शहरं
Join us  
Trending Stories
1
Eknath Shinde: काँग्रेसने पाकिस्तानला उत्तर देण्याची कधीच हिंमत दाखवली नाही, शिंदेंची टीका
2
मुस्लीम विद्यार्थी चारच, पण 159 जणांना नमाज पठण करण्यास भाग पाडलं; प्रोफेसरला अटक!
3
युद्धात पाकिस्तानच्या बाजूनं उभं राहणार, भारताचे तुकडे होतील; कोण आहे हा दिल्लीचा शत्रू? मुनीर सैन्यासोबत लढण्याची केली घोषणा
4
पुण्यात आल्यावर मुंबईच्या तरुणीला पटवलं, शरीरसंबंधही ठेवले; नंतर तिच्याच मैत्रिणीसोबत...
5
भयंकर! नवरा-नवरीसोबत आक्रित घडलं, कारला भीषण आग; ७ जणांनी उड्या मारुन वाचवला जीव
6
वैभव सूर्यवंशीने ठोकलं विक्रमी शतक, पण आता लागू शकते क्रिकेटबंदी; खेळाडूच्या आरोपाने चर्चांना उधाण
7
छाया कदम यांनी 'ती' गोष्ट अभिमानाने सांगितली अन् अडचणी वाढल्या; अभिनेत्रीची होणार चौकशी
8
Traffic News: पुणे-मुंबई एक्सप्रेसवेवर मोठी वाहतूक कोंडी, ५ किलोमीटरपर्यंत वाहनांच्या रांगा
9
अरे व्वा! रुग्णालयात अनोखा विवाहसोहळा, आजारी वधूला उचलून घेऊन नवरदेवाने घेतल्या सप्तपदी
10
'वेव्हज हे फक्त नाव नाही तर...'; PM मोदींनी WAVES परिषदेमध्ये मनोरंजन क्षेत्रासाठी केली मोठी घोषणा
11
Nagpur: मित्राचा वाढदिवस ठरला आयुष्यातील शेवटचा दिवस, स्विमिंग पूलमध्ये बुडून तरुणाचा मृत्यू
12
“राज ठाकरे-उद्धव ठाकरे एकत्र येत असतील तर...”; मनसे-ठाकरे गट युतीवर काँग्रेस नेते थेट बोलले
13
"सैनिकांचे मनोबल तोडू नका"; पहलगाम हल्ल्याची चौकशी करण्याची मागणी करणाऱ्यांना कोर्टाने फटकारले
14
एआयमुळे २०००० नोकऱ्या मिळणार, Cognizant २०२५ मध्ये फ्रेशर्सची भरती करणार
15
“उद्धव-राज ठाकरे दोघेही भावासमान, महाराष्ट्र हितासाठी मनाचा मोठेपणा दाखवत...”: सुप्रिया सुळे
16
Video - अरे बापरे! टँकर पलटताच तेल लुटण्यासाठी बादल्या, कॅन घेऊन लोकांची झुंबड
17
नाशिक: पोलिसांच्या हाताला झटका देऊन पळालेला क्रिश सापडला, कुठे बसला होता लपून?
18
कोण आहे 'तो' चोर? ज्याचं सर्वच करताहेत भरभरून कौतुक; कोट्यवधी रुपये चोरले अन्...
19
३५ वर्ष हेच सुरू, काश्मिरींना खूप त्रास सहन करावा लागतो; पहलगामवरून फारूक अब्दुल्ला थेट बोलले
20
कर्मचाऱ्याचे पीएफ ट्रान्सफर होणार कंपनीच्या मंजुरीविना, नोकरी बदलताना प्रक्रिया होणार सुलभ

कोट्यवधींचे धान्य उघड्यावर

By admin | Updated: April 12, 2015 02:32 IST

कळमना मार्केट परिसरात कोट्यवधी रुपयांचा शेतमाल उघड्यावर पडला आहे. दोन दिवस झालेल्या पावसामुळे शेतकऱ्यांच्या २० टक्के मालाचे नुकसान झाले आहे.

नागपूर : कळमना मार्केट परिसरात कोट्यवधी रुपयांचा शेतमाल उघड्यावर पडला आहे. दोन दिवस झालेल्या पावसामुळे शेतकऱ्यांच्या २० टक्के मालाचे नुकसान झाले आहे. अचानक बदलत असलेल्या वातावरणामुळे शेतकऱ्यांमध्ये नुकसानीची भीती आहे. कृषी उत्पन्न बाजार समितीने येणाऱ्या शेतमालाच्या सुरक्षेसाठी उपाययोजना करावी, अशी शेतकऱ्यांची मागणी आहे. मात्र कृषी उत्पन्न बाजार समितीचे अधिकारी, सभापती, संचालक मंडळ याकडे दुर्लक्ष करीत आहे. कळमना मार्केटमध्ये गहू, चणा, तूर, धानाची आवक मोठ्या प्रमाणात झाली आहे. गोदाम भरली असल्याने, अनेक शेतकऱ्यांनी आपला माल उघड्यावरच ठेवला आहे. गुरुवारी अचानक आलेल्या वादळी पावसामुळे मोठ्या प्रमाणात शेतकऱ्यांच्या धान्याचे नुकसान झाले. अनेक शेतकऱ्यांजवळ स्वत:च्या ताडपत्र्या नसल्याने, त्यांना तर चांगलाच फटका सहन करावा लागला. ज्यांनी ताडपत्र्या झाकल्या, त्यांचेही धान्याचे पोते खालून ओले झाले. धान्य ओले झाल्यामुळे शुक्रवारी परत शेतकऱ्यांना माल काढून वाळवावा लागला. माल स्वच्छ करून ठेवण्यासाठी पुन्हा हमाली द्यावी लागली. पाण्यामुळे चणा डागी लागला होता. गव्हू काळा पडला होता. नुकसान झालेले बहुतांश शेतकरी हे नागपूर व जवळच्या जिल्ह्यातील आहे. तीन ते चार दिवसापासून ते आपला शेतमाल विक्रीसाठी कळमन्यात घेऊन आले आहे. दरवर्षी अवकाळी पावसामुळे मोठ्या प्रमाणात शेतमालाचे नुकसान होते. कृषी उत्पन्न बाजार समितीच्या माध्यमातून कुठलीही उपाययोजना करण्यात येत नाही. कृषी उत्पन्न बाजार समितीने शेतमालाच्या सुरक्षेसाठी सोय उपलब्ध करून द्यावी, अशी मागणी शेतकऱ्यांनी केली आहे. (प्रतिनिधी)