शहरं
Join us  
Trending Stories
1
काँग्रेसच्या झेंड्याला ठाकरेंच्या मताची काठी; तब्बल दहा वर्षानंतर लोकसभेसाठी काँग्रेसला मुंबईत खाते उघडण्याची संधी
2
पैशांच्या अवैध वाहतुकीवर तिसरा डोळा; निवडणूक आयोगाचे मुंबई आणि परिसरातील रेल्वे स्थानकांवर विशेष लक्ष
3
पिकअप व्हॅन आणि कारचा भीषण अपघात, १० जणांचा मृत्यू, २३ जण जखमी   
4
भर समुद्रात पाकच्या बोटीवरून ६०० कोटींचे ड्रग्ज जप्त; भारतीय तटरक्षक दल, एटीएस व एनसीबीची मोठी कारवाई
5
निवडणुकीत जातीपातीच्या जाणिवा टोकदार ; एकाच जातीचे उमेदवार; तिथे पाहतात पोटजात
6
ठाण्यातील ‘त्या’ सव्वातीन लाख मतांचे मालक कोण? अजित की शरद पवार?
7
देवेगौडांचा नातू ‘सेक्स स्कँडल’मध्ये; विदेशात पलायन? एसआयटी चौकशी
8
साताऱ्यातील प्रचारात मुंबई बाजार समितीतील भ्रष्टाचाराचा मुद्दा ‘हॉट’ ; उदयनराजे भोसले आणि शशिकांत शिंदे यांच्यात थेट लढत
9
एक-एक वर्षासाठी पंतप्रधानपदाचे वाटप ; ‘इंडिया’चे हेच समीकरण : पंतप्रधान मोदी
10
भाजप अन् बीजेडीची ओडिशात मिलीभगत; निवडक लोकांसाठी काम : राहुल गांधी
11
राष्ट्रीय स्वयंसेवक संघ नेहमीच आरक्षणाचा समर्थक राहिला : मोहन भागवत
12
1 मे ध्वजारोहण : उमेदवार मंत्री वगळले, पण नातलग ?
13
मोटारीला चपलांचा हार आणि आरोप-प्रत्यारोपांचे प्रहार; जरांगे पाटलांनी केला आरोप
14
यापूर्वीही आरक्षणाला संघाचा विरोध : राहुल गांधी
15
तरुणाई का संतापली? निराश तरुण मतदानाकडेच पाठ फिरवताना दिसताहेत
16
निवडणूक आहे, जिभेला लगाम घाला !
17
दुबईत साकारतेय जगातील सर्वात मोठे विमानतळ; प्रथमच नवीन विमान वाहतूक तंत्रज्ञानाचा होणार वापर
18
त्यांच्या कारकिर्दीत ‘ते’ म्हणतील ते सगळं केलं, आता भावनिक व्हायच नाही; अजित पवारांचा वार
19
IPL 2024 GT vs RCB: RCB चा 'विराट' शो! विल जॅक्सचे ४१ चेंडूत शतक; ४ ओव्हर राखून विजय
20
बारामती, शिरुरमध्ये पोलिसी बळाचा वापर, मतदारांना धमक्या; संजय राऊतांचा गंभीर आरोप

पंतप्रधानांपर्यंत जाण्याची मराठी माणसाची लायकीच नाही

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 04, 2018 8:02 PM

अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाध्यक्षपद भूषविणारे डॉ.अक्षयकुमार काळे यांनी चक्क मराठी माणसाच्या कुवतीवरच प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यापर्यंत जाण्याची मराठी लोकांची लायकीच नाही, असे वादग्रस्त विधान त्यांनी नागपुरात केले.

ठळक मुद्देसाहित्य संमेलनाध्यक्ष अक्षयकुमार काळेंचे वादग्रस्त विधानमराठी भाषेला अभिजात दर्जा मिळण्यासंदर्भात निवेदन पाठविणार

आॅनलाईन लोकमतनागपूर : अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाध्यक्षपद भूषविणारे डॉ.अक्षयकुमार काळे यांनी चक्क मराठी माणसाच्या कुवतीवरच प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यापर्यंत जाण्याची मराठी लोकांची लायकीच नाही, असे वादग्रस्त विधान त्यांनी नागपुरात केले. राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाच्या मराठी पदव्युत्तर विभागाच्या हीरक महोत्सवानिमित्त ‘मराठी भाषा संरक्षण व संवर्धन’ या विषयावर चर्चासत्राचे आयोजन करण्यात आले आहे. यासंदर्भात आयोजित पत्रकार परिषदेत त्यांनी हे वक्तव्य केले.६ व ७ जानेवारी रोजी होणाऱ्या  या चर्चासत्रात राज्यभरातून साहित्यिक व मराठी अभ्यासक उपस्थित होणार आहेत. या चर्चासत्राच्या अखेरीस उपस्थित अभ्यासकांच्यावतीने केंद्राकडून मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा मिळावा यासाठी निवेदन करण्यात येणार आहे. हे निवेदन पंतप्रधान नरेंद्र मोदी व मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना पाठविण्यात येईल, असे डॉ.काळे यांनी सांगितले. देवेंद्र फडणवीस यांना नागपुरात प्रत्यक्ष भेटून निवेदन देण्यात येईल. मात्र पंतप्रधानांना थेट निवेदन देणे शक्य होणार नाही. कारण मराठी लोकांची पंतप्रधानांपर्यंत जाण्याची लायकीच नाही, असे प्रतिपादन त्यांनी केले. विशेष म्हणजे पंतप्रधानांची भेट घेण्यासाठी चर्चासत्राचे आयोजक मराठी विभाग तसेच मराठी विभाग माजी विद्यार्थी संघटनेतर्फे कुठलाही पुढाकार घेण्यात आलेला नाही. अशा स्थितीत डॉ.काळे यांचे वक्तव्य आश्चर्यचकित करणारे आहे.

टॅग्स :Akshay Kumarअक्षय कुमारmarathiमराठी