शहरं
Join us  
Trending Stories
1
‘धर्मांतरासारखे प्रकार खपवून घेऊ नका’ मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचे पोलिसांना कडक निर्देश
2
Air Travel Rules: ...तर ‘त्या’ प्रवाशांना विमानात ‘नो एन्ट्री’, नव्या नियमांचा मसुदा तयार!
3
आजचे राशीभविष्य, १९ एप्रिल २०२६: शारीरिक व मानसिक आरोग्य उत्तम राहील, आर्थिक बाबीत सावध राहा!
4
आयत्या पिठावर रेघोट्या मारून राजकारण होत नाही; जनतेची कामे करा: एकनाथ शिंदे
5
Gold Rates: सोन्याचे दर खाली घसरतील की आणखी चढतील?
6
Supreme Court: घर मालकीहक्काचा निर्णय सोसायटी घेऊ शकत नाही : उच्च न्यायालय
7
Maharashtra Weather: अलर्ट! राज्यावर दुहेरी संकट, कडक उन्हासोबत अवकाळी पावसाचा शक्यता
8
जबरदस्तीने फोटो काढून अत्याचार अन् धर्मांतरास प्रवृत्त केल्याचा आरोप;  पंचवटी पोलिसांची मोठी कारवाई
9
केंद्रीय कर्मचाऱ्यांना गुड न्यूज; महागाई भत्ता २ टक्के वाढला; पेन्शनरांनाही होणार लाभ 
10
मुंबईत यकृत प्रत्यारोपणासाठी ८३७ रुग्ण वेटिंगवर, अवयवदानाबाबत पुन्हा जागरुकतेची आवश्यकता
11
Rahul Gandhi: ‘भारताचा आत्मा वाचवण्यासाठीच विधेयक रोखले!’- राहुल गांधी
12
खेळण्यातील कारचा वापर करून हल्ल्याचा कट, ४ संशयित दहशतवाद्यांना अटक
13
PM Modi: महिला आरक्षण रोखून विरोधकांनी पाप केले; त्यांना शिक्षा मिळणारच: पंतप्रधान मोदी
14
Iran fires on Indian ships: होर्मुजच्या सामुद्रधुनीमध्ये भारतीय जहाजांवर गोळीबार; इराणचे पुन्हा निर्बंध 
15
मोठी अपडेट! गोळीबारात एक जहाज होर्मुझमधून निसटले, इराणने भारताची १४ जहाजे रोखलेली
16
IPL 2026 : मलिंगाचा भेदक मारा; महागडा प्रफुलही शेवटी चमकला! CSK ला रोखत SRH नं मैदान मारलं
17
हा तर डिस्ट्रेस एड्रेस! पंतप्रधान मोदींच्या संबोधनावर काँग्रेसकडून पलटवार झाला; खर्गे म्हणाले, हताश होऊन पंतप्रधान...
18
आयुष म्हात्रेनं लंगडत लंगडत धाव घेतली; धोका पत्करुन डाव खेळला तोही फसला! पण खरंच याची गरज होती का?
19
भारतीय जहाजांवर हल्ला केल्यानंतर इराणची मोठी घोषणा; आता युद्ध संपेपर्यंत होर्मुझ ताब्यात ठेवणार...
20
"काल आमचे संख्याबळ कमी पडले, पण..."; महिला आरक्षणावरून PM मोदींचा निर्धार
Daily Top 2Weekly Top 5

जैविक आपत्ती निवारणाचे ‘नागपूर मॉडेल’ भविष्यासाठी पथदर्शी !

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 2, 2020 14:00 IST

आपत्ती निवारणाच्या संदर्भात भविष्यात उद्भवू शकणाऱ्या कोणत्याही आपत्तीसाठी या उपाययोजना ‘नागपूर मॉडेल’ म्हणून निश्चितच पथदर्शी ठरतील यात शंका नाही.

