शहरं
Join us  
Trending Stories
1
ज्याला दिलं हृदय त्यानेच घेतला जीव! प्रेमविवाह करणाऱ्या अंजलीचा शेवट कसा झाला?; आरोपी पतीला अटक
2
खासदार श्रीकांत शिंदेंच्या बंगल्यातही शिरलं पाणी; विकासकामांवर बोलायचं नाही, मनसेचा खोचक टोला
3
Mumbai Rain Updates Live: शाळा-कॉलेजला २० ऑगस्टला सुट्टी जाहीर केल्याचा मेसेज खोटा - BMC
4
जग पाहण्याआधीच बाळाचा जीव गेला, आईनं गमावलं लेकरू; महाराष्ट्रात आरोग्य सेवेचे धिंडवडे निघाले
5
School Holiday: मुसळधार पावसाचा इशारा, प्रशासन सतर्क; २० ऑगस्टला कोणकोणत्या जिल्ह्यात शाळांना सुट्टी? वाचा
6
उपराष्ट्रपती निवडणूक: सी.पी राधाकृष्णन विरुद्ध सुदर्शन रेड्डी लढतीत कुणाचं पारडं मजबूत?
7
४० तोळं सोने अन् २० लाख खर्च करून लग्न लावलं; २ वर्षात पोरीनं स्वत:ला कायमचं संपवलं
8
मोनो रेल्वे बंद का पडली? CM देवेंद्र फडणवीसांनी दिले चौकशीचे आदेश, प्रवाशांना न घाबरण्याचं आवाहन
9
भारतातील श्रीमंत कुटुंबे रशियन तेलाचा फायदा घेत आहेत, डोनाल्ड ट्रम्प यांच्या मंत्र्यांचे मोठे विधान
10
Asia Cup 2025 : गिल वर्षभरानंतर संघात आला अन् उप-कर्णधार झाला! सूर्यकुमार यादवनं सांगितली आतली गोष्ट
11
पावसामुळे लोकल ठप्प, स्टेशनवर प्रवाशांची गर्दी; मुंबईकरांचे प्रचंड हाल, घरी परतण्यासाठी तारांबळ
12
भारताकडे शक्तिशाली क्षेपणास्त्रे, आमचे अनेक हवाई तळ उडवले; शरीफ यांच्या सहकाऱ्याने पाकिस्तानची पोलखोल केली
13
India Cotton Imports: केंद्र सरकारने कापूस आयातीवरील सीमा शुल्क हटवले; कुणाला फायदा?
14
Monorail: मोठी बातमी! मुंबईत प्रवाशांनी भरलेली मोनो रेल्वे मध्येच बंद पडली, प्रवासी अडकले; काच ब्रेक करण्याचे प्रयत्न सुरू (Video)
15
सेंच्युरीसह मुंबईकर पृथ्वीचं 'ग्रहण' सुटलं! दुसऱ्या बाजूला पुणेकर ऋतुराजनं घातला घोळ, अन्...
16
मुंबईसह राज्यात २० ऑगस्टपासून पावसाचा जोर ओसरणार; हवामान खात्याचा अंदाज, १२ तासांसाठी रेड अलर्ट
17
महिंद्राच्या कर्मचाऱ्याने महिला खासदाराला दिली अत्याचार, मारण्याची धमकी; कंपनी म्हणते...
18
सुदर्शन रेड्डींमुळे चंद्राबाबू-जगन मोहन यांच्यासमोर धर्म संकट; उपराष्ट्रपतिपदासाठी विरोधकांची खेळी
19
आता आणखी दोन नव्या कलर ऑप्शन्ससह आली Tata Punch EV, मिळणार फास्ट चार्जिंग स्पीड! असे आहेत सेफ्टी फीचर्स
20
राहुल गांधींच्या गाडीची पोलिसाला धडक, 'ही तर जनतेला चिरडणारी यात्रा', भाजपची बोचरी टीका

नागपूर विद्यापीठ; अर्ध्यातून शिक्षण सोडल्यावरदेखील मिळणार प्रमाणपत्र

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 11, 2020 06:00 IST

Nagpur News Education Nagpur University अभियांत्रिकीचा चार वर्षांच्या अभ्यासक्रम करत असताना विद्यार्थ्याने एखादा चांगला संशोधन प्रकल्प पूर्ण केला तर त्याला ‘डिग्री विथ रिसर्च’ अशी पदवी देण्यात येणार आहे. यासंदर्भात प्राधिकरणांची मान्यता घेण्यात येणार आहे.

