शहरं
Join us  
Trending Stories
1
Manikrao Kokate: माणिकराव कोकाटे यांची अटक टळली; हायकोर्टाने शिक्षेला स्थगिती दिली, पण...
2
"मी हरियाणामध्ये हिंदू महिलेचे 'घूंघट' खेचले असते तर...", नीतीश कुमारांच्या हिजाब वादावर काय म्हमाले उमर अब्दुल्ला?
3
ED: बेटिंग ॲप प्रकरणी युवराज सिंग, रॉबिन उथप्पा यांची मालमत्ता जप्त; ईडीची मोठी कारवाई
4
“सत्य लपून राहत नाही, आता दुसरा मंत्रीही राजीनामा देणार”; उद्धव ठाकरेंचा रोख कुणाकडे?
5
'सेबीची कारवाई म्हणजे आर्थिक मृत्यूदंड' अवधूत साठेंच्या वकिलांचा 'सॅट'मध्ये युक्तिवाद; काय दिला निर्णय?
6
Anurag Dwivedi : २०० रुपयांपासून सुरुवात, आता कोट्यवधींची कमाई; ९ वर्षांत युट्यूबर अनुराग द्विवेदी कसा बनला धनकुबेर?
7
IND vs SL, U19 Asia Cup Semi Final 1 : वनडेत टी-२० ट्विस्ट! श्रीलंकेनं टीम इंडियासमोर ठेवलं १३९ धावांच लक्ष्य
8
राज ठाकरे एक्शन मोडवर! मनपा निवडणुकीपूर्वी शाखा भेटींवर जोर; २ दिवस मुंबई शहर पिंजून काढणार
9
राज आणि उद्धव ठाकरे मुंबईतील 'या' ११३ जागांवर विशेष लक्ष देणार, जागावाटपात ‘MaMu’ फॉर्म्युला वापरणार  
10
सातारा ड्रग्ज प्रकरणात CM फडणवीसांची पहिली मोठी प्रतिक्रिया; म्हणाले, “पोलिसांचे अभिनंदन करतो की…”
11
बाजारात पुन्हा 'बुल्स'चे पुनरागमन! सलग ४ दिवसांच्या घसरणीला ब्रेक; 'हे' शेअर्स ठरले टॉप गेनर्स
12
Viral Video: धैर्य आणि प्रसंगावधान! अचानक केसांनी पेट घेतला तरी शाळकरी मुलगी डगमगली नाही...
13
"कुठेही लिहिलेलं नाही की, काळे कपडे घालून...!", भाजप नीतीश कुमारांच्या पाठीशी; हिजाबवर बंदी घातली जाणार?
14
Winter Special: १० मिनिटात तयार होणारी तीळ शेंगदाण्याची पौष्टिक आणि रुचकर वडी; पाहा रेसिपी 
15
Jara Hatke: टक्कल पडू नये म्हणून 'या' मंदिरात देवाला अर्पण करतात केसांची बट
16
"चांगली कामगिरी करुनही टीम इंडियात निवड होत नसेल तर..." ईशान किशनने बोलून दाखवली मनातली गोष्ट
17
याला म्हणतात 'धुरंधर'...! या ₹2 च्या शेअरनं गुंतवणूकदारांचं नशीबच बदललं, 5 वर्षांत दिला 19000% चा परतावा
18
विमानतळ क्षेत्रात अदानींची 'उंच झेप'! ११ नवीन विमानतळांसाठी लावणार बोली; IPO कधी येणार?
19
Viral Video: पाच वर्षाच्या चिमुकल्याला फुटबॉलप्रमाणे उडवलं, शेजाऱ्याचं अमानुष कृत्य, घटना कॅमेऱ्यात कैद!
20
Sonam Raghuvanshi : नवा ट्विस्ट! "मी राजाला मारलं नाही, राज माझा भाऊ..."; जामीन अर्जात काय म्हणाली सोनम रघुवंशी?
Daily Top 2Weekly Top 5

