शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तानवर ‘फिरकी बाॅम्ब’; इंडियाचा मैदानावरही 'बदला'; हायव्होल्टेज सामन्यात पाकचा दणदणीत पराभव
2
‘जिल्हा परिषदां’ना बळ मिळेल? पूर्वी जिल्हा परिषद अध्यक्षांना राज्यमंत्री पदाचा दर्जा होता
3
सायबर भामट्यांनी साेडले खात्यात केवळ ८६ रुपये; बोलण्यात गुंतवून पाठवली लिंक
4
मी शिवभक्त, विष गिळून टाकतो, पंतप्रधान मोदींचा विरोधकांवर हल्लाबोल; काँग्रेसने घुसखोरांना प्रोत्साहन दिले, गरिबांना नाकारले
5
महाराष्ट्रात एका वर्षात ‘आयुष्मान’चे लाभार्थी तिप्पट; ग्रामीण भागापर्यंत विस्तार करण्याचे राज्यासमोर आव्हान
6
मोबाइलमध्ये अडकलेली तरुणाई सरस्वतीच्या दरबारात नेणार : विश्वास पाटील
7
प्रभादेवी तिकीट कार्यालयाचे स्थलांतर कुठे? २ ते ३ दिवसांमध्ये जागा निश्चित करणार
8
बांधकामातील बदल, कराने वाढला कोस्टल रोडचा खर्च; महत्त्वाकांक्षी प्रकल्पाच्या शेवटच्या टप्प्यात २ हजार कोटींची वाढ
9
नेपाळच्या आगीत कोण आपली पोळी भाजते आहे?
10
साहित्य संमेलनाध्यक्षपदी ‘पानिपत’कार विश्वास पाटील ; १ ते ४ जानेवारीदरम्यान संमेलन होणार
11
पहलगाम हल्ल्यातील शहीदांना श्रद्धांजली, आजचा विजय भारतीय सैन्यदलाला समर्पित - सूर्यकुमार यादव
12
IND vs PAK : आम्ही काहीच विसरलेलो नाही! दुबईतून टीम इंडियाचा पाकला स्पष्ट संदेश
13
IND vs PAK : सूर्यानं सिक्सर मारत संपवली मॅच! टीम इंडियाचा दबावात दिमाखदार विजय
14
भारत कणखर, अमेरिका झाला हतबल; म्हणे, “आमच्याकडून २५ किलो मक्याचं एक पोतं घ्यायला तयार नाही”
15
“महाराष्ट्रात सामाजिक वीण उसवतेय, समाजात कटूता निर्माण होणारे निर्णय घेतले जातायत”: शरद पवार
16
IND vs PAK : कुलदीप यादवची हॅटट्रिक हुकली; पण पाक विरुद्ध ३ विकेट्स घेत साधला साधला मोठा डाव
17
“ओबीसी असो किंवा मराठा असो, सगळ्या समाजाचे हित हेच सरकार करू शकते”: CM देवेंद्र फडणवीस
18
IND vs PAK : पाकच्या National Anthem ऐवजी DJ वाल्या बाबूनं वाजवलं भलतंच गाणं; व्हिडिओ व्हायरल
19
IND vs PAK : परंपरा मोडत भारतीयांची भावना जपली! सूर्यानं हात न मिळवता पाक कॅप्टनकडे फिरवली पाठ (VIDEO)

६० टक्के ओबीसींचे २७ टक्के राजकीय आरक्षण कायम राखा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 23, 2021 04:09 IST

नागपूर : देशातील ६० टक्के ओबीसींना न्याय द्यावा असे केंद्र सरकारला खरोखरच वाटत असेल तर ओबीसींना मिळणारे सध्याचे २७ ...

