शहरं
Join us  
Trending Stories
1
नरेंद्र मोदींचा उत्तराधिकारी कोण बनणार? सरसंघचालक मोहन भागवतांचं सूचक विधान, म्हणाले...    
2
ज्या देशाच्या कारमधून पुतिन यांनी केला प्रवास; आता त्यांच्याचविरोधात उतरवले लढाऊ जहाज, तणाव वाढला
3
अविवाहित मुलीच्या संपत्तीचा खरा वारसदार कोण? कायद्यानुसार कोणाचे असतात प्रथम अधिकार?
4
'या' कर्जमुक्त कंपनीच्या शेअरवर गुंतवणूकदारांच्या उड्या; ₹६० पेक्षा कमी आहे किंमत, दमानींचीही गुंतवणूक
5
Travel : भारतातून १००००० रुपये घेऊन थायलंड ट्रिपला निघताय? राहणं, खाणं आणि फिरणं एकूण किती होईल खर्च?
6
“देशात कधीही झाले नाही, ती परंपरा PM मोदी अन् CM फडणवीसांनी सुरू केली”; कुणी केली टीका?
7
Akola Live in Partner killed: २८ वर्षाच्या प्रेयसीची पवनने हत्या केली आणि पोलीस ठाण्यात जाऊन म्हणाला, 'तिने माझ्या घरात...'
8
केंद्रीय कर्मचाऱ्यांसाठी महत्त्वाची बातमी, सरकारनं 'या' महत्त्वाच्या नियमांत केला बदल; १५ डिसेंबरपासून लागू होणार
9
संतापजनक...! गुजरातमध्ये 6 वर्षांच्या चिमुकलीवर अत्याचार, नराधमानं प्रायव्हेट पार्टमध्ये...; आरोपी 3 मुलांचा बाप!
10
३१ डिसेंबर आहे अखेरची तारीख, 'ही' २ कामं पटापट आटोपून घ्या; केली नाही तर समस्यांना सामोरं जावं लागेल
11
क्रिकेट कोचला बॅटने बेदम मारहाण; २० टाके पडले! संघात न घेतल्यानं तिघे भडकले, अन्....
12
प्रेम, धोका आणि ब्लॅकमेलिंग! व्यापाऱ्याचा महिला DSP वर कोट्यवधी रुपये हडपल्याचा गंभीर आरोप
13
शिंदेंचा ‘वाघ’ थेट बिबट्याच्या वेशात विधान भवनात; हात जोडून सरकारला विनवणी, “गेली २० वर्षे...”
14
ममता बॅनर्जींनी केंद्र सरकारच्या आदेशाचा कागद फाडला! कशावरून रंगला 'हाय-व्होल्टेज' ड्रामा?
15
पाकिस्तानात शूट झालाय रणवीर सिंगचा 'धुरंधर'? अभिनेत्याचा मोठा खुलासा, म्हणाला- "तिथले गँगस्टर..."
16
माणुसकी संपली! हेल्थ चेकअपमध्ये कॅन्सर झाल्याचे कळले; IT कंपनीने २१ वर्षांचा अनुभव असलेल्या कर्मचाऱ्याला काढले 
17
'वीर सावरकर पुरस्कार' नाकारला! काँग्रेस खासदार शशी थरूर यांनी HRDS इंडियाचा प्रस्ताव फेटाळला; 'सहमतीशिवाय घोषणा केल्याने' वाद
18
Viral Video: अरे, हे चाललंय तरी काय? जोडप्यानं हायवेवर कार बाजूला लावली अन् रस्त्यावरच...
19
२०२६ मधील सार्वजनिक सुट्ट्यांची यादी जाहीर, भाऊबीजेला अतिरिक्त सुट्टी; सरकारकडून अधिसूचना जारी
Daily Top 2Weekly Top 5

Nagpur: बांगलादेशच्या सिमेवरील मुले, रेल्वे स्थानकावर रंगला संशयकल्लोळ, आरपीएफची कारवाई

By नरेश डोंगरे | Updated: May 20, 2025 18:42 IST

Nagpur Railway Station: बांगलादेशच्या सिमेवरील अल्पवयीन मुले मोठ्या संख्येत सोमवारी रात्री नागपूर रेल्वे स्थानकावर उतरली.