योगेश पांडेलोकमत न्यूज नेटवर्कनागपूर: ‘कोरोना’च्या निमित्ताने सध्या संपूर्ण जग एका महाभयानक संकटाचा मुकाबला करत आहे. या संकटाने भारतातही प्रवेश केला आहे. राज्यातील ज्या शहरांची तुलनेने जगाशी जास्त ‘कनेक्टीव्हीटी’ आहे त्यात नागपूर आणि परिसराचा अग्रक्रमाने समावेश होतो. त्यामुळे आंतरराष्ट्रीय विमानतळ असलेल्या राज्याच्या उपराजधानीची याबाबतची संवेदनशीलता लक्षात घेऊन प्रशासनाने वेळीच उपाययोजना सुरू केल्याने येथील परिस्थिती अद्यापपर्यंत तरी तशी नियंत्रणात आहे. देशाच्या मध्यवर्ती ठिकाणी वसलेल्या नागपूरची ख्याती एक प्रमुख ‘लॉजिस्टीक हब’ अशी असल्याने येथील परिस्थिती तुलनेने जास्त आव्हानात्मक असून ती अधिक प्रभावीपणे हाताळण्याची गरज असते. त्यानुसार सध्या ती अत्यंत चोखपणे हाताळली जात आहे.गेल्या ११ मार्चला नागपूर शहरात पहिला ‘कोरोना’बाधित रुग्ण आढळून आल्यानंतर गेल्या २० दिवसात ही संख्या १६ इतकी नियंत्रणात आहे. त्यातही सुरुवातीचे दोन आठवडे अवघे चार बाधित रुग्ण होते. यशस्वी उपचारांमुळे हे चारही बाधित रुग्ण आता बरे होऊन घरी परतले आहेत.नागपूर शहरात संशयित नागरिकांच्या आरोग्य तपासणीसाठी विशेष कक्ष स्थापन करण्यात आला. आंतरराष्ट्रीय प्रवास केलेल्या नागरिकांच्या विलगीकरणासाठी आवश्यक ती व्यवस्था करण्यात आली. त्यासोबतच देशांतर्गत प्रवास केलेल्या सर्व प्रवाशांचे ‘स्कॅनिंग’ करून त्यांना आता आमदार निवासात स्थापित करण्यात आलेल्या केंद्रात ठेवण्यात आले आहे. सध्या ही क्षमता ४५० व्यक्तींसाठी असून शहरातील ही क्षमता १७ हजार इतकी वाढविण्याचे नियोजन कृतीच्या पातळीवर आहे.शहरात आढळून आलेल्या ‘कोरोना’बाधितांच्या संपर्कातील सर्व नागरिकांचा शोध घेऊन त्यांची तात्काळ तपासणी करण्यात आली. जनतेत व्यापक जनजागृती मोहीम राबवितानाच विविध माध्यमांद्वारे नागरिकांना माहिती देण्यासाठी विशेष अभियानाची अंमलबजावणी करण्यात आली. ‘कोरोना’चा सामूहिक संसर्ग पसरण्याची शक्यता लक्षात घेऊन विभागातील आरोग्य यंत्रणा अधिक सक्षम करण्याचे नियोजन करण्यात आले. त्यानुसार मेयो व मेडिकल येथील वैद्यकीय सुविधांमध्ये वाढ करण्याचा निर्णय घेऊन त्यानुसार ‘व्हेंटिलेटर’सह सर्व आवश्यक ती सामग्री खरेदीसाठी वेगवेगळ्या माध्यमातून निधी उपलब्ध करण्यात आला. जिल्हा प्रशासनानेही ‘मायक्रो प्लॅनिंग’ करताना अनेक महत्त्वाच्या बाबींवर जाणिवेने काम सुरू केले. महापालिका प्रशासनानेही या साऱ्या उपाययोजनांमध्ये सहयोग देताना एक चांगला आदर्श घालून दिला. महापालिका यंत्रणेने ‘कोरोना’संदर्भात केलेले कार्य स्थानिक स्वराज्य संस्थांसाठी पथदर्शी ठरावे असे आहे.समाजातील कमकुवत घटकांना प्रशासनातर्फे मदतीचा हात पुढे करण्यात आला आहे. जीवनावश्यक वस्तूंचा पुरेसा साठा असल्याने नागरिकांनी साठेबाजी करू नये, यासाठीही जनजागृती करण्यात आली. कामगारांसह बेघर नागरिकांसाठी विभागात १२१ निवारागृहे सुरूकरण्यात आली आहेत. तेथे १० हजार ३३९ नागरिकांची व्यवस्था करण्यात आली आहे. नागपूर पोलिसांनी ‘लॉकडाऊन’सह इतर सर्व उपाययोजनांमध्ये प्रभावी कृती योजना करताना बजावलेली कामगिरी मोठी आहे. ‘सायबर सेल’च्या प्रयत्नांमुळे अफवांना आळा बसला आहे.‘कोरोना’च्या पार्श्वभूमीवर प्रशासकीय यंत्रणेने अत्यंत सजगता आणि संवेदनशीलता दाखवून गेल्या तीन आठवड्यांपासून अतिशय जबाबदारीने व नियोजनाने काम केले आहे. आपत्ती निवारणाच्या संदर्भात भविष्यात उद्भवू शकणाऱ्या कोणत्याही आपत्तीसाठी या उपाययोजना ‘नागपूर मॉडेल’ म्हणून निश्चितच पथदर्शी ठरतील यात शंका नाही.- हेमराज बागुल, संचालक, माहिती व जनसंपर्क, नागपूर 

 

टॅग्स :Coronavirus in Maharashtraमहाराष्ट्रात कोरोना व्हायरस