शहरं
Join us  
Trending Stories
1
"भारतावर टीका करणारे देशच रशियासोबत व्यापार करताहेत"; ट्रम्प यांना भारताने दाखवला आरसा, आकडेवारीसह सुनावले
2
"...त्यामुळे मी भारतावरील टॅरिफ भरपूर वाढवणार आहे"; अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांचा पुन्हा इशारा
3
DSP सिराजचा ऑन ड्युटी फॉर्म्युला! सर्वाधिक विकेट्स अन् १००० पेक्षा अधिक चेंडू टाकण्याचा मोठा पराक्रम
4
Pahalgam Attack: ते दहशतवादी पाकिस्तानी असल्याचे लष्कराने म्हटले नाही; संरक्षण मंत्रालयाचा खुलासा
5
मोबाईलसाठी रेल्वेतील प्रवाशाच्या हातावर फटका, तरुणाने गमावला पाय; २० हजार रुपयेही पळवले
6
१२,००० सॅमसंग स्मार्टफोनने भरलेला ट्रक चोरीला गेला; चोरट्यांनी ९१ कोटींच्या वस्तू लंपास केल्या
7
IND vs ENG : एक मालिका अन् दोन मालिकावीर! गंभीरमुळं गिलसोबत हॅरी ब्रूकला मिळाला हा पुरस्कार
8
अमित शाह मोडणार देशाच्या गृहमंत्र्यांचा रेकॉर्ड! जम्मू काश्मीरबद्दल सरकार घेणार आणखी एक मोठा निर्णय?
9
मारहाण, शिवीगाळ असं काहीच घडलं नाही; पुणे पोलिसांनी मुलींचे सगळेच आरोप फेटाळले
10
'भारत आगीशी खेळत आहे'; डोनाल्ड ट्रम्प, एस. जयशंकर यांच्याबद्दल खोटी विधाने केली पोस्ट, 'एक्स'ने खातीच केली बंद
11
iPhone 16: पहिल्यांदाच आयफोन १६ च्या खरेदीवर एवढी मोठी सूट!
12
भारत रशियाला युक्रेनविरुद्ध युद्धासाठी अप्रत्यक्षपणे निधी पुरवतोय, अमेरिकेचा आरोप!
13
येमेनमध्ये निमिषा प्रियाच्या अडचणी वाढल्या! मृताच्या भावाने पत्र लिहून केली मोठी मागणी
14
Siraj, IND vs ENG: 'तो' एक शब्द अन् सिराजने फिरवला अख्खा सामना... टीम इंडियाच्या विजयानंतर उघड केलं गुपित
15
आपच्या सत्येंद्र जैन यांना दिलासा, CBIच्या क्लोजर रिपोर्टवर कोर्टाचं शिक्कामोर्तब
16
माझा 'तो' व्हिडीओ रोहित पवारांना कुणी पाठवला? मंत्री मेघना बोर्डीकर म्हणाल्या...
17
राज ठाकरेंच्या 'मराठी'नंतर नितीश कुमारांची 'बिहारी' घोषणा; शिक्षक भरतीत नोकरी बिहारींनाच मिळणार
18
Siraj, IND vs ENG: ‘पूरा खोल दिए पाशा...’; सिराजच्या 'मॅचविनिंग' गोलंदाजीवर ओवेसींची हैदराबादी शैलीत स्तुती
19
कमाल झाली राव! रशियन महिलेने सांगितली भारतीय पुरुषाशी लग्न करण्याची खास कारणं, जिंकलं मन
20
क्रिस वोक्स स्ट्राइकवर आला असता तर...? इंग्लंडच्या लढवय्याबद्दल काय म्हणाला मॅच विनर सिराज?

नागपूर : ‘तुझे राजकारण संपले’ म्हणत काँग्रेस पदाधिकाऱ्यावर जीवघेणा हल्ला

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 16, 2024 23:10 IST

Nagpur Crime News: आचारसंहिता लागल्यानंतर पहिल्याच दिवशी नागपुरातील चंद्रमणी नगरात खळबळ घटना घडली आहे. काँग्रेसच्या पदाधिकाऱ्यावर हल्ला करण्यात आला. या प्रकरणी पोलिसांनी दोन आरोपींना अटक केली आहे. 