नरेश डोंगरे, नागपूर: बांगलादेशच्या सिमेवरील अल्पवयीन मुले मोठ्या संख्येत सोमवारी रात्री नागपूर रेल्वे स्थानकावर उतरली. रेल्वे सुरक्षा दलाने (आरपीएफ) त्यांना ताब्यात घेत चाैकशी सुरू केली. दरम्यान, हा ह्युमन ट्रॅफिकिंगचा प्रकार असावा, असा संशय आल्याने मुलांना बिहारमधून सोबत घेऊन येणारांची मंगळवारी पहाटेपर्यंत चाैकशी सुरू होती.

ट्रेन नंबर १८०३० शालीमार एक्सप्रेस सोमवारी रात्री नागपुरात आली. फलाट क्रमांक ८ वर तैनात असलेल्या स्टेशन मास्तरला अनेक छोटी छोटी मुले एकापाठोपाठ उतरताना दिसल्याने संशय आला. त्यांनी आरपीएफच्या जवानांना पाचारण केले. छोटी-छोटी २६ मुले एकसाथ दिसल्याने आणि त्यांचे पालक सोबत नसल्याने संशयकल्लोळ वाढला. सर्व मुले १५ वर्षांच्या आतील वयोगाटाचे आहेत. टिचर म्हणवून घेणारे दोघे त्यांचे दिशादर्शक म्हणून काम करत होते. त्यामुळे आरपीएफने त्यांना विचारपूस सुरू केली. ह्युमन ट्रॅफिकिंगचा प्रकार असावा, असा संशय बळावल्याने लगेच बाल कल्याण समिती आणि चाईल्ड लाईनच्या सदस्यांना बोलवून घेण्यात आले.

पहाटेपर्यंत झाली शहानिशाजिल्हा बाल संरक्षण अधिकारी मुश्ताक पठाण, चाईल्ड लाईनचे नीतेश सांगोडे, रणजित कुंभारे, दीपाली धमगाये यांनी आरपीएफचे निरीक्षक यादव यांच्या देखरेखित पहाटेपर्यंत विचारपूस चालली. ही सर्व मुले बांगलादेश सिमेवरील किशनगंज जिल्ह्यातील (बिहार) कलकली तसेच आजुबाजुच्या ठिकाणची असून ती येथे मदरशात शिक्षणसाठी आल्याचे चाैकशीत स्पष्ट झाले.

आईवडिलांशी संपर्कसीडब्ल्यूसी आणि चाईल्ड लाईनच्या पदाधिकाऱ्यांनी मुलांच्या पालकांशी संपर्क साधला. त्यांनी ही मुले शिक्षणासाठी नागपुरात पाठविल्याचे सांगितल्याची माहिती अधिकारी सांगतात. दरम्यान, समोरसामोर खात्री करून घेण्यासाठी मुलांच्या पालकांना नागपुरात बोलविले असून, ते बुधवारी सायंकाळपर्यंत पोहचणार आहेत. तूर्त मुलांना पाटणकर चाैकातील शासकीय बालगृहात ठेवण्यात आल्याचे जिल्हा बाल संरक्षण अधिकारी पठाण यांनी सांगितले.

मुलांना दुसऱ्या प्रांतात नेता येते ?कोणत्याही कारणासाठी अल्पवयीन मुलांना आईवडील सोबत नसताना एका प्रांतातून दुसऱ्या प्रांतात नेता येते का, असा प्रश्न उपस्थित झाला आहे. या प्रश्नाचे उत्तर शोधण्यासाठी विधिज्ञांचे मत घेतले जात आहे. बाल संरक्षण कायद्यानुसार, मुलांना त्यांच्या पालकांशिवाय एका प्रांतातून दुसऱ्या प्रांतात नेले जात असेल तर ते चुकीचे आहे. त्यामुळे आरपीएफसह अन्य यंत्रणाही या प्रकाराच्या चाैकशीकडे नजर ठेवून आहेत.

टॅग्स :nagpurनागपूरMaharashtraमहाराष्ट्र