शहरं
Join us  
Trending Stories
1
"नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाला नरेंद्र मोदी नाव द्यावं, अदानींचा दि.बा.पाटील नावाला विरोध"
2
रोहित पवारांचा सभापती राम शिंदेंवर खळबळजनक आरोप; निलेश घायवळला देशाबाहेर पळवण्यामागे कोण?
3
"सचिन घायवळवर गुन्हे दाखल होते, पण..."; मंत्री योगेश कदमांनी सांगितले शस्त्र परवाना देण्याचे कारण
4
याला म्हणतात जबरदस्त लिस्टिंग, २०% प्रीमिअमसह लिस्ट झाला शेअर; खरेदीसाठी गुंतवणूकदारांच्या उड्या, लागलं अपर सर्किट
5
“CJI गवई यांच्यावरील हल्ला हा लोकशाहीवरचा हल्ला, सर्वांनी संताप व्यक्त करायला हवा”: सपकाळ
6
VIDEO: आ रा रा रा खतरनाकsss... पक्ष्याने चक्क गिळला जिवंत साप, पाहून तुम्हीही व्हाल अवाक्
7
पुढील वर्षी सरासरी १० टक्क्यांपर्यंत पगारवाढ; सर्वाधिक लाभ कुणाला मिळणार?
8
दिवाळीला कार घ्यायचीय? HDFC, ICICI की IndusInd? ५ वर्षांसाठी सर्वात कमी हप्ता कोणाचा?
9
चीन-भारताच्या संबंधात फिल्मी क्लायमॅक्स; ड्रॅगन म्हणाला, " आश्वासन द्या, आम्ही जे देऊ ते अमेरिकेला देणार नाही..."
10
प्रेमानंद महाराजांची प्रकृती आणखी खालावली? आश्रमाकडून मिळाली 'ही' अधिकृत माहिती 
11
रोहित शर्माचं कर्णधारपद जाणार हे आधीच सांगितलं होतं.. प्रेस कॉन्फरन्समध्ये झाला मोठा खुलासा
12
फक्त ८८६ चेंडूत टेस्ट मॅच संपवली; ऑस्ट्रेलियाचा धुव्वा उडवून भारतानं रचला इतिहास!
13
गोल्ड ईटीएफ ठरला नवा मल्टीबॅगर स्टॉक! इतक्या वर्षात ₹१० लाखाचे झाले तब्बल ₹१ कोटी रुपये!
14
Ratan Tata Death Anniversary: वाद... आव्हानं.., रतन टाटांच्या निधनानंतर एका वर्षात किती बदलला टाटा समूह
15
Rinku Singh: क्रिकेटविश्व हादरलं! क्रिकेटपटू रिंकू सिंहला दाऊद गँगची धमकी, १० कोटींची खंडणी मागितली
16
बायकोचं ऐकलं नाही, रोडट्रिपला गेला; अपघतात ३५ वर्षीय गायकाचा मृत्यू, दोन लहान मुलं पोरकी
17
WhatsApp हॅक झालं? लगेच करा 'या' ५ गोष्टी; नाहीतर पूर्ण फोनचाच ताबा जाईल!
18
“त्रिभाषा प्रकरणी हरकती नोंदवण्याची मुदत वाढवावी, आडमार्गाने...”; मनसेचे समितीला पत्र
19
Mohammed Shami: "मी तंदुरुस्त आहे आणि..."  ऑस्ट्रेलिया दौऱ्यातून वगळल्यानंतर शमीने सोडले मौन! 
20
Saif Ali Khan : "तू मरणार आहेस का?", रक्ताच्या थारोळ्यात पाहून तैमूरने विचारलेला प्रश्न, सैफने दिलं 'हे' उत्तर

Nagpur: बांगलादेशच्या सिमेवरील मुले, रेल्वे स्थानकावर रंगला संशयकल्लोळ, आरपीएफची कारवाई

By नरेश डोंगरे | Updated: May 20, 2025 18:42 IST

Nagpur Railway Station: बांगलादेशच्या सिमेवरील अल्पवयीन मुले मोठ्या संख्येत सोमवारी रात्री नागपूर रेल्वे स्थानकावर उतरली.

