शहरं
Join us  
Trending Stories
1
'हेल-होल' वादानंतर ट्रम्प यांचं 'हृदयपरिवर्तन'! म्हणाले, "भारत 'महान देश' आणि मोदी..."
2
पश्चिम रेल्वेच्या ट्रेन मॅनेजरला होमगार्ड शिपायाची लाथ; गुन्हा नोंदवण्यास टाळाटाळ केल्याचा आरोप
3
Baramati bypoll election: बारामती विधानसभा पोटनिवडणुकीत मतदानाचा टक्का घसरला; सुनेत्रा पवार यांच्या ‘रेकॉर्डब्रेक’ मताधिक्याचा ४ 'मे'ला होणार फैसला
4
Sanju Samson Record: वानखेडेवर संजूची विक्रमी सेंच्युरी! हिटमॅन रोहित शर्माची बरोबरी; कोहली-अभिषेकचा रेकॉर्डही धोक्यात
5
जळगाव महापालिकेत पोलिसांचे तळ, कागदपत्रांची झाडाझडती; ४१ कोटींच्या अपहाराचा आरोप
6
MI vs CSK : मुकेश चौधरीला सलाम! आईच्या निधनानंतर काळजावर दगड ठेवून उतरला मैदानात
7
पुतळ्यासारखे थिजले लेकाचे हात; बापासाठी पदक जिंकले, सुवर्ण सोहळा पाहायला येतानाच वडिलांचा अपघाती मृत्यू
8
पश्चिम बंगालमध्ये पहिल्या टप्प्यात भाजप किती जागा जिंकणार? विक्रमी मतदानानंतर सुवेंदू अधिकारी यांचा धक्कादायक दावा!
9
बंगाल-तमिळनाडूत मतदानाची विक्रमी टक्केवारी; बंपर मतदानाने कोणाचे नशीब उजळणार?
10
मध्य प्रदेशमधील प्रवाशाचे साहित्य हरवले; रेल्वे पोलिसांनी नागपुरात शोधून दिले
11
होर्मुझमध्ये सुरुंग पेरणाऱ्या बोटी दिसताच उडवा! ट्रम्प यांचा आदेश; पुन्हा युद्ध भडकणार?
12
बारामतीमध्ये २०२९ ला पवार विरुद्ध पवार लढाई होणार का? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं...
13
IPL 2026 : रोहित-धोनीशिवाय MI आणि CSK संघ उतरला मैदानात! IPL मध्ये पहिल्यांदाच असं घडलं
14
Travel : निसर्गाची मुक्त हस्ताने उधळण! भारताच्या 'या' ४ सुंदर ठिकाणांपुढे स्वित्झर्लंडही पडेल फिके
15
चेहऱ्यावर मास्क, खांद्यावर बंदूक...; भारतात येणाऱ्या जहाजावर इराणी कमांडोंनी कसा केला कब्जा? बघा भरसमुद्रातला थरारक VIDEO
16
पुणेकर...! म्हाडाची २९५ घरे घेणार का ? प्रथम येणाऱ्यास प्रथम प्राधान्य... कुठे, कुठे आहेत...
17
डोनाल्ड ट्रम्प यांच्या ‘हेलहोल’ टिप्पणीवर भारताची सावध भूमिका; परराष्ट्र मंत्रालयाने म्हटले...
18
हर्षवर्धन सपकाळ मातोश्रीवर गेले, उद्धव ठाकरे यांची भेट घेतली; कोणत्या विषयावर काय चर्चा झाली?
19
काळाचा घाला! उत्तराखंडच्या चंबा-कोटी रोडवर भीषण अपघात; बस दरीत कोसळून ८ जणांचा मृत्यू
20
कर्नाटक सरकारचे मराठी संपवण्याचे षडयंत्र! १० वीच्या निकालातून 'मराठी' शब्द गायब; सीमाभागात संताप
Daily Top 2Weekly Top 5

नागपूर-पुणे दुरांतो सुरूकरा

By admin | Updated: January 7, 2016 03:45 IST

नागपूर-पुणे या मार्गावरील रेल्वेगाड्यात नेहमीच प्रवाशांची गर्दी पाहावयास मिळते. विदर्भातील चाकरमानी नोकरीनिमित्त आणि बहुतांश विद्यार्थी पुण्याला शिकत असल्यामुळे हा मार्ग १२ महिने व्यस्त असतो.

