शहरं
Join us  
Trending Stories
1
RBI MPC Meeting Update: रेपो दर 'जैसे थे'; जागतिक अनिश्चिततेदरम्यान रिझर्व्ह बँकेचा सावध पवित्रा
2
शस्त्रसंधी केली तरी ट्रम्प यांची खुर्ची धोक्यात? ८५ खासदारांनी मागितला राजीनामा; विरोध कायम
3
ट्रम्प झुकले, इराणसमोर सरेंडर केले, युद्धविरामावरून सिनेटर भडकले, अमेरिकेत संतापाची लाट
4
इथे युद्ध थांबलं, तिथे शेअर बाजार सुस्साट... Sensex २६०० अंकांनी वधारला, Nifty मध्ये ७०० अंकांची तेजी
5
अग्रलेख: भाजपला सत्तेपासून दूर ठेवण्यासाठी एकत्र आलेली 'महाविकास आघाडी' संपुष्टात?
6
“शस्त्रसंधी वगैरे काही नाही”; इस्रायलने केले स्पष्ट, अमेरिका-इराण युद्ध खरेच थांबणार का?
7
अमेरिकेने रोखली क्षेपणास्त्रे, इराणही भूमिकेवर ठाम, अखेर ‘या’ देशाची एंट्री, अन् झाला युद्धविराम
8
भय इथले संपत नाही! अमेरिका-इराण शस्त्रसंधी झाली तरी आखाती देश हाय अलर्टवर; तणाव कायम
9
HDFC Bank New Rates: एचडीएफसी बँकेच्या व्याजदरात बदल; लोनच्या EMI वर होणार परिणाम, पटापट चेक करा नवे दर
10
आजचे राशीभविष्य, ०८ एप्रिल २०२६: नोकरदारांना ऑफिसमध्ये अनुकूल वातावरण, आर्थिक लाभाची शक्यता
11
भंडाऱ्यात चोरांचे तांडव! ५ तासांत २१ दुकाने फोडली; लाखोंचा मुद्देमाल गायब, टोळी असल्याचा संशय
12
Iran युद्धात शस्त्रसंधीच्या घोषणेनं दिलासा; कच्च्या तेलाच्या किमतीत मोठी घसरण आणि अमेरिकन बाजारात बंपर तेजी
13
रवींद्र एरंडेच्या ऑफिसमध्ये धनादेशांचा खच; वाचवण्यासाठी अहिल्यानगरच्या 'त्या' नेत्यांचा पोलिसांवर दबाव
14
धक्कादायक वास्तव! हा बघा मुंबई विद्यापीठाच्या क्रीडा संकुलातील ‘जलतरण तलाव’
15
अखेर शस्त्रसंधी झाली तरी कशी? अमेरिकेला पाठवला १० कलमी प्रस्ताव; इराणने केली भूमिका स्पष्ट
16
ट्रम्प-इराण युद्धविरामात पाकिस्तानचा गेम? 'कॉपी-पेस्ट' मेसेजने पोलखोल, शाहबाज यांची स्क्रिप्ट कुणी लिहिली?
17
आठ वर्षांच्या चिमुरडीचा डम्परखाली चिरडून मृत्यू; संतप्त नागरिकांचा रास्ता रोको, चालकाला अटक
18
अमेरिका-इराणमध्ये २ आठवड्यांसाठी युद्धबंदी; डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून हल्ले थांबवण्याची घोषणा
19
पहिल्या पॉड टॅक्सीचे भूमिपूजन; मात्र कुर्ला ते वांद्रे रेल्वे स्थानक प्रवासासाठी २०३१ची प्रतीक्षा
20
‘टनेल बोरिंग’ मशिनवर 'ठाणेकर' उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे ठेवणार नजर- मुख्यमंत्री फडणवीस
Daily Top 2Weekly Top 5

रसायनयुक्त पाणी साेडल्याने कळमेश्वरातील खडक नदी दूषित; माशांसह जलचर प्राण्यांचा मृत्यू 

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 18, 2023 12:35 IST

एमआयडीसीतील पाणी साेडले नदीत

आशिष साैदागर

कळमेश्वर (नागपूर) : शहरालगत वाहणाऱ्या खडक नदीत एमआयडीसी परिसरातील कंपन्यांमधील रसायनयुक्त पाणी साेडले जात असल्याने ही नदी दूषित झाली आहे. नदीतील माशांसह इतर जलचर प्राणी मृत्युमुखी पडले असून, या दूषित पाण्याचा मानवी व जनावरांच्या आराेग्यावर घातक परिणाम हाेण्याची शक्यता आहे. या गंभीर प्रकाराकडे महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाने दुर्लक्ष केल्याचा आराेप कळमेश्वर शहरातील नागरिकांनी केला आहे.

