शहरं
Join us  
Trending Stories
1
दिल्लीकडून खेळताना किंग कोहलीची ‘विराट’ कामगिरी! नव्या विश्वविक्रमासह ऑस्ट्रेलियन दिग्गजाला धोबीपछाड
2
"धर्म आणि विज्ञान यांच्यात कुठलाही संघर्ष नाही; दोघांचेही ध्येय एकच...!" नेमकं काय म्हणाले मोहन भागवत?
3
पुतण्यानेच रचला चुलत्याच्या हत्येचा कट; पराभवाचा बदला घेण्यासाठी मंगेश काळोखेंची हत्या, तटकरेंच्या निकटवर्तीयावरही गुन्हा दाखल
4
"लोकं अडकून पडलेत, मुलांचं शिक्षण रखडलंय"; H1B व्हिसा मुद्द्यावर भारताची अमेरिकेशी चर्चा
5
जावळ काढण्याच्या प्रथेत आईचेही बळजबरीने मुंडन; दौंडमधील महिलांची राज्य महिला आयोगाकडे तक्रार
6
Viral Video: "ही कार आहे... बाईक नाही!" नको त्या कारणावरून जोडप्यामध्ये पेटला वाद, व्हिडीओ व्हायरल
7
पदकं फेकली, प्रमाणपत्रं फाडली, भाजपा खासदारांच्या क्रीडा महोत्सवात खेळाडूंचा संताप, कारण काय?
8
"दोषींना शिक्षा झालीच पाहिजे..."; बांगलादेशातील हिंदू तरुणाच्या हत्येवरून भारताने सुनावलं
9
थरकाप उडवणारा VIDEO! चिनी शस्त्रांची पुन्हा पोलखोल, थायलंड विरोधात वापरताना रॉकेट सिस्टिमचाच स्फोट; कंबोडियाच्या 8 जवानांचा मृत्यू
10
GenZ पिढीच्या मुलांवर माझा विश्वास, हीच मुलं भारताला 'विकसित राष्ट्र' बनवतील- पंतप्रधान मोदी
11
४५ वर्षाचा गड कोसळला, भाजपानं रचला इतिहास; १ मत फिरवलं अन् 'या' महापालिकेत बसवला महापौर
12
भाजपा आमदारांच्या ‘ब्राह्मण भोजना’मुळे उत्तर प्रदेशच्या राजकारणात खळबळ, भाजपामध्ये चाललंय काय? 
13
काही केलं तरी रात्री झोपच येत नाही? मग करा 'हे' एक छोटसं काम; १० मिनिटांत व्हाल डाराडूर
14
Shehnaaz Gill : "इथे सगळे राक्षस, मी खूप स्ट्रगल...", शहनाज गिलची झाली फसवणूक, इंडस्ट्रीबद्दल मोठा खुलासा
15
उद्धव ठाकरेंच्या भेटीत काय ठरले? जागावाटपाबाबत बैठकीत चर्चा झाली का?; जयंत पाटील म्हणाले...
16
अडीच वर्षातील काम जनता विसरणार नाही; शिवसेनेत येताच प्रकाश महाजनांचे शिंदेंबाबत कौतुकोद्गार
17
रिपल इफेक्ट : ग्राहकांच्या सवयी बाजाराच्या हालचालींवर कशा परिणाम करतात?
18
"राजकारण बंद करेन, पण आता..."; काँग्रेसमध्ये प्रवेश करताच प्रशांत जगतापांनी मांडली भूमिका
19
पाकिस्तानला अजूनही 'ऑपरेशन सिंदूर'ची भीती! सीमेवर अँटी-ड्रोन सिस्टीम बसवले
Daily Top 2Weekly Top 5

रसायनयुक्त पाणी साेडल्याने कळमेश्वरातील खडक नदी दूषित; माशांसह जलचर प्राण्यांचा मृत्यू 

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 18, 2023 12:35 IST

एमआयडीसीतील पाणी साेडले नदीत

आशिष साैदागर

कळमेश्वर (नागपूर) : शहरालगत वाहणाऱ्या खडक नदीत एमआयडीसी परिसरातील कंपन्यांमधील रसायनयुक्त पाणी साेडले जात असल्याने ही नदी दूषित झाली आहे. नदीतील माशांसह इतर जलचर प्राणी मृत्युमुखी पडले असून, या दूषित पाण्याचा मानवी व जनावरांच्या आराेग्यावर घातक परिणाम हाेण्याची शक्यता आहे. या गंभीर प्रकाराकडे महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाने दुर्लक्ष केल्याचा आराेप कळमेश्वर शहरातील नागरिकांनी केला आहे.

