शहरं
Join us  
Trending Stories
1
Video: माजी मंत्री तानाजी सावंत यांचा बंगला पाण्याखाली; दोन-दोन टोयोटा फॉर्च्युनर पुरात बुडाल्या...
2
सुनेत्रा अजित पवार यांचे NCP कार्यकर्त्यांना आवाहन; म्हणाल्या, “अतिवृष्टी हातात नाही, पण...”
3
अभूतपूर्व परिस्थितीत तातडीच्या मदतीसह कायमस्वरुपी मदतीची गरज; अन्यथा शेती मोठ्या समस्येत - शरद पवार
4
PM मेलोनींच्या इटलीमध्ये हजारो आंदोलक रस्त्यावर, बस-रेल्वे गाड्यांची तोडफोड; 60 पोलीस जखमी
5
पेनी स्टॉक बनला मल्टीबॅगर, एका वर्षात केलं मालामाल; १ लाखांचे झाले ६८ लाखांपेक्षा अधिक
6
Accident Video: दोन बाईकचा थरकाप उडवणारा अपघात; हवेत उडाले, नंतर फूट दूर जाऊन पडले
7
फक्त डेटा डिलिट करणं पुरेसं नाही! जुना फोन विकण्यापूर्वी 'या' ५ सीक्रेट गोष्टी करायलाच हव्यात
8
"पाकिस्तानचे तुकडे तुकडे होतील, बॉम्बहल्ला ही तर सुरुवात..."; इस्लामाबादच्या शत्रूचा इशारा
9
Navratri 2025: वडापावची क्रेव्हिंग होतेय? झटपट करा 'हा' उपासाचा कुरकुरीत बटाटेवडा
10
काय सांगता? स्लिम होण्याचा ट्रेंड जीवघेणा; बारीक लोकांमध्ये अकाली मृत्यूचा धोका तिप्पट
11
नाना पाटेकर सरसावले, 'ऑपरेशन सिंदूर'नंतर Pakच्या गोळीबारात बाधित झालेल्या कुटुंबांना ४२ लाखांची मदत
12
जीएसटीने आणखी अवघड केले...! पार्ले-जी बिस्कीट पुडा ५ रुपयांचा आता ४.४५ ला, १ रुपयाचे चॉकलेट ८८ पैशांना...
13
Gold Silver Price Today: आजही सोन्या-चांदीचे भाव नव्या विक्रमी पातळीवर; सोन्याच्या दरात प्रति तोळा ₹१,३४३ तर चांदी ₹१,१८१ ने महागली
14
Mumbai Local: एसी लोकलच्या टपावर चढला तरूण; क्षणात होत्याचं नव्हत झालं; दिवा स्थानकावरील घटना!
15
...म्हणून डोंबिवलीत काँग्रेसच्या ज्येष्ठ नेत्याला भाजपाच्या कार्यकर्त्यांनी नेसवली साडी, व्हिडीओ व्हायरल
16
नवरात्री २०२५: वातीभोवती काजळी धरली? १ सोपा उपाय; वात नीट राहील अन् दिवा अजिबात विझणार नाही
17
"निरपराध लोकांची काय चूक होती? आम्ही निषेध करणार"; हवाई हल्ल्यात ३० जणांचा मृत्यू, पाकिस्तानमधील जनता संतापली
18
GST कपातीनंतर सरकारची आणखी एक गुड न्यूज! २५ लाख महिलांना मिळणार मोफत गॅस कनेक्शन
19
ओला दुष्काळ जाहीर करणार का? देवेंद्र फडणवीस म्हणाले, 'त्याकरिता जेवढ्या पद्धतीची..."
20
"...ही चांगली गोष्ट नाही!"; राहुल गांधी यांच्या 'मत चोरी' संदर्भातील आरोपांवरून शरद पवार यांचं मोठं विधान, नेमकं काय म्हणाले?

नागपूर- अमरावती महामार्गावरील सातनवरीत पेपर मिलला आग

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 5, 2018 10:25 IST

नागपूर - अमरावती महामार्गावर असलेल्या सातनवरी शिवरातील इंड्स पेपर मिलला रविवारी दुपारी २.१५ च्या सुमारास आग लागली. त्यात कंपनीच्या आवारात ठेवण्यात आलेला कोट्यवधी रुपये किमतीचा आयातीत माल जळून राख झाला.

