शहरं
Join us  
Trending Stories
1
पटनायक सरकारची 'एक्सपायरी डेट' 4 जून; पहिल्याच रॅलीत संकटमोचकावरच PM मोदींचा हल्लाबोल
2
"भाजपा खूप दिवसांपासून दिवास्वप्न पाहतेय..."; नवीन पटनायक यांचा पंतप्रधान मोदींवर पलटवार
3
Amit Shah : "दीदींनी 5 वर्षे प्रचार केला तरी..."; अमित शाह यांनी ममता बॅनर्जींना दिलं जाहीर आव्हान
4
Mumbai Indians च्या खांद्यावर आठ संघांचा भार! SRH विरुद्धच्या लढतीत सर्वांना हवेत MI चे उपकार
5
“भारताचे परराष्ट्र धोरण अपयशी ठरलेय, अनेक देशांशी संबंध बिघडलेत”; प्रकाश आंबेडकरांची टीका
6
Preity Zinta powerhouse of talent, Mumbai Indians: मुंबई इंडियन्सचा 'हा' खेळाडू म्हणजे 'टॅलेंटचं पॉवरहाऊस'; प्रिती झिंटाकडून क्रिकेटरचं तोंडभरून कौतुक
7
मोदींकडून सद्भावना, उद्धव ठाकरेंसोबत भाजपाची पुन्हा युती होणार? देवेंद्र फडणवीसांचं मोठं विधान
8
काँग्रेस ५० टक्के आरक्षणाची मर्यादा हटवेल, दलित आणि मागासवर्गीयांचा कोटा वाढवेल: राहुल गांधी
9
BANW vs INDW: ३३ व्या वर्षी भारतीय संघात पदार्पण; खेळाडूंनी केला एकच जल्लोष, यजमानांची अस्तित्वाची लढाई
10
'राम मंदिराचा निर्णय बदलणार...'; आचार्य प्रमोद कृष्णम यांचा मोठा दावा, काँग्रेसनं शाहबानो प्रकरणाप्रमाणे प्लॅन आखला!
11
"असं असेल तर MS Dhoni ने खेळूच नये..."; Harbhajan Singh भडकला, CSK vs PBKS सामन्यानंतर व्यक्त केला संताप
12
नरेश गोयल यांना २ महिन्यांचा जामीन, मुंबईबाहेर जाण्यासाठीही घ्यावी लागणार परवानगी
13
भाजपाला मोठा दिलासा, दिंडोरीमध्ये बंडखोर माजी खासदार हरिश्चंद्र चव्हाण यांनी घेतली माघार
14
पाकिस्तानची फजिती! मोहम्मद आमिर आयर्लंड दौऱ्यावर वेळेत जाणार नाही, कारण...
15
"भाजपा आता लाठ्याकाठ्यांनी तोडफोड करायला उतरलीय, अत्यंत निंदनीय आणि लज्जास्पद"
16
LSG ने काल १३ खेळाडू खेळवले! KKR लाही कसे नाही समजले? वाचा नेमके असे काय घडले  
17
माता न तू वैरिणी; नवऱ्यासोबत भांडणाचा राग, चिमुकल्याला मगरींनी भरलेल्या नदीत फेकले...
18
Eknath Shinde : धर्मवीर चित्रपटात राजन विचारेंबाबत दाखवलेलं सर्व खोटं, विचारे नकली शिष्य; एकनाथ शिंदेंनी सगळंच सांगितलं
19
लोकसभा निवडणुकीत महाराष्ट्रात महायुतीला किती मिळणार? देवेंद्र फडणवीसांनी सांगितला आकडा
20
Closing Bell: सेन्सेक्स किंचित तेजीसह तर, निफ्टी घसरणीसह बंद; टायटनमध्ये मोठी घसरण, IT शेअर्स चमकले

नागपुरात सहा महिन्यातच भाजपची १,४३,९४९ मते घटली

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 26, 2019 12:26 AM

नितीन गडकरी यांना ज्या विधानसभा मतदार संघात बढत मिळाली होती, ती मते सुद्धा भाजपला कायम राखता आली नाही. पक्षाला काही महिन्यातच १ लाख ४३ हजार ९४९ मतांचे नुकसान सहन करावे लागले.

