शहरं
Join us  
Trending Stories
1
RR vs KKR सामना रद्द! समान १७ गुण असूनही SRH क्वालिफायर १ साठी पात्र, जाणून घ्या कारण
2
इराणचे राष्ट्रपती रईसी यांची हत्या? अमेरिकेने व्यक्त केला संशय, बोलावली तातडीची बैठक 
3
विराट, सिराज, संजू T20 World Cup मधील भारताच्या एकमेव सराव सामन्याला मुकणार
4
EVM वर ८ वेळा मतदान करताना दिसला तरुण, व्हिडीओ व्हायरल, राहुल गांधींनी दिला सक्त इशारा
5
राहुल गांधी, राजनाथ सिंह, श्रीकांत शिंदे, स्मृती इराणी...पाचव्या टप्प्यातील हायप्रोफाईल लढती
6
मतदानापूर्वी नवी मुंबई पोलीस आयुक्तालयाचा वाहतुकीबाबत महत्त्वपूर्ण निर्णय
7
उत्तर प्रदेशात भाजप किती जागा जिंकणार? राहुल गांधींनी थेट आकडाच सांगितला...
8
RR vs KKR सामन्याचा ग्राऊंड रिपोर्ट! मॅच रद्द झाल्यास असं असेल Playoffs चं वेळापत्रक 
9
'देशात परिवर्तन अटळ! महाराष्ट्रातून भाजप आणि मित्रमंडळीचा सुपडा साफ होणार', नाना पटोलेंचा दावा
10
पद्मश्री पुरस्कारानंतर राजकारणातील प्रतिष्ठित पुरस्कार जिंकण्याचं कंगना याचं स्वप्न; म्हणाल्या...
11
राज्यात महाविकास आघाडीच्या ४० पेक्षा जास्त जागा येतील, बाळासाहेब थोरातांना विश्वास
12
इराणच्या राष्ट्रपतींना घेऊन जाणारं हेलिकॉप्टर क्रॅश, बचाव पथक रवाना
13
'...तर मी तेव्हाच मुख्यमंत्री झालो असतो', छगन भुजबळ यांचा मोठा गौप्यस्फोट
14
सनरायझर्स हैदराबादचा दणदणीत विजय, पण क्वालिफायर १ ची जागा RR vs KKR सामन्यावर अवलंबून
15
"एकनाथ शिंदे यांच्या मुख्यमंत्रीपदाला संजय राऊतांचाच विरोध होता", अजित पवार गटाचा पलटवार
16
मुस्लिम कट्टरतावाद्यांच्या मतांसाठी संतांचा अपमान..; PM मोदींचा ममता बॅनर्जींवर हल्लाबोल
17
‘मोदींचं गुणगान गाऊन योगींकडून भगव्या वस्त्राचा अपमान, भगवे कपडे घालून संतांसारखे…’ नाना पटोलेंचा सल्ला
18
"भाजपला डिस्टर्ब करू नका, निवडणूक संपताच...", हिमंता यांचा माजी IPS अधिकाऱ्याला इशारा
19
आमदार पी.एन. पाटील यांची प्रकृती बिघडली; खासगी रुग्णालयात दाखल, तातडीने शस्त्रक्रिया सुरु
20
ऑल दी बेस्ट, रोहित अँड... ! Mumbai Indians च्या अपयशानंतर असं का म्हणाल्या नीता अंबानी?

मणिपूरच्या विद्यार्थ्यांना नागपूर विद्यापीठाचा आधार

By जितेंद्र ढवळे | Published: May 08, 2024 5:52 PM

९ विद्यार्थ्यांनी घेतले शिक्षण : विद्यापीठ प्रशासनाचे मानले आभार

नागपूर : खंडित झालेले शिक्षण पुन्हा सुरू ठेवण्याकरिता राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठ आशेचा किरण ठरले असल्याच्या भावना मणिपूरच्या विद्यार्थ्यांनी व्यक्त केल्या. शैक्षणिक अडचणी लक्षात घेत राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाने वेळीच प्रवेश दिल्याने कुलगुरू डॉ. सुभाष चौधरी यांचा मणिपूर येथील विद्यार्थ्यांनी सत्कार करीत आभार मानले.

मणिपूर येथे हिंसाचार सुरू असल्याने अशांतता निर्माण झाली. अशा परिस्थितीत असंख्य विद्यार्थ्यांना शिक्षण घेणे कठीण झाले. अशा परिस्थितीचा सामना करीत मणिपूर येथील काही विद्यार्थ्यांनी राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाची प्रवेश मिळावा म्हणून संपर्क साधला. कुलगुरू डॉ. चौधरी यांनी विद्यार्थ्यांची शैक्षणिक अडचण लक्षात घेता तातडीने मदत करीत या विद्यार्थ्यांचे प्रवेश विद्यापीठाच्या विविध विभागांमध्ये करवून घेतले. वेळीच मदत केल्याने अशांत असलेल्या मणिपूर येथील विद्यार्थ्यांना नागपूर विद्यापीठात त्यांचे शिक्षण सुरू ठेवता आले.

मणिपूर येथील चुराचंदपूर तसेच कांग्पोक्पी येथील विद्यार्थ्यांचा नागपूर विद्यापीठात प्रवेश घेणाऱ्यांमध्ये समावेश आहे. पाच विद्यार्थी व ४ विद्यार्थिनींना विद्यापीठाने विविध ठिकाणी प्रवेश दिला आहे. विद्यापीठाचा पदव्युत्तर गणित विभाग, पदव्युत्तर इंग्रजी विभाग, पदव्युत्तर मानसशास्त्र विभाग, पदव्युत्तर विधी विभाग आदी विविध विभागांमध्ये मणिपूर येथील एकूण ९ विद्यार्थ्यांनी शिक्षण पूर्ण केले आहे. विद्यापीठ प्रशासनाकडून करण्यात आलेली मदत त्याचप्रमाणे उपलब्ध करून देण्यात आलेल्या सुविधेमुळे विद्यार्थ्यांनी समाधान व्यक्त केले आहे. जमनालाल बजाज प्रशासकीय भवनातील कुलगुरू कक्षात मणिपूरच्या विद्यार्थ्यांनी कुलगुरू चौधरी यांचा सत्कार करीत आभार मानले. या वेळी मणिपूर येथील विद्यार्थी-विद्यार्थिनी उपस्थित होते.

 

टॅग्स :Rashtrasant Tukdoji Maharaj Nagpur Universityराष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठManipur Violenceमणिपूर हिंसाचारStudentविद्यार्थीEducationशिक्षण