शहरं
Join us  
Trending Stories
1
केदारनाथमध्ये हेलिकॉप्टर कोसळलं, गौरीकुंडजवळ अपघात; सात जणांचा मृत्यू झाल्याची शक्यता
2
राशीभविष्य, १५ जून २०२५: कामात समाधान लाभेल, आवडत्या व्यक्तीची भेट होईल, प्रवासाचा बेत आखाल !
3
इस्रायलचा इराणवर 'वार'! तेहरानमधील संरक्षण मंत्रालयाची इमारत, अणु मुख्यालय उद्ध्वस्त
4
CET: बीबीए, बीसीए, बीएमएसच्या परीक्षेसाठी सीईटी कक्षाकडून नोंदणी सुरू 
5
Maharashtra Govt: महावितरणची सौरऊर्जेत ३० हजार कोटींची गुंतवणूक!
6
Mumbai Local: तिकीट काढूनच फर्स्ट क्लासमधून प्रवास; नाही तर भरा दंड!
7
Navi Mumbai: नवी मुंबईत पाच आंतरराष्ट्रीय विद्यापीठे येणार
8
Ulhasnagar: धक्कादायक! डॉक्टरांनी मृत घोषित केलेला रुग्ण होता जिवंत
9
Air India: सोने तस्करीप्रकरणी एअर इंडियाच्या कर्मचाऱ्याला अटक
10
Mumbai Accident: लिंक रोड नेमका कोणासाठी बांधला? गोवंडी अपघातानंतर नागरिकांमध्ये संताप
11
Ahmedabad Plane Crash: चौकशीसाठी उच्चस्तरीय समिती स्थापन, मृतांची संख्या २७०
12
Palghar: आधी मृत अर्भकाला पिशवीतून नेऊ दिले, आता आरोग्य विभागाचे एकमेकांकडे बोट
13
अग्रलेख: ‘ती’च्यावर गर्भाशय काढण्याची वेळ का येते?
14
Mumbai Accident: गोवंडीत तीन लहान मुलांसह चौघांना भरधाव डम्परने चिरडले
15
WTC Final: अखेर २७ वर्षांनंतर दक्षिण आफ्रिकेने पुसला चोकर्सचा डाग; ऑस्ट्रेलियाला नमवून कसोटीचा नवा चॅम्पियन
16
विमान अपघातात सापडलेली भगवदगीता, कृष्ण मूर्ती कोणाची? एअर इंडियाची क्रू मेंबर असलेल्या पनवेलच्या लेकीची...
17
इराणच्या आकाशात इस्रायलची विमाने, गॅस रिफायनरीवर हल्ला; डिफेंस सिस्टीम उध्वस्त
18
आयुष्यात कधीच विमानात बसणार नाही; व्हिडीओ रेकॉर्ड करणाऱ्या आर्यनने घेतली धास्ती, पोलीस चौकशीनंतर...
19
अमेरिकेत मोठी घटना! दोन खासदारांवर घरात घुसून गोळीबार; महिला खासदार, पतीचा मृत्यू
20
नीट-यूजीचा निकाल जाहीर! राजस्थानचा महेश कुमार पहिला, तर महाराष्ट्राचा कृष्णांग जोशी तिसरा

विदर्भात पावसाची रिपरिप; मात्र अद्याप ६८ टक्के बॅकलॉग

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 27, 2023 11:43 IST

भंडारा, यवतमाळ जिल्ह्यात वीज कोसळून ३ ठार, दोन जखमी

नागपूर : विदर्भात नागपूर, चंद्रपूर, गडचिरोली, गोंदिया, भंडारा, यवतमाळ या जिल्ह्यात पावसाची रिपरिप सुरू आहे. विदर्भाला अद्यापही दमदार पावसाची प्रतीक्षा असली तरी सोमवारच्या पावसामुळे बळीराजा सुखावला आहे. सामान्य नागरिकांनाही उकाड्यापासून दिलासा मिळाला आहे. यादरम्यान भंडारा जिल्ह्यात वीज कोसळून दोघांचा मृत्त्यू झाला तर यवतमाळ जिह्यात आर्णी तालुक्यातील शेंदूरसनी शिवारात एक महिला मजूर वीज कोसळून ठार झाली.

नागपुरात रविवारी रात्री सुरू झालेला पाऊस सोमवारी सकाळपर्यंत संथपणे संततधार सुरू होता. नागपुरात रात्रीच्या रिपरिपीनंतर सर्वाधिक ७८.४ मि.मी. पावसाची नोंद झाली. सोमवारी दिवसभर मात्र आकाशात जमलेल्या ढगांनी शांतता बाळगली.

झाडाचा आधार घेतला अन् घात झाला..

