शहरं
Join us  
Trending Stories
1
नाशिक हादरले! दिंडोरीत विहिरीत कार कोसळून एकाच कुटुंबातील ९ जणांचा मृत्यू; लहान मुलांचाही समावेश
2
आजचे राशीभविष्य, ०४ एप्रिल २०२६: सर्वत्र लाभ, हरवलेली वस्तू मिळेल; मनासारखा दिवस
3
पार्थ पवारच्या निवडीत अडचण येत असल्याने 'ते' पत्र मागे घेणार; पटेल आणि तटकरे काहीसे शांत
4
खरातच्या मोबाइलमधून हवाला रॅकेटचे कनेक्शन समोर; सीएकडेली पुजेतून समोर आला दुबईचा सराफा व्यापारी
5
सुमारे एक हजार कोटींच्या निविदा रद्द; मुंबईकरांचे हकनाक खर्च होणारे पैसे वाचवल्याचा दावा
6
मध्य रेल्वेवर आज, उद्या खोळंबा; प्रभादेवी पुलासाठी सीएसएमटी-दादर सेवा खंडित
7
टोल प्लाझावर आता 'कॅश'ला 'नो एन्ट्री'! १० एप्रिलपासून व्यवहार पूर्णपणे डिजिटल होणार
8
'लोकांचे प्रश्न घेऊन लढणारा पक्ष अशी प्रतिमा तयार करा': राज ठाकरे
9
युद्ध चिघळले, इराणने पाडले अमेरिकेचे विमान; इस्रायलचे तेहरान, इस्फहान शहरांवर तुफान हल्ले
10
सीबीएसई शाळांमध्ये इयत्ता सहावीपासून त्रिभाषा सूत्राची अंमलबजावणी; या वर्षापासूनच निर्णय लागू
11
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
12
अफगाणिस्तानला भूकंपाचा भीषण धक्का; जम्मू-काश्मीर आणि दिल्लीतही जमीन हादरली
13
"ही वृत्ती संपुष्टात आणण्याची शिवसेनेची भूमिका"; अशोक खरातचे एकनाथ शिंदेंना फोनच्या दाव्यावर उदय सामंतांची प्रतिक्रिया
14
इराणने आमचे लढाऊ विमान पाडले, वैमानिकही बेपत्ता; अमेरिकेने दिली कबुली
15
Mumbai Indias: मुंबई इंडियन्सची ताकद वाढली, स्टार ऑलराउंडरची संघात एन्ट्री, दिल्लीविरुद्ध खेळण्याची शक्यता!
16
Ashok Kharat Case : भोंदूबाबा खरातचा 'महाप्रताप'! भक्तांच्याच नावे उघडली १०० बोगस खाती; 'समता' आणि 'जयदंबा' पतसंस्था रडारवर
17
'फोनवर संभाषण झाले म्हणून वरिष्ठ मंत्र्यांवर आरोप करणे योग्य नाही';अंजली दमानियांच्या आरोपांवर दीपक केसरकरांचे प्रत्युत्तर
18
धुळे-सोलापूर महामार्गावर प्रचंड वाहतूक कोंडी; ७ तासांपासून वाहने खोळंबली, नागरिकांचे हाल
19
ज्याची भीती तेच घडलं, युद्ध आणखी पेटलं; इराणच्या सर्वात मोठ्या ब्रिजवर हल्ला, ८ मृत्यू ९५ जखमी
20
IPL 2026: ५ षटकार, ६ चौकार, १६९.७७ चा स्ट्राईक रेट; पंजाबविरुद्ध आयुष म्हात्रेची विस्फोटक इनिंग!
Daily Top 2Weekly Top 5

'एआय'ला करा शिवाराचा साथीदार : हवामान बदलाच्या संकटात शेतकऱ्यांची ढाल!

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 2, 2025 12:08 IST

Nagpur : ‘स्मार्ट फार्मिंग’ची वाटचाल सुरू; महाराष्ट्र सरकारकडून ५०० कोटींचा टेक्नो-बूस्ट!

