शहरं
Join us  
Trending Stories
1
लोकसभा निवडणुकीच्या सहाव्या टप्प्यात ५९.०६ टक्के मतदान, अशी आहे राज्यवार आकडेवारी
2
गुजरातमध्ये अग्नितांडव! गेमिंग झोनमध्ये लागलेल्या आगीत २० जणांचा मृत्यू; आकडा वाढण्याची शक्यता
3
राष्ट्रवादी काँग्रेस  शरदचंद्र पवार पक्षाला मोठा धक्का, या नेत्याने दिला सर्व पदांचा राजीनामा 
4
"मतांच्या संख्येत बदल होऊच शकत नाही’’, शंका घेणाऱ्यांना निवडणूक आयोगाने ठणकावले
5
डोंबिवलीच्या अमूदान कंपनीत स्फोट कसा झाला? आरोपीच्या वकिलांनी दिली धक्कादायक माहिती
6
Nagpur: धक्कादायक! ‘मॉक पोल’ची मते क्लिअर न करताच घेतले मतदान, निवडणूक अधिकारी म्हणतात...
7
"मी उद्धव ठाकरेंना गुवाहाटीला जाताना फोन केला होता, पण...", बच्चू कडू यांचा गौप्यस्फोट
8
"१५-२० दिवसांनंतर फेरमतदानाची मागणी करणं हास्यास्पद’’, सुनील तटकरे यांचा टोला
9
KKR vs SRH Final वर पावसाचं सावट? स्टेडियमवरची ताजी दृश्ये पाहून चाहते चिंतेत
10
हनिट्रॅप लावला, कोलकात्यात येण्यास भाग पाडले आणि... बांगलादेशी खासदाराच्या हत्येमागचं कारण समोर
11
"मग गुजरातमध्ये मुस्लिमांना आरक्षण का दिलं?" तेजस्वी यादवांचा नरेंद्र मोदींवर पलटवार
12
इंडिया आघाडीकडून पंतप्रधानपदाचा चेहरा कोण असेल? अखिलेश यांच्या आमदारानं सांगितलं
13
साहेब, मला माझ्या पत्नीपासून वाचवा! पीडित पतीने पोलिसांकडे घेतली धाव, समोर आलं धक्कादायक कारण
14
धक्कादायक! सायन हॉस्पिटलच्या आवारात भरधाव कारची धडक; वृद्ध महिलेचा जागीच मृत्यू
15
सावधान! प्लास्टिकच्या बॉटलमधून पाणी पिताय?; आताच बदला सवय, 'या' आजारांचा धोका
16
Narendra Modi : "बिहारच्या गरिबांना लुटणाऱ्यांचं काउंटडाउन सुरू झालं, त्यांना लवकरच जेलमध्ये जावं लागेल"
17
गंभीर टीम इंडियाचा कोच बनण्यास इच्छुक? पण शाहरूख 'स्पीडब्रेकर', जाणून घ्या गणित
18
आधीच अल्पमतात, त्यात पाठिंबा देणाऱ्या आमदाराचं निधन, हरयाणातील भाजपा सरकारचं काय होणार?
19
झारग्राममध्ये भाजपा उमेदवाराच्या ताफ्यावर हल्ला, सुरक्षा कर्मचारी जखमी
20
"आम्ही ४०० पार करू, काँग्रेस ४० च्या खाली जाईल", अमित शाहांचा जोरदार हल्लाबोल

उपराजधानीत चोवीस तासात दोघांची हत्या

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 10, 2018 12:04 AM

गुरुवारी मध्यरात्री यशोधरानगर पोलीस ठाण्याच्या हद्दीत एका गांजा विक्रेत्याची तीन गुन्हेगारांनी निर्घृण हत्या केली. या हत्येची चर्चा सुरूच असताना रेल्वेस्थानकासमोरच्या उड्डाण पुलाखाली एका महिलेची शुक्रवारी रात्री निर्घृण हत्या झाली. २४ तासात हत्येच्या दोन घटना घडल्याने उपराजधानीत खळबळ निर्माण झाली आहे.

