शहरं
Join us  
Trending Stories
1
पाण्यानंतर आता मेडिसीनसाठीही तरसणार पाकिस्तान? आपत्कालीन परिस्थिती टाळण्यासाठी तयारीला लागलं फार्मा सेक्टर
2
'झेलम'ला अचाकच पूर आला, पाकिस्तानात एकच गोंधळ उडाला; पाक मीडियानं भारतावर मोठा आरोप केला! नेमकं काय घडलं?
3
पर्यटकाच्या व्हिडिओमध्ये कैद झाले दहशतवादी...? देहूरोड येथील सामाजिक कार्यकर्त्याचा दावा
4
चोपड्यात थरार...! प्रेमविवाह केलेल्या मुलीला बापानेच गोळी झाडून संपवलं, जावई जखमी  
5
"...तर आपल्या प्रजेचं रक्षण करणं हा राजाचा धर्म! लोक लक्षात ठेवतील"; मोहन भागवत स्पष्टच बोलले
6
अंबाला गावात लग्नाच्या जेवणातून विषबाधा; आठ वर्षीय बालकाचा मृत्यू, अनेकांची प्रकृती चिंताजनक
7
पाकिस्ताननं बांगलादेशात तैनात केले फायटर जेट? PAK पत्रकाराचा मोठा दावा; म्हणाला, यावेळी...
8
पहलगाम ईफेक्ट : सूक्ष्म नजर ठेवा, सतर्क रहा; भारतीय रेल्वेला अलर्ट!
9
Pahalgam Terror Attack: मोठाच पेचप्रसंग! ‘त्या’ महिला आता पाकिस्तानात जाऊ शकत नाहीत; नेमका काय आहे ‘लाँग टर्म व्हिसा’?
10
सर्वार्थ सिद्धी योगात चैत्र अमावास्या: १० राशींवर धनलक्ष्मीची कृपा, लाभच लाभ; भरघोस भरभराट!
11
सिंधूच्या पाण्याचा एक थेंबही पाकिस्तानात जाणार नाही...! पण एवढं पाणी भारत कसं वापरणार? ३ पर्यायांवर होतोय विचार
12
Prabhsimran Singh ची कडक फटकेबाजी; नरेनच्या गोलंदाजीवर 'उलटा' फटका मारला अन्... (VIDEO)
13
Devendra Fadnavis: ४८ तासात पाकिस्तानी लोकांनी देश न सोडल्यास कारवाई करण्यात येणार; मुख्यमंत्र्यांचा इशारा
14
CM पदाबाबत आता खुद्द फडणवीसांनी मनातील इच्छा बोलून दाखवली; बावनकुळेंच्या विधानावर म्हणाले...
15
"एकनाथ शिंदेनी मला पुन्हा जिवंत केलं, कधीच शिवसेना सोडणार नाही"; निलेश राणेंचे विधान
16
दहशतवाद्यांचे कंबरडे मोडण्याची तयारी, अनंतनागमधून १७५ जण ताब्यात, लष्कराची मोठी कारवाई
17
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
18
VIDEO: सीमेवर युद्धाची तयारी? लोकांकडून जमिनीखालील सरकारी तळघरांची साफसफाई
19
पहलगाम हल्ला: पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेणे हाच पर्याय!; ठाकरे गटाची स्वाक्षरी मोहीम
20
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार

नागपूर विद्यापीठ : परीक्षा केंद्रांची संख्या वाढवावी लागणार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 9, 2020 00:37 IST

विद्यापीठ अनुदान आयोगाच्या दिशानिर्देशांचे पालन करायचे की नाही यासंदर्भात महाराष्ट्रात स्थिती स्पष्ट झालेली नाही. यासंदर्भात प्रशासनाचे राज्य शासनाकडे लक्ष लागले आहे. जर परीक्षा झालीच तर त्याचे नियोजन कसे करायचे याबाबतदेखील मंथन सुरू आहे.