आता महाराष्ट्रात असं होणार नाही, पहिल्याच भाषणात आदित्य ठाकरेंचा भाजपाला इशारा

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 19, 2019 11:33 IST

विधानसभेत मी गेल्या 2 दिवसांत खूप गोंधळ बघितलाय. सभागृहातील कामकाज पाहाताना,

मुंबई - शिवसेना नेते आणि वरळी मतदारसंघाचे आमदार आदित्य ठाकरेंनी विधानसभा सभागृहात आमदार म्हणून पहिलंच भाषण केलं. आपल्या पहिल्याच भाषणात आदित्य यांनी भाजपा नेत्यांवर टीका केली. आम्ही पहिल्यांदाच आमदार बनून आलो असून निवडणुकीनंतर पहिल्याच महिन्यात आम्हाला खूप चांगला अनुभव आला. आम्हाला नवख्या आमदारांना खूप शिकायला मिळालं. सत्तेसाठी कोण कुठल्या थराला जातं, कसं सरकार बनतं हे सगळंच आम्हाला पाहायला मिळाल्याचं आदित्य यांनी म्हटलं. 

विधानसभेत मी गेल्या 2 दिवसांत खूप गोंधळ बघितलाय. सभागृहातील कामकाज पाहाताना, एकमेकांवर आरोप प्रत्यारोप पाहिलं. असं बोललं जातं की चिखलातच कमळ खुलतं. पण, चिखल करा आणि कमळ फुलवा, असं आता महाराष्ट्रात होणार नाही. महाराष्ट्रात आता बदल घडलाय, महाराष्ट्रात ही ताकद एकत्र आलेली आहे. गोंधळ सभागृहात घालायचा, गोंधळ बाहेर घालायचा, देश पेटवून ठेवायचा आणि मग राज्य आणायंच ही आमची भूमिका नाही. महाराष्ट्रात भयमुक्त सरकार बनविण्यात यश आलंय. आता, आम्ही भयमुक्त महाराष्ट्र बनवायला निघालो आहोत, असे आदित्य ठाकरेंनी सभागृहात बोलताना म्हटलं.

आपल्या भाषणात प्लास्टीक बंदी, प्रदुषण, पर्यावरण, हवामान या विषयांवरही आदित्य यांनी भाषण केलं. बेरोजगारी हा मोठा विषय आहे, 2016 च्या अंताला नोटबंदी झाली, जीएसटीमुळे उद्योगधंदे बंद झाले. सगळ ठप्प झालंय. त्यामुळे रोजगारासाठी आपल्याला काम करणं गरजेचं असलंय. शिक्षणपद्धतीवरही आदित्य ठाकरेंनी भाष्य केलं. डोनेशन भररुन शिक्षण पूर्ण केल्यानतंरही नोकरी मिळण्याची शाश्वती नाही. त्यामुळे शिक्षण पद्धतीत बदल गरजेचा आहे. 

आमदार म्हणून मी पाहतो, मुंबई महापालिकेच्या 1232 शाळा आहेत. त्यामध्ये मराठीसह 8 भाषांमध्ये शिक्षण दिलं जातं. 50 हजार मुलं टॅबवर शिकत आहेत. हे टॅबच शिक्षण आपण गावपातळीवर नेलं पाहिजे, या 1232 शाळांपैकी 500 शाळा ह्या व्हर्च्युअल क्लासरुमशी जोडल्या आहेत. तीच सॅटलाईटची टेक्नॉलॉजी आपण गावपातळीवर नेली पाहिजे. आपण व्हर्च्युअल क्लासरुप आणि डिजिटल एज्युकेशन हे प्रत्येक जिल्ह्यात नेणं गरजेचं आहे, अशी मी मुख्यमंत्र्यांकडे विनंती करतो, असेही आदित्य ठाकरेंनी म्हटलंय.    

टॅग्स :Aditya Thackreyआदित्य ठाकरेBJPभाजपाShiv SenaशिवसेनाNCPराष्ट्रवादी काँग्रेसnagpurनागपूर