ठळक मुद्देरेल्वेस्थानकासमोर महिलेची तर यशोधरानगरात गांजा विकणाऱ्याची हत्या : सर्वत्र खळबळ

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : गुरुवारी मध्यरात्री यशोधरानगर पोलीस ठाण्याच्या हद्दीत एका गांजा विक्रेत्याची तीन गुन्हेगारांनी निर्घृण हत्या केली. या हत्येची चर्चा सुरूच असताना रेल्वेस्थानकासमोरच्या उड्डाण पुलाखाली एका महिलेची शुक्रवारी रात्री निर्घृण हत्या झाली. २४ तासात हत्येच्या दोन घटना घडल्याने उपराजधानीत खळबळ निर्माण झाली आहे.रुबिना सलीम खान (रा. मोहननगर, सदर) ही महिला मध्यवर्ती रेल्वेस्थानकाच्या उड्डाण पुलाखाली ( प्रवेशद्वारासमोर) हातठेल्यावर फळ विकत होती. शुक्रवारू रात्री ८.४५ च्या सुमारास रुबिना मृतावस्थेत दिसल्याने परिसरात एकच खळबळ उडाली. माहिती कळताच सीताबर्डीचे ठाणेदार हेमंत खराबे आपल्या सहकाऱ्यांसह घटनास्थळी धावले. रुबिनाच्या डोक्यावर आणि गळ्यावर घाव होता. चौकशीत तिची दोन ते तीन जणांनी हत्या केल्याचा संशय आजूबाजूच्यांनी व्यक्त केला. एका संशयिताचे नावही पोलिसांना कळले. त्यावरून पोलिसांची पथके आरोपीच्या शोधात वेगवेगळळ्या भागात रवाना झाली. दरम्यान, पोलिसांनी रुबिनाचा मृतदेह रुग्णालयात पाठविला. हत्येच्या या घटनेने रेल्वेस्थानक परिसरात दहशत निर्माण झाली होती.यशोधरानगरातील मृताचे नाव शेरू अली मोहम्मद अली (वय ४०) असून, तो एकता कॉलनी गौसीया मस्जीदजवळ सुकेशिनी राजेश बल्लारे (वय ३५) हिच्या घरी राहायचा. तो गांजा विकत होता. त्याच्याकडे ओरिसा, आंध्रप्रदेशमधील तस्कर नेहमी गांजाची खेप घेऊन येत होते. नेहमीप्रमाणे राजलक्ष्मी नामक महिला गुरुवारी गांजाची खेप घेऊन शेरू-सुकेशिनीच्या घरी आली. तिने घरात पिशवी ठेवली होती. त्याचवेळी तेथे जरीपटक्यातील लुंबिनीनगरात राहणारा आरोपी गोलू ऊर्फ विद्याधर कांबळे आला. तो निघून गेल्यानंतर राजलक्ष्मीच्या पिशवीतील तीन गांजाची पाकिटं गायब झाल्याचे शेरूच्या लक्षात आले. ते कांबळेनेच चोरले असावे, असा संशय आल्याने शेरूने कांबळेला बोलविले. कांबळे त्याच्या दोन साथीदारासह गुरुवारी मध्यरात्री १२ च्या सुमारास शेरूच्या घरी पोहचला. यावेळी चोरलेला गांजा परत आणून दे, असे म्हणत शेरूने कांबळेसोबत वाद घातला. कांबळेने नकार देताच शेरूने त्याला दोन थापडा मारल्या. यामुळे कांबळेने त्याच्यावर लोखंडी पाईपने हल्ला चढवला. त्याला रक्तबंबाळ केल्यानंतर कांबळेसोबत असलेले त्याचे साथीदार कुणाल नरेंद्र वाघमारे (वय २०, रा. लुंबिनीनगर) आणि दाद्या ऊर्फ राहुल भीमराव इंगळे (वय २४) या दोघांनी शेरूला पकडले तर कांबळेने धारदार खंजराने शेरूवर सपासप घाव घालून त्याची हत्या केली. यामुळे परिसरात प्रचंड दहशत निर्माण झाली. माहिती कळताच यशोधरानगर पोलिसांचा ताफा पोहचला. पोलिसांनी सुकेशिनी बल्लारेच्या तक्रारीवरून गुन्हा दाखल केला. त्यानंतर आरोपींची शोधाशोध सुरू केली.पळून जाण्याची होती तयारीशेरूची हत्या केल्यानंतर आरोपी कांबळे, वाघमारे आणि इंगळे यशोधरानगरातून पळून गेले. हे तिघेही गुन्हेगारी वृत्तीचे असून, यशोधरानगर तसेच जरीपटक्यात ते अवैध दारू, गांजाची विक्री करतात. त्यांनी पैशाची जुळवाजुळव केल्यानंतर पहाटे नागपुरातून बाहेरगावी पळून जाण्याच्या तयारीत होते. मात्र, ठाणेदार पुंडलिक मेश्राम आणि त्यांच्या सहकाऱ्यानी या तिघांच्याही मुसक्या बांधल्या. 

 

टॅग्स :Murderखूनnagpurनागपूर