शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तानचे डोळे उघडले! चक्क चक्क चिनी कंपन्यांना ठणकावले; म्हणाले, 'आमची लूट थांबवा, अन्यथा काम बंद करा'
2
"बौद्ध धर्माचे पालन करतो, पण..., आज जो काही आहे तो..."; निवृत्तीपूर्वी CJI बीआर गवई यांचं मोठं विधान!
3
जेव्हा मुख्यमंत्री नितीश कुमार पंतप्रधान मोदींच्या पायाला स्पर्श करण्यासाठी वाकले..., पाटणा विमानतळावरील 'आदराचं' अद्भुत दृश्य - Video
4
भाजपने आणखी एक नगरपालिका बिनविरोध जिंकली; मविआच्या तिन्ही उमेदवारांनी अर्ज मागे घेतले... 
5
Breaking: भारत - इस्रायल समृद्धीच्या नव्या पर्वाचे 'टेक ऑफ'; मुक्त व्यापार करार, थेट विमानसेवा अन् बरंच काही...
6
मोठी बातमी! लुधियाना टोल प्लाझाजवळ पोलीस आणि दहशतवाद्यांमध्ये भीषण चकमक; परिसरात गोळीबाराचा आवाज
7
IND vs SA: शुबमन गिलच्या दुखापतीबद्दल बॅटिंग कोचने दिली महत्त्वाची अपडेट, म्हणाले...
8
२०० महिलांनी कोर्टातच घेतला जीव; मालेगावात जे घडता घडता राहिलं ते नागपूरमध्ये झालं होतं
9
राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाला धक्का, अनिल देशमुख यांचे पुत्र सलिल देशमुख यांचा राजीनामा
10
Viral : जगातला सगळ्यात आळशी व्यक्ती! स्पर्धा जिंकण्यासाठी तब्बल 'इतके' तास गादीवर झोपून राहिला
11
'अनगरच्या पाटलांचा माज आम्ही उतरवणार, चुकीला माफी नाही'; अजित पवारांच्या नेत्याचा थेट इशारा
12
बंगालमध्ये 'घमासान'! "परिस्थिती अत्यंत बिघडलीये, SIR त्वरित थांबवा..."; ममता बॅनर्जींच CECना पत्र, आणखी काय म्हणाल्या?
13
IND vs SA: हार्दिक पांड्या आफ्रिकेविरूद्धच्या वनडे मालिकेत खेळणार की नाही? वाचा ताजी अपडेट
14
लाकडाचेच ते...! चीनमधील १,५०० वर्षे जुन्या प्राचीन मंदिराचे पॅव्हेलिअन पेटले; पर्यटकांनी मेणबत्ती लावली अन्...
15
भारतात विकली जाणारी टेस्ला मॉडेल Y किती सुरक्षित; युरो एनकॅप क्रॅश टेस्टमध्ये मिळवले 'एवढे' स्टार रेटिंग!
16
पश्चिम बंगालमध्ये ९०० मतदारांची नावे यादीतून गायब; निवडणूक आयोगाचा संताप, बीएलओंवर कारवाईचे आदेश
17
लोकांचे पैसे गुंतविता गुंतविता Groww ने १९,००० कोटींचे नुकसान केले; गुंतवणूकदार डोके धरून बसले...
18
पती नव्हे राक्षस! पत्नीने मित्रांना विरोध केला म्हणून मारहाण, गर्भपात आणि नंतर अश्लील व्हिडीओ व्हायरल
19
'पाश्चिमात्य दबावातही भारत-रशिया संबंध मजबूत', अमेरिकेचा उल्लेख करत रशियाची मोठी प्रतिक्रिया
20
Nashik: येवल्यात छगन भुजबळांच्या 'पंच'मुळे उद्धवसेना 'सलाइन'वर, 'शिंदेसेने'लाही दिला शह
Daily Top 2Weekly Top 5

राज्याच्या तुलनेत नागपूरचा मृत्यूदर सर्वाधिक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 1, 2021 23:39 IST

Nagpur has the highest mortality rate राज्यात हॉटस्पॉट ठरलेल्या नागपूर जिल्ह्यात कोरोना संसर्गाचा विळखा अधिकाधिक घट्ट होऊ लागला आहे. यात मृत्यूच्या वाढत्या संख्येने चिंता वाढविली आहे. विशेष म्हणजे, १ एप्रिल रोजी जगाचा मृत्यूदर २.१९ टक्के, भारताचा १.३३ टक्के, महाराष्ट्राचा १.९४ टक्के तर नागपूर जिल्ह्याचा मृत्यूदर सर्वाधिक २.२४ टक्के होता.

