शहरं
Join us  
Trending Stories
1
मेक्सिकोमध्ये GenZचे जोरदार आंदोलन, तरूण रस्त्यावर का उतरले? इतका तीव्र संताप कशासाठी?
2
Shubman Gill Hospitalised : शुभमन गिलला रुग्णालयात दाखल करण्याची वेळ; BCCI नं दिली मोठी अपडेट
3
आजचे राशीभविष्य, १६ नोव्हेेंबर २०२५: आर्थिक लाभ होतील, मित्र व स्नेह्यांची भेट आनंददायी राहील.
4
पाकिस्तानची सौदी अरेबियानंतर आता आणखी एका मुस्लिम देशाशी हातमिळवणी? नवा 'प्लॅन' काय?
5
'वाराणसी' एस एस राजामौलींच्या सिनेमाचं टायटल घोषित, महेश बाबूचा व्हिडीओ टीझर आऊट
6
साप्ताहिक राशीभविष्य: ८ राशींना घवघवीत यश, मनसोक्त जगण्याचा काळ; नोकरीत प्रगती, इच्छापूर्ती!
7
Bihar CM: मुख्यमंत्री कोण? एनडीएमध्ये चर्चा सुरूच; बिहारच्या नेतृत्वाबाबत गूढ कायम!
8
Kalyan: रेल्वेतून पडून जखमी; डॉक्टरांनी घरी पाठवले, काही तासांत मृत्यू!
9
ड्रायव्हिंग टेस्ट फक्त नावापुरती! मुंबई RTO मध्ये स्टिअरिंगवर हात ठेवताच मिळतंय लायसन्स
10
JJ Hospital: जेजे रुग्णालयाची कॅन्सर रुग्णांसाठी ११ एकर जागेची मागणी!
11
Mumbai: मुंबईत मोठी दुर्घटना! भायखळा येथे बांधकाम सुरू असताना माती कोसळली; २ ठार, ३ जखमी
12
Court: राजकारण्यांवरील खटल्यांचा निपटारा करा! महाराष्ट्र, गोव्यातील ४७८ प्रकरणांवर हायकोर्टाचे आदेश
13
Congress: ठाकरेंना मोठा धक्का! काँग्रेसची 'एकला चलो'ची घोषणा; मुंबई महानगरपालिका स्वबळावर लढणार
14
Akasa Air: नवी मुंबई विमानतळामुळे प्रवाशांना दिलासा; ख्रिसमसपासून दिल्ली, गोवासह ४ शहरांसाठी थेट सेवा
15
Vasai: बालदिनीच क्रूर शिक्षा! शाळेत उशिरा आली म्हणून १०० उठाबशा, विद्यार्थिनीचा दुर्दैवी मृत्यू
16
अमेरिकेत महागाई वाढली, डोनाल्ड ट्रम्प यांनी टॅरिफवर घेतला यू-टर्न; भारताला मोठा फायदा होणार
17
लालू प्रसाद यादवांच्या मुलीचा खळबळजनक आरोप! रोहिणी म्हणाल्या "तेजस्वीने मला घरातून बाहेर..."
18
Rohini Aacharya: लालू प्रसाद यादवांच्या घरात ज्यांच्यामुळे सुरू झालं 'महाभारत', ते संजय यादव कोण?
19
एका वर्षात तिसरी वेळ! भारताच्या शेजारी देशात सापडली तब्बल १००० टन सोन्याची खाण, कोणता आहे देश?
20
माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण आज कराडात! सातारा जिल्ह्यामधील महाविकास आघाडी बाबत होणार निर्णय?
Daily Top 2Weekly Top 5

वानर अन् माकडे म्हणे अभयारण्यात सोडणार!

By admin | Updated: April 13, 2015 00:07 IST

अफलातून योजना : वनविभागाने पाठवला शासनाकडे प्रस्ताव

रत्नागिरी : ग्रामीण भागामध्ये वानर, माकडांचा उपद्रव दिवसेंदिवस वाढत असताना वनविभागाच्या डोक्यातून एक अफलातून आणि तितकीच विनोदी ‘आयडिया’ आली आहे. वनविभागाने या माकडांना पकडून अभयारण्यात सोडण्याचा विडा उचलला आहे म्हणे! एवढंच नव्हे तर एवढ्या महत्त्वकांक्षेपोटी तब्बल ७९ लाख २७ हजार ४६५ रुपये खर्च करण्याचा प्रस्ताव शासनाकडे मंजुरीसाठी पाठवला आहे.जिल्ह्यात अवघे ६९.३९ चौरस किलो मीटरएवढे वनक्षेत्र आहे. जिल्ह्याच्या एकूण भौगोलिक क्षेत्राच्या मानाने वनांचे प्रमाण फक्त ०.८० टक्के एवढेच आहे. वनखात्याच्या ताब्यात असलेले वनक्षेत्र हे विखुरलेल्या स्वरुपात आहे. जिल्ह्यालगत असलेल्या कोल्हापूर वनविभागात चांदोली व कोयना अभयारण्ये आहेत. तसेच जिल्ह्याची भौगोलिक रचना पाहता सह्याद्री पर्वतरांगा, डोंगर, दऱ्या, नद्या आदींमध्ये जिल्हा विभागलेला आहे. येथील वनक्षेत्र आणि लगतची अभयारण्ये पाहता जिल्ह्यात वन्यप्राण्यांचा मोठ्या प्रमाणात वावर आहे.जिल्ह्यात जंगलतोडीचे प्रमाणही वाढले आहे. त्यामुळे वानर, माकड, बिबटे लोकवस्तीकडे वळू लागले आहेत. वानर आणि माकडांकडून होणारा हा उपद्रव अगदी सहन करण्यापलिकडे गेलेला आहे. या प्राण्यांमुळे दरवर्षी भाजीपाला, शेती आदींचे नुकसान होते. जिल्ह्यात वानर, माकडांच्या होणाऱ्या उपद्रवाबाबत जिल्हा परिषदेच्या स्थायी समिती, सर्वसाधारण सभांमध्ये याबाबत उदय बने व अन्य सदस्यांनी वेळोवेळी आवाज उठवून त्यांचा बंदोबस्त करण्याची मागणी अनेकदा केली होती.वनविभागाकडेही याबाबत वारंवार तक्रारी येत आहेत. त्यावर वनविभागाने एक भन्नाट आयडिया शोधली आहे म्हणे! वनविभागाने वानर व माकडे पकडण्यासाठी ७९ लाख २७ हजार ४६५ रुपयांचा प्रस्ताव तयार केला आहे. वानर व माकडे पकडून ती अभयारण्यात सोडण्याच्या खर्चाचा प्रस्ताव वनविभागाकडून शासनाकडे पाठविण्यात आला आहे.वानर व माकडे पकडण्यासाठी गावच्या सरपंचांच्या देखरेखीखाली ग्रामसेवकांच्यामार्फत लवकरात लवकर हा कार्यक्रम राबवण्यात येणार आहे. एवढ्या मोठ्या प्रमाणावर माकडांना पकडून त्यांचा बंदोबस्त त्यांना करता येईल का? असा सवाल मात्र गरीब शेतकऱ्यांकडून होत आहे. (शहर वार्ताहर)तालुका लागणारी रक्कममंडणगड ४,२८,१००खेड ३,१९,४१०दापोली ११,००,९००चिपळूण ५,०८,९५०गुहागर २,७७,३५०लांजा १५,०७,९२०राजापूर ९,६९,३०५संगमेश्वर १७,५१,५२०रत्नागिरी १०,६४,०१०एकूण ७९,२७,४६५जिल्ह्यात माकड, वानरांकडून शेतातील पिके, फळभाज्या, घरांचे नुकसान.जंगलतोडीमुळे माकडे लोकवस्तीकडे.सरपंचांच्या देखरेखीखाली कार्यक्रम राबविणार.जाणकार व प्रशिक्षित व्यक्तीकडून माकडे पकडणार.तब्बल ७९ लाख २७ हजारांचा खर्च अपेक्षित असल्याचा शासनाकडे प्रस्ताव.