प्रवाशांची मागणी : प्रतीक्षायादी राहत असल्यामुळे गैरसोयनागपूर : नागपूर-पुणे या मार्गावरील रेल्वेगाड्यात नेहमीच प्रवाशांची गर्दी पाहावयास मिळते. विदर्भातील चाकरमानी नोकरीनिमित्त आणि बहुतांश विद्यार्थी पुण्याला शिकत असल्यामुळे हा मार्ग १२ महिने व्यस्त असतो. या मार्गावरील रेल्वेगाड्यांचे दोन महिन्यांपूर्वीच आरक्षण फुल्ल झालेले आढळते. त्यामुळे अनेक प्रवाशांना वेटींगचे तिकीट घेऊन प्रवास करण्याची पाळी येते. प्रवाशांची गैरसोय दूर करण्यासाठी आगामी रेल्वे अर्थसंकल्पात नागपूर-पुणे दुरांतो एक्स्प्रेस सुरू करण्याची मागणी प्रवासी करीत आहेत.नागपूरवरून पुण्याला ये-जा करणाऱ्या प्रवाशांची संख्या फार मोठी आहे. प्रवासाचे स्वस्त आणि सुरक्षित माध्यम म्हणून प्रवाशी रेल्वेच्या प्रवासाला प्राधान्य देतात. परंतु नागपूरवरून प्रतिदिवशी एकच रेल्वेगाडी पुण्यासाठी सोडण्यात येते. १२१३६ नागपूर-पुणे एक्स्प्रेस ही गाडी सोमवार, बुधवार आणि शनिवारी सोडण्यात येते. तर १२११४ नागपूर-पुणे गरीबरथ एक्स्प्रेस ही गाडी मंगळवार, शुक्रवार आणि रविवारी सोडण्यात येते. या दोन्ही गाड्यात १२ महिने प्रवाशांची भली मोठी प्रतीक्षायादी पाहावयास मिळते. दोन महिन्यांपूर्वीच या मार्गावरील गाड्यांचे आरक्षण फुल्ल होते. नागपूरसह विदर्भातील असंख्य विद्यार्थी पुण्यात शिकण्यासाठी गेलेले असल्यामुळे हा मार्ग १२ महिने व्यस्त राहतो. दिवाळीत नागपूरवरून पुण्याला ये-जा करणाऱ्या प्रवाशांच्या संख्येत कमालीची वाढ होते. याचाच फायदा घेऊन खासगी ट्रॅव्हल्सचे संचालक नागपूर-पुणे प्रवासाचे भाडे तीन हजार करीत असल्यामुळे प्रवाशांची मोठी आर्थिक लूट होते. या मार्गावरील प्रवाशांना दिलासा देण्यासाठी आगामी रेल्वे अर्थसंकल्पात नागपूर-पुणे दुरांतो एक्स्प्रेस ही नवी गाडी सुरू करण्याची मागणी प्रवासी करीत आहेत. (प्रतिनिधी)दिल्ली, पुणे दुरांतोसाठी पाठपुरावा करणार‘नागपूरवरून दिल्लीला तसेच पुण्याला जाणाऱ्या प्रवाशांची संख्या फार मोठी आहे. त्यामुळे या दोन्ही मार्गावर नागपुरातून दुरांतो गाड्या सुरू करणे महत्त्वाचे आहे. याबाबत आगामी रेल्वे अर्थसंकल्पापूर्वी रेल्वे बोर्डाला पत्र लिहून खुद्द रेल्वेमंत्री सुरेश प्रभू यांची भेट घेऊन पाठपुरावा करणार आहे. याशिवाय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनाही भेटून या गाड्या सुरू करण्यासाठी पुढाकार घेण्यासाठी आग्रह करणार आहे.’अजय संचेती, खासदार, राज्यसभा