ठळक मुद्दे २.२४ टक्के : महाराष्ट्राचा मृत्यूदर १.९४ टक्के : उशिरा उपचार हेच मृत्यूचे मुख्य कारण

लोकमत  न्यूज  नेटवर्क 

नागपूर : राज्यात हॉटस्पॉट ठरलेल्या नागपूर जिल्ह्यात कोरोना संसर्गाचा विळखा अधिकाधिक घट्ट होऊ लागला आहे. यात मृत्यूच्या वाढत्या संख्येने चिंता वाढविली आहे. विशेष म्हणजे, १ एप्रिल रोजी जगाचा मृत्यूदर २.१९ टक्के, भारताचा १.३३ टक्के, महाराष्ट्राचा १.९४ टक्के तर नागपूर जिल्ह्याचा मृत्यूदर सर्वाधिक २.२४ टक्के होता. वाढत्या मृत्यूमागे लक्षणे दिसूनही उशिरा चाचणी व उशिरा उपचार हे मुख्य कारण असल्याचे डॉक्टरांचे म्हणणे आहे.

नागपूर जिल्ह्यात पहिल्या कोरोनाबाधित मृत्यूची नोंद ४ एप्रिल २०२० रोजी झाली. या महिन्यात दोन रुग्णांचे मृत्यू झाले. त्यानंतर ही संख्या वाढतच गेली. मे महिन्यात ११, जून महिन्यात १५, जुलै महिन्यात ९८, ऑगस्ट महिन्यात ९१९, सप्टेंबर महिन्यात १४०६, ऑक्टोबर महिन्यात ९५२, नोव्हेंबर महिन्यात २६९, डिसेंबर महिन्यात २५८, जानेवारी महिन्यात २२८, फेब्रुवारी महिन्यात १७७ तर मार्च महिन्यात ७६३ रुग्णांचे जीव गेले. जानेवारी व फेब्रुवारी महिन्यात काही दिवस शहर व ग्रामीणमध्ये शून्य मृत्यूची नोंदही झाली. परंतु कोरोनाची पहिली लाट ओसरत असताना व दुसऱ्या लाटेची शक्यता वर्तविली जात असताना प्रशासनाकडून आवश्यक उपाययोजना युद्धस्तरावर हातीच घेण्यात आल्या नाहीत. परिणामी, मार्च महिन्याच्या दुसऱ्या आठवड्यापासून मृत्यूचा आकडा वाढताना दिसून येत आहे.

 पहिल्या २४ तासात मृत्यूचे प्रमाण २०.८७ टक्के

मेडिकलमध्ये १ ते २५ मार्च या कालावधीत २३० कोरोनाबाधितांचे मृत्यू झाले. यात ‘ब्रॉट डेड’चे प्रमाण १६.९६ टक्के तर, पहिल्या २४ तासाच्या उपचारातील मृत्यूचे प्रमाण २०.८७ टक्के आहे. यावरून रुग्ण घरीच गंभीर होत आहेत. त्यांच्यावरील औषधोपचाराकडे प्रशासनाचे विशेष लक्ष नसल्याचे दिसून येते.

५० वर्षांवर ‘को-मॉर्बिडिटीज’ असलेल्या ७० टक्के रुग्णांचा मृत्यू

वरिष्ठ श्वसनरोग तज्ज्ञ डॉ. अशोक अरबट यांनी सांगितले,‘को-मॉर्बिडिटीज’ असलेले ५० वर्षांवरील रुग्ण कोरोना होऊनही विशेष लक्ष देत नाही. विशेषत: रुग्णालयात उशिरा येतात. परिणामी, यातील जवळपास ७० टक्के रुग्णांचा मृत्यू होतो. कोरोनाच्या पहिल्या लाटेच्या तुलनेत ही दुसरी लाट अधिक भयावह ठरत आहे. यामुळे प्रत्येकाने काळजी घेणे व लक्षणे दिसताच चाचणी करणे व औषधोपचार करणे महत्त्वाचे झाले आहे.

कोणतीही लक्षणे अंगावर काढू नका

मेडिकलच्या औषधवैद्यकशास्त्र विभागाचे प्रमुख डॉ. प्रशांत पाटील यांनी सांगितले, रुग्णालयात मृत्यू होणारे साधारण ६६ टक्के मृत्यू हे पहिल्या तीन दिवसातील तर, ५० टक्के रुग्ण हे पहिल्या २४ तासातील आहेत. यामागे लक्षणे असूनही उशिरा चाचणी, उशिरा उपचार हे मुख्य कारण आहे. कोणतीही लक्षणे अंगावर काढू नका. लक्षणे दिसताच चाचणी करा व अहवाल पॉझिटिव्ह आल्यास तातडीने योग्य उपचार घ्या, असा सल्लाही त्यांनी दिला.

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याDeathमृत्यूMaharashtraमहाराष्ट्रnagpurनागपूर