शहरं
Join us  
Trending Stories
1
Eknath Shinde: काँग्रेसने पाकिस्तानला उत्तर देण्याची कधीच हिंमत दाखवली नाही, शिंदेंची टीका
2
मुस्लीम विद्यार्थी चारच, पण 159 जणांना नमाज पठण करण्यास भाग पाडलं; प्रोफेसरला अटक!
3
युद्धात पाकिस्तानच्या बाजूनं उभं राहणार, भारताचे तुकडे होतील; कोण आहे हा दिल्लीचा शत्रू? मुनीर सैन्यासोबत लढण्याची केली घोषणा
4
पुण्यात आल्यावर मुंबईच्या तरुणीला पटवलं, शरीरसंबंधही ठेवले; नंतर तिच्याच मैत्रिणीसोबत...
5
भयंकर! नवरा-नवरीसोबत आक्रित घडलं, कारला भीषण आग; ७ जणांनी उड्या मारुन वाचवला जीव
6
वैभव सूर्यवंशीने ठोकलं विक्रमी शतक, पण आता लागू शकते क्रिकेटबंदी; खेळाडूच्या आरोपाने चर्चांना उधाण
7
छाया कदम यांनी 'ती' गोष्ट अभिमानाने सांगितली अन् अडचणी वाढल्या; अभिनेत्रीची होणार चौकशी
8
Traffic News: पुणे-मुंबई एक्सप्रेसवेवर मोठी वाहतूक कोंडी, ५ किलोमीटरपर्यंत वाहनांच्या रांगा
9
अरे व्वा! रुग्णालयात अनोखा विवाहसोहळा, आजारी वधूला उचलून घेऊन नवरदेवाने घेतल्या सप्तपदी
10
'वेव्हज हे फक्त नाव नाही तर...'; PM मोदींनी WAVES परिषदेमध्ये मनोरंजन क्षेत्रासाठी केली मोठी घोषणा
11
Nagpur: मित्राचा वाढदिवस ठरला आयुष्यातील शेवटचा दिवस, स्विमिंग पूलमध्ये बुडून तरुणाचा मृत्यू
12
“राज ठाकरे-उद्धव ठाकरे एकत्र येत असतील तर...”; मनसे-ठाकरे गट युतीवर काँग्रेस नेते थेट बोलले
13
"सैनिकांचे मनोबल तोडू नका"; पहलगाम हल्ल्याची चौकशी करण्याची मागणी करणाऱ्यांना कोर्टाने फटकारले
14
एआयमुळे २०००० नोकऱ्या मिळणार, Cognizant २०२५ मध्ये फ्रेशर्सची भरती करणार
15
“उद्धव-राज ठाकरे दोघेही भावासमान, महाराष्ट्र हितासाठी मनाचा मोठेपणा दाखवत...”: सुप्रिया सुळे
16
Video - अरे बापरे! टँकर पलटताच तेल लुटण्यासाठी बादल्या, कॅन घेऊन लोकांची झुंबड
17
नाशिक: पोलिसांच्या हाताला झटका देऊन पळालेला क्रिश सापडला, कुठे बसला होता लपून?
18
कोण आहे 'तो' चोर? ज्याचं सर्वच करताहेत भरभरून कौतुक; कोट्यवधी रुपये चोरले अन्...
19
३५ वर्ष हेच सुरू, काश्मिरींना खूप त्रास सहन करावा लागतो; पहलगामवरून फारूक अब्दुल्ला थेट बोलले
20
कर्मचाऱ्याचे पीएफ ट्रान्सफर होणार कंपनीच्या मंजुरीविना, नोकरी बदलताना प्रक्रिया होणार सुलभ

वानर अन् माकडे म्हणे अभयारण्यात सोडणार!