ब्राह्मणी गावाचा समावेश कळमेश्वर नगरपालिकेत करण्यात आला आहे. या गावालगत खडक नदी वाहते. मागील काही महिन्यांपासून या नदीतील पाण्याचा रंग काळाशार पडायला सुरुवात झाली. त्यातच नदीच्या पाण्यात माेठ्या प्रमाणात मृत मासे व इतर जलचर प्राणी आढळू लागल्याने या नदीतील पाणी दूषित झाल्याचे नागरिकांच्या निदर्शनास आले.

कळमेश्वर शहरालगतच्या औद्याेगिक वसाहतीतील कारखान्यांमधील रसायनयुक्त पाणी प्रक्रिया न करता उघड्यावर साेडले जात असल्याने या भागातील जमिनीतील पाणीही दूषित झाले आहे. त्यामुळे कळमेश्वर शहरातील सर्वच जलस्राेत निकामी झाले असून, शहराला गेल्या ३० वर्षांपासून बाहेरील पाण्यावर अवलंबून राहावे लागत आहे. आता खडक नदीतील पाणी दूषित झाल्याने कळमेश्वर शहरासाेबतच तालुक्यातील काही गावे पाण्याच्या बाबतीत परावलंबी हाेणार आहेत.

या दूषित पाण्यामुळे हाेणारे गंभीर व दूरगामी परिणाम टाळण्यासाठी यावर राज्य सरकार व महाराष्ट्र राज्य प्रदूषण नियंत्रण मंडळाने वेळीच याेग्य उपाययाेजना कराव्यात, अशी मागणी ब्राह्मणी येथील अनुजा निंबाळकर, वरोडा येथील शेतकरी बंडू ढवळे, नरेश राऊत, राजू काकडे, प्रशांत डाखोळे, ईश्वर पारसे, दामोदर राऊत यांच्यासह नागरिकांनी केली आहे.

जलस्राेत निकामी हाेणार

खडक नदी ब्राह्मणी शिवारातून पुढे कळमेश्वर तालुक्यातील वरोडा, झुनकी, सावळी (बु.), बोरगाव (खुर्द), ब्रह्मपुरी शिवाराकडे वाहत जाते. नदीतील रसायनयुक्त पाणी जमिनीत माेठ्या प्रमाणात झिरपत असून, ते या गावांसह शेतीतील विहिरींमध्ये जमा हाेते. पाण्याची चाचणी करण्यात न आल्याने या पाण्यात नेमके काेणते घातक घटक मिसळले आहेत, याबाबत कुणालाही माहिती नाही. त्यामुळे नदीच्या परिसरातील जलस्राेत कायमचे निकामी हाेण्याची शक्यता पर्यावरण अभ्यासकांनी व्यक्त केली आहे.

माणसांसह जनावरांचे आराेग्य धाेक्यात

जनावरे व इतर जनावरे याच नदीच्या पात्रातील पाणी पितात. विहिरींमध्ये नदीतील रसायनयुक्त पाणी झिरपते, त्या पाण्याचा वापर सिंचनासाठी केल्यास शेतजमिनीचा पाेत कायम खराब हाेऊन या शिवारातील शेतजमिनी नापीक हाेण्याची तसेच विहिरींमधील दूषित पाणी प्यायल्याने माणसांसह जनावरांच्या जीवितास धाेका उद्भवण्याची शक्यता जाणकार व्यक्तींनी व्यक्त केली आहे. या दूषित पाण्यामुळे चर्मराेग हाेण्याची शक्यता वैद्यकीय सूत्रांनी व्यक्त केली.

टॅग्स :pollutionप्रदूषणWaterपाणीriverनदीnagpurनागपूर