शहरं
Join us  
Trending Stories
1
रोहित आर्याप्रकरणी अहवाल सादर करा! मानवाधिकार आयोगाकडून पोलिसांना ८ आठवड्यांची मुदत
2
आजचे राशीभविष्य,०४ नोव्हेंबर २०२५: वडीलधाऱ्यांकडून लाभ, दुपार नंतर प्रतिकूलतेशी तोंड द्यावे लागेल
3
छगन भुजबळ यांच्यावर यशस्वी हृदय शस्त्रक्रिया; जाणून घ्या हेल्थ अपडेट
4
मतदारांची दुबार नावे शोधा, त्यांचे दुबार मतदान रोखा! निवडणूक आयोगाने दिले स्पष्ट आदेश
5
STचा पुढचा पल्ला वीजनिर्मितीचा; सौरऊर्जा प्रकल्पातून वर्षाला ३०० मेगावॅट निर्मितीचे लक्ष्य
6
मुंबई अपहरण प्रकरण: रोहित आर्याचे एन्काउंटर; माजी मंत्री केसरकर यांची हाेणार चौकशी
7
मुख्य अधिष्ठाता डॉ. बारोट यांची उचलबांगडी; हलगर्जी भोवली, वैद्यकीय अधिकाऱ्याला कारणे दाखवा
8
आवडत्या बांधकाम व्यावसायिकांसाठी ५ हजार कोटींचा पीएपी घोटाळा: वर्षा गायकवाड
9
डॉक्टर संपाचा रुग्णसेवेवर परिणाम नाही; राज्यभर ओपीडीत रुग्णांची नेहमीप्रमाणेच तपासणी
10
ऊस दरासाठी बोलावलेली पहिली बैठक निष्फळ; आम्ही कायदा हातात घेऊन कारखाने बंद पाडू; राजू शेट्टींचा इशारा
11
रशियाच्या मदतीने इराण ८ नवीन अणुऊर्जा प्रकल्प बांधणार, असा करार दोन्ही देशांमध्ये झाला
12
फक्त २००० रुपयांची SIP तुम्हाला बनवेल 'कोट्यधीश'; कंपाऊंडिंगचे गणित समजून घ्या
13
'घोळ कुणी घातला आणि फायदा कुणाला झाला, हे आता लपवणं शक्यच नाही'; राज ठाकरेंच्या आमदाराचं थेट मुद्द्यावर बोट
14
१ कोटींचा पगार, ६० सेकंदात व्हिसा रिजेक्ट; इंजिनिअरने धक्कादायक अनुभव सांगितला, ते तीन प्रश्नही केले शेअर
15
आजीला ‘हार्ट अटॅक’...घरच्यांनी लपवली गोष्ट; भारताच्या लेकीनं फिल्डिंगच्या जोरावर फिरवली मॅच!
16
Railway Accident: मुंब्रा रेल्वे अपघात प्रकरणी दोन इंजिनिअरवर गुन्हा दाखल, एफआरआयमध्ये काय?
17
चिनी एअरलाइन्समध्ये विवाहित एअर होस्टेस आता 'एअर आंटी' झाली, मोठा वाद सुरू झाला
18
Travel : भारतापासून अवघ्या ४ तासांवर आहे 'हा' देश; शिमला-मनालीच्या बजेटमध्ये करू शकता परदेशवारी!
19
Amol Majumdar : भारतीय महिला संघाच्या यशामागचा हिरो अन् त्याचं ‘सेम टू सेम’ हिटमॅन स्टाईल सेलिब्रेशन
20
"मी म्हणालो हॉटेलवरून उडी मारेन अन् स्वतःला संपवून टाकेन", बालाजी कल्याणकरांच्या डोक्यात काय सुरू होतं?

