शहरं
Join us  
Trending Stories
1
झोप येत नव्हती म्हणून जागेवरून उठला अन्...; सौदी बस अपघातात एकमेव बचावलेल्या 'शोएब'ची कहाणी
2
आजचे राशीभविष्य - १८ नोव्हेंबर २०२५, या राशीसाठी आर्थिक, सामाजिक आणि कौटुंबिक दृष्टीने आजचा दिवस लाभदायी
3
रशियन राष्ट्राध्यक्ष पुतीन भारत दौऱ्यावर येण्याआधी मंत्री जयशंकर मॉस्कोत, काय झाली चर्चा?
4
CNG: मुंबई, ठाण्यात गॅसकोंडी, ४५ टक्के रिक्षा-टॅक्सी बंद; सीएनजीच्या तुटवड्याने प्रवाशांचे मोठे हाल!
5
हेट स्पीच: राज ठाकरेंवर एफआयआरची मागणी करणारी याचिका, उच्च न्यायालयाने महाराष्ट्र सरकारला फटकारले
6
saudi arabia: सौदी अरेबियात भीषण अपघात! मक्केहून मदिनेला जाणाऱ्या बसची टँकरला धडक; ४२ भारतीयांचा मृत्यू
7
'लाडकी बहीण' योजनेच्या महिलांसाठी मोठी दिलासादायक बातमी! e-KYC ला ३१ डिसेंबरपर्यंत मुदतवाढ
8
Sheikh Hasina: बांगलादेशच्या माजी पंतप्रधान शेख हसीना यांना मृत्युदंड!
9
रक्षाविसर्जनावेळी मयताचा सावत्र मुलगा आल्याने वाद; दोन गटांत हाणामारी 
10
Reservation: आरक्षण मर्यादा ओलांडू नका; अन्यथा निवडणुका स्थगित करणार, न्यायालयाचा महाराष्ट्र सरकारला इशारा
11
सौदी बस अग्निकांडाला जबाबदार कोण? एकाच कुटुंबातील १८ जणांचा जळून मृत्यू, क्षणात ३ पिढ्यांतील लोकांचा अंत!
12
कसली महायुती अन् कोणती आघाडी घेऊन बसला! शिंदे शिवसेना आणि शरद पवारांची राष्ट्रवादी नगरपरिषद एकत्र लढवणार...
13
ईव्हीएममध्ये २५,००० मते आधीच होती, तरीही आमच्या पक्षाचे २५ उमेदवार जिंकले; 'RJD'च्या जगदानंद यांचा मोठा दावा
14
लाल किल्ला स्फोटात 'डिजिटल सस्पेंस'; स्विस ॲप 'थ्रीमा'चा वापर, सुरक्षा यंत्रणांपुढे मोठे आव्हान!
15
थंडी सुरु झाली...! रात्री झोपण्यापूर्वी बेंबीमध्ये या तेलाचे दोन थेंब टाका, मिळतील ७ आरोग्यदायी फायदे...
16
'फिदायीन' उमरनं घातला होता 'बूट बॉम्ब'; यात असं काय होतं? ज्याला म्हटलं जातं 'शैतान की मां'!
17
स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत आरक्षणाच्या ५० टक्के मर्यादेचे उल्लंघन, सुप्रीम कोर्टात १९ नोव्हेंबरला सुनावणी
18
कागलमध्ये हसन मुश्रीफ-समरजित घाटगेंची युती, मुश्रीफांनी संजयबाबांची मागितली माफी; म्हणाले...
19
IND vs SA : "सगळे घाबरुन खेळत आहेत..." डावललेल्या खेळाडूचं नाव घेत कैफ थेट 'गंभीर' मुद्यावर बोलला
20
शेख हसिनांना फाशी, हा भारताविरोधात अमेरिका-पाकिस्तानचा कट; संरक्षण विश्लेषकांचा खळबळजनक दावा
Daily Top 2Weekly Top 5

Coronavirus; नागपुरातील व्हेंटिलेटरवर गेलेल्या ५५ टक्क्यांवर कोरोनाबाधितांचा मृत्यू

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 29, 2021 08:10 IST

Nagpur News नागपुरातील मेयो, मेडिकलसह खासगी कोविड रुग्णालयात व्हेंटिलेटरवर ठेवण्यात आलेल्या सुमारे ५५ टक्के रुग्णांचा मृत्यू झाल्याची माहिती आहे.

