शहरं
Join us  
Trending Stories
1
श्रीनगरमध्ये जप्त केलेल्या स्फोटकांचा स्फोट, ९ जणांचा मृत्यू; दिल्ली कनेक्शनच्या चौकशीदरम्यान ब्लास्ट
2
IPL 2026 Player Trade Updates : जड्डू घाट्यात! संजू ना नफा ना तोटा तत्वावर CSK च्या ताफ्यात
3
जप्त केलेली ३५० किलो स्फोटके कशी फुटली? स्टेशन बाहेरच्या 'त्या' कारवर संशय, अवयव ३०० फूटांवर फेकले गेले
4
"मी कट्टर BJP आहे, त्यामुळे..."; निवेदिता सराफ यांचं वक्तव्य चर्चेत; बिहार निवडणुकीबद्दल काय म्हणाल्या?
5
SIM Swap Fraud: तुमचा मोबाईल नंबर, त्यांचा कंट्रोल; OTP फ्रॉडनं वाढलीये डोकेदुखी, कसं वाचाल?
6
ऐन निवडणुकीत अश्लील व्हिडिओ व्हायरल, मात्र जनतेने दिली साथ; भाजपा उमेदवार किती मतांनी जिंकले?
7
“बिहारच्या निकालाचे श्रेय निवडणूक आयोग अन् मतचोरी, SIR मुळे NDAचा विजय”: हर्षवर्धन सपकाळ
8
आयसीएल फिनकॉर्पचा नवीन एनसीडी इश्यू १७ नोव्हेंबर २०२५ रोजी खुला होणार, १२.६२% पर्यंत परताव्याचा दावा
9
अहिल्यानगर, तुळजापूरमध्ये शिवसेनेची ताकद वाढली; एकनाथ शिंदेंच्या उपस्थितीत मोठे पक्षप्रवेश
10
वाईट घडलं! नवले पूल अपघातात ३० वर्षीय मराठी अभिनेत्याचा दुर्देवी मृत्यू, ३ महिन्याचा मुलगा पोरका
11
भाजप बनला सर्वांत मोठा पक्ष, तरी नितीश कुमार दहाव्यांदा मुख्यमंत्री? डावलणे अशक्य, हे आहे कारण
12
पैसा दुप्पट करण्याची मशीन बनली पोस्टाची ‘ही’ स्कीम; केवळ ₹१००० पासून सुरू करू शकता गुंतवणूक
13
एनडीएच्याच गळ्यात पुन्हा विजयाचा (बि)हार; अब की बार... २०० पार; महाआघाडीचा फ्लाॅप शो; भाजप प्रथमच नंबर १
14
लग्नाच्या वाढदिवशीच घरी लक्ष्मी आली! राजकुमार राव आणि पत्रलेखा झाले आईबाबा
15
'फर्स्ट पास्ट द पोस्ट'चा धक्का; राजदच्या मतांची टक्केवारी भाजपपेक्षा अधिक; पण पराभूत
16
आजचे राशीभविष्य,१५ नोव्हेंबर २०२५: मित्रांसाठी खर्च करावा लागण्याची शक्यता; शक्यतो आज बौद्धिक चर्चा टाळा
17
पाच मुद्द्यांमधून जाणून घ्या एनडीएचा विजय आणि महाआघाडीच्या पराजयाची कारणे...
18
मेगाब्लॉक, जम्बोब्लॉकमुळे रेल्वेच्या तिन्ही मार्गांवर उद्या होणार प्रवास खोळंबा
19
बीबीसीने मागितली अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांची माफी
20
बिहारच्या विजयाने स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांत सत्ताधारी महायुतीला बळ ! मतचोरीचे आरोप चालले नाहीत
Daily Top 2Weekly Top 5

नागपूर विद्यापीठ; अर्ध्यातून शिक्षण सोडल्यावरदेखील मिळणार प्रमाणपत्र

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 11, 2020 06:00 IST

Nagpur News Education Nagpur University अभियांत्रिकीचा चार वर्षांच्या अभ्यासक्रम करत असताना विद्यार्थ्याने एखादा चांगला संशोधन प्रकल्प पूर्ण केला तर त्याला ‘डिग्री विथ रिसर्च’ अशी पदवी देण्यात येणार आहे. यासंदर्भात प्राधिकरणांची मान्यता घेण्यात येणार आहे.

