शहरं
Join us  
Trending Stories
1
रिझर्व्ह बँकेचा 100, 200 रुपयांच्या नोटांबद्दल महत्त्वाचा निर्णय, सर्वसामान्यांना मिळणार दिलासा
2
परप्रांतीय प्रियकराच्या मदतीनं पतीचा काढला काटा; हत्येनंतर अपघाताचा रचला बनाव, पण...
3
‘पीओके’मधील दहशतवादी नेटवर्कवर भारत करणार प्रहार; उच्चस्तरीय विचारविनिमय सुरू; ४२ सक्रिय दहशतवादी तळ केंद्राच्या रडारवर
4
आजचे राशीभविष्य, २९ एप्रिल २०२५: सार्वजनिक क्षेत्रात मानहानी होण्याची शक्यता
5
तीन देशांत एकाच वेळी वीज गायब; सर्व काही थांबले; देशभरातील वाहतूक सिग्नलवर परिणाम
6
१६ पाकिस्तानी यूट्युब चॅनेलवर सरकारची बंदी; केंद्रीय गृहमंत्रालयाच्या शिफारशींनुसार बंदी
7
त्यांची जबाबदारी माझ्यावर होती, मी माफी कशी मागू, शब्द नाहीत; मुख्यमंत्री ओमर अब्दुल्ला यांनी दिली कबुली
8
नौदलाच्या ताफ्यात येणार फ्रान्सची २६ राफेल विमाने; ६४ हजार कोटींच्या खरेदी करारावर देशांच्या स्वाक्षऱ्या
9
गूढ कायम.. खरं, खोट्याचा होईना उलगडा; डॉ. वळसंगकरांच्या आत्महत्येला दहा दिवस ओलांडले
10
‘म्हाडा’चे ५ हजार घरांचे दिवाळी गिफ्ट; जुन्या इमारतीचाही पुनर्विकास होणार
11
१९ चाळींचा पुनर्विकास एमएमआरडीए करणार; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत महत्त्वपूर्ण निर्णय
12
‘लिव्ह इन’, उत्तराखंड आणि समान नागरी संहिता
13
बुलेट ट्रेन २०२८ अखेरीस मुंबईतून धावणार सुसाट, नवी मुंबई विमानतळ गेम चेंजर ; मुख्यमंत्री फडणवीस
14
मुलांचा ताबा देताना धर्म विचारात घेतला जाऊ शकत नाही : हायकोर्ट
15
कान टोचले, बरे झाले ! केंद्राने विशेष पत्रक काढून माध्यमांना काही मार्गदर्शक सूचना दिल्या
16
पाण्यासाठी भारत-पाक युद्ध पेटण्याची वेळ येऊन ठेपली ?
17
मोठमोठे रस्ते बांधत आहात, इकडे लाेकांचा जीव जाताेय; जखमींवर कॅशलेस उपचारांवरून सर्वाेच्च न्यायालयाने केंद्राला फटकारले
18
बोगस डॉक्टरांविरोधात प्रशासनाने कसली कंबर; तालुकापातळीवरही समिती सक्षम होणार!

'तिचा' हरविलेला पती पोलिसांनी कागदावरच शोधला!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 28, 2022 12:21 IST

नरेश परत आले नसताना पोलिसांनी परत आल्याची नोंद पोलीस ठाण्यात केली कशी, असा दीपालीचा प्रश्न आहे. तत्कालीन ठाणेदारांनी केस पेंडिंग राहू नये म्हणून खोटी माहिती लिहिली असल्याचा आरोप तिने केला आहे.

जलालखेडा (नागपूर) : मदना येथील नरेश बाबाराव जाणे (४५) हे २०१६ पासून बेपत्ता आहेत. याबाबत त्यांच्या कुटुंबीयांनी जलालखेडा पोलिसात तक्रारही दाखल केली होती. मात्र, केस पेंडिंग राहू नये म्हणून तक्रार झाल्याच्या १५ दिवसातच नरेश जाणे मिळाल्याची नोंद पोलीस दफ्तरी असल्याने नरेशची पत्नी दीपाली आज शासकीय योजनांच्या लाभापासून वंचित आहे.

मिळालेल्या माहितीनुसार मदना येथील नरेश बाबाराव जाणे हे खासगी वाहनावर चालक होते. ३० सप्टेंबर २०१६ रोजी ते कामानिमित्त बाहेर गेले असता, घरी परत आलेच नाहीत. त्यांचा संपर्क होत नसल्याने घरच्यांनी शेवटी १३ ऑक्टोबर २०१६ रोजी जलालखेडा पोलीस ठाण्यात नरेश बेपत्ता असल्याची तक्रार दाखल केली होती. ६ वर्ष उलटूनसुद्धा नरेशचा शोध लागलेला नाही. २०२२ मध्ये दीपालीच्या पतीच्या नावाने घरकुल आले. त्यासाठी पती व पत्नीच्या नावाचे संयुक्त बँक खाते उखडणे गरजेचे आहे; मात्र पती हरविला असल्यामुळे सह्या होऊ शकत नसल्याने पासबूक निघू शकत नाही, असे दीपाली हिला बँकेच्यावतीने सांगण्यात आले.

त्यावर पर्याय म्हणून बँक कर्मचाऱ्यांनी नरेश हरविल्याची पोलीस ठाण्यात नोंद असल्याचे कागदपत्र आणण्यासाठी तिला सांगितले. यानंतर दीपाली जलालखेडा पोलीस स्टेशन येथे गेली असता, तिचे पती तक्रार दिल्यानंतर आठ दिवसात परत आल्याची नोंद ठाण्यात आहे. त्यामुळे तुमचे पती हरविले असल्याबाबत आम्ही तुम्हाला लिहून देऊ शकत नसल्याचे पोलिसांनी दीपालीला सांगितले. नरेश परत आले नसताना पोलिसांनी परत आल्याची नोंद पोलीस ठाण्यात केली कशी, असा दीपालीचा प्रश्न आहे. तत्कालीन ठाणेदारांनी केस पेंडिंग राहू नये म्हणून खोटी माहिती लिहिली असल्याचा आरोप तिने केला आहे.

माझे पती नरेश जाणे हे ६ वर्षांपासून बेपत्ता आहेत. घरकुल योजनेत आमचे नाव आल्यामुळे पोलीस ठाण्यातून पती हरविले असल्याचे लेखी कागदपत्र हवे होते. मात्र, पोलिसांच्या लेखी माझे पती परत आले आहेत. ते आलेच नाही तर पोलिसांनी खोटी नोंद कोणत्या आधारावर केली?

दीपाली जाणे, मदना

महिलेच्या  सांगण्यावरून तिचे पती परत आले नाही; परंतु, मी या प्रकरणाची शहनिशा केली असता, नरेश जाणे परत आल्याची नोंद पोलीस ठाण्यात आहे. २०१६ चे प्रकरण आहे. या प्रकरणाची सविस्तर चौकशी करून योग्य ती कारवाई केली जाईल.

मनोज चौधरी, ठाणेदार, जलालखेडा

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीPoliceपोलिसnagpurनागपूर