शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तानात गृहयुद्ध! बलूचिस्तानात बंडखोरांसोबत झालेल्या झटापटीत पाक सैन्याचे २३ जवान ठार
2
राजा रघुवंशी प्रकरणात समोर आले आणखी एक नाव, सोनम-राजशी आहे थेट कनेक्शन! कोण आहे 'हा' व्यक्ती? 
3
काल निवृत्ती, आज लगेच दुसऱ्या संघाचा कर्णधार... 'या' स्टार खेळाडूला मिळाली मोठी जबाबदारी
4
स्वस्तात ऑनलाईन वस्तू विकणाऱ्या 'मीशो'चं नाव बदललं! का घेतला मोठा निर्णय?
5
रस्त्यावर महिला दिसताच धावत जाऊन घ्यायचा चुंबन, 'सायको किसर'ला पोलिसांनी घातल्या बेड्या!
6
एकेकाळी शून्य झालेली अनिल अंबानींची नेटवर्थ, आता जबरदस्त कमबॅक; 'या' दोन कंपन्यांनी केलं मालामाल
7
ऑपरेशन सिंदूरदरम्यान कुणाचं झालं सर्वाधिक नुकसान? अमेरिकन रिपोर्टमधून धक्कादायक माहिती उघड
8
ट्रम्प-मस्क वादात नवा ट्विस्ट; आता टेस्ला प्रमुखांना होतोय 'या' गोष्टीचा पश्चाताप, म्हणाले...
9
Sonam Raghuwanshi: हत्या होण्यापूर्वी राजा रघुवंशी सोनमसोबत इथे थांबला होता, पहा व्हिडीओ
10
राजाच्या रक्तानं माखलेलं जॅकेट फेकलं अन् आकाशला...; 'बेवफा' सोनमनं काय काय केलं?
11
Raja Raghuvanshi Murder: कोण आहे अल्बर्ट पीडी? ज्याच्या एका जबाबामुळे सोनम रघुवंशीचा खरा चेहरा जगासमोर आला
12
स्वत:च्या फायद्यासाठी महिलांना वेश्या व्यवसायात ढकललं, आरोपींना अटक; १० जणांची सुटका!
13
प्रसिद्ध टीव्ही अभिनेत्री झाली आई, दोन दिवसांपूर्वीच घरी आला छोटा पाहुणा; मुलगा की मुलगी?
14
'काम करु नका, मुले जन्माला घाला'! लोकसंख्या वाढीसाठी 'या' देशाने काढले फर्मान
15
Sonam Raghuvanshi : "मी कोणाशीही लग्न केलं तरी मी तुझीच गर्लफ्रेंड...", सोनमसमोर स्टेजवर ढसाढसा रडला राज
16
डिलिव्हरी फ्री, पॅकेजिंग फ्री फक्त... रॅपिडोची फूड डिलिव्हरी बाजारात एन्ट्री! झोमॅटो-स्विगी टेन्शनमध्ये?
17
Vastu Tips: आर्थिक संकट असो वा जुना आजार; झोपण्यापूर्वी 'या' उपायाने मिळेल समाधान!
18
राजा रघुवंशी हत्याकांडावर सीमा हैदरच्या वकिलांचं मोठं विधान, म्हणाले - 'इस्लाम धर्मात...!'
19
महाराष्ट्रात मद्याच्या किंमतीत वाढ; दारूचं उत्पादन करणाऱ्या कंपन्यांचे शेअर्स आपटले
20
सुप्रिया सुळेंनी पंतप्रधान मोदींना भेट दिली दोन खास पुस्तकं, काय आहेत नावं?

Vidhan Sabha 2019: आमदारकी सोडणाऱ्या आशिष देशमुखांचे पुनर्वसन होणार का ?

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 17, 2019 08:22 IST

महाराष्ट्र विधानसभा निवडणूक 2019 -आशिष देशमुख यांनी २००९ मध्ये काँग्रेस सोडून भाजपमध्ये प्रवेश केला होता. सावनेर मतदारसंघातून ते भाजपकडून लढले. पण थोड्या अंतराने पराभूत झाले.

कमलेश वानखेडे

नागपूर : लोकसभा निवडणुकीच्या पूर्वी नाना पटोले यांनी खासदारकीचा व आशिष देशमुख यांनीही काटोलच्या आमदारकीचा राजीनामा देत भाजपाही सोडली. पुढे पटोले यांना काँग्रेसने नागपूर लोकसभेची उमेदवारी देऊ केली. मात्र, आता आशिष देशमुख यांना विधानसभेचे तिकीट देऊन त्यांचे पुनर्वसन होते का, याकडे राजकीय वर्तुळाचे लक्ष लागले आहे.

आशिष देशमुख यांनी २००९ मध्ये काँग्रेस सोडून भाजपमध्ये प्रवेश केला होता. सावनेर मतदारसंघातून ते भाजपकडून लढले. पण थोड्या अंतराने पराभूत झाले. त्यानंतर २०१४ मध्ये त्यांनी मतदारसंघ बदलला व काटोलमध्ये स्वत:चे काका माजी मंत्री अनिल देशमुख यांच्या विरोधात भाजपकडून उभे ठाकले. या निवडणुकीत पुतण्याने काकांचा पराभव केला. आशिष देशमुख आमदार झाले. मात्र, ते फार काळ भाजपमध्ये रमू शकले नाहीत. त्यांनी वेगवेगळ्या मुद्यांवरून भाजपवर नेम साधण्यास सुरुवात केली. शेवटी लोकसभा निवडणुकीच्यापूर्वी त्यांनी आमदारकीचा राजीनामा दिला व पुन्हा काँग्रेसचा ‘हात’ धरला. मात्र, आता आगामी विधानसभा निवडणुकीत काँग्रेस त्यांना ‘हात’ देईल की हात दाखवेल, असा प्रश्न निर्माण झाला आहे.

आशिष देशमुख यांनी लोकसभा निवडणुकीत नागपुरातून काँग्रेसचे तिकीट मिळविण्यासाठी दिल्ली दरबारी बरेच प्रयत्न केले. पण नाना पटोले यांनी हात मारला. आता देशमुख यांच्यासाठी जिल्ह्यात तसा कुठलाही मतदारसंघ नाही. मात्र, मिळेल त्या मतदारसंघातून लढण्याची त्यांची तयारी आहे. मात्र, त्यानंतरही त्यांना तिकीट मिळेलच याची खात्री नाही. शिवाय आता काँग्रेस-राष्ट्रवादी सोडून जो तो भाजपकडे धाव घेत असल्याचे चित्र आहे. त्यामुळे देशमुख यांनी भाजपची आमदारकी सोडून चूक तर केली नाही ना, अशी चर्चा आता त्यांच्या समर्थकांसह जिल्ह्याच्या राजकीय वर्तुळात रंगू लागली आहे. विशेष म्हणजे पुन्हा भाजपवासी होण्याचे त्यांचे सारेच रस्ते बंद झाले आहेत.

टॅग्स :Ashish Deshmukhआशीष देशमुखkatol-acकॅटोलMaharashtra Assembly Election 2019महाराष्ट्र विधानसभा निवडणूक 2019congressकाँग्रेसBJPभाजपा