शहरं
Join us  
Trending Stories
1
कॅचच्या निर्णयावरून भारतीय खेळाडूंचा अंपायरशी वाद; पाकिस्तानकडून वैभव सूर्यवंशीच्या संघाचा पराभव
2
दिल्ली ब्लास्ट : रोहतकची डॉक्टर प्रियंका शर्मा अनंतनागमधून ताब्यात, कुटुंबीयांनी काय सांगितंल?
3
IND A vs PAK A : भारत-पाक मॅचमध्ये Relay Catch वरुन वाद; नेमकं काय घडलं? चिटिंग झाली की...
4
ब्रेकिंग! मुंबई, ठाणे आणि नवी मुंबईचा गॅस पुरवठा खंडित; पाईपलाईनचे मोठे नुकसान, घरगुती गॅस बंद, CNG स्टेशनवर तुटवडा
5
सैन्यभरतीसाठी गेलेल्या तरुणांच्या मोटरसायकलला उसाच्या ट्रकची धडक; दोघांचाही जागीच मृत्यू
6
भारत-पाकिस्तान हायव्होल्टेज मॅच! वैभव सुर्यवंशीचा संघ ढेपाळला; एका मागोमाग एक १० विकेट, झालेत इतकेच रन्स...
7
मोठी बातमी! लाल किल्ला स्फोटाची जबाबदारी टीआरएफने स्वीकारली; 'पहलगाम' हल्ल्याशी जोडले स्फोटाचे धागेदोरे
8
दिल्ली ब्लास्ट प्रकरणात NIA ची मोठी कारवाई, उमरच्या जवळच्या सहकाऱ्याला अटक; याच्याच नावावर होती i-20 कार
9
'विशेष मतदार यादी सुधारणा' प्रक्रियेच्या कामाच्या ताणामुळे बीएलओ अधिकाऱ्याने आयुष्य संपविले; कर्मचारी वर्गात संताप
10
नितीश कुमार उद्या राजीनामा देणार! 'मिशन कॅबिनेट'ची तयारी पूर्ण; मुख्यमंत्री कोणाचा होणार यावर मात्र...
11
तेजस्वी यांनी पराभवासाठी बहीण रोहिणीला ठरवलं जबाबदार; फेकली होती चप्पल? अशी आहे संपूर्ण इनसाइड स्टोरी!
12
पाकिस्तानच्या गोळीबार गमावला पाय; आता 'गौरी'ला मिळाले नवीन आयुष्य
13
दिल्ली ब्लास्टचे बांग्लादेश कनेक्शन उघड; मुर्शिदाबाद मार्गे भारतात आणली स्फोटके
14
युरोपने केलेली 'ही' मोठी चूक अमेरिकेला ३० वर्षांत गरीब करेल; जे पी मॉर्गनचा इशारा
15
तेजस्वी यादवांच्या अन्य तिन्ही बहिणींनी पाटणाचे घर सोडले; मोठ्या बहिणीनंतर...
16
मी दिलेला '२५ जागांचा शाप' खरा ठरला!; तेजस्वी यादवांनी तिकीट नाकारले तेव्हा रडणाऱ्या नेत्याचा दावा 
17
तेजप्रताप यादवांचा राज्यातील NDA सरकारला पाठिंबा; रोहिणी आचार्य यांना मोठी जबाबदारी देणार
18
रशिया आणि युक्रेनमध्ये मोठा करार होणार, राष्ट्राध्यक्ष झेलेन्स्कींनी केली घोषणा; म्हणाले...
19
“जो जीता वही सिकंदर, पण सिकंदर बनायचे राज समजू शकले नाही”; बिहार निकालावर उद्धव ठाकरे बोलले
20
"सुन लो जयचंदों...! माझ्या वडिलांनी एक इशारा दिला तर...!", रोहिणी आचार्य वादावरून तेजप्रताप भडकले
Daily Top 2Weekly Top 5

कोट्यवधींचे धान्य उघड्यावर

By admin | Updated: April 12, 2015 02:32 IST

कळमना मार्केट परिसरात कोट्यवधी रुपयांचा शेतमाल उघड्यावर पडला आहे. दोन दिवस झालेल्या पावसामुळे शेतकऱ्यांच्या २० टक्के मालाचे नुकसान झाले आहे.

नागपूर : कळमना मार्केट परिसरात कोट्यवधी रुपयांचा शेतमाल उघड्यावर पडला आहे. दोन दिवस झालेल्या पावसामुळे शेतकऱ्यांच्या २० टक्के मालाचे नुकसान झाले आहे. अचानक बदलत असलेल्या वातावरणामुळे शेतकऱ्यांमध्ये नुकसानीची भीती आहे. कृषी उत्पन्न बाजार समितीने येणाऱ्या शेतमालाच्या सुरक्षेसाठी उपाययोजना करावी, अशी शेतकऱ्यांची मागणी आहे. मात्र कृषी उत्पन्न बाजार समितीचे अधिकारी, सभापती, संचालक मंडळ याकडे दुर्लक्ष करीत आहे. कळमना मार्केटमध्ये गहू, चणा, तूर, धानाची आवक मोठ्या प्रमाणात झाली आहे. गोदाम भरली असल्याने, अनेक शेतकऱ्यांनी आपला माल उघड्यावरच ठेवला आहे. गुरुवारी अचानक आलेल्या वादळी पावसामुळे मोठ्या प्रमाणात शेतकऱ्यांच्या धान्याचे नुकसान झाले. अनेक शेतकऱ्यांजवळ स्वत:च्या ताडपत्र्या नसल्याने, त्यांना तर चांगलाच फटका सहन करावा लागला. ज्यांनी ताडपत्र्या झाकल्या, त्यांचेही धान्याचे पोते खालून ओले झाले. धान्य ओले झाल्यामुळे शुक्रवारी परत शेतकऱ्यांना माल काढून वाळवावा लागला. माल स्वच्छ करून ठेवण्यासाठी पुन्हा हमाली द्यावी लागली. पाण्यामुळे चणा डागी लागला होता. गव्हू काळा पडला होता. नुकसान झालेले बहुतांश शेतकरी हे नागपूर व जवळच्या जिल्ह्यातील आहे. तीन ते चार दिवसापासून ते आपला शेतमाल विक्रीसाठी कळमन्यात घेऊन आले आहे. दरवर्षी अवकाळी पावसामुळे मोठ्या प्रमाणात शेतमालाचे नुकसान होते. कृषी उत्पन्न बाजार समितीच्या माध्यमातून कुठलीही उपाययोजना करण्यात येत नाही. कृषी उत्पन्न बाजार समितीने शेतमालाच्या सुरक्षेसाठी सोय उपलब्ध करून द्यावी, अशी मागणी शेतकऱ्यांनी केली आहे. (प्रतिनिधी)