ठळक मुद्दे‘फिजिकल डिस्टन्सिंग’चे आव्हान : राज्य शासनाकडे प्रशासनाचे लक्ष

लोकमत  न्यूज  नेटवर्कनागपूर : विद्यापीठ अनुदान आयोगाच्या दिशानिर्देशांचे पालन करायचे की नाही यासंदर्भात महाराष्ट्रात स्थिती स्पष्ट झालेली नाही. यासंदर्भात प्रशासनाचे राज्य शासनाकडे लक्ष लागले आहे. जर परीक्षा झालीच तर त्याचे नियोजन कसे करायचे याबाबतदेखील मंथन सुरू आहे. जर सप्टेंबरमध्ये परीक्षा घ्याव्या लागल्या तर विद्यापीठाला परीक्षा केंद्रांची संख्या वाढवावी लागेल. अशा स्थितीत महाविद्यालयांना यासाठी मनविणे हे विद्यापीठासमोरील मोठे आव्हान ठरेल, अशी माहिती सूत्रांनी दिली आहे.विद्यापीठ अनुदान आयोगाने अंतिम वर्षाच्या परीक्षांबाबत दिशानिर्देश जारी केल्यानंतर नागपूर विद्यापीठामध्ये आणखी संभ्रम वाढला आहे. राज्य शासनातर्फे मंगळवारी परीक्षा नकोच, अशी भूमिका घेण्यात आली आहे. त्यामुळे विद्यापीठ अनुदान आयोगाच्या निर्देशांबाबत शासन ठोस कोणता निर्णय घेते यावर विद्यापीठाच्या परीक्षांचे भवितव्य अवलंबून राहणार आहे.असे असले तरी जर परीक्षा झाली तर काय याबाबत आतापासूनच विचार करावा लागणार आहे. परीक्षांचे पेपर नव्याने ‘सेट’ करणे हे काम लवकर होईल. परंतु आमच्यासमोरील सर्वात मोठे आव्हान हे परीक्षा केंद्रांंचे असेल अशी माहिती एका अधिकाऱ्याने नाव न छापण्याच्या अटीवर दिली. परीक्षा केंद्रांवर ‘फिजिकल डिस्टन्सिंग’ पाळणे अनिवार्य असेल. त्यामुळे परीक्षा केंद्रांची संख्यादेखील त्या हिशेबाने वाढवावी लागेल. नागपूर विद्यापीठात ५०३ संलग्नित महाविद्यालये आहेत. यातील २५० हून महाविद्यालये तर ग्रामीण भागात आहेत. सर्वच ठिकाणी ‘फिजिकल डिस्टन्सिंग’ पाळले तर प्रत्येक परीक्षा केंद्रावर विद्यार्थ्यांची संख्या कमी होईल. अशा स्थितीत नवीन परीक्षा केंद्रांचा शोध प्रशासनाला घ्यावा लागेल. ही तारेवरची कसरत ठरेल. परीक्षा केंद्र निश्चित करताना विद्यार्थ्यांना ते केंद्र येण्याजाण्यासाठी सोयीचे आहे का, तिथे इतर सुविधा आहेत का ही बाबदेखील पाहण्यात येते. त्यामुळे हे सर्व नियोजन करताना प्रशासनाची दमछाक होणार आहे. यासंदर्भात परीक्षा व मूल्यमापन संचालक डॉ.प्रफुल्ल साबळे यांच्याशी संपर्क होऊ शकला नाही.महाविद्यालयांची भूमिकादेखील महत्त्वाचीजर परीक्षा घेण्याचा निर्णय झाला तर महाविद्यालयाची भूमिकादेखील महत्त्वाची ठरेल. परीक्षा केंद्र स्थापन करण्यासाठी महाविद्यालये होकार देतील का हा प्रश्न आहे. शिवाय अनेक महाविद्यालयांत आवश्यक संख्येत प्राध्यापक नाहीत. अशा स्थितीत परीक्षा केंद्रांवरील नियोजन कसे राहील याचादेखील प्रशासनाला विचार करावा लागेल.

टॅग्स :Rashtrasant Tukdoji Maharaj Nagpur Universityराष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठexamपरीक्षा