्थितीत परीक्षा केंद्रांवरील नियोजन कसे राहील याचादेखील प्रशासनाला विचार करावा लागेल.

टॅग्स :Rashtrasant Tukdoji Maharaj Nagpur Universityराष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठexamपरीक्षा