भंडारा जिल्ह्यात सोमवार सकाळपासून पावसाला सुरुवात झाली आहे. दरम्यान, भंडारा तालुक्यातील वाघबोडी शिवारात वीज कोसळून दोन शेतमजुरांचा मृत्यू झाला. ही घटना वाघबोडी येथील तेजराम बडोले यांच्या शेतात दुपारी २ वाजताच्या सुमारास घडली. यादवराव अर्जुन शहारे (६५) रा. विद्यानगर, भंडारा आणि रमेश श्रावण अंबादे (५२) अशी मृतकांची नावे आहेत. खरीप हंगाम अंतर्गत शेतात काम सुरू असतानाच मुसळधार पावसाला सुरुवात झाली. यावेळी या दोन्ही मजुरांनी पावसापासून बचाव करण्यासाठी शेतातीलच एका मोठ्या झाडाचा आधार घेतला. याचवेळी झाडावर वीज कोसळली. यात दोन्ही मजुरांचा जागीच मृत्यू झाला.

पेरणी करुन परतत असतानाच महिला मजुरांवर वीज कोसळली

यवतमाळ जिल्ह्यात मागील २४ तासांपासून पावसाची रिपरिप सुरू आहे. आर्णी तालुक्यातील शेंदूरसनी शिवारात पेरणी करून घरी परतत असलेल्या महिला मजुरांवर वीज कोसळली. यात एका महिलेचा मृत्यू झाला तर दोन जखमी आहेत. ही घटना सोमवारी सायंकाळी घडली.

सखूबाई राजू राठोड (४७) असे मृत महिलेचे नाव आहे. तर संगीता गजानन डोल्हारकर आणि ज्योती किशोर राठोड या दोघी गंभीर जखमी झाल्या आहेत. शेंदूरसनी येथील शेतात महिला मजूर पेरणीसाठी गेल्या होत्या. पेरणी झाल्यानंतर घराकडे येत असताना अचानक वीज कोसळली. यात त्या जखमी झाल्या त्यांना तातडीने आर्णी ग्रामीण रुग्णालयात आणण्यात आले. जखमी महिलांवर उपचार सुरू असल्याची माहिती नायब तहसीलदार यू. डी. तुंडलवार यांनी दिली.

मुसळधार पावसाची गरज

विदर्भात पावसाची तूट अद्यापही ६८ टक्के आहे. विदर्भात मान्सून बराच उशिरा म्हणजे २३ जूनला सक्रिय झाला. अति जोरदार पावसाचा इशारा दिला असला तरी अद्यापही त्याप्रमाणे बरसला नाही. त्यामुळे जून महिन्याची एकूण सरासरी गाठायला पुढल्या चार दिवसात मुसळधार पावसाची गरज आहे. रविवारी रात्री झालेल्या पावसामुळे मात्र मोठी तूट भरून काढायला मदत मिळाली. विदर्भात या महिन्यात १४० ते १५० मि.मी. पावसाची नोंद अपेक्षित होती पण आतापर्यंत केवळ ४४.६ मि.मी. पावसाचीच नोंद झाली आहे. त्यामुळे पावसाचा बॅकलॉग ६८ टक्क्यांवर आहे. नागपुरात ही तूट सर्वात कमी ४३ टक्के आहे. इतर जिल्ह्यात मात्र ७५ ते ८० टक्के बॅकलॉग बाकी आहे.

कुठे किती पाऊस 

सोमवारी दिवसा ब्रम्हपुरी २० मि.मी. व गोंदियामध्ये १८ मि.मी. पावसाची नोंद करण्यात आली. त्याखाली गडचिरोली व अकोल्यात ५ मि.मी. पाऊस झाला. इतर जिल्ह्यात ढगांचा जोर शांत होता. रविवारी रात्री मात्र नागपूरनंतर चंद्रपूरला ५७.४ मि.मी., अमरावती २२.२ मि.मी., भंडारा २० मि.मी., यवतमाळ ४० मि.मी. वर्धा २७.७ मि.मी. व अकोल्यात १८.९ मि.मी. पाऊस झाला. 

सर्वदूर पावसामुळे दिवसाचे तापमान मोठ्या प्रमाणात खाली घसरले, अकोला, अमरावतीत ५.९ व ४.८ अंशाने पारा घसरला. यवतमाळमध्ये सर्वाधिक ७.५ अंशाने घसरत २७.२ अंशावर पोहोचला. नागपुरात सर्वाधिक ३२ अंश तापमानाची नोंद झाली. रात्रीचा पारा मात्र सरासरीच्या खाली घसरला आहे.

कोणत्या जिल्ह्यात किती तूट?

जिल्हा - तूट (टक्के) 

  • नागपूर - ४३
  • गोंदिया - ७४
  • भंडारा - ७२
  • चंद्रपूर - ७०
  • गडचिरोली - ७४
  • वर्धा - ५८
  • अमरावती - ६४
  • अकोला - ८७
  • यवतमाळ - ६९
  • बुलढाणा - ८२
टॅग्स :environmentपर्यावरणRainपाऊसVidarbhaविदर्भbhandara-acभंडाराYavatmalयवतमाळ