शहरं
Join us  
Trending Stories
1
झिपलाईन ऑपरेटर अल्लाहू अकबर का म्हणत होता? पीडीपी, नॅशनल कॉन्फरन्सच्या नेत्यांचा वेगळाच दावा...
2
पहलगाम हल्ल्यानंतर घेतलेल्या भूमिकेवरून काँग्रेसनं मोदींना घेरलं, हे चार प्रश्न उपस्थित करून केली कोंडी
3
तणावपूर्ण परिस्थितीदरम्यान पाकिस्तानकडून सायबर ‘वार’, भारतीय लष्कराची वेबसाईट हॅक करण्याचा प्रयत्न 
4
गुगलचे सीईओ सुंदर पिचाई यांचा पगार किती? कंपनीने फक्त सुरक्षेवरच खर्च केले ७१ कोटी रुपये
5
१ लाखांपेक्षा अधिक गुंतवणूकदार कंगाल झाले; ९२% आपटला हा शेअर, आता विकणंही झालं कठीण
6
१८ वर्षांची तरुणी पडली ५५ वर्षीय व्यक्तीच्या प्रेमात, पुढं घडलं भयंकर, ऐकून पायाखालची जमीन सरकेल
7
बंगळुरूत 'पाकिस्तान जिंदाबाद' म्हणणाऱ्या व्यक्तीला बेदम मारहाण, जागीच मृत्यू; गृहमंत्री म्हणाले...
8
मोठी बातमी: दहशतवादी हल्ल्यातील मृतांच्या कुटुंबीयांना ५० लाखांची मदत; राज्य सरकारचा निर्णय
9
बाजार सपाट पातळीवर बंद; रिलायन्सचा शेअर पुन्हा आला धावून, 'या' सेक्टरवर दबाव
10
ATM मधून वारंवार पैसे काढायची सवय असेल तर ती बदला, नाहीतर १ मे पासून होईल नुकसान
11
अण्वस्त्रांची धमकी देणाऱ्या पाकिस्तानच्या संरक्षण मंत्र्यांचे तोंड भारताने केले बंद; एक्स अकाउंटवर घातली बंदी
12
Viral Video: बिबट्या थेट पोलीस ठाण्यातच आला! पोलिसाने पाहिलं, पण नंतर काय घडलं?
13
इलेक्ट्रिक व्हेईकल घेणाऱ्यांसाठी CM फडणवीसांची मोठी घोषणा; टोलमाफी देण्याचा मंत्रिमंडळ बैठकीत निर्णय
14
...म्हणून मुलाचं नाव बॉबी ठेवलं! किशोरी शहाणेंनी सांगितलं कारण, म्हणाल्या- "मी मराठी, नवरा पंजाबी आणि सासू..."
15
Mumbai Accident: ओव्हरटेक करण्याचा प्रयत्न अंगलट; दुचाकीवर पाठी बसलेल्या तरुणीचा ट्रकखाली चिरडून मृत्यू
16
पाकिस्तानने कुठे लपवलाय अण्वस्त्रांचा साठा? 'या' अहवालाने केली पाकची पोलखोल...
17
Pune: पुण्याच्या विमानतळ परिसरात बिबट्या, सगळ्यांना फुटला घाम; तुम्ही व्हिडीओ बघितला का?
18
डॉलरच्या तुलनेत रुपयाची जोरदार कामगिरी; आशियातील सर्वात मजबूत चलन, ही आहेत ५ कारणे
19
टक्केवारीच्या आरोपानंतर परभणीचे जिल्हा नियोजन अधिकारी कार्यमुक्त; अधिकाऱ्यांमध्ये खळबळ
20
पाकिस्तानला धडा शिकवण्यासाठीचा प्लॅन तयार, पंतप्रधान मोदी बुधवारी घेणार चार बैठका, त्यानंतर...  

राज्याच्या तुलनेत नागपूरचा मृत्यूदर सर्वाधिक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 1, 2021 23:39 IST

Nagpur has the highest mortality rate राज्यात हॉटस्पॉट ठरलेल्या नागपूर जिल्ह्यात कोरोना संसर्गाचा विळखा अधिकाधिक घट्ट होऊ लागला आहे. यात मृत्यूच्या वाढत्या संख्येने चिंता वाढविली आहे. विशेष म्हणजे, १ एप्रिल रोजी जगाचा मृत्यूदर २.१९ टक्के, भारताचा १.३३ टक्के, महाराष्ट्राचा १.९४ टक्के तर नागपूर जिल्ह्याचा मृत्यूदर सर्वाधिक २.२४ टक्के होता.

