शहरं
Join us  
Trending Stories
1
'दक्षिणेतील लोक आफ्रिकन दिसतात'; सॅम पित्रोदांच्या विधानावर काँग्रेस म्हणतं, 'त्यांनी दिलेली उपमा...'
2
४ जूनच्या निकालानंतर सगळं स्पष्ट होईल; शरद पवारांच्या विधानावर पृथ्वीराज चव्हाणांचा दावा
3
सॅम पित्रोदांनी ईशान्य आणि दक्षिण भारतातील लोकांच्या रंगावरून केलेल्या टिप्पणीला मोदींचं प्रत्युत्तर, म्हणाले...   
4
Sachin Pilot : "काँग्रेसला भाजपापेक्षा जास्त जागा मिळतील; जे खूप वर जातात ते एक ना एक दिवस खाली येतात"
5
उत्तर मुंबईतील सर्वसमावेशक विकासावर लक्ष केंद्रीत करणार; पीयूष गोयल यांनी दिली ग्वाही
6
पदवीधर आणि शिक्षक मतदारसंघाच्या निवडणुका जाहीर; ४ जागांसाठी 'या' तारखेला मतदान
7
Ajit Pawar : श्रीनिवास पवारांनी मला साथ देणार असल्याचं सांगितलं होतं, पण....' अजित पवारांचा मोठा गौप्यस्फोट
8
परशुराम जन्मोत्सव: विष्णूंचा सहावा अवतार, शस्त्र-शास्त्रात पारंगत चिरंजीव; वाचा, महात्म्य
9
अरे देवा! ब्युटी पार्लरमध्ये भेटल्या, एकमेकींच्या प्रेमात पडल्या अन् घरातून पळाल्या; कोर्ट म्हणतं...
10
...अन् सुरेश रैनाने सिद्धार्थ जाधवला मारली मिठी, अभिनेता म्हणाला- "तुम्ही माझं कौतुक केलं..."
11
टोल नाकेवाल्यांनी पैसे घेतले, NHAI ला महागात पडले; परदेशी वाहनमालक नडला, 25000 चा दंड
12
30 वर्ष सहन केला नवऱ्याचा अत्याचार; बॉलिवूड गाजवणाऱ्या अभिनेत्रीचे लग्नानंतर झाले अतोनात हाल
13
Babar Azam म्हणजे बिन कामाचा भाऊ; पाकिस्तानातील अभिनेत्रींनी कर्णधाराची उडवली खिल्ली
14
केरळमध्ये वेस्ट नाईल तापाचा प्रादुर्भाव; 'या' धोकादायक आजाराची लक्षणे काय आहेत? जाणून घ्या...
15
Smriti Irani Tax Saving Funds : स्मृती इराणींनी ज्या टॅक्स सेव्हिंग फंडात गुंतवणूक केली, माहितीये त्यांची कामगिरी कशीये?
16
रश्मिका मंदानाला विसरा, आता ही साऊथ अभिनेत्री बनली 'नॅशनल क्रश'; दुप्पट केलं मानधन
17
मनीष सिसोदियांना दिलासा नाहीच! जामीन याचिकेवरील सुनावणी पुढे ढकलली
18
उच्च न्यायालयाचा राज्य सरकारला दिलासा! औरंगाबाद आणि उस्मानाबाद जिल्ह्याचं नाव छत्रपती संभाजीनगर आणि धाराशिवच
19
अक्षय्य तृतीयेला पंचमहायोग: लक्ष्मीकृपा मिळण्यासाठी ‘हे’ उपाय करा, लाभ मिळवा; शुभच होईल!
20
‘अदानी, अंबानींकडून किती माल उचलला, त्यांना शिव्या देणं अचानक कसं काय बंद केलं?’, मोदींचा काँग्रेसला सवाल  

१७ महिन्यात राज्यभरात २० हजारांहून अधिक अर्भक मृत्यू

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 14, 2020 11:20 AM

२०१९ पासून १७ महिन्यात राज्यभरात २० हजारांहून अधिक अर्भकमृत्यू झाले आहेत. तर उपजत मृत्यूचे प्रमाणदेखील चिंताजनक आहे.

ठळक मुद्देमुला-मुलींच्या जन्मसंख्येत सातत्याने घट उपजत मृत्यूचे प्रमाणदेखील चिंताजनकच

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : २०१९ पासून १७ महिन्यात राज्यभरात २० हजारांहून अधिक अर्भकमृत्यू झाले आहेत. तर उपजत मृत्यूचे प्रमाणदेखील चिंताजनक आहे. राज्यातील अर्भक मृत्यू थांबण्यासाठी प्रशासनाकडून विविध प्रकारचे प्रयत्न सुरू असल्याचे दावे करण्यात येतात. मात्र माहिती अधिकारातून समोर आलेली आकडेवारी ही डोळ्यात अंजन टाकणारी आहे.उपराजधानीतील माहिती अधिकार कार्यकर्ते अभय कोलारकर यांनी माहितीच्या अधिकाराअंतर्गत राज्य कुटुंब कल्याण कार्यालयाकडे विचारणा केली होती. १ जानेवारी २०१९ ते ३१ मे २०२० या कालावधीत राज्यात किती अर्भक, बालमृत्यू झाले, तसेच बालमृत्यूचा दर किती होता, राज्यात किती मुले व मुलींचा जन्म झाला इत्यादी प्रश्न त्यांनी विचारले होते. यावर राज्य कुटुंब कल्याण कार्यालयाकडून प्राप्त झालेल्या अधिकृत माहितीनुसार १ जानेवारी २०१९ ते ३१ मे २०२० या १७ महिन्यांच्या कालावधीत राज्यभरात एक वर्षांपर्यंतच्या २० हजार ७७० अर्भकांचा मृत्यू झाला. तर ८ हजार ७७३ उपजत मृत्यूंची नोंद झाली. बाल व माता मृत्यूंची संख्या नागरी नोंदणी पद्धतीनुसार उपलब्ध नसल्याचे कार्यालयाकडून सांगण्यात आले.

दरम्यान, १ जानेवारी २०१५ ते ३१ मे २०२० या कालावधीमध्ये राज्यभरात ९३ लाख ३ हजार ७०० जन्मांची नोंद झाली. यात ४८ लाख ३७ हजार ५९९ मुले तर ४४ लाख ६६ हजार १०१ मुलींचा समावेश होता. मुलांच्या तुलनेत मुलींच्या जन्माचे प्रमाण हे ९२.३२ टक्के इतके होते.

जन्मसंख्येत पाच वर्षांत घटसंबंधित आकडेवारीनुसार २०१५ सालच्या तुलनेत पाच वर्षांत जन्मसंख्येत सातत्याने घट दिसून आली आहे. २०१५ साली १० लाख १४ हजार २६३ मुले व ९ लाख ७९ हजार ७९९ मुली अशा एकूण १९ लाख ९४ हजार ६२ जन्मांची नोंद झाली. तर २०१९ साली हीच संख्या १४ लाख २३ हजार ४८७ (७,४३,०४८ मुले व ६,८०,४३९ मुली) इतकी होती. पाच वर्षांतच ५ लाख ७० हजार ५७५ ने जन्मसंख्या घटली.

टॅग्स :Deathमृत्यू