ठळक मुद्देअभियांत्रिकीत येणार ‘डिग्री विथ रिसर्च’

योगेश पांडे

लोकमत न्यूज नेटवर्क

नागपूर : राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाच्या अभियांत्रिकी विद्याशाखेत आमूलाग्र बदल करण्यासाठी पावले उचलण्यात आली आहे. यंदापासून नवीन अभ्यासक्रम तर लागू होण्याची शक्यता आहेच. शिवाय अभियांत्रिकीतील पदवीची प्रणाली बदलविण्यासाठीदेखील प्रयत्न करण्यात येत आहे. अभियांत्रिकीचा चार वर्षांच्या अभ्यासक्रम करत असताना विद्यार्थ्याने एखादा चांगला संशोधन प्रकल्प पूर्ण केला तर त्याला ‘डिग्री विथ रिसर्च’ अशी पदवी देण्यात येणार आहे. यासंदर्भात प्राधिकरणांची मान्यता घेण्यात येणार आहे.

नवीन शैक्षणिक धोरणामध्ये पदवी प्रणालीतदेखील बदल करण्याच्या मुद्याचा अंतर्भाव आहे. त्याचाच आधार घेत नागपूर विद्यापीठात यासंदर्भात बदल करण्याची सुरुवात झाली आहे. अनेक विद्यार्थी अभियांत्रिकीमध्ये प्रवेश तर घेतात. मात्र ते अंतिम वर्षापर्यंत पोहोचू शकत नाही. त्यांना कुठलीही पदवी तर मिळतच नाही, शिवाय प्रमाणपत्रदेखील नसते. त्यामुळे त्यांनी शिक्षण घेतलेले दोन किंवा तीन वर्ष वायाच जातात. मात्र यापुढे अशा विद्यार्थ्यांनादेखील कुठले ना कुठले प्रमाणपत्र मिळू शकणार आहे. यासंदर्भात विद्यापीठाने तयारी सुरू केली आहे. विद्यापीठाकडून ‘इंटरमिडीएट एक्झिट’ची सोय करण्यात येणार आहे. त्यामुळे विद्यार्थी दुसऱ्या किंवा तिसऱ्या वर्षी शिक्षण सोडून गेला तरी त्याला तसे प्रमाणपत्र मिळू शकेल.

आता अभियांत्रिकीच्या प्रत्येक विद्यार्थ्याला ‘बॅचलर ऑफ इंजिनिअरींग’ अशी पदवी मिळते. परंतु आता ही प्रणालीदेखील बदलणार आहे. एखाद्या अभ्यासक्रमातील विद्यार्थ्याने शिक्षण सुरू असतानाच त्याच्याच अध्ययन क्षेत्रात दर्जेदार संशोधन प्रकल्प केला तर त्याला ‘बीई विथ रिसर्च’ अशी पदवी देण्यात येईल. यासंदर्भात नवीन शैक्षणिक धोरणातदेखील उल्लेख असून त्याचे पालन विद्यापीठ करेल. लवकरात लवकर ही प्रणाली लागू करण्याचा विद्यापीठाचा मानस आहे, असे कुलगुरू डॉ. सुभाष चौधरी यांनी ‘लोकमत’ला सांगितले.

‘क्रेडिट्स’चे महत्त्व वाढणार

अभियांत्रिकीच्या विद्यार्थ्यांना पदवी देत असताना त्यांच्या ‘क्रेडिट्स’वर भर राहणार आहे. यामुळे ‘क्रेडिट्स’चे महत्त्व वाढेल व त्यासाठी ‘एबीसी’ची (अ‍ॅकेडॅमिक बँक ऑफ क्रेडिट) स्थापना करण्यात येईल. ‘बीई विथ रिसर्च’ किंवा ‘ऑनर्स’ची पदवी देत असताना या ‘क्रेडिट्स’चा आधार घेण्यात येईल. विद्यार्थ्यांनी एखादा संशोधन प्रकल्प केला तर त्यांच्या नावावर कामाच्या दर्जानुसार ‘क्रेडिट्स’ जमा होतील.

टॅग्स :Education Sectorशिक्षण क्षेत्र