ठळक मुद्दे २.२४ टक्के : महाराष्ट्राचा मृत्यूदर १.९४ टक्के : उशिरा उपचार हेच मृत्यूचे मुख्य कारण

लोकमत  न्यूज  नेटवर्क 

नागपूर : राज्यात हॉटस्पॉट ठरलेल्या नागपूर जिल्ह्यात कोरोना संसर्गाचा विळखा अधिकाधिक घट्ट होऊ लागला आहे. यात मृत्यूच्या वाढत्या संख्येने चिंता वाढविली आहे. विशेष म्हणजे, १ एप्रिल रोजी जगाचा मृत्यूदर २.१९ टक्के, भारताचा १.३३ टक्के, महाराष्ट्राचा १.९४ टक्के तर नागपूर जिल्ह्याचा मृत्यूदर सर्वाधिक २.२४ टक्के होता. वाढत्या मृत्यूमागे लक्षणे दिसूनही उशिरा चाचणी व उशिरा उपचार हे मुख्य कारण असल्याचे डॉक्टरांचे म्हणणे आहे.

नागपूर जिल्ह्यात पहिल्या कोरोनाबाधित मृत्यूची नोंद ४ एप्रिल २०२० रोजी झाली. या महिन्यात दोन रुग्णांचे मृत्यू झाले. त्यानंतर ही संख्या वाढतच गेली. मे महिन्यात ११, जून महिन्यात १५, जुलै महिन्यात ९८, ऑगस्ट महिन्यात ९१९, सप्टेंबर महिन्यात १४०६, ऑक्टोबर महिन्यात ९५२, नोव्हेंबर महिन्यात २६९, डिसेंबर महिन्यात २५८, जानेवारी महिन्यात २२८, फेब्रुवारी महिन्यात १७७ तर मार्च महिन्यात ७६३ रुग्णांचे जीव गेले. जानेवारी व फेब्रुवारी महिन्यात काही दिवस शहर व ग्रामीणमध्ये शून्य मृत्यूची नोंदही झाली. परंतु कोरोनाची पहिली लाट ओसरत असताना व दुसऱ्या लाटेची शक्यता वर्तविली जात असताना प्रशासनाकडून आवश्यक उपाययोजना युद्धस्तरावर हातीच घेण्यात आल्या नाहीत. परिणामी, मार्च महिन्याच्या दुसऱ्या आठवड्यापासून मृत्यूचा आकडा वाढताना दिसून येत आहे.

 पहिल्या २४ तासात मृत्यूचे प्रमाण २०.८७ टक्के

मेडिकलमध्ये १ ते २५ मार्च या कालावधीत २३० कोरोनाबाधितांचे मृत्यू झाले. यात ‘ब्रॉट डेड’चे प्रमाण १६.९६ टक्के तर, पहिल्या २४ तासाच्या उपचारातील मृत्यूचे प्रमाण २०.८७ टक्के आहे. यावरून रुग्ण घरीच गंभीर होत आहेत. त्यांच्यावरील औषधोपचाराकडे प्रशासनाचे विशेष लक्ष नसल्याचे दिसून येते.

५० वर्षांवर ‘को-मॉर्बिडिटीज’ असलेल्या ७० टक्के रुग्णांचा मृत्यू

वरिष्ठ श्वसनरोग तज्ज्ञ डॉ. अशोक अरबट यांनी सांगितले,‘को-मॉर्बिडिटीज’ असलेले ५० वर्षांवरील रुग्ण कोरोना होऊनही विशेष लक्ष देत नाही. विशेषत: रुग्णालयात उशिरा येतात. परिणामी, यातील जवळपास ७० टक्के रुग्णांचा मृत्यू होतो. कोरोनाच्या पहिल्या लाटेच्या तुलनेत ही दुसरी लाट अधिक भयावह ठरत आहे. यामुळे प्रत्येकाने काळजी घेणे व लक्षणे दिसताच चाचणी करणे व औषधोपचार करणे महत्त्वाचे झाले आहे.

कोणतीही लक्षणे अंगावर काढू नका

मेडिकलच्या औषधवैद्यकशास्त्र विभागाचे प्रमुख डॉ. प्रशांत पाटील यांनी सांगितले, रुग्णालयात मृत्यू होणारे साधारण ६६ टक्के मृत्यू हे पहिल्या तीन दिवसातील तर, ५० टक्के रुग्ण हे पहिल्या २४ तासातील आहेत. यामागे लक्षणे असूनही उशिरा चाचणी, उशिरा उपचार हे मुख्य कारण आहे. कोणतीही लक्षणे अंगावर काढू नका. लक्षणे दिसताच चाचणी करा व अहवाल पॉझिटिव्ह आल्यास तातडीने योग्य उपचार घ्या, असा सल्लाही त्यांनी दिला.

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याDeathमृत्यूMaharashtraमहाराष्ट्रnagpurनागपूर