ठळक मुद्देकोट्यवधी रुपयांचे नुकसान आयातीत मालाची राख

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : नागपूर - अमरावती महामार्गावर असलेल्या सातनवरी शिवरातील इंड्स पेपर मिलला रविवारी दुपारी २.१५ च्या सुमारास आग लागली. त्यात कंपनीच्या आवारात ठेवण्यात आलेला कोट्यवधी रुपये किमतीचा आयातीत माल जळून राख झाला. सुदैवाने या आगीत कोणत्याही कर्मचारी अथवा कामगाराला दुखापत झाली नाही. आगीचे कारण अस्पष्ट असले तरी आग विझविण्याचे कार्य रात्री उशिरापर्यंत सुरूच होते.सातनवरी शिवारातील इंड्स पेपर मिलमध्ये ‘टिशू पेपर, किचन टॉवेल व टॉयलेट’चे उत्पादन केले जाते. त्यासाठी लागणारा कच्चा माल हा अमेरिका व युरोपियन राष्ट्रांमधून आयात केला जातो. मिल ओशीगाम ग्रुपच्या मालकीची आहे. या कच्च्या मालाचे बंडल कंपनीच्या गोदाम आणि आवारात साठवून ठेवले होते. दरम्यान, दुपारी २.१५ च्या सुमारास आवारात ठेवण्यात आलेल्या पेपरच्या बंडलने पेट घेतला आणि ही आग अल्पावधीतच पसरत गेली.ही आग सुरक्षा कर्मचारी नीलेश मडके यांच्या लक्षात येताच त्यांनी लगेच वरिष्ठ अधिकाऱ्यांना सूचना देत आग विझविण्यासाठी आवारातील फायर पॉर्इंट सुरू करून आगीवर पाण्याचा मारा करायला सुरुवात केली. आग नियंत्रणात येत नसल्याचे लक्षात येताच नजीकच्या सोलार एक्सप्लोसिव्ह कंपनीतील अग्निशमन दलाला बोलावण्यात आले. त्यानंतर हिंगणा एमआयडीसी, कळमेश्वर नगर परिषद व नागपूर महानगर पालिकेच्या अग्निशमन दलाला पाचारण करण्यात आले. अग्निशमन दलाच्या चार गाड्या ही आग विझविण्याचा आटोकाट प्रयत्न करीत होत्या. मात्र, आग नियंत्रणात आली नाही.

२०० कामगार व कर्मचारी सुरक्षितया कंपनीतील सकाळची पाळी सकाळी ८ ते सायंकाळी ४ वाजेपर्यंत असते. या पाळीत कंपनीमध्ये एकूण २०० कामगार व कर्मचारी कर्तव्यावर होते. त्यात महिला कामगारांचाही समावेश होता. कंपनीच्या आवारात आग लागल्याचे लक्षात येताच सर्व कामगार व कर्मचाऱ्यांना सुरक्षित बाहेर काढण्यात आले. या कार्यात कामगार आतातायीपणा करणार नाही, याचीही विशेष काळजी घेण्यात आली. त्यामुळे कुणालाही इजा झाली नाही.

आवारात २,५०० टन मालया कंपनीच्या आवारात २,५०० टन कच्चा माल ठेवला होता. तो सर्व परदेशातून आयात केला होता. या मालाची किंमत प्रति टन ३५ हजार रुपये आहे. आगीत नेमके किती रुपयांचे नुकसान झाले, हे आग विझल्यानंतर स्पष्ट होईल, अशी माहिती कंपनीचे व्यवस्थापक विजय शर्मा यांनी दिली. या कंपनीत रोज ४० टन कागदाचे उत्पादन केले जाते, अशी माहिती कंपनीचे मार्केटिंग अधिकारी प्रशांत जोशी यांनी दिली.

अग्निशमन दलाचा जवान जखमीहिंगणा एमआयडीसी अग्निशमन दलाचा जवान सचिन उकरे हा आग विझविण्याचे कार्य करीत होता. त्यातच पाण्याच्या दाबामुळे नोझल व पाईप त्याच्या हातातून सुटला. त्यात त्याच्या हाताला दुखापत झाली. या ठिकाणी कळमेश्वर ठाण्यातील पोलीस उपनिरीक्षक सुनील काबडी व शुभांगी ढगे यांनी पोलीस बंदोबस्त ठेवला आहे. शिवाय, एक रुग्णवाहिकाही उपलब्ध करून देण्यात आली.

टॅग्स :fireआग