शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तानात मोठी कारवाई! खैबर पख्तूनख्वा प्रांतात घुसखोरी करणारे ५४ TTP समर्थक ठार
2
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित एक ओव्हर नाही टिकला; पण दोन चेंडूत विराटची बरोबरी करून परतला
3
मध्य प्रदेशात भीषण अपघात; भरधाव कार विहिरीत कोसळली, 12 जणांचा मृत्यू
4
"शरद पवारांनी जाणीवपूर्वक 'ते' वक्तव्य केले"; पहलगामबाबतच्या 'त्या' विधानावरुन भुजबळांचे स्पष्टीकरण
5
पाकिस्तानात भीतीचे वातावरण; लष्कर प्रमुखानंतर बिलावल भुट्टोचे कुटुंबीय देश सोडून पळाले
6
जसप्रीत बुमराहची रेकॉर्ड ब्रेक स्पेल; मुंबई इंडियन्सकडून 'अशी' कामगिरी करणारा पहिलाच!
7
सीमेवर तणाव वाढताच पाकिस्तानने चीनकडे मागितले १.४ बिलियन डॉलर
8
"लाडक्या बहि‍णी १५०० मध्ये खूष, २१०० रुपये देऊ असं कुणीच म्हटलं नाही"; नरहरी झिरवाळांचे विधान
9
MI vs LSG : बॅटिंग-बॉलिंग सगळ्यात भारी! पुन्हा दिसतोय MI चा चॅम्पियनवाला तोरा
10
IPL 2025: गगनचुंबी षटकार तोही बुमराहला; बिश्नोईचा आनंद गगनात मावेना! पंतची रिॲक्शनही व्हायरल (VIDEO)
11
Suryakumar Yadav : ...अन् सूर्या भाऊ ठरला IPL मध्ये सर्वात कमी चेंडूत ४००० धावा करणारा भारतीय
12
व्हाईट बॉल क्रिकेटमध्ये स्मृती मानधनाची ऐतिहासिक कामगिरी, मेग लॅनिंगचाही विक्रम मोडला!
13
"पहलगाममधील मृतांच्या कुटुंबीयांना नागरी शौर्य पुरस्कार द्या"; सुप्रिया सुळेंचे CM फडणवीसांना पत्र
14
सूर्यकुमार अन् रायनचा झंझावात, नमन धिरनेही चोपले; लखनौसमोर 216 धावांचे आव्हान...
15
दहशतवादी हल्ल्यानंतर अतुल कुलकर्णी पोहोचले काश्मीरला, म्हणाले- "इथे सध्या सुरक्षित असून..."
16
"हिंमत असेल बोलून दाखवा की भारतीय सैन्यात..."; शहीद सैनिकाला निरोप देताना भावाचे अंगावर काटा आणणारे भाषण
17
मदरसे, मशिदी तीन दिवसांत ओस पडल्या! स्ट्राईक होणार या शक्यतेने दहशतवादी पळाले
18
लंकेत टीम इंडियाचा डंका! आधी स्नेह राणाचा जलवा! मग सृती, हरलीनसह प्रतिकानं लुटली मैफिल
19
BRICS ची महत्वपूर्ण बैठक; परराष्ट्र मंत्री अन् राष्ट्रीय सुरक्षा सल्लागारांची अनुपस्थिती, कारण काय...
20
राणा सांगा वाद! सपा खासदार रामजीलाल सुमन यांच्या ताफ्यावर हल्ला; अनेक वाहनांचे नुकसान...

विजेसाठी महाराष्ट्र खासगी यंत्रणा आणि केंद्राच्या भरवशावर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 14, 2020 10:05 IST

ऊर्जा क्षेत्रामध्ये आत्मनिर्भर असल्याचा दावा करणारा महाराष्ट्र प्रत्यक्षात मात्र खासगी कंपन्या आणि केंद्राकडून होणाऱ्या वीजपुरवठ्यामुळेच विजेच्या टंचाईच्या दिवसात निभावून नेत आहे.

कमल शर्मालोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : ऊर्जा क्षेत्रामध्ये आत्मनिर्भर असल्याचा दावा करणारा महाराष्ट्र प्रत्यक्षात मात्र खासगी कंपन्या आणि केंद्राकडून होणाऱ्या वीजपुरवठ्यामुळेच विजेच्या टंचाईच्या दिवसात निभावून नेत आहे. राज्यात सध्या १७ हजार मेगावॅटपेक्षा अधिक विजेची मागणी आहे. मात्र सरकारी कंपनी महाजनकोच्या संयत्रांमधून केवळ ४,७३५ मेगावॅट वीज मिळते. उर्वारित वीज खासगी कंपन्या आणि केंद्रासोबतच पॉवर एक्सचेंजमधूनही घेतली जात आहे, या आकडेवारीवरून परिस्थतीचा अंदाज लावला जात आहे.१३ मेच्या दुपारची विजेची मागणी आणि पुरवठ्याची स्थिती लक्षात घेतली तर, राज्यात एकूण १७,५७६ मेगावॅट विजेची मागणी होती. लॉकडाऊनच्या काळात औद्योगिक कंपन्या सुरू झाल्याने मागणीतही रोज वाढ दिसत आहे. महाजनकोने या दरम्यान १०,४२२ मेगावॅट (हायड्रो पॉवर वगळता) या स्थापित क्षमतेच्या ऐवजी ४,७३५ मेगावॅॅटचे उत्पादन केले. महावितरणने ही मागणी पूर्ण केली. परंतु यात ३,५८८ मेगावॅटचे योगदान खासगी संयंत्रांचे होते. केंद्र सरकारची कंपनी एनटीपीसीने ३,५८८ मेगावॅटचे योगदान दिले. एनटीपीसीचे महाराष्ट्रातील मौदा आणि सोलापूर येथील संयंत्र ठप्प पडल्यावर हे घडले. प्रत्यक्षात या दरम्यान हायड्रो पॉवरने १,४०९ मेगावॅट वीज दिली होती. यात कोयना प्रकल्पाचे योगदान १,२२८ मेगावॅट होते. मात्र रात्रीतूनच हा आकडा २३२ खाली घसरला. त्याचप्रमाणे १,७०० मेगावॅट पॉवर एक्सचेंजकडून तसेच ८२० मेगावॅट वीज अन्य स्रोतांकडून घेण्यात आली होती.३ केंद्रे व १२ युनिट्स बंदतिकडे महाजनकोची तीन औष्णिक केंदे्र ठप्प पडली आहेत. यात कोराडी, नाशिक आणि भुसावळ केंद्रांचा समावेश आहे. या सोबतच एकूण १२ वीज युनिट बंद पडले आहेत. महाजनकोच्या मते लॉकडाऊनमध्ये विजेची मागणी मंदावली होती. यामुळे महागडी संयंत्रे बंद केली होती. मागणी वाढल्याने आता ती सुरू केली जातील. दुसरीकडे महावितरणने खासगी संयंत्रांची वीज स्वस्त असल्याचा दावा केला आहे. त्यांची वीज खरेदी न केल्यास दंड भरावा लागतो. त्यामुळे महाजनकोच्या विजेचा वापर कमी होत आहे, असे त्यांनी म्हटले आहे.

 

टॅग्स :electricityवीज