शहरं
Join us  
Trending Stories
1
दिल्ली महिला आयोगातून २२३ कर्मचाऱ्यांना तडकाफडकी काढले; उपराज्यपालांचे आदेश
2
माढा, सोलापूरात महाविकास आघाडीला धक्का; देवेंद्र फडणवीसांच्या खेळीनं भाजपाला फायदा
3
'अस्वस्थ झाला असतात तर ८४ वर्ष जगला नसता';नारायण राणेंचं शरद पवारांना प्रत्युत्तर
4
मतदानाच्या टक्केवारीत अचानक ११ दिवसांनी वाढ कशी?; संजय राऊतांनी व्यक्त केली शंका
5
कोरोना लसीकरण सर्टिफिकेटवरून PM नरेंद्र मोदींचा फोटो गायब? तांत्रिक बिघाड की आणखी काही कारण...
6
अखिलेश यादव यांचा समाजवाद की परिवारवाद? कुटुंबातील एवढे सदस्य लोकसभेच्या रिंगणात 
7
Fact Check : "मोदी जिंकले तर आरक्षण संपुष्टात येईल"; 'ती' क्लिप खोट्या दाव्यासह व्हायरल, जाणून घ्या 'सत्य'
8
'माझा भाऊ नाराज नाही', किरण सामंतांनी फोटो, बॅनर हटविल्यावरून उदय सामंतांची प्रतिक्रिया
9
विराट-अनुष्काचा मुलगा 'अकाय' कसा दिसतो? टीव्ही अभिनेता आमिर अली म्हणाला...
10
टेक कंपन्यांत मंदीचे वारे! एप्रिलमध्ये ७०००० कर्मचाऱ्यांना नोकरीवरून काढले; गुगल, टेस्ला ही यादीत
11
"मी भाग्यवान..."; निवडणूक प्रचारासाठी बहिणींकडून गहू, पैसे मिळाल्यावर शिवराज सिंह चौहान भावूक
12
बलात्कार पीडितेला मदत करणाऱ्या शिक्षकाचं हादरवणारं कृत्य; पोलिसांनी ठोकल्या बेड्या
13
दक्षिण भारतातील सर्वात तरुण उमेदवार! जाणून घ्या कोण आहेत मोहित रेड्डी? 
14
राष्ट्रीय पुरस्कार मिळालेल्या सिनेमामुळे प्रसाद झाला होता कर्जबाजारी; विकावं लागलं घर; म्हणाला, 'कर्जाचे हप्ते, बँकेचे फोन..';
15
अमित शाहांच्या बनावट व्हिडिओ प्रकरणी पोलीस ॲक्शन मोडवर, 3 बड्या नेत्यांना पाठवली नोटीस 
16
‘मोदी, भाजपा २७२ किंवा ३०० पार का म्हणत नाही? ४०० पार म्हणजे…’ संभाजीराजेंनी सांगितला संभाव्य धोका
17
Godrej Inside Story : कुलूप आणि चावीनं सुरुवात, मग इंग्रजांसाठी बनवली तिजोरी; गोदरेजचा यशाच्या शिखरापर्यंतचा रंजक प्रवास
18
हिट अँड रन: सुरेश रैनावर दु:खाचा डोंगर, कारने स्कूटीला धडक दिल्याने अपघात, मामेभावाचा मृत्यू   
19
Opening Bell: सेन्सेक्स-निफ्टीची तेजीसह सुरुवात; BPCL मध्ये तेजी, Kotal Bank घसरला
20
भेटायला गेले अन् पक्षप्रवेश करून घेतला; सकाळी शिंदे गटात, संध्याकाळी ठाकरे गटात

कॉंग्रेसच्या आश्वासनांची मोदी सरकारने पूर्तता केली : देवेंद्र फडणवीस

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 21, 2020 11:05 PM

कृषी क्षेत्रात बदल घडविण्याची क्षमता असलेल्या व संसदेत मंजूर झालेल्या विधेयकांना विरोध करणाऱ्या काँग्रेस पक्षावर विधानसभेतील विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी जोरदार टीकास्त्र सोडले आहे. विधेयकाचा विरोध करणाऱ्या काँग्रेसने याच सुधारणांचे आश्वासन दिले होते. प्रत्यक्षात केंद्रातील मोदी सरकारने काँग्रेसच्या या आश्वासनाची पूर्तता केली आहे. काँग्रेसचा शेतकरी हिताच्या मुखवट्याचा भंडाफोड करण्यात येईल, असे फडणवीस यांनी सांगितले.