नागपूर : देशातील ६० टक्के ओबीसींना न्याय द्यावा असे केंद्र सरकारला खरोखरच वाटत असेल तर ओबीसींना मिळणारे सध्याचे २७ टक्के राजकीय आरक्षण कायम ठेवा आणि ओबीसींची जातनिहाय जनगणना करा, या मागणीचा पुनरूच्चार करीत राष्ट्रीय ओबीसी महासंघाने बुधवारी पुन्हा राष्ट्रपती, पंतप्रधानांसह वरिष्ठ राजकीय नेत्यांना जिल्हाधिकाऱ्यांच्या मार्फत निवेदन सादर केले.

राष्ट्रीय ओबीसी महासंघाच्या पुढाकारात ओबीसींच्या नेत्यांनी एकत्र येऊन नागपुरात गृहमंत्री, सामाजिक न्यायमंत्री, काँग्रेस पक्षाध्यक्ष सोनिया गांधी, राहुल गांधी, राष्ट्रवादीचे नेते शरद पवार आदींनाही निवेदने पाठविली. राज्यात जिल्हा परिषदा व त्याअंतर्गत पंचायत समित्यांच्या पोटनिवडणुकांसाठी आणि पाच ठिकाणच्या जिल्हा परिषदा व पंचायत समितीच्या जागांसाठी ५ ऑक्टोबरला निवडणूक होणार आहे. ही निवडणूक ओबीसी संवर्गाशिवाय होऊ घातल्याने ओबीसी संवर्गाचे २७ टक्के राजकीय आरक्षण धोक्यात आले आहे. सर्वोच्च न्यायालयाने दिलेल्या निकालानुसार तीन अटींनुसार राज्य सरकारने समर्पित आयोगाची स्थापना केली आहे. इम्पॅरिकल डाटा गोळा करणे सुरू केले आहे. तो मिळाल्यावर आरक्षणाचा तक्ता तयार होईल. मात्र, राज्य शासनाने अलीकडेच अध्यादेश काढण्याचा निर्णय जाहीर केला. तक्ता तयार होताना ओबीसी संवर्गात आतापर्यंत मिळत असलेले २७ टक्के राजकीय आरक्षण पूर्णत: न मिळता ते कमी प्रमाणात राहणार आहे. हा ओबीसी समाजासाठी धोका असून, काही वर्षांनंतर ओबीसी समाजाचे राजकीय आरक्षण शून्यावर जाऊ शकते, अशी भीती या निवेदनातून वर्तविण्यात आली आहे.

हा धोका टाळण्यासाठी केंद्राने पुढील जनगणनेत ओबीसी संवर्गाची जातनिहाय जनगणना करावी, संविधानाच्या कलम २४३ (डी) (६) आणि संविधानाच्या कलम २४३ (टी) (६) मध्ये सुधारणा करून ओबीसी संवर्गाला २७ टक्के राजकीय आरक्षणाची तरतूद करावी, सर्वोच्च न्यायालयाने घातलेली आरक्षणाची ५० टक्के मर्यादा रद्द करण्यासाठी घटनेमध्ये सुधारणा करावी, यासह केंद्रात स्वतंत्र ओबीसी मंत्रालयाची स्थापना करून लोकसंख्येच्या प्रमाणात निधी, केंद्र सरकारी कार्यालयात ओबीसींच्या २७ टक्के नोकरीतील रिक्त जागा भरणे तसेच अन्य मागण्यांचाही यात समावेश आहे. महिनाभरात निर्णय न घेतल्यास देशभरात तीव्र आंदोलन उभारण्याचा इशारा देण्यात आला आहे. यावेळी महासंघाचे राष्ट्रीय अध्यक्ष डॉ. बबनराव तायवाडे, प्रा. शरद वानखेडे, सुभाष घाटे, राजकुमार घुले, गुणेश्वर आरीकर, महिला अध्यक्ष सुषमा भड, महाराष्ट्र प्रदेश महिला अध्यक्ष कल्पना मानकर, संजय पन्नासे, मनोज चव्हाण आदींसह शेकडो पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.