शहरं
Join us  
Trending Stories
1
'लाडकी बहीण'नंतर आणखी एका योजनेची घोषणा; महायुती सरकारची नोकरदार महिला वर्गाला मोठी भेट
2
"मर्सिडिज, महागडा फोन अन् ३५ लाख दिले तरीही..."; मृत्यूपूर्वी युवकाचा भाजपा नेत्यावर गंभीर आरोप
3
घर सोडले, गाव सोडले अन् निघाल्या थेट मुंबईकडे; टीसीच्या सतर्कतेमुळे 'त्या' दोघी सुखरूप बचावल्या
4
अमेरिकेच्या 'टॅरिफ'विरुद्ध चीन भारतासोबत उभा! चीनच्या राजदूताने डोनाल्ड ट्रम्प यांच्यावर टीका केली
5
"शेर हमेशा शेर ही रहता है..."  २०२६ ची निवडणूक स्वबळावर; DMK, भाजपासोबत युती नाही, विजयची घोषणा
6
१८ किमी अंतर, २० मिनिटांचा वेळ...फिल्मी स्टाईलनं अर्चना तिवारीनं बदलला लूक, CCTV मध्ये कैद
7
रेल्वे प्रवाशांना नियमापेक्षा जास्त सामानावर दंड भरावा लागणार? रेल्वेमंत्री वैष्णव म्हणाले...
8
CSK च्या अकादमीत MI अन् RCB चे चाहते! ऋतुराज म्हणाला; प्रत्येकाचं नाव लक्षात ठेवीन! (VIDEO)
9
रशियन सैन्यात अजूनही भारतीय...एस जयशंकर यांची रशियाकडे मागणी; 'मॉस्को'नेही दिला शब्द
10
धुळे: तरुण-तरुणीचं होतं जीवापाड प्रेम, पण घरच्यांनी...; लग्नाला चार वर्ष झाल्यानंतर एकत्रच मृत्यूला कवटाळले 
11
KGF Gold Mine : KGF मधून आतापर्यंत किती सोने काढले? आकडा ऐकून धक्का बसेल, भारतातील सर्वात खोल खाण
12
नागपुरात ‘छम छम बार’, अश्लील नृत्य करणाऱ्या ‘डान्सर्स’वर पैशांची उधळण; २५ जणांविरोधात गुन्हा
13
'रशियाकडून भारत नाही, चीन सर्वाधिक तेल खरेदी करतो', जयशंकर यांचा अमेरिकेवर निशाणा
14
हे महाराष्ट्रात घडलं! ताटात उष्टे अन्न ठेवले म्हणून मुलाने वडिलांचे कुऱ्हाडीने केले तुकडे, पोत्यात भरून...
15
मोठी बातमी! पालघरमधील मेडली फार्मा कंपनीमध्ये वायू गळती; चार जणांचा मृत्यू
16
ट्रम्प खोटारडे निघाले! अमेरिकेच्याच दूतावासाने उघडे पाडले; भारतात निवडणूक फंडिंग केल्याचा केलेला दावा
17
२ लग्नानंतरही 'ती' थांबली नाही, तिसऱ्यासाठी दबाव टाकला; माजी सरपंचाशी वैर महिलेला जीवावर बेतलं
18
कोकणात जाणाऱ्या गणेशभक्तांसाठी टोलमाफीची घोषणा; वाहनधारकांना कुठे मिळणार विशेष पास?
19
Shreyas Iyer: बापानं व्यक्त केलं लेकाच्या मनातील दु:ख! कॅप्टन्सीची इच्छा नाही; फक्त संघात घ्या!
20
12th Pass Job: बारावी उत्तीर्णांसाठी हायकोर्टात चांगल्या पगाराची नोकरी; ८१,१०० पर्यंत पगार मिळणार!

Nagpur: बांगलादेशच्या सिमेवरील मुले, रेल्वे स्थानकावर रंगला संशयकल्लोळ, आरपीएफची कारवाई

By नरेश डोंगरे | Updated: May 20, 2025 18:42 IST

Nagpur Railway Station: बांगलादेशच्या सिमेवरील अल्पवयीन मुले मोठ्या संख्येत सोमवारी रात्री नागपूर रेल्वे स्थानकावर उतरली.