ब्राह्मणी गावाचा समावेश कळमेश्वर नगरपालिकेत करण्यात आला आहे. या गावालगत खडक नदी वाहते. मागील काही महिन्यांपासून या नदीतील पाण्याचा रंग काळाशार पडायला सुरुवात झाली. त्यातच नदीच्या पाण्यात माेठ्या प्रमाणात मृत मासे व इतर जलचर प्राणी आढळू लागल्याने या नदीतील पाणी दूषित झाल्याचे नागरिकांच्या निदर्शनास आले.

कळमेश्वर शहरालगतच्या औद्याेगिक वसाहतीतील कारखान्यांमधील रसायनयुक्त पाणी प्रक्रिया न करता उघड्यावर साेडले जात असल्याने या भागातील जमिनीतील पाणीही दूषित झाले आहे. त्यामुळे कळमेश्वर शहरातील सर्वच जलस्राेत निकामी झाले असून, शहराला गेल्या ३० वर्षांपासून बाहेरील पाण्यावर अवलंबून राहावे लागत आहे. आता खडक नदीतील पाणी दूषित झाल्याने कळमेश्वर शहरासाेबतच तालुक्यातील काही गावे पाण्याच्या बाबतीत परावलंबी हाेणार आहेत.

या दूषित पाण्यामुळे हाेणारे गंभीर व दूरगामी परिणाम टाळण्यासाठी यावर राज्य सरकार व महाराष्ट्र राज्य प्रदूषण नियंत्रण मंडळाने वेळीच याेग्य उपाययाेजना कराव्यात, अशी मागणी ब्राह्मणी येथील अनुजा निंबाळकर, वरोडा येथील शेतकरी बंडू ढवळे, नरेश राऊत, राजू काकडे, प्रशांत डाखोळे, ईश्वर पारसे, दामोदर राऊत यांच्यासह नागरिकांनी केली आहे.

जलस्राेत निकामी हाेणार

खडक नदी ब्राह्मणी शिवारातून पुढे कळमेश्वर तालुक्यातील वरोडा, झुनकी, सावळी (बु.), बोरगाव (खुर्द), ब्रह्मपुरी शिवाराकडे वाहत जाते. नदीतील रसायनयुक्त पाणी जमिनीत माेठ्या प्रमाणात झिरपत असून, ते या गावांसह शेतीतील विहिरींमध्ये जमा हाेते. पाण्याची चाचणी करण्यात न आल्याने या पाण्यात नेमके काेणते घातक घटक मिसळले आहेत, याबाबत कुणालाही माहिती नाही. त्यामुळे नदीच्या परिसरातील जलस्राेत कायमचे निकामी हाेण्याची शक्यता पर्यावरण अभ्यासकांनी व्यक्त केली आहे.

माणसांसह जनावरांचे आराेग्य धाेक्यात

जनावरे व इतर जनावरे याच नदीच्या पात्रातील पाणी पितात. विहिरींमध्ये नदीतील रसायनयुक्त पाणी झिरपते, त्या पाण्याचा वापर सिंचनासाठी केल्यास शेतजमिनीचा पाेत कायम खराब हाेऊन या शिवारातील शेतजमिनी नापीक हाेण्याची तसेच विहिरींमधील दूषित पाणी प्यायल्याने माणसांसह जनावरांच्या जीवितास धाेका उद्भवण्याची शक्यता जाणकार व्यक्तींनी व्यक्त केली आहे. या दूषित पाण्यामुळे चर्मराेग हाेण्याची शक्यता वैद्यकीय सूत्रांनी व्यक्त केली.

टॅग्स :pollutionप्रदूषणWaterपाणीriverनदीnagpurनागपूर