शहरं
Join us  
Trending Stories
1
मुंबईकरांनो पाणी जपून वापरा! ३० मे पासून ५ टक्के, तर ५ जून पासून १० टक्के पाणी कपात
2
पुण्यात मोठी घडामोड! बड्या असामीला अटक; बिल्डर बाळाच्या ड्रायव्हरला दोन दिवस डांबलेले
3
Arvind Kejriwal : "भाजपामध्ये उत्तराधिकारीवरून भांडण सुरू, मोदींना अमित शाहांना..."; केजरीवालांचा मोठा दावा
4
"इलेक्शन मोडमधून सरकार बाहेर आले असेल..."; दुष्काळावरुन जयंत पाटलांचा सरकारवर निशाणा
5
एस जयशंकर २० मिनिटे रांगेत राहिले, मतदार यादीत नावच नव्हते; मग मतदान कसे केले? 
6
हाताला सलाईन, रुग्णालयाच्या बेडवर झोपलेला दिसला मुनव्वर फारूकी, चाहते चिंतेत
7
Hyundai IPO: दिग्गज कार कंपनी आणणार देशातील सर्वात मोठा IPO, लिस्टिंगचा आहे प्लान
8
१.८३ कोटी महिलांनी टाळले मतदान; आदिवासी मतदारसंघांमध्ये महिला मतांचा टक्का चांगला, शहरी भागात मात्र अनास्थाच 
9
विधानपरिषद निवडणूक: चारपैकी दोन ठिकाणी ठाकरेंनी उमेदवार दिले; पोतनिसांचे तिकीट कापले, विश्वासू शिलेदाराला पुन्हा संधी
10
Success Story : पैशांमुळे सुटलं शिक्षण, स्टेशनवर काढले दिवस; मेहनतीच्या जोरावर उभी केली ₹९२००० कोटींची कंपनी
11
श्रीमंतासाठी वेगळा न्याय, राग येणे साहजिकच; पोर्शे अपघात प्रकरणी प्रसिद्ध वकिलांची प्रतिक्रिया
12
Adani च्या 'या' शेअरची सेन्सेक्स इंडेक्समध्ये एन्ट्री; Wipro ची घेतली जागा, एक्सपर्ट म्हणाले, "खरेदी..."
13
पश्चिम बंगालमध्ये निवडणुकीदरम्यान मारहाण, टीएमसी कार्यकर्ता ठार; भाजपवर आरोप
14
कशा मिळतील ४०० पेक्षा जास्त जागा? मल्लिकार्जुन खरगे यांनी व्यक्त केले आश्चर्य; ‘इंडिया’ला बहुमत मिळण्याचा दावा
15
आता अकरावी, बारावीला इंग्रजीची सक्ती नाही; कोणत्याही दोन भारतीय भाषा निवडता येणार
16
Vicco चे अध्यक्ष यशवंत पेंढारकर यांचं निधन, वयाच्या ८५ व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास
17
आजचे राशीभविष्य २५ मे २०२४; सकाळी सौख्य व समाधान लाभेल, दुपारी...
18
पोर्शे अपघात प्रकरणा : होय...! पोलिसांकडूनच निष्काळजीपणा झाला; आयुक्तांची कबुली 
19
पुणे पोर्शे अपघात प्रकरण; कारवाईत दिरंगाई, दोन पीआय निलंबित
20
लैलाच्या सावत्र वडिलांना कोर्टाने ठोठावली फाशी; अभिनेत्रीसह सहा जणांची केली होती हत्या

मोदी सरकारच्या योजना चक्क रद्दीत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 02, 2018 1:40 AM

आगामी निवडणुका लक्षात घेता भाजपाकडून मागील वर्षीपासूनच तयारी सुरू झाली आहे. जनसंपर्क मोहिमेच्या माध्यमातून जनतेपर्यंत जास्तीत जास्त प्रमाणात केंद्र व राज्य शासनाच्या योजना पोहोचविण्यासाठी भर देण्यात येत असल्याचा दावादेखील नेत्यांकडून करण्यात येत आहे. मात्र प्रत्यक्षात दिव्याखालीच अंधार असून विविध मंत्रालयांची कामे व योजनांची माहिती देणारे साहित्य चक्क भाजप कार्यालयाच्या परिसरातच अक्षरश: रद्दीतील कचऱ्याप्रमाणे पडले असल्याचे चित्र आहे. पक्ष नेत्यांच्या येण्याजाण्याच्या मार्गावर हे साहित्य असतानादेखील त्याची कुणीही योग्य दखल घेतलेली नाही.