ठळक मुद्देशासकीयसह खासगी रुग्णालयांतील स्थिती मेयोमध्ये दोन हजारांवर रुग्णांचा मृत्यू

लोकमत न्यूज नेटवर्क नागपूर : कोरोनाचा संसर्ग फुफ्फुसावर झालेल्या सहामधून एका रुग्णाला श्वास घेण्याचा त्रास होण्याची शक्यता अधिक असते. अशा रुग्णांना व्हेंटिलेटरवर ठेवले जाते. नागपुरातील मेयो, मेडिकलसह खासगी कोविड रुग्णालयात व्हेंटिलेटरवर ठेवण्यात आलेल्या अशा सुमारे ५५ टक्के रुग्णांचा मृत्यू झाल्याची माहिती आहे. एकट्या मेयोमध्ये १ मार्च २०२० ते २७ एप्रिल २०२१ पर्यंत ३ हजार ५०२ रुग्णांना विविध व्हेंटिलेटर्सवर ठेवण्यात आले. त्यापैकी १ हजार ४२१ रुग्ण बरे झाले, तर २ हजार ८१ रुग्णांचा मृत्यू झाले आहे.

            कोरोनाचा दुसऱ्या लाटेत गंभीर रुग्णांची संख्या अधिक होती. यामुळे दरम्यानच्या काळात व्हेंटिलेटर बेडची मागणी वाढली होती. शरिरातील ऑक्सिजनचे प्रमाण कमी झालेल्या किंवा श्वास घेण्यास कठीण झालेल्या रुग्णांना व्हेंटिलेटर लावले जात होते. सध्या शासकीयसह खासगी रुग्णालयात २०९ रुग्ण व्हेंटिलेटरवर आहेत. तज्ज्ञाच्या मते, व्हेंटिलेटरचे ‘मॅकेनिकल व्हेंटिलेटर’ व ‘नॉन इन्व्हॅसिव्ह व्हेंटिलेटर’ असे दोन प्रकार असतात. ‘मॅकेनिकल व्हेंटिलेटर’ एका ट्यूबद्वारे श्वासनलिकेशी जोडला जातो. हा व्हेंटिलेटर माणसाच्या फुप्फुसापर्यंत ऑक्सिजन पोहोचविण्याचे काम करतो. तर, ‘नॉन इन्व्हॅसिव्ह व्हेंटिलेटर’ रुग्णाचे केवळ तोंड आणि नाक झाकून फुप्फुसापर्यंत ऑक्सिजन पोहोचवतो. ‘नॉन इन्व्हॅसिव्ह व्हेंटिलेटर’च्या तुलनेत ‘मॅकेनिकल व्हेंटिलेटर’वर असलेल्या रुग्णांचे मृत्यू अधिक झाले आहेत. नागपूर जिल्ह्यात मार्च २०२० ते २६ मे २०२१ या कालावधीत ८८५४ रुग्णांचे मृत्यू झाले. यातील सुमारे ५५ टक्क्यांवर रुग्ण हे ‘व्हेंटिलेटर’ होते.

-२४ तासांत एकदाच ड्युमीडिफायरमध्ये भरले जाते पाणी

व्हेंटिलेटरमधील ड्युमीडिफायरमधील पाण्याची पातळी कमी झाल्यावर किंवा २४ तासांतून एकदा पाणी भरले जात असल्याची माहिती खासगीसह शासकीय रुग्णालयातील रुग्णांच्या काही नातेवाइकांनी दिली. तज्ज्ञाच्या मते, २४ तासांत एकदा ‘ड्युमीडिफायर’मध्ये पाणी भरण्याचा असा काही नियम नाही. तीन दिवसांनंतरही भरता येते. पण, पाणी स्वच्छ असले पाहिजे. पाण्याची पातळी कमी झाल्यावरही पाणी भरले जाते.

-‘ईटी ट्यूब’ ब्लॉक झाल्यावर तातडीने बदलली जाते

कोरोना रुग्णाचा व्हेंटिलेटरची ‘ईटी ट्यूब’ दर सहा तासांनी स्वच्छ करण्याची गरज पडत नाही. परंतु ज्या रुग्णांची ‘ईटी ट्यूब’ ब्लॉक झाली असल्यास ती तातडीने बदलली जाते. व्हेंटिलेटर व रुग्णांशी जोडलेली ‘एचएमई’ फिल्टर’ मात्र रोज बदलले जाते. जर तीन दिवसांपेक्षा जास्त कालावधीसाठी रुग्ण व्हेंटिलेटरवर असेल तर व्हेंटिलेटरचे ‘सर्किट’ बदलले जाते, अशी माहिती तज्ज्ञानी दिली.

 

 

टॅग्स :Coronavirus in Maharashtraमहाराष्ट्रात कोरोना व्हायरस