सुनील चरपेनागपूर : हवामानाचे चक्र बिघडले आहे, जमिनीचा पोत बदलतोय, किडींची वाढलेली प्रतिकारशक्ती व नव्या प्रजाती आणि या सर्वांचा थेट परिणाम होत आहे शेतकऱ्यांच्या रोजच्या संघर्षांतर. शेतमालाची उत्पादकता घटतेय, खर्च वाढतोय आणि अन्नसुरक्षेचा प्रश्न डोके तर काढतोय. अशा वेळेस आधुनिक तंत्रज्ञानाचा किरण म्हणजेच 'कृत्रिम बुद्धिमत्ता' (एआय) शेतकऱ्यांसाठी आशेचा नवा किरण ठरू शकतो का? जगभर शेतीत 'एआय'चा उपयोग करून अचूक हवामान अंदाज, कीड व्यवस्थापन, रोबोटिक तंत्र, आणि 'स्मार्ट फार्मिंग' सुरू आहे. मात्र, भारतात याची शक्यता, अडथळे व भविष्यातील दिशा यावर व्यापक चर्चा गरजेची आहे. कारण, जर शेती वाचवायची असेल तर तिला शहाणपणाचा कृत्रिम बुद्धिमत्तेचा आधार लागणारच आहे. राज्य सरकारने सन २०२५-२६ च्या अर्थसंकल्पात शेतीक्षेत्रातील एआय आणि अत्याधुनिक तंत्रज्ञानाचा वापर वाढविण्यासाठी पुढील दोन वर्षांकरिता ५०० कोटी रुपयांची तरतूद केली आहे. त्याअनुषंगाने राज्यात कार्यशाळा व प्रशिक्षण शिबिरांद्वारे शेतकऱ्यांना मार्गदर्शन केले जात आहे. काही कंपन्यांनी यावर काम सुरू केले असून, त्यांनी केलेल्या अभ्यास व प्रयोगांची प्रात्यक्षिके दाखविली जात आहे.

फूड टेक्नॉलॉजीसह शेतमालावर प्रक्रिया करणाऱ्या प्रत्येक उद्योगांमध्ये या तंत्रज्ञानाचा वापर प्रभावीपणे करता येतो. एआयचा वापर कोरडवाहू शेतकन्यांनी कसा करावा, यावर विचार करणे गरजेचे आहे. या तंत्रज्ञानाच्या वापराचा भांडवली खर्च, हाताळणी व देखभाल खर्च, गुंतवणूक याच्या ताळेबंदाचा विचार व्हावा. अन्यथा सेन्सर, ड्रोन, सॉफ्टवेअर तयार करणाऱ्या कंपन्या व स्वयंचलित हवामान निरीक्षण केंद्रांना या तंत्रज्ञानातून नफा मिळेल आणि शेतकरी लुटला जाईल.

'अॅप'द्वारे लगेच सूचनायासाठी विशिष्ट अॅप विकसित केले जात आहे. त्या अॅपद्वारे सॅटेलाईट मॅपिंगमुळे शेतातील मातीत असलेली अन्नद्रव्ये, ओलावा, वाफसा, तापमान, पिकांना पाण्याची गरज, पाण्याचे बाष्पीभवन याची अचूक माहिती व आकडेवारी मिळते. पिकांवर रोग व किडींचा प्रादुर्भावाची सुरुवात होताच त्याचीही सूचना दिली जाते. या तंत्रज्ञानामुळे पाण्याचा किमान ४० टक्के व खतांचा ३० टक्के वापर कमी होत असून, पीक उत्पादनात ४० टक्के वाढ होऊ शकते.

मूलभूत सुधारणा आवश्यकभारत उष्णकटिबंधीय प्रदेश असल्याने परिस्थितीनुसार आवश्यक ते बदल करणे गरजेचे आहे. शेतकऱ्यांची तंत्रज्ञान व कौशल्य निपुणता विचारात घेणे, वैज्ञानिक क्लिष्टता टाळणे, कृषी निविष्ठा वाजवी दरात तसेच सरकारी अनुदानावर सहज उपलब्ध करून देणे, जमिनीतील सेन्सर इनपुटसाठी २४ तास वीजपुरवठा, सॅटेलाईट मॅपिंग सपोर्ट, जीपीएस, इंटरनेट ऑफ थिंग्जसाठी नेटवर्क उपलब्धता, ओव्हरहेड लाईट वायर, ट्रान्सफार्मर, पक्षी यामुळे ड्रोनचे तसेच वन्यप्राण्यांमुळे या संयंत्रांचे होणारे नुकसान यासह अन्य महत्त्वाच्या बाबींवर विचार करणे व त्यात सुधारणा करणे अत्यावश्यक आहे.

टॅग्स :farmingशेतीArtificial Intelligenceआर्टिफिशिअल इंटेलिजन्सFarmerशेतकरीnagpurनागपूरVidarbhaविदर्भ