शहरं
Join us  
Trending Stories
1
कष्टकऱ्यांचा आधारवड काेसळला: डाॅ. बाबा आढाव यांचे निधन, वयाच्या ९५ व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास
2
वंचित, कष्टकऱ्यांसाठी लढणारा महान संघर्षयोद्धा हरपला; बाबा आढाव यांच्या निधनानंतर पवार-फडणवीसांकडून म्हणून श्रद्धांजली
3
"ठाकरे ब्रँड एकच होता, सध्या राज ठाकरेंचा वापर करून..."; CM देवेंद्र फडणवीसांचे रोखठोक मत
4
"असदुद्दीन ओवेसींचे पूर्वज हिंदू होते, ब्राह्मण कुटुंबात झाला होता जन्म" बृजभूषण शरण सिंह यांचा दावा 
5
IndiGoला मोठा दणका! CEO, COO, बड्या अधिकाऱ्यांना DGCA कडून समन्स, उद्या सकाळी चौकशी
6
“धर्मवीर ३ ची स्क्रिप्ट मलाच लिहावी लागेल, आनंद दिघे...”; एकनाथ शिंदेंनी सांगितले ‘राज’कारण
7
बाबरी मशिदीचे भूमिपूजन करणाऱ्या हुमायूं कबीर यांचा मोठा 'यू-टर्न'; आता काय म्हणाले?
8
1 रुपये 34 पैशांच्या शेअरची कमाल, ₹90 वर गेला भाव, खरेदीसाठी लोकांची झुंबड; आता कंपनीनं केली मोठी घोषणा!
9
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? युतीच्या चर्चांवर जयंत पाटलांकडून मौन; म्हणाले, "याचं उत्तर शोधणार नाही"
10
गोवा अग्निकांडाचे आरोपी इंडिगोच्या फ्लाईटने फुकेतला पसार; पोलीस पोहोचण्याआधीच काढला पळ
11
“...तर २०२९ मध्ये महायुतीच्या हातातून सत्ता जाऊ शकते, मराठे सोपे नाहीत”: मनोज जरांगे पाटील
12
जपानच्या उत्तर किनाऱ्यावर ७.२ रिश्टर स्केलचा तीव्र भूकंप; ३ मीटर उंचीच्या त्सुनामीचा इशारा
13
"कोण बसवणार आहे मला? काय बोलताय"; 'वंदे मातरम्'वर बोलत असताना राजनाथ सिंह प्रचंड भडकले
14
'क्वीन इज बॅक'..! कणखर मानसिकतेची 'रन'रागिणी! स्मृती मानधना पुन्हा मैदानात उतरण्याच्या तयारीत
15
“मंत्री येणार म्हणून फक्त देखावा नको, ३६५ दिवस प्रवाशांना सेवा द्या”: मंत्री प्रताप सरनाईक
16
लग्न करताच 'या' कपलला मिळतात 2.5 लाख रुपये, 90% लोकांना ही योजनाच माहीत नाही!
17
VIDEO: नववधूला सरप्राईज! शेजारी बसलेला नवरदेव अचानक उठला अन् सुरु केला भन्नाट डान्स
18
भाजपाच्या मित्रपक्षातील नेत्याचे बाबरी मशि‍दीला समर्थन; म्हणाले, “मुस्लीम समजाला अधिकार...”
19
"जेवढ्या दिवसांपासून मोदी PM आहेत, जवळपास तेवढे दिवस नेहरू जेलमध्ये होते"; 'वंदे मातरम'वरील चर्चेदरम्यान प्रियांका गांधींचा निशाणा
20
निवृत्तीसाठी कोणता फंड सर्वोत्तम? EPF, PPF की NPS? कोणासाठी कोणती योजना चांगली? वाचा तज्ज्ञांचा सल्ला
Daily Top 2Weekly Top 5

Vidhan Sabha 2019: आमदारकी सोडणाऱ्या आशिष देशमुखांचे पुनर्वसन होणार का ?

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 17, 2019 08:22 IST

महाराष्ट्र विधानसभा निवडणूक 2019 -आशिष देशमुख यांनी २००९ मध्ये काँग्रेस सोडून भाजपमध्ये प्रवेश केला होता. सावनेर मतदारसंघातून ते भाजपकडून लढले. पण थोड्या अंतराने पराभूत झाले.

कमलेश वानखेडे

नागपूर : लोकसभा निवडणुकीच्या पूर्वी नाना पटोले यांनी खासदारकीचा व आशिष देशमुख यांनीही काटोलच्या आमदारकीचा राजीनामा देत भाजपाही सोडली. पुढे पटोले यांना काँग्रेसने नागपूर लोकसभेची उमेदवारी देऊ केली. मात्र, आता आशिष देशमुख यांना विधानसभेचे तिकीट देऊन त्यांचे पुनर्वसन होते का, याकडे राजकीय वर्तुळाचे लक्ष लागले आहे.

आशिष देशमुख यांनी २००९ मध्ये काँग्रेस सोडून भाजपमध्ये प्रवेश केला होता. सावनेर मतदारसंघातून ते भाजपकडून लढले. पण थोड्या अंतराने पराभूत झाले. त्यानंतर २०१४ मध्ये त्यांनी मतदारसंघ बदलला व काटोलमध्ये स्वत:चे काका माजी मंत्री अनिल देशमुख यांच्या विरोधात भाजपकडून उभे ठाकले. या निवडणुकीत पुतण्याने काकांचा पराभव केला. आशिष देशमुख आमदार झाले. मात्र, ते फार काळ भाजपमध्ये रमू शकले नाहीत. त्यांनी वेगवेगळ्या मुद्यांवरून भाजपवर नेम साधण्यास सुरुवात केली. शेवटी लोकसभा निवडणुकीच्यापूर्वी त्यांनी आमदारकीचा राजीनामा दिला व पुन्हा काँग्रेसचा ‘हात’ धरला. मात्र, आता आगामी विधानसभा निवडणुकीत काँग्रेस त्यांना ‘हात’ देईल की हात दाखवेल, असा प्रश्न निर्माण झाला आहे.

आशिष देशमुख यांनी लोकसभा निवडणुकीत नागपुरातून काँग्रेसचे तिकीट मिळविण्यासाठी दिल्ली दरबारी बरेच प्रयत्न केले. पण नाना पटोले यांनी हात मारला. आता देशमुख यांच्यासाठी जिल्ह्यात तसा कुठलाही मतदारसंघ नाही. मात्र, मिळेल त्या मतदारसंघातून लढण्याची त्यांची तयारी आहे. मात्र, त्यानंतरही त्यांना तिकीट मिळेलच याची खात्री नाही. शिवाय आता काँग्रेस-राष्ट्रवादी सोडून जो तो भाजपकडे धाव घेत असल्याचे चित्र आहे. त्यामुळे देशमुख यांनी भाजपची आमदारकी सोडून चूक तर केली नाही ना, अशी चर्चा आता त्यांच्या समर्थकांसह जिल्ह्याच्या राजकीय वर्तुळात रंगू लागली आहे. विशेष म्हणजे पुन्हा भाजपवासी होण्याचे त्यांचे सारेच रस्ते बंद झाले आहेत.

टॅग्स :Ashish Deshmukhआशीष देशमुखkatol-acकॅटोलMaharashtra Assembly Election 2019महाराष्ट्र विधानसभा निवडणूक 2019congressकाँग्रेसBJPभाजपा