नरेश डोंगरे, नागपूर: बांगलादेशच्या सिमेवरील अल्पवयीन मुले मोठ्या संख्येत सोमवारी रात्री नागपूर रेल्वे स्थानकावर उतरली. रेल्वे सुरक्षा दलाने (आरपीएफ) त्यांना ताब्यात घेत चाैकशी सुरू केली. दरम्यान, हा ह्युमन ट्रॅफिकिंगचा प्रकार असावा, असा संशय आल्याने मुलांना बिहारमधून सोबत घेऊन येणारांची मंगळवारी पहाटेपर्यंत चाैकशी सुरू होती.

ट्रेन नंबर १८०३० शालीमार एक्सप्रेस सोमवारी रात्री नागपुरात आली. फलाट क्रमांक ८ वर तैनात असलेल्या स्टेशन मास्तरला अनेक छोटी छोटी मुले एकापाठोपाठ उतरताना दिसल्याने संशय आला. त्यांनी आरपीएफच्या जवानांना पाचारण केले. छोटी-छोटी २६ मुले एकसाथ दिसल्याने आणि त्यांचे पालक सोबत नसल्याने संशयकल्लोळ वाढला. सर्व मुले १५ वर्षांच्या आतील वयोगाटाचे आहेत. टिचर म्हणवून घेणारे दोघे त्यांचे दिशादर्शक म्हणून काम करत होते. त्यामुळे आरपीएफने त्यांना विचारपूस सुरू केली. ह्युमन ट्रॅफिकिंगचा प्रकार असावा, असा संशय बळावल्याने लगेच बाल कल्याण समिती आणि चाईल्ड लाईनच्या सदस्यांना बोलवून घेण्यात आले.

पहाटेपर्यंत झाली शहानिशाजिल्हा बाल संरक्षण अधिकारी मुश्ताक पठाण, चाईल्ड लाईनचे नीतेश सांगोडे, रणजित कुंभारे, दीपाली धमगाये यांनी आरपीएफचे निरीक्षक यादव यांच्या देखरेखित पहाटेपर्यंत विचारपूस चालली. ही सर्व मुले बांगलादेश सिमेवरील किशनगंज जिल्ह्यातील (बिहार) कलकली तसेच आजुबाजुच्या ठिकाणची असून ती येथे मदरशात शिक्षणसाठी आल्याचे चाैकशीत स्पष्ट झाले.

आईवडिलांशी संपर्कसीडब्ल्यूसी आणि चाईल्ड लाईनच्या पदाधिकाऱ्यांनी मुलांच्या पालकांशी संपर्क साधला. त्यांनी ही मुले शिक्षणासाठी नागपुरात पाठविल्याचे सांगितल्याची माहिती अधिकारी सांगतात. दरम्यान, समोरसामोर खात्री करून घेण्यासाठी मुलांच्या पालकांना नागपुरात बोलविले असून, ते बुधवारी सायंकाळपर्यंत पोहचणार आहेत. तूर्त मुलांना पाटणकर चाैकातील शासकीय बालगृहात ठेवण्यात आल्याचे जिल्हा बाल संरक्षण अधिकारी पठाण यांनी सांगितले.

मुलांना दुसऱ्या प्रांतात नेता येते ?कोणत्याही कारणासाठी अल्पवयीन मुलांना आईवडील सोबत नसताना एका प्रांतातून दुसऱ्या प्रांतात नेता येते का, असा प्रश्न उपस्थित झाला आहे. या प्रश्नाचे उत्तर शोधण्यासाठी विधिज्ञांचे मत घेतले जात आहे. बाल संरक्षण कायद्यानुसार, मुलांना त्यांच्या पालकांशिवाय एका प्रांतातून दुसऱ्या प्रांतात नेले जात असेल तर ते चुकीचे आहे. त्यामुळे आरपीएफसह अन्य यंत्रणाही या प्रकाराच्या चाैकशीकडे नजर ठेवून आहेत.

टॅग्स :nagpurनागपूरMaharashtraमहाराष्ट्र