शहरं
Join us  
Trending Stories
1
सुशीला कार्की होणार नेपाळच्या पंतप्रधान; बालेंद्र शाहांचा पाठिंबा, आंदोलकांना केले आवाहन...
2
Asia Cup 2025 : बुमराहच्या परफेक्ट यॉर्करशिवाय ही गोष्ट ठरली लक्षवेधी; कारण ६ वर्षांनी असं घडलं
3
नागपुरातील कडबी चौकाजवळ भर रस्त्यावर व्यापाऱ्यावर गोळीबार, ५० लाखांची लूट
4
IND vs UAE : अभिषेकनं षटकारासह उघडलं खातं! गिलनं खणखणीत चौकार मारत पॉवरप्लेमध्ये संपवली मॅच
5
रुमाल पडला; तो क्रीजमध्ये यायला विसरला! सूंजचा डायरेक्ट थ्रो; पण Out बॅटरला सूर्यानं दिलं Not Out
6
'तुमचा वापर केला जातोय...', नेपाळमधील सत्तापालटानंतर केपी शर्मा ओलींची पहिली प्रतिक्रिया
7
महाराष्ट्राचे नवे राज्यपाल कोण? सीपी राधाकृष्णन राजीनामा देणार; १२ सप्टेंबरला उपराष्ट्रपतीपदाची शपथ घेण्याची शक्यता
8
शोरुममधून बाहेर पडताच नवीन कारचा अपघात झाला तर विमा मिळतो का? जाणून घ्या...
9
दात घासताना ८० वर्षीय वृद्धाच्या अन्ननलिकेत झाडाची काडी अडकली; ७ दिवस उपाशी राहिले अन्...
10
नेपाळमधील सत्तापालटावर चीनची पहिली प्रतिक्रिया; माजी पंतप्रधान ओलींचं नाव घेणं टाळलं!
11
बालेंद्र शाहांचा नकार; सुशीला कार्की होणार नेपाळच्या पंतप्रधान? तरुणांचा सर्वाधिक पाठिंबा...
12
IND vs UAE : सूर्यानं टॉस जिंकला! बॉलिंग घेतल्यावर UAE चा कॅप्टन म्हणाला; बॅटिंग करायची ना...
13
पुण्यात भलामोठा आयकर रिटर्न घोटाळा; आयटी, मल्टीनॅशनल कंपन्यांचे कर्मचारी अडकले... 
14
मुंबई महापालिका निवडणुकीसाठी शिंदेसेनेची 'जम्बो टीम'; २१ नेत्यांची मुख्य कार्यकारी समिती जाहीर
15
आर्टिफिशियल फ्लेवर्स, प्रिझर्व्हेटिव्ह्जशिवाय घरीच करा 'अ‍ॅपल जॅम'; मुलं म्हणतील, यम्मी...
16
ठाकरेंचा आवाज छत्रपती शिवाजी महाराज पार्कवर घुमणार; दसरा मेळाव्याला महापालिकेची परवानगी
17
Samruddhi Mahamarg : ‘समृद्धी महामार्गावर’वर दिसणारे ते खिळे नाहीत, मग काय?; समजून घ्या 'इपॉक्सी ग्राउटिंग' तंत्रज्ञान
18
वायफाय राउटरच्या बाजूला ठेवल्यात 'या' गोष्टी? आताच बाजूला करा अन्यथा...
19
आयटी सेक्टरमध्ये तेजी! गुंतवणूकदारांनी कमावले २.६४ लाख कोटी रुपये; 'हे' स्टॉक्स ठरले टॉप गेनर
20
वॉशिंग्टन सुरक्षित केले म्हणून डोनाल्ड ट्रम्प हॉटेलमध्ये जेवायला गेले...; लोकांनी जे केले...