By admin | Updated: April 13, 2015 00:07 IST

अफलातून योजना : वनविभागाने पाठवला शासनाकडे प्रस्ताव

रत्नागिरी : ग्रामीण भागामध्ये वानर, माकडांचा उपद्रव दिवसेंदिवस वाढत असताना वनविभागाच्या डोक्यातून एक अफलातून आणि तितकीच विनोदी ‘आयडिया’ आली आहे. वनविभागाने या माकडांना पकडून अभयारण्यात सोडण्याचा विडा उचलला आहे म्हणे! एवढंच नव्हे तर एवढ्या महत्त्वकांक्षेपोटी तब्बल ७९ लाख २७ हजार ४६५ रुपये खर्च करण्याचा प्रस्ताव शासनाकडे मंजुरीसाठी पाठवला आहे.जिल्ह्यात अवघे ६९.३९ चौरस किलो मीटरएवढे वनक्षेत्र आहे. जिल्ह्याच्या एकूण भौगोलिक क्षेत्राच्या मानाने वनांचे प्रमाण फक्त ०.८० टक्के एवढेच आहे. वनखात्याच्या ताब्यात असलेले वनक्षेत्र हे विखुरलेल्या स्वरुपात आहे. जिल्ह्यालगत असलेल्या कोल्हापूर वनविभागात चांदोली व कोयना अभयारण्ये आहेत. तसेच जिल्ह्याची भौगोलिक रचना पाहता सह्याद्री पर्वतरांगा, डोंगर, दऱ्या, नद्या आदींमध्ये जिल्हा विभागलेला आहे. येथील वनक्षेत्र आणि लगतची अभयारण्ये पाहता जिल्ह्यात वन्यप्राण्यांचा मोठ्या प्रमाणात वावर आहे.जिल्ह्यात जंगलतोडीचे प्रमाणही वाढले आहे. त्यामुळे वानर, माकड, बिबटे लोकवस्तीकडे वळू लागले आहेत. वानर आणि माकडांकडून होणारा हा उपद्रव अगदी सहन करण्यापलिकडे गेलेला आहे. या प्राण्यांमुळे दरवर्षी भाजीपाला, शेती आदींचे नुकसान होते. जिल्ह्यात वानर, माकडांच्या होणाऱ्या उपद्रवाबाबत जिल्हा परिषदेच्या स्थायी समिती, सर्वसाधारण सभांमध्ये याबाबत उदय बने व अन्य सदस्यांनी वेळोवेळी आवाज उठवून त्यांचा बंदोबस्त करण्याची मागणी अनेकदा केली होती.वनविभागाकडेही याबाबत वारंवार तक्रारी येत आहेत. त्यावर वनविभागाने एक भन्नाट आयडिया शोधली आहे म्हणे! वनविभागाने वानर व माकडे पकडण्यासाठी ७९ लाख २७ हजार ४६५ रुपयांचा प्रस्ताव तयार केला आहे. वानर व माकडे पकडून ती अभयारण्यात सोडण्याच्या खर्चाचा प्रस्ताव वनविभागाकडून शासनाकडे पाठविण्यात आला आहे.वानर व माकडे पकडण्यासाठी गावच्या सरपंचांच्या देखरेखीखाली ग्रामसेवकांच्यामार्फत लवकरात लवकर हा कार्यक्रम राबवण्यात येणार आहे. एवढ्या मोठ्या प्रमाणावर माकडांना पकडून त्यांचा बंदोबस्त त्यांना करता येईल का? असा सवाल मात्र गरीब शेतकऱ्यांकडून होत आहे. (शहर वार्ताहर)तालुका लागणारी रक्कममंडणगड ४,२८,१००खेड ३,१९,४१०दापोली ११,००,९००चिपळूण ५,०८,९५०गुहागर २,७७,३५०लांजा १५,०७,९२०राजापूर ९,६९,३०५संगमेश्वर १७,५१,५२०रत्नागिरी १०,६४,०१०एकूण ७९,२७,४६५जिल्ह्यात माकड, वानरांकडून शेतातील पिके, फळभाज्या, घरांचे नुकसान.जंगलतोडीमुळे माकडे लोकवस्तीकडे.सरपंचांच्या देखरेखीखाली कार्यक्रम राबविणार.जाणकार व प्रशिक्षित व्यक्तीकडून माकडे पकडणार.तब्बल ७९ लाख २७ हजारांचा खर्च अपेक्षित असल्याचा शासनाकडे प्रस्ताव.