ठळक मुद्देविधेयकांना विरोध करणाऱ्या काँग्रेसवर टीकास्त्र

लोकमत  न्यूज  नेटवर्कनागपूर : कृषी क्षेत्रात बदल घडविण्याची क्षमता असलेल्या व संसदेत मंजूर झालेल्या विधेयकांना विरोध करणाऱ्या काँग्रेस पक्षावर विधानसभेतील विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी जोरदार टीकास्त्र सोडले आहे. विधेयकाचा विरोध करणाऱ्या काँग्रेसने याच सुधारणांचे आश्वासन दिले होते. प्रत्यक्षात केंद्रातील मोदी सरकारने काँग्रेसच्या या आश्वासनाची पूर्तता केली आहे. काँग्रेसचा शेतकरी हिताच्या मुखवट्याचा भंडाफोड करण्यात येईल, असे फडणवीस यांनी सांगितले.नागपुरात सोमवारी आयोजित पत्रपरिषदेदरम्यान ते बोलत होते. या कृषी विधेयकांमुळे शेतकऱ्यांना कुठेही बाजार मिळू शकतो. आतापर्यंत शेतकऱ्यांना आपले पीक विकण्यासाठी कृषी उत्पन्न बाजार समितीला ८ टक्क्यांपर्यंत सेस द्यावा लागत होता. मात्र आता असे होणार नाही. आपले पीक कुठे व कितीमध्ये विकायचे याचा निर्णय शेतकरी घेऊ शकतील. त्यांना दलालांपासून मुक्ती मिळेल, असे फडणवीस यांनी स्पष्ट केले. महाराष्ट्रात तत्कालीन आघाडी सरकारने २००६ मध्ये कॉन्टेक्ट फार्मिंगला परवानगी दिली होते. त्याचे चांगले निकाल समोर आले आहेत. काँग्रेसनेच खासगी कृषी बाजार समितीला परवानगी दिली होती. आज या बाजारांमध्ये शेतकऱ्यांना चांगले भाव मिळत आहेत. २०१९ च्या लोकसभा निवडणुकांसाठी जारी केलेल्या घोषणापत्रात काँग्रेसने कृषी उत्पादनांच्या आंतरराज्यीय विक्रीला परवानगी देणे, शेतकऱ्यांना कुठेही विक्रीची परवानगी देणे यांचे आश्वसान दिले होते. संसदेत संमत झालेल्या विधेयकात याच आश्वासनांना मंजुरी देण्यात आली आहे. आता केवळ राजकीय कारणांमुळे काँग्रेस व त्यांचे मित्र पक्ष विरोध करत आहेत, असे प्रतिपादन फडणवीस यांनी केले. काही लोकांचा फायद्यासाठी या विधेयकाला विरोध आहे, असे म्हणत देवेंद्र फडणवीस यांनी शिवसेना व काँग्रेस नेते खा. राहुल गांधी यांच्यावर टीका केली.शेतकऱ्यांच्या आंदोलनात काँग्रेसचे झेंडे९० टक्के शेतकरी हे कृषी विधेयकाच्या समर्थनार्थ आहेत. उर्वरित १० टक्के शेतकऱ्यांची दिशाभूल करण्यात येत आहे. भाजप यासंदर्भात सत्य समोर आणत आहे. पंजाबमध्ये विधेयकाला विरोध होत असताना काँग्रेसचे झेंडे दिसून आले. भाजपा मतांसाठी निर्णय करत नाही. बिहारमध्ये याचा प्रभाव राहणार नाही कारण विधेयकातील तरतुदी तेथे अगोदरपासूनच लागू आहेत, असे देवेंद्र फडणवीस यांनी म्हटले.

टॅग्स :Devendra Fadnavisदेवेंद्र फडणवीसFarmerशेतकरीcongressकाँग्रेसMediaमाध्यमे