-योगेश पांडे,नागपूरविधानसभा निवडणूक जाहीर होताच जागोजागी पोलिसांनी गस्त वाढविली असतानाच आचारसंहितेच्या पहिल्याच दिवशी नागपुरात काँग्रेसच्या एका पदाधिकाऱ्यावर जीवघेणा हल्ला करण्यात आला. जुन्या वादातून ‘तुझे राजकारण संपले’ असे म्हणत दोन आरोपींनी त्याच्यावर घरासमोरच हल्ला केला. दोन्ही आरोपी गुन्हेगारी प्रवृत्तीचे असून त्यांना अटक करण्यात आली आहे. अजनी पोलीस ठाण्याच्या हद्दीत ही घटना घडली असून अधिकाऱ्यांच्या कार्यप्रणालीवरच प्रश्नचिन्ह उपस्थित करण्यात येत आहे.

नागपूर शहर काँग्रेस कमिटीचे सचिव तसेच संजय गांधी निराधार अनुदान योजनेचे दक्षिण नागपूरचे माजी अध्यक्ष सुहास नानवटकर (३८) असे जखमी पदाधिकाऱ्याचे नाव असून, ते मागील एका वर्षापासून चंद्रमणीनगरात त्यांच्या सासुरवाडीत राहत आहेत.

कोणी केला जीवघेणा हल्ला?

आरोपी लोकेश सुरेश गयाल (२४) व कार्तिक सूरज बालगुहर (२३) हे दोघेही त्याच परिसरात राहतात. नानवटकर यांच्या सासुरवाडीच्या समोरील घरात आरोपींचे नेहमीच येणे-जाणे होते. आरोपी मंगळवारी त्यांच्या घराजवळ आले. 

रात्री नऊ वाजताच्या सुमारास जेवण झाल्यावर नानवटकर हे त्यांच्या सासूशी बोलत घराबाहेरच उभे होते. दोन्ही आरोपी त्यांच्या पाठीमागून आले व आता तुझे राजकारण संपले असे म्हणत शिवीगाळ करू लागले. त्यांनी नानवटकर यांना जीवे मारण्याचीदेखील धमकी दिली.

काँग्रेस पदाधिकाऱ्यावर अचानक केला हल्ला 

अचानक लोकेशने वीटेने नानवटकर यांच्या उजव्या कानाजवळ प्रहार केला. यामुळे ते खाली पडले व कान रक्तबंबाळ झाला. त्याही अवस्थेत त्यांनी पत्नीसह अजनी पोलिस ठाणे गाठले व पोलिसांनी त्यांना मेडिकल इस्पितळात नेले. 

बीट मार्शल्सने घटनास्थळी पोहोचत दोन्ही आरोपींना अटक केली. सुहास यांची पत्नी तृप्ती यांच्या तक्रारीवरून पोलिसांनी दोन्ही आरोपींविरोधात भारतीय न्याय संहितेच्या कलम ११८(१), ३५१(३) व ३५२ अंतर्गत गुन्हा दाखल केला आहे. दोन्ही आरोपी गुन्हेगारी प्रवृत्तीचे आहे. कार्तिकविरोधात तीन गुन्हे दाखल आहेत, तर लोकेशविरोधात सोनेगाव पोलिस ठाण्यात एक गुन्हा दाखल आहे.

हल्ल्यामागे राजकीय कारण नाही

नानवटकर यांनी दोन तीन वेळा त्यांना काही कारणावरून रागावले होते. त्याचा राग मनात ठेवून त्यांच्यावर हल्ला झाल्याची शक्यता आहे. या हल्ल्यामागे कुठलेही राजकीय कारण नसल्याचा दावा पोलिस अधिकाऱ्यांनी केला आहे. 

आदर्श आचारसंहिता जाहीर झाल्यावर पोलिसांकडून गस्त वाढणे अपेक्षित होते. मात्र अजनी पोलिस ठाण्यात अधिकाऱ्यांच्या दुर्लक्षामुळे अवैध धंदे वाढले असून गुन्हेगारांवरदेखील वचक राहिलेला नाही. नवीन ठाणेदारांकडूनदेखील हव्या त्या प्रमाणात नियोजन होत नसल्याचे चित्र आहे.

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीPoliceपोलिसnagpurनागपूरcongressकाँग्रेस