शहरं
Join us  
Trending Stories
1
भारताविरुद्ध पाकिस्तानला दिली साथ, आता 'या' देशावर भीतीचं सावट; इस्रायली हल्ल्याची सतावतेय भीती
2
धुळ्यात विधानसभेला 45 हजार बोगस मतदारांचे मतदान; अनिल गोटेंकडे यादीच, गंभीर आरोप
3
डिझेलवाले सुटले...? नाही, पेट्रोलसारखेच इथेनॉल मिसळायचे होते, पण...; नितीन गडकरींच्या मनात चाललेय तरी काय...
4
Gen-Z आंदोलनामुळे नेपाळ आर्थिक संकटात; अब्जो रुपयांचे नुकसान, १० हजार लोकांच्या नोकऱ्या गेल्या
5
वरुण धवन इज बॅक! 'सनी संस्कारी की तुलसी कुमारी'चा ट्रेलर, प्रेमात ट्विस्ट अन् कॉमेडीचा तडका
6
जगातील ५० इस्लामिक देश एकटवणार; पहिल्यांदाच 'असं' काही घडणार, अमेरिकेची चिंता वाढली
7
भारताला लाल डोळे दाखवणाऱ्या चीनची अर्थव्यवस्था कोलमडली? लोकं पैसे खर्च करायलाच तयार नाही
8
Viral Video : 'ओ काका ही ट्रेन किती अ‍ॅवरेज देते?'; तरुणाच्या प्रश्नावर लोकोपायलटने दिले भन्नाट उत्तर! म्हणाले... 
9
Video: "इरफान... प्रामाणिक राहा..."; IND vs PAK सामन्यानंतर गौतम गंभीर कॅमेऱ्यासमोर असं का बोलला?
10
गर्भवतीची प्रसुती होत असताना प्रसुतीगृहातच एकमेकींशी भिडल्या इंटर्न डॉक्टर, त्यानंतर...  
11
सुपर मॉम! २६ दिवसांच्या लेकीला कुशीत घेऊन दिला इंटरव्ह्यू; आता झाली DSP, पतीने दिली साथ
12
अनंत अंबानी यांच्या वनताराला क्लीनचिट; जाणून घ्या काय आहे संपूर्ण प्रकरण?
13
ओप्पोचा मोठा धमाका! जबरदस्त फीचर्ससह ३ फोन केले लॉन्च; जाणून घ्या किंमत
14
हवाई दलात इंजिनिअर लोकेश बहिणीच्या घरी आला आणि अचानक २४व्या मजल्यावरून मारली उडी
15
सत्तापालटाच्या अवघ्या ३ दिवसांत नेपाळच्या Gen Z आंदोलकांमध्ये असंतोष; सुशीला कार्कींच्या घराबाहेर निदर्शने!
16
पाकिस्तानला धूळ चारल्यानंतर सूर्यकुमार यादवचं पत्नीसोबत जंगी सेलिब्रेशन, पाहा खास फोटो
17
Astro Tips: घर, प्लॉट विक्रीसाठी सगळे उपाय करून पाहिले? तरी निराशा? करा 'हा' प्रभावी तोडगा!
18
मुंबई महापालिका निवडणुकीपूर्वी शिंदेसेनेला धक्का? १५ माजी नगरसेवक नाराजीची चर्चा
19
Acharya Devvrat: आचार्य देवव्रत यांनी महाराष्ट्राचे राज्यपाल म्हणून घेतली शपथ 
20
घाव भर गया है! परेश रावल यांचं 'हेरा फेरी ३'वर भाष्य, दिग्दर्शकासोबतचं नातं बिघडलं? म्हणाले...

‘मोडी लिपी’चा जन्मदाता दुर्लक्षित

By admin | Updated: July 26, 2015 03:17 IST

वंशावळीचा ऐतिहासिक दस्तऐवज लिहून ठेवणारा आणि ज्यात हा दस्तऐवज लिपीबद्ध करण्यात आला आहे, ...

नागपूर : वंशावळीचा ऐतिहासिक दस्तऐवज लिहून ठेवणारा आणि ज्यात हा दस्तऐवज लिपीबद्ध करण्यात आला आहे, त्या ‘मोडी लिपी’चा जनक असलेला भाट समाज आज आपल्या अस्तित्वाची लढाई लढतो आहे. शेकडो वर्षांपासून भटकंती करूनच आपला उदरनिर्वाह करणाऱ्या भाट समाजाची नोंद शासनदरबारी भटक्या विमुक्ताच्या वर्गात नसल्याने अनेक सोयीसुविधांपासून वंचित आहे. परिणामी गरिबीत खितपत पडलेल्या समाजाचे अस्तित्वच धोक्यात आले आहे. जुन्या काळात अनेक लोकं आपली वंशावळी लिहून ठेवायचे. वंशावळ लिहून ठेवण्याचे काम भाट समाज करायचे. ज्या लिपीमध्ये ही वंशावळी लिहून ठेवली जायची त्याला मोरी लिपी किंवा प्रचलित भाषेत मोडी लिपी असे म्हटले जाते. ही लिपी केवळ भाटांनाच लिहिता वाचता येत असल्याने त्याला भाटाची लिपी सुद्धा म्हटले जाते. या लिपीचा शोध कधी लागला याचा फारसा उल्लेख नसला तरी ही लिपी भाट समाजात पारंपरिक पद्धतीने आली. शेकडो वर्षांपासून ही परंपरा सुरू होती. त्यामुळे या लिपीचा जन्मदाता हा भाट समाज असल्याचे मानले जाते. परंतु आधुनिकतेच्या काळात ही लिपी नामशेष व कालबाह्य झाली आहे. त्यामुळे भाट समाजाचा उदरनिर्वाह कधीचाच हिरावला गेला. आज या समाजाचे लोक तांड्यावर राहतात. मिळेल ते काम करतात. गावोगावी फिरून लोकांची वंशावळी लिहिण्याचे काम हा समाज करीत होता. परंतु शासन दरबारी भाट समाजाची नोंद ही ओबीसी प्रवर्गात करण्यात आली आहे. पारंपरिक पद्धतीने आम्ही भटके विमुक्त असल्याने आमची नोंद भटके विमुक्त वर्गात करण्यात यावी, यासाठी गेल्या अनेक वर्षांपासून हा समाज लढा देत आहे. हा लढा केवळ शासनाच्या योयी सवलती मिळण्यासाठी नसून आपल्या समाजाच्या अस्तित्वासाठी आहे. आजच्या घडीला संपूर्ण महाराष्ट्रात भाट समाजाची लोकसंख्या केवळ दीड लाख आहे. काही बोटावर मोजण्यासारखी मंडळी सोडली तर हा समाज आजही डोंगरदऱ्यात राहतो. उदरनिर्वाहासाठी सातत्याने भटकंती करीत आहेत. महाराष्ट्र शासनाने नुकतीच शाळाबाह्य विद्यार्थ्यांची नोंद केली आहे. त्यात सर्वाधिक संख्या भाट समाजातील मुलांची होती. अशा परिस्थितीत गरिबीत खितपत पडलेल्या या समाजाला शासनाच्या मदतीची गरज आहे. (प्रतिनिधी)