शहरं
Join us  
Trending Stories
1
भारताला धमकी मिळाल्यानंतर रशिया संतापला; अमेरिकेला सांगितलं, 'धमकी देऊ नका'
2
कबुतरांना खाद्य मिळण्याचा मार्ग मोकळा; कबुतरखान्यांबद्दल CM फडणवीसांचा महत्त्वाचा निर्णय
3
निळेशार डोळे असलेल्या मॉडेलचं डोनाल्ड ट्रम्प का करतायत तोंडभरून कौतुक? कारण खूपच खास
4
स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीचा कार्यक्रम ठरला; कधी होणार महापालिका निवडणुका?
5
निसर्गाचा प्रकोप! ३४ सेकंदात सगळंच संपलं, सुंदर धरालीच्या विनाशाचे धडकी भरवणारे फोटो
6
एसटी महामंडळ राज्य शासनाचे अधिकृत यात्री ॲप चालवणार, परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांची घोषणा
7
तयारीला लागा! उद्धव ठाकरेंचे पदाधिकाऱ्यांना आदेश; मनसेसोबतच्या युतीबाबत म्हणाले...
8
बेस्टच्या ऑफिसमध्ये पैसे उडवून डान्स? २०१७ मधल्या 'त्या' घटनेवर माधवी जुवेकर म्हणाली- "रात्री दोन मंत्र्यांचे फोन आले..."
9
७०, ५०, ४० की ३५ किलो; ट्रेनमध्ये किती सामान घेऊन जाऊ शकता? अन्यथा मोठा दंड होऊ शकतो
10
Vastu Tips: दारात ठेवण्याचे पायपुसणे हिरव्याच रंगाचे का असावे? खरंच होतो का भाग्योदय?
11
खिशातून एक रुपयाही न भरता शेतकऱ्यांना मिळेल वार्षिक ३६,००० पेन्शन, योजनेचा कसा घ्यायचा फायदा?
12
Shravan Purnima 2025: नारळी पौर्णिमेला समुद्राला श्रीफळ का अर्पण करतात? त्यामागे आहे 'हे' विशेष कारण!
13
"न्यायपालिकेला राजकीय आखाडा बनवण्याचा प्रकार नाही का?", आरती साठेंच्या न्यायमूर्तीपदी नियुक्तीला रोहित पवारांचा विरोध
14
Mumbai: कबुतरखान्यावरून आदित्य ठाकरेंची देवेंद्र फडणवीस आणि एकनाथ शिंदेंवर टीका
15
"ढगफुटीमुळे हॉटेल्स, लॉज, बाजारपेठा, गाव उद्ध्वस्त..."; प्रत्यक्षदर्शींनी सांगितला भयंकर अनुभव
16
ट्रम्प यांच्या वक्तव्याने भारतीय गुंतवणूकदारांना २ लाख कोटींचा फटका; फक्त 'या' क्षेत्रात झाली वाढ
17
बिहारनंतर आता या राज्यातही होणार मतदार याद्यांचं पुनरीक्षण, निवडणूक आयोगाने दिले आदेश   
18
कॅनडात खलिस्तान्यांच्या कुरापती सुरुच; 'रिपब्लिक ऑफ खलिस्तान' नावाने उभारले बनावट दूतावास
19
मंत्रिमंडळ बैठकीत ७ मोठे निर्णय; स्टार्टअप उद्योजगता धोरण जाहीर, समृद्धी फ्रेट कॉरिडॉर मंजूर
20
मराठीशी पंगा महागात! निशिकांत दुबेंच्या अडचणी वाढण्याची शक्यता; मनसेकडून याचिका दाखल

'तिचा' हरविलेला पती पोलिसांनी कागदावरच शोधला!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 28, 2022 12:21 IST

नरेश परत आले नसताना पोलिसांनी परत आल्याची नोंद पोलीस ठाण्यात केली कशी, असा दीपालीचा प्रश्न आहे. तत्कालीन ठाणेदारांनी केस पेंडिंग राहू नये म्हणून खोटी माहिती लिहिली असल्याचा आरोप तिने केला आहे.

जलालखेडा (नागपूर) : मदना येथील नरेश बाबाराव जाणे (४५) हे २०१६ पासून बेपत्ता आहेत. याबाबत त्यांच्या कुटुंबीयांनी जलालखेडा पोलिसात तक्रारही दाखल केली होती. मात्र, केस पेंडिंग राहू नये म्हणून तक्रार झाल्याच्या १५ दिवसातच नरेश जाणे मिळाल्याची नोंद पोलीस दफ्तरी असल्याने नरेशची पत्नी दीपाली आज शासकीय योजनांच्या लाभापासून वंचित आहे.

मिळालेल्या माहितीनुसार मदना येथील नरेश बाबाराव जाणे हे खासगी वाहनावर चालक होते. ३० सप्टेंबर २०१६ रोजी ते कामानिमित्त बाहेर गेले असता, घरी परत आलेच नाहीत. त्यांचा संपर्क होत नसल्याने घरच्यांनी शेवटी १३ ऑक्टोबर २०१६ रोजी जलालखेडा पोलीस ठाण्यात नरेश बेपत्ता असल्याची तक्रार दाखल केली होती. ६ वर्ष उलटूनसुद्धा नरेशचा शोध लागलेला नाही. २०२२ मध्ये दीपालीच्या पतीच्या नावाने घरकुल आले. त्यासाठी पती व पत्नीच्या नावाचे संयुक्त बँक खाते उखडणे गरजेचे आहे; मात्र पती हरविला असल्यामुळे सह्या होऊ शकत नसल्याने पासबूक निघू शकत नाही, असे दीपाली हिला बँकेच्यावतीने सांगण्यात आले.

त्यावर पर्याय म्हणून बँक कर्मचाऱ्यांनी नरेश हरविल्याची पोलीस ठाण्यात नोंद असल्याचे कागदपत्र आणण्यासाठी तिला सांगितले. यानंतर दीपाली जलालखेडा पोलीस स्टेशन येथे गेली असता, तिचे पती तक्रार दिल्यानंतर आठ दिवसात परत आल्याची नोंद ठाण्यात आहे. त्यामुळे तुमचे पती हरविले असल्याबाबत आम्ही तुम्हाला लिहून देऊ शकत नसल्याचे पोलिसांनी दीपालीला सांगितले. नरेश परत आले नसताना पोलिसांनी परत आल्याची नोंद पोलीस ठाण्यात केली कशी, असा दीपालीचा प्रश्न आहे. तत्कालीन ठाणेदारांनी केस पेंडिंग राहू नये म्हणून खोटी माहिती लिहिली असल्याचा आरोप तिने केला आहे.

माझे पती नरेश जाणे हे ६ वर्षांपासून बेपत्ता आहेत. घरकुल योजनेत आमचे नाव आल्यामुळे पोलीस ठाण्यातून पती हरविले असल्याचे लेखी कागदपत्र हवे होते. मात्र, पोलिसांच्या लेखी माझे पती परत आले आहेत. ते आलेच नाही तर पोलिसांनी खोटी नोंद कोणत्या आधारावर केली?

दीपाली जाणे, मदना

महिलेच्या  सांगण्यावरून तिचे पती परत आले नाही; परंतु, मी या प्रकरणाची शहनिशा केली असता, नरेश जाणे परत आल्याची नोंद पोलीस ठाण्यात आहे. २०१६ चे प्रकरण आहे. या प्रकरणाची सविस्तर चौकशी करून योग्य ती कारवाई केली जाईल.

मनोज चौधरी, ठाणेदार, जलालखेडा

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीPoliceपोलिसnagpurनागपूर