शहरं
Join us  
Trending Stories
1
भर सभागृहात निशिकांत दुबे आणि वर्षा गायकवाड यांच्यात तू- तू मै मै!
2
भीक मागण्यासाठी पुण्यातून चिमुरडीचे अपहरण; तुळजापुरातील ५ जणांची टोळी गजाआड
3
नागपुरात चोरट्यांचा आतंक; दिवसाढवळ्या कारची काच फोडून २५ लाख पळवले!
4
२२ एप्रिलचा बदला २२ मिनिटांत घेतला, भारतीयांना अपेक्षित कारवाई केली- पंतप्रधान नरेंद्र मोदी
5
ऑपरेशन सिंदूरदरम्यान भारताने PoK परत का घेतला नाही? काँग्रेसच्या प्रश्नावर मोदींनी दिलं असं उत्तर  
6
१० मे रोजी युद्धविरामाचा निर्णय कुणाच्या सांगण्यावरून झाला? अखेर पंतप्रधान नरेंद्र मोदीचं लोकसभेत मोठं विधान
7
"बबिताजींसोबत माझं शूटिंग असतं तेव्हा..."; 'तारक मेहता' फेम जेठालालने सांगितली 'मन की बात'
8
मुंबईत संतापजनक घटना! भावासोबत खेळत असलेल्या १० वर्षांच्या मुलीवर गार्डनमध्ये नेऊन अत्याचार
9
मोबाईल शॉपमध्ये गेली मुलगी, दुकानदाराने आत खेचलं, शटर लावून टाकलं अन् केलं 'दुष्कृत्य'
10
"तुम्ही तर ऑपरेशन सिंदूरच्या रात्रीच युद्धविराम केला, लढण्याची…’’, राहुल गांधींची टीका   
11
Pune Rave Party: 'त्या' रुममध्ये पुन्हा होणार होती रेव्ह पार्टी; तपासातून पोलिसांच्या हाती नवी माहिती
12
"इंदिरा गांधींसारखी हिंमत असेल, तर मोदींनी इथे सांगावं की, डोनाल्ड ट्रम्प खोटारडे आहेत", राहुल गांधींचा हल्लाबोल
13
Nashik Kumbh Mela: शिवीगाळ, हाणामारी अन् जिवे मारण्याच्या धमक्या; पुरोहितांचे दोन गट आमने-सामने
14
कमी किंमतीत टॉप-क्लास फीचर्स; रेडमीच्या बजेट फोनचा बाजारात धमाका!
15
"माफ करणार नाही, रक्ताचा बदला रक्ताने..."; निमिषा प्रियाची फाशी टाळणं आता अशक्य? समोर आलं पत्र
16
Mumbai Water Cut: मुंबईकरांनो पाणी जपून वापरा! गुरुवारी 'या' भागांत १४ तासांसाठी पाणीपुरवठा राहणार बंद
17
Operation Mahadev : 'ऑपरेशन महादेव' नंतर पहलगाममधील दहशतवाद्यांना कसे ओळखले? धक्कादायक माहिती आली समोर
18
२६/११ चा उल्लेख करत प्रियंका गांधींचे अमित शाहांवर टीकास्त्र; म्हणाल्या, तेव्हा मुख्यमंत्री आणि गृहमंत्र्यांनी...
19
भाजपाची नवी खेळी! महापालिका निवडणुकीआधी काँग्रेसच्या माजी मंत्र्याचा झाला पक्षप्रवेश
20
IND vs ENG : फिल्डिंगसाठी राबलेला प्लेइंग इलेव्हनमध्ये खेळणार की, नव्या चेहऱ्याला 'लॉटरी' लागणार?

‘मोडी लिपी’चा जन्मदाता दुर्लक्षित

By admin | Updated: July 26, 2015 03:17 IST

वंशावळीचा ऐतिहासिक दस्तऐवज लिहून ठेवणारा आणि ज्यात हा दस्तऐवज लिपीबद्ध करण्यात आला आहे, ...

नागपूर : वंशावळीचा ऐतिहासिक दस्तऐवज लिहून ठेवणारा आणि ज्यात हा दस्तऐवज लिपीबद्ध करण्यात आला आहे, त्या ‘मोडी लिपी’चा जनक असलेला भाट समाज आज आपल्या अस्तित्वाची लढाई लढतो आहे. शेकडो वर्षांपासून भटकंती करूनच आपला उदरनिर्वाह करणाऱ्या भाट समाजाची नोंद शासनदरबारी भटक्या विमुक्ताच्या वर्गात नसल्याने अनेक सोयीसुविधांपासून वंचित आहे. परिणामी गरिबीत खितपत पडलेल्या समाजाचे अस्तित्वच धोक्यात आले आहे. जुन्या काळात अनेक लोकं आपली वंशावळी लिहून ठेवायचे. वंशावळ लिहून ठेवण्याचे काम भाट समाज करायचे. ज्या लिपीमध्ये ही वंशावळी लिहून ठेवली जायची त्याला मोरी लिपी किंवा प्रचलित भाषेत मोडी लिपी असे म्हटले जाते. ही लिपी केवळ भाटांनाच लिहिता वाचता येत असल्याने त्याला भाटाची लिपी सुद्धा म्हटले जाते. या लिपीचा शोध कधी लागला याचा फारसा उल्लेख नसला तरी ही लिपी भाट समाजात पारंपरिक पद्धतीने आली. शेकडो वर्षांपासून ही परंपरा सुरू होती. त्यामुळे या लिपीचा जन्मदाता हा भाट समाज असल्याचे मानले जाते. परंतु आधुनिकतेच्या काळात ही लिपी नामशेष व कालबाह्य झाली आहे. त्यामुळे भाट समाजाचा उदरनिर्वाह कधीचाच हिरावला गेला. आज या समाजाचे लोक तांड्यावर राहतात. मिळेल ते काम करतात. गावोगावी फिरून लोकांची वंशावळी लिहिण्याचे काम हा समाज करीत होता. परंतु शासन दरबारी भाट समाजाची नोंद ही ओबीसी प्रवर्गात करण्यात आली आहे. पारंपरिक पद्धतीने आम्ही भटके विमुक्त असल्याने आमची नोंद भटके विमुक्त वर्गात करण्यात यावी, यासाठी गेल्या अनेक वर्षांपासून हा समाज लढा देत आहे. हा लढा केवळ शासनाच्या योयी सवलती मिळण्यासाठी नसून आपल्या समाजाच्या अस्तित्वासाठी आहे. आजच्या घडीला संपूर्ण महाराष्ट्रात भाट समाजाची लोकसंख्या केवळ दीड लाख आहे. काही बोटावर मोजण्यासारखी मंडळी सोडली तर हा समाज आजही डोंगरदऱ्यात राहतो. उदरनिर्वाहासाठी सातत्याने भटकंती करीत आहेत. महाराष्ट्र शासनाने नुकतीच शाळाबाह्य विद्यार्थ्यांची नोंद केली आहे. त्यात सर्वाधिक संख्या भाट समाजातील मुलांची होती. अशा परिस्थितीत गरिबीत खितपत पडलेल्या या समाजाला शासनाच्या मदतीची गरज आहे. (प्रतिनिधी)