ठळक मुद्देकाँग्रेस दोन जागांवर विजयी, परंतु मतांमध्ये केवळ १७,७३८ ने वाढ

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : २०१४ च्या निवडणुकांप्रमाणे शहरातील सहाही जागा जिंकण्याच्या विश्वासाने उतरलेल्या सत्ताधारी भाजपला जोरदार धक्का बसला आहे. भाजपच्या दोन जागा हातून गेल्या. मजबूत संघटन असल्याचा दावा करणाऱ्या भाजपला सहा महिन्यापूर्वी पार पडलेल्या लोकसभा निवडणुकीत मिळालेले मतदानही वाचवता आले नाही. गडकरी यांना ज्या विधानसभा मतदार संघात बढत मिळाली होती, ती मते सुद्धा भाजपला कायम राखता आली नाही. पक्षाला काही महिन्यातच १ लाख ४३ हजार ९४९ मतांचे नुकसान सहन करावे लागले.यावर्षी लोकसभा निवडणुकीच्या पहिल्या चरणात नागपूर लोकसभा मतदार संघासाठी ११ एप्रिल रोजी मतदान पार झाले. पक्षाचे नेते व उमेदवार केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी तब्बल ६ लाख ६० हजार २२१ मते घेत विजय प्राप्त केला. काँग्रेसचे उमेदवार नाना पटोले यांना ४ लाख ४४ हजार २१२ मते मिळाली. भाजप केवळ उत्तर नागपुरात माघारला. ते सुद्धा केवळ ८,९१० मतांनी. उर्वरित पाचही विधानसभा मतदार संघात गडकरी यांना प्रचंड लीड होती. सध्या २१ ऑक्टोबर रोजी पार पडलेल्या विधानसभा निवडणुकीत नागपूर लोकसभा मतदार क्षेत्रांतर्गत येणाऱ्या शहरातील सहाही विधानसभा मिळून भाजपला केवळ ५ लाख १६ हजार २७२ मते मिळाली. त्यामुळे सरळसरळ सहा महिन्यातच पक्षाचे १ लाख ४३ हजार ९४९ मते कमी झाली. भाजपला उत्तर नागपूरसह पश्चिम नागपुरातही पराभव पत्करावा लागला.दुसरीकडे विधानसभेत शहरातील सर्व जागा गमावलेल्या काँग्रेसला उत्तर नागपुरात आघाडी मिळाली होती. यात आणखी सुधारणा करीत विधानसभेत उतरलेल्या काँग्रेसने उत्तरसह पश्चिम नागपुरातही विजय खेचून आणला. दक्षिण आणि मध्य नागपुरातही काँग्रेसने कडवी झुंज दिली. या दोन जागा जिंकण्यासाठी भाजपला घाम गाळावा लागला. फार थोड्या मतांच्या फरकाने या दोन जागा भाजपने जिंकल्या. इतकी चांगली कामगिरी केल्यानंतरही काँग्रेसच्या मतांमध्ये मात्र केवळ १७७३८ मतांचीच भर पडली.भाजपच्या निराशाजनक कामगिरीमागे स्थानिक नेत्यांचा अतिआत्मविश्वास हे सुद्धा एक कारण आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्यावरच बहुतांश कार्यकर्ते अवलंबून राहिल्याचेही कारण सांगितले जाते. दक्षिण नागपूरमध्ये पक्षाला माजी उपमहापौर सतीश होले आणि किशोर कुमेरिया यांची बंडखोरी रोखता आली नाही. त्याचप्रकारे तिकीट नाकारण्यात आलेल्या एका पदाधिकाऱ्यांची पत्नी काँग्रेस उमेदवाराच्या पत्नीबरोबर प्रचारात फिरत होती.त्यामुळे भाजपचे उमेदवार मोहन मते यांच्या पत्नी सविता यांनाही सक्रिय व्हावे लागले. या सर्व गोष्टी अगोदरच नियंत्रित करता आल्या असत्या तर निवडणुकीत कडवा संघर्ष करावा लागला नसता. उत्तर नागपुरात अनेक बौद्धबहुल भागात मतदानाच्या दिवशी बुथ सुद्धा लावण्यात आले नाही. त्यामुळे पक्षातील कार्यकर्ते दुखावले गेले. पक्षाचे उमेदवार डॉ. मिलिंद माने यांना मागील पाच वर्षात स्वत:च्या कार्यकर्त्यांची फळी निर्माण करता आली नाही. मतदार संघ बांधता आला नाही. पक्षाने सुद्धा त्यांना तसे करू दिले नाही. त्यांच्या प्रामाणिक व स्वच्छ प्रतिमेचा उपयोग पक्षालाही करून घेता आला नाही. काही पदाधिकाऱ्यांचा दावा आहे की, डॉ. माने यांना सुद्धा परिस्थितीचे आकलन झाले होते. त्यामुळेच त्यांनी कदाचित आपल्या रुग्णालयाकडे अधिक लक्ष देणे सुरु केले होते. पश्चिममध्ये सुद्धा माजी आमदार सुधाकर देशमुख यांना त्यांच्या विरोधातील लाट दिसून आली नाही. पूर्व नागपूरला आपला गड बनवलेल्या भाजपला स्मार्ट सिटी व पारडी उड्डाण पूल सारखे मुद्दे व्यवस्थित हाताळता आले नाही. परिणामी काँग्रेसचे उमेदवार पुरुषोत्तम हजारे यांनी ७९,९७५ मते घेऊन भाजपचे विजयी उमेदवार कृष्णा खोपडे यांना केवळ २४ हजाराच्या लीडवर रोखून धरले. लोकसभा निवडणुकीत गडकरी यांनी पूर्व नागपुरातून ७५,३८० मतांची आघाडी घेतली होती. त्याचप्रकारे मध्य नागपूरमध्ये सुद्धा भाजपचे उमेदवार विकास कुंभरे यांना संघर्ष करावा लागला. एमआयएमचा उमेदवार नसता तर ही जगाही भाजपच्या हातून गेली असती.

टॅग्स :Maharashtra Assembly Election 2019महाराष्ट्र विधानसभा निवडणूक 2019BJPभाजपाVotingमतदान