शहरं
Join us  
Trending Stories
1
'सर्वात मोठा शत्रू म्हणजे परावलंबन'; टॅरिफ वाद आणि H-1B व्हिसासंदर्भातील बदलानंतर, काय म्हणाले पंतप्रधान मोदी?
2
MSRTC: एसटी महामंडळात १७ हजारांहून अधिक पदांची भरती; चालक आणि सहाय्यक नेमणार, 'इतका' पगार!
3
हाफिज सईदने दहशतवादी संघटना जैश-ए-मोहम्मदचे नाव बदलले; आता 'अल-मुराबितुन' नावाने पैसे गोळा करणार
4
५०% सूट, ८०% सूट... कपडे आणि बुटांच्या दुकांनावर आता अशा ऑफर्स दिसणार नाहीत! GST कपातीशी संबंध काय?
5
शाहिद आफ्रिदीचं इरफान पठाणला आव्हान, म्हणाला, ‘’मर्द असशील तर…”, मिळालं असं प्रत्युत्तर
6
नागपूरमध्ये मनोज जायस्वाल यांना अटक, सीबीआयची हॉटेलमध्ये कारवाई; 4000 कोटींची केस काय?
7
मोलकरणीने मालकिणीच्या 'थप्पड'चा असा घेतला बदला, वाचून तुमच्याही भुवया उंचावतील!
8
'टॅरिफ'नंतर ट्रम्प यांचा नवा फतवा! भारतीयांसाठी 'अमेरिकन ड्रीम' महागणार! Visa साठी भरावे लागणार ₹८८ लाख
9
'शिंदे, पवार अन् भाजपचे ९०% आमदार मते चोरुन निवडून आले', संजय राऊतांचे टीकास्त्र
10
IND-Pak हँडशेकवरून लढत राहिले; तिकडे या संघाचा कप्तान भारतीय वंशाचा, अर्धे खेळाडू पाकिस्तानी वंशाचे निघाले
11
मारुतीनंतर महिंद्राचे GST रेट आले...! स्कॉर्पिओ एनपेक्षा XUV 700 स्वस्त झाली, बोलेरो निओ तर...
12
हृदयद्रावक! जुळ्या मुलांनी आईला मारलेली मिठी; ढिगाऱ्याखालील मृतदेह पाहून अख्खं गाव रडलं
13
VIRAL : सलाम तिच्या हिमतीला! 'मौत का कुआं'मध्ये बाईक चालवणाऱ्या तरुणीचा व्हिडीओ पाहून अंगावर काटा येईल
14
VIDEO: हार्दिक पांड्याने सीमारेषेवर धावत-पळत, कसरत करत घेतला भन्नाट झेल, पाहणारेही थक्क
15
भारत टेन्शन फ्री... ४ वर्षात जे झालं नव्हतं ते आता झालं, 'हा' कोणता साठा आता जमा झाला?
16
"त्या २४८ शेतकऱ्यांना तीन महिन्यांत कर्जमाफी द्या", उच्च न्यायालयाने राज्य सरकारला झापले, आदेश काय?
17
घरची गरिबी, टोमणे सहन केले, पण मानली नाही हार, बनली बॉक्सिंगमध्ये वर्ल्ड चॅम्पियन, कोण आहे मीनाक्षी हुड्डा
18
हसत हसतच पाण्याच उतरलेला, क्षणात होत्याचं नव्हतं झालं; जुबीन गर्गचा शेवटचा Video व्हायरल
19
Zero GST Product List: सोमवारपासून या वस्तू '0' जीएसटीत येणार, तुम्ही पाहिल्यात का? 
20
Akshay Kumar : सातवीत नापास झाला होता अभिनेता अक्षय कुमार; लहानपणी पाहिलेलं 'हे' स्वप्न

विजेसाठी महाराष्ट्र खासगी यंत्रणा आणि केंद्राच्या भरवशावर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 14, 2020 10:05 IST

ऊर्जा क्षेत्रामध्ये आत्मनिर्भर असल्याचा दावा करणारा महाराष्ट्र प्रत्यक्षात मात्र खासगी कंपन्या आणि केंद्राकडून होणाऱ्या वीजपुरवठ्यामुळेच विजेच्या टंचाईच्या दिवसात निभावून नेत आहे.

कमल शर्मालोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : ऊर्जा क्षेत्रामध्ये आत्मनिर्भर असल्याचा दावा करणारा महाराष्ट्र प्रत्यक्षात मात्र खासगी कंपन्या आणि केंद्राकडून होणाऱ्या वीजपुरवठ्यामुळेच विजेच्या टंचाईच्या दिवसात निभावून नेत आहे. राज्यात सध्या १७ हजार मेगावॅटपेक्षा अधिक विजेची मागणी आहे. मात्र सरकारी कंपनी महाजनकोच्या संयत्रांमधून केवळ ४,७३५ मेगावॅट वीज मिळते. उर्वारित वीज खासगी कंपन्या आणि केंद्रासोबतच पॉवर एक्सचेंजमधूनही घेतली जात आहे, या आकडेवारीवरून परिस्थतीचा अंदाज लावला जात आहे.१३ मेच्या दुपारची विजेची मागणी आणि पुरवठ्याची स्थिती लक्षात घेतली तर, राज्यात एकूण १७,५७६ मेगावॅट विजेची मागणी होती. लॉकडाऊनच्या काळात औद्योगिक कंपन्या सुरू झाल्याने मागणीतही रोज वाढ दिसत आहे. महाजनकोने या दरम्यान १०,४२२ मेगावॅट (हायड्रो पॉवर वगळता) या स्थापित क्षमतेच्या ऐवजी ४,७३५ मेगावॅॅटचे उत्पादन केले. महावितरणने ही मागणी पूर्ण केली. परंतु यात ३,५८८ मेगावॅटचे योगदान खासगी संयंत्रांचे होते. केंद्र सरकारची कंपनी एनटीपीसीने ३,५८८ मेगावॅटचे योगदान दिले. एनटीपीसीचे महाराष्ट्रातील मौदा आणि सोलापूर येथील संयंत्र ठप्प पडल्यावर हे घडले. प्रत्यक्षात या दरम्यान हायड्रो पॉवरने १,४०९ मेगावॅट वीज दिली होती. यात कोयना प्रकल्पाचे योगदान १,२२८ मेगावॅट होते. मात्र रात्रीतूनच हा आकडा २३२ खाली घसरला. त्याचप्रमाणे १,७०० मेगावॅट पॉवर एक्सचेंजकडून तसेच ८२० मेगावॅट वीज अन्य स्रोतांकडून घेण्यात आली होती.३ केंद्रे व १२ युनिट्स बंदतिकडे महाजनकोची तीन औष्णिक केंदे्र ठप्प पडली आहेत. यात कोराडी, नाशिक आणि भुसावळ केंद्रांचा समावेश आहे. या सोबतच एकूण १२ वीज युनिट बंद पडले आहेत. महाजनकोच्या मते लॉकडाऊनमध्ये विजेची मागणी मंदावली होती. यामुळे महागडी संयंत्रे बंद केली होती. मागणी वाढल्याने आता ती सुरू केली जातील. दुसरीकडे महावितरणने खासगी संयंत्रांची वीज स्वस्त असल्याचा दावा केला आहे. त्यांची वीज खरेदी न केल्यास दंड भरावा लागतो. त्यामुळे महाजनकोच्या विजेचा वापर कमी होत आहे, असे त्यांनी म्हटले आहे.

 

टॅग्स :electricityवीज