ठळक मुद्देभाजप कार्यालयातील वास्तव : पक्ष नेत्यांचीदेखील अनास्था

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : आगामी निवडणुका लक्षात घेता भाजपाकडून मागील वर्षीपासूनच तयारी सुरू झाली आहे. जनसंपर्क मोहिमेच्या माध्यमातून जनतेपर्यंत जास्तीत जास्त प्रमाणात केंद्र व राज्य शासनाच्या योजना पोहोचविण्यासाठी भर देण्यात येत असल्याचा दावादेखील नेत्यांकडून करण्यात येत आहे. मात्र प्रत्यक्षात दिव्याखालीच अंधार असून विविध मंत्रालयांची कामे व योजनांची माहिती देणारे साहित्य चक्क भाजप कार्यालयाच्या परिसरातच अक्षरश: रद्दीतील कचऱ्याप्रमाणे पडले असल्याचे चित्र आहे. पक्ष नेत्यांच्या येण्याजाण्याच्या मार्गावर हे साहित्य असतानादेखील त्याची कुणीही योग्य दखल घेतलेली नाही.आता केंद्र व राज्य शासनाच्या योजना जनतेपर्यंत पोहोचविण्यासाठी ‘संपर्कातून समर्थन’ ही मोहीम राबविण्यात येत आहेत. यादरम्यान नवीन मतदारांपर्यंत ही माहिती पोहचविण्यावर जास्त भर देण्यात येत आहे. मतदारांना योजना कळाव्यात यासाठी क्षेत्रीय व केंद्रीय पातळीवरून आलेल्या निर्देशांनुसार मोठ्या प्रमाणात प्रचार साहित्य छापण्यात आले आहे. यात लहान पुस्तिका, पत्रके इत्यादींचा समावेश आहे. जवळपास प्रत्येकच साहित्यावर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे छायाचित्रदेखील आहे.गणेशपेठ येथील भाजपा कार्यालयात हे साहित्य उपलब्ध आहे. परंतु यातील काही साहित्य चक्क कार्यालयाच्या इमारतीमधील तळमजल्यावर ‘लिफ्ट’जवळ भंगारासारखे ठेवण्यात आले आहे. यातील बरेचसे साहित्य पाण्यामुळे खराबदेखील झाले असून पत्रके विखुरलेली आहेत. यात अगदी मंत्रालयनिहाय पुस्तिकांचादेखील समावेश आहे. विशेष म्हणजे कार्यालयात जाण्यासाठी हाच मार्ग असून पक्षाचे पदाधिकारी, नेते यांच्यापैकी कुणीही यांना हटविण्यासाठी पुढाकार घेतलेला नाही. यासंदर्भात प्रतिक्रियेसाठी भाजपचे शहराध्यक्ष सुधाकर कोहळे यांच्याशी संपर्क होऊ शकला नाही.कार्यकर्त्यांनी व्यक्त केली नाराजीपक्षाच्या कार्यालयात कार्यकर्त्यांची नेहमीच उठबस असते. यातील काही सूज्ञ कार्यकर्त्यांनी पदाधिकाºयांच्या कानावर ही बाब टाकलीदेखील. मात्र त्याकडे दुर्लक्ष करण्यात आले. महाल परिसरातील अनेक खाद्यपदार्थांच्या ठेल्यावर, पानटपऱ्यांवरदेखील येथील पत्रकांचा वापर करण्यात येत असल्याची माहिती भाजपच्याच एका ज्येष्ठ कार्यकर्त्याने ‘लोकमत’ला दिली. आम्ही पक्षासाठी दिवसरात्र एक करतो आणि आमच्या सरकारची माहिती देणाऱ्या साहित्याची कदरदेखील पदाधिकाऱ्यांना नसल्याचे पाहून दु:ख होते, अशी भावना काही कार्यकर्त्यांनी व्यक्त केली.

टॅग्स :nagpurनागपूरBJPभाजपा