नरेश डोंगरे, नागपूर: बांगलादेशच्या सिमेवरील अल्पवयीन मुले मोठ्या संख्येत सोमवारी रात्री नागपूर रेल्वे स्थानकावर उतरली. रेल्वे सुरक्षा दलाने (आरपीएफ) त्यांना ताब्यात घेत चाैकशी सुरू केली. दरम्यान, हा ह्युमन ट्रॅफिकिंगचा प्रकार असावा, असा संशय आल्याने मुलांना बिहारमधून सोबत घेऊन येणारांची मंगळवारी पहाटेपर्यंत चाैकशी सुरू होती.

ट्रेन नंबर १८०३० शालीमार एक्सप्रेस सोमवारी रात्री नागपुरात आली. फलाट क्रमांक ८ वर तैनात असलेल्या स्टेशन मास्तरला अनेक छोटी छोटी मुले एकापाठोपाठ उतरताना दिसल्याने संशय आला. त्यांनी आरपीएफच्या जवानांना पाचारण केले. छोटी-छोटी २६ मुले एकसाथ दिसल्याने आणि त्यांचे पालक सोबत नसल्याने संशयकल्लोळ वाढला. सर्व मुले १५ वर्षांच्या आतील वयोगाटाचे आहेत. टिचर म्हणवून घेणारे दोघे त्यांचे दिशादर्शक म्हणून काम करत होते. त्यामुळे आरपीएफने त्यांना विचारपूस सुरू केली. ह्युमन ट्रॅफिकिंगचा प्रकार असावा, असा संशय बळावल्याने लगेच बाल कल्याण समिती आणि चाईल्ड लाईनच्या सदस्यांना बोलवून घेण्यात आले.

पहाटेपर्यंत झाली शहानिशाजिल्हा बाल संरक्षण अधिकारी मुश्ताक पठाण, चाईल्ड लाईनचे नीतेश सांगोडे, रणजित कुंभारे, दीपाली धमगाये यांनी आरपीएफचे निरीक्षक यादव यांच्या देखरेखित पहाटेपर्यंत विचारपूस चालली. ही सर्व मुले बांगलादेश सिमेवरील किशनगंज जिल्ह्यातील (बिहार) कलकली तसेच आजुबाजुच्या ठिकाणची असून ती येथे मदरशात शिक्षणसाठी आल्याचे चाैकशीत स्पष्ट झाले.

आईवडिलांशी संपर्कसीडब्ल्यूसी आणि चाईल्ड लाईनच्या पदाधिकाऱ्यांनी मुलांच्या पालकांशी संपर्क साधला. त्यांनी ही मुले शिक्षणासाठी नागपुरात पाठविल्याचे सांगितल्याची माहिती अधिकारी सांगतात. दरम्यान, समोरसामोर खात्री करून घेण्यासाठी मुलांच्या पालकांना नागपुरात बोलविले असून, ते बुधवारी सायंकाळपर्यंत पोहचणार आहेत. तूर्त मुलांना पाटणकर चाैकातील शासकीय बालगृहात ठेवण्यात आल्याचे जिल्हा बाल संरक्षण अधिकारी पठाण यांनी सांगितले.

मुलांना दुसऱ्या प्रांतात नेता येते ?कोणत्याही कारणासाठी अल्पवयीन मुलांना आईवडील सोबत नसताना एका प्रांतातून दुसऱ्या प्रांतात नेता येते का, असा प्रश्न उपस्थित झाला आहे. या प्रश्नाचे उत्तर शोधण्यासाठी विधिज्ञांचे मत घेतले जात आहे. बाल संरक्षण कायद्यानुसार, मुलांना त्यांच्या पालकांशिवाय एका प्रांतातून दुसऱ्या प्रांतात नेले जात असेल तर ते चुकीचे आहे. त्यामुळे आरपीएफसह अन्य यंत्रणाही या प्रकाराच्या चाैकशीकडे नजर ठेवून आहेत.

टॅग्स :nagpurनागपूरMaharashtraमहाराष्ट्र