आता महाराष्ट्रात असं होणार नाही, पहिल्याच भाषणात आदित्य ठाकरेंचा भाजपाला इशारा

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 19, 2019 11:33 IST

विधानसभेत मी गेल्या 2 दिवसांत खूप गोंधळ बघितलाय. सभागृहातील कामकाज पाहाताना,

मुंबई - शिवसेना नेते आणि वरळी मतदारसंघाचे आमदार आदित्य ठाकरेंनी विधानसभा सभागृहात आमदार म्हणून पहिलंच भाषण केलं. आपल्या पहिल्याच भाषणात आदित्य यांनी भाजपा नेत्यांवर टीका केली. आम्ही पहिल्यांदाच आमदार बनून आलो असून निवडणुकीनंतर पहिल्याच महिन्यात आम्हाला खूप चांगला अनुभव आला. आम्हाला नवख्या आमदारांना खूप शिकायला मिळालं. सत्तेसाठी कोण कुठल्या थराला जातं, कसं सरकार बनतं हे सगळंच आम्हाला पाहायला मिळाल्याचं आदित्य यांनी म्हटलं. 

विधानसभेत मी गेल्या 2 दिवसांत खूप गोंधळ बघितलाय. सभागृहातील कामकाज पाहाताना, एकमेकांवर आरोप प्रत्यारोप पाहिलं. असं बोललं जातं की चिखलातच कमळ खुलतं. पण, चिखल करा आणि कमळ फुलवा, असं आता महाराष्ट्रात होणार नाही. महाराष्ट्रात आता बदल घडलाय, महाराष्ट्रात ही ताकद एकत्र आलेली आहे. गोंधळ सभागृहात घालायचा, गोंधळ बाहेर घालायचा, देश पेटवून ठेवायचा आणि मग राज्य आणायंच ही आमची भूमिका नाही. महाराष्ट्रात भयमुक्त सरकार बनविण्यात यश आलंय. आता, आम्ही भयमुक्त महाराष्ट्र बनवायला निघालो आहोत, असे आदित्य ठाकरेंनी सभागृहात बोलताना म्हटलं.

आपल्या भाषणात प्लास्टीक बंदी, प्रदुषण, पर्यावरण, हवामान या विषयांवरही आदित्य यांनी भाषण केलं. बेरोजगारी हा मोठा विषय आहे, 2016 च्या अंताला नोटबंदी झाली, जीएसटीमुळे उद्योगधंदे बंद झाले. सगळ ठप्प झालंय. त्यामुळे रोजगारासाठी आपल्याला काम करणं गरजेचं असलंय. शिक्षणपद्धतीवरही आदित्य ठाकरेंनी भाष्य केलं. डोनेशन भररुन शिक्षण पूर्ण केल्यानतंरही नोकरी मिळण्याची शाश्वती नाही. त्यामुळे शिक्षण पद्धतीत बदल गरजेचा आहे. 

आमदार म्हणून मी पाहतो, मुंबई महापालिकेच्या 1232 शाळा आहेत. त्यामध्ये मराठीसह 8 भाषांमध्ये शिक्षण दिलं जातं. 50 हजार मुलं टॅबवर शिकत आहेत. हे टॅबच शिक्षण आपण गावपातळीवर नेलं पाहिजे, या 1232 शाळांपैकी 500 शाळा ह्या व्हर्च्युअल क्लासरुमशी जोडल्या आहेत. तीच सॅटलाईटची टेक्नॉलॉजी आपण गावपातळीवर नेली पाहिजे. आपण व्हर्च्युअल क्लासरुप आणि डिजिटल एज्युकेशन हे प्रत्येक जिल्ह्यात नेणं गरजेचं आहे, अशी मी मुख्यमंत्र्यांकडे विनंती करतो, असेही आदित्य ठाकरेंनी म्हटलंय.    

टॅग्स :Aditya Thackreyआदित्य ठाकरेBJPभाजपाShiv SenaशिवसेनाNCPराष्ट्रवादी काँग्रेसnagpurनागपूर