ठळक मुद्देअभियांत्रिकीत येणार ‘डिग्री विथ रिसर्च’

योगेश पांडे

लोकमत न्यूज नेटवर्क

नागपूर : राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाच्या अभियांत्रिकी विद्याशाखेत आमूलाग्र बदल करण्यासाठी पावले उचलण्यात आली आहे. यंदापासून नवीन अभ्यासक्रम तर लागू होण्याची शक्यता आहेच. शिवाय अभियांत्रिकीतील पदवीची प्रणाली बदलविण्यासाठीदेखील प्रयत्न करण्यात येत आहे. अभियांत्रिकीचा चार वर्षांच्या अभ्यासक्रम करत असताना विद्यार्थ्याने एखादा चांगला संशोधन प्रकल्प पूर्ण केला तर त्याला ‘डिग्री विथ रिसर्च’ अशी पदवी देण्यात येणार आहे. यासंदर्भात प्राधिकरणांची मान्यता घेण्यात येणार आहे.

नवीन शैक्षणिक धोरणामध्ये पदवी प्रणालीतदेखील बदल करण्याच्या मुद्याचा अंतर्भाव आहे. त्याचाच आधार घेत नागपूर विद्यापीठात यासंदर्भात बदल करण्याची सुरुवात झाली आहे. अनेक विद्यार्थी अभियांत्रिकीमध्ये प्रवेश तर घेतात. मात्र ते अंतिम वर्षापर्यंत पोहोचू शकत नाही. त्यांना कुठलीही पदवी तर मिळतच नाही, शिवाय प्रमाणपत्रदेखील नसते. त्यामुळे त्यांनी शिक्षण घेतलेले दोन किंवा तीन वर्ष वायाच जातात. मात्र यापुढे अशा विद्यार्थ्यांनादेखील कुठले ना कुठले प्रमाणपत्र मिळू शकणार आहे. यासंदर्भात विद्यापीठाने तयारी सुरू केली आहे. विद्यापीठाकडून ‘इंटरमिडीएट एक्झिट’ची सोय करण्यात येणार आहे. त्यामुळे विद्यार्थी दुसऱ्या किंवा तिसऱ्या वर्षी शिक्षण सोडून गेला तरी त्याला तसे प्रमाणपत्र मिळू शकेल.

आता अभियांत्रिकीच्या प्रत्येक विद्यार्थ्याला ‘बॅचलर ऑफ इंजिनिअरींग’ अशी पदवी मिळते. परंतु आता ही प्रणालीदेखील बदलणार आहे. एखाद्या अभ्यासक्रमातील विद्यार्थ्याने शिक्षण सुरू असतानाच त्याच्याच अध्ययन क्षेत्रात दर्जेदार संशोधन प्रकल्प केला तर त्याला ‘बीई विथ रिसर्च’ अशी पदवी देण्यात येईल. यासंदर्भात नवीन शैक्षणिक धोरणातदेखील उल्लेख असून त्याचे पालन विद्यापीठ करेल. लवकरात लवकर ही प्रणाली लागू करण्याचा विद्यापीठाचा मानस आहे, असे कुलगुरू डॉ. सुभाष चौधरी यांनी ‘लोकमत’ला सांगितले.

‘क्रेडिट्स’चे महत्त्व वाढणार

अभियांत्रिकीच्या विद्यार्थ्यांना पदवी देत असताना त्यांच्या ‘क्रेडिट्स’वर भर राहणार आहे. यामुळे ‘क्रेडिट्स’चे महत्त्व वाढेल व त्यासाठी ‘एबीसी’ची (अ‍ॅकेडॅमिक बँक ऑफ क्रेडिट) स्थापना करण्यात येईल. ‘बीई विथ रिसर्च’ किंवा ‘ऑनर्स’ची पदवी देत असताना या ‘क्रेडिट्स’चा आधार घेण्यात येईल. विद्यार्थ्यांनी एखादा संशोधन प्रकल्प केला तर त्यांच्या नावावर कामाच्या दर्जानुसार ‘क्रेडिट्स’ जमा होतील.

टॅग्स :Education Sectorशिक्षण क्षेत्र