आता महाराष्ट्रात असं होणार नाही, पहिल्याच भाषणात आदित्य ठाकरेंचा भाजपाला इशारा

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 19, 2019 11:33 IST

विधानसभेत मी गेल्या 2 दिवसांत खूप गोंधळ बघितलाय. सभागृहातील कामकाज पाहाताना,

मुंबई - शिवसेना नेते आणि वरळी मतदारसंघाचे आमदार आदित्य ठाकरेंनी विधानसभा सभागृहात आमदार म्हणून पहिलंच भाषण केलं. आपल्या पहिल्याच भाषणात आदित्य यांनी भाजपा नेत्यांवर टीका केली. आम्ही पहिल्यांदाच आमदार बनून आलो असून निवडणुकीनंतर पहिल्याच महिन्यात आम्हाला खूप चांगला अनुभव आला. आम्हाला नवख्या आमदारांना खूप शिकायला मिळालं. सत्तेसाठी कोण कुठल्या थराला जातं, कसं सरकार बनतं हे सगळंच आम्हाला पाहायला मिळाल्याचं आदित्य यांनी म्हटलं. 

विधानसभेत मी गेल्या 2 दिवसांत खूप गोंधळ बघितलाय. सभागृहातील कामकाज पाहाताना, एकमेकांवर आरोप प्रत्यारोप पाहिलं. असं बोललं जातं की चिखलातच कमळ खुलतं. पण, चिखल करा आणि कमळ फुलवा, असं आता महाराष्ट्रात होणार नाही. महाराष्ट्रात आता बदल घडलाय, महाराष्ट्रात ही ताकद एकत्र आलेली आहे. गोंधळ सभागृहात घालायचा, गोंधळ बाहेर घालायचा, देश पेटवून ठेवायचा आणि मग राज्य आणायंच ही आमची भूमिका नाही. महाराष्ट्रात भयमुक्त सरकार बनविण्यात यश आलंय. आता, आम्ही भयमुक्त महाराष्ट्र बनवायला निघालो आहोत, असे आदित्य ठाकरेंनी सभागृहात बोलताना म्हटलं.

आपल्या भाषणात प्लास्टीक बंदी, प्रदुषण, पर्यावरण, हवामान या विषयांवरही आदित्य यांनी भाषण केलं. बेरोजगारी हा मोठा विषय आहे, 2016 च्या अंताला नोटबंदी झाली, जीएसटीमुळे उद्योगधंदे बंद झाले. सगळ ठप्प झालंय. त्यामुळे रोजगारासाठी आपल्याला काम करणं गरजेचं असलंय. शिक्षणपद्धतीवरही आदित्य ठाकरेंनी भाष्य केलं. डोनेशन भररुन शिक्षण पूर्ण केल्यानतंरही नोकरी मिळण्याची शाश्वती नाही. त्यामुळे शिक्षण पद्धतीत बदल गरजेचा आहे. 

आमदार म्हणून मी पाहतो, मुंबई महापालिकेच्या 1232 शाळा आहेत. त्यामध्ये मराठीसह 8 भाषांमध्ये शिक्षण दिलं जातं. 50 हजार मुलं टॅबवर शिकत आहेत. हे टॅबच शिक्षण आपण गावपातळीवर नेलं पाहिजे, या 1232 शाळांपैकी 500 शाळा ह्या व्हर्च्युअल क्लासरुमशी जोडल्या आहेत. तीच सॅटलाईटची टेक्नॉलॉजी आपण गावपातळीवर नेली पाहिजे. आपण व्हर्च्युअल क्लासरुप आणि डिजिटल एज्युकेशन हे प्रत्येक जिल्ह्यात नेणं गरजेचं आहे, अशी मी मुख्यमंत्र्यांकडे विनंती करतो, असेही आदित्य ठाकरेंनी म्हटलंय.    

टॅग्स :Aditya Thackreyआदित्य ठाकरेBJPभाजपाShiv SenaशिवसेनाNCPराष्ट्रवादी काँग्रेसnagpurनागपूर