शहरं
Join us  
Trending Stories
1
फास्टॅग पास एक्स्प्रेस हायवे, समृद्धी, अटल सेतूवरही लागू होणार? जाणून घ्या, नेमका कुठे फायदा होणार
2
एअर इंडियाच्या अपघातात विमा धारकाचाही मृत्यू अन् नॉमिनीचाही; विमा कंपन्या पेचात सापडल्या, इरडाचे तर स्पष्ट आदेश आहेत...
3
हजारो जीव वाचणार! आपत्कालीन परिस्थितीत विमानातील प्रवाशांचे केबिन वेगळे होणार, युक्रेनियन अभियंत्याने केले डिझाइन
4
काहीतरी विपरित घडणार? तामिळनाडूत आढळली Doomsday fish; सोशल मीडियावर वेगळीच चर्चा
5
लग्नासाठी गोव्याला घेऊन गेला, पण तिथेच नेऊन खेळ संपवला! माथेफिरू प्रियकराला अटक
6
आतापर्यंत इस्रायलच्या हल्ल्यात इराणचे किती लोक मारले गेले? आकडा पाहून धक्का बसेल; तेहरान सोडून पळ काढणाऱ्यांचीही लागली रांग
7
इतिहासाची पुनरावृत्ती... तारीख, दिवस अन् घटनाही त्याच; ८४ वर्षापूर्वी घडलेले, सेम टू सेम...
8
एका दिवसांत किती वेळाही Toll क्रॉस करा; वार्षिक पासमुळे सामान्यांना काय होणार फायदा?
9
१९९५पासूनचा बालेकिल्ला ढासळला, कोकणात ठाकरे गटाला धक्का; माजी आमदार, नेते NCP अजित पवार गटात
10
'मनसेसोबत युती केली तरच फायदा होईल'; उद्धव ठाकरेंच्या बैठकीत राज ठाकरेंसोबत जाण्याचा 'सूर'
11
महापालिका निवडणुकीचे वारे वाहताच, उल्हासनगरात ठाकरेसेनेच्या पदाधिकाऱ्याच्या घरावर पेट्रोल टाकून पेटविण्याचा प्रयत्न
12
पंतप्रधान मोदींच्या दौऱ्याने चर्चेत आलाय 'हा' छोटासा देश, तुम्हीही बनवू शकता फिरायचा प्लान!
13
'आमच्यावर युद्ध लादले; आत्मसमर्पण करणार नाही', खमेनी यांचा इस्रायसह अमेरिकेलाही थेट इशारा
14
राजा रघुवंशी नव्हे, 'या' व्यक्तीशी होणार होतं सोनमचं लग्न, २५ गुणही जुळलेले! मग का मोडलं नातं? 
15
जिद्दीला सॅल्यूट! २३ वेळा अपयश पण मानली नाही हार; शेतकऱ्याचा लेक झाला असिस्टंट कमांडंट
16
आमच्या कार चालवायचे थांबवा! सिट्रोएनने C3 साठी युरोपमध्ये जारी केला इशारा
17
भाजपा सरकारच्या ‘या’ निर्णयाचे जयंत पाटलांनी केले स्वागत; गडकरींचा उल्लेख करत म्हणाले...
18
कुंडलीतच पतीच्या हत्येचा योग...! राजापूर्वी दुसऱ्याच मुलासोबत ठरलं होतं सोनमचं लग्न, पंडितजींनी वाचवलं
19
Ashadhi Ekadashi 2025: विठ्ठल नामोच्चारात हृदयविकार टाळण्याची ताकद? वैद्यकीय संशोधन सांगते...
20
उत्पन्न वाढलं, महागाईही नियंत्रणात पण खिशात पैसेच शिल्लक राहत नाहीत; बचत झाली कमी, कर्ज वाढली

वैतागलेल्या शेतमालकाकडून मंत्रालय उडवून देण्याचा फोन; प्रशासनाची उडाली होती खळबळ

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 30, 2021 20:31 IST

पोलिसांकडून उमरेडच्या व्यक्तीची चौकशी

नागपूर : शासनाने अधिग्रहित केलेल्या शेत जमिनी संदर्भातील वादात न्याय मिळत नसल्याची भावना झाल्याने वैतागलेल्या एका शेतजमीन मालकाने थेट मंत्रालय उडवून देण्याचा मुंबईत फोन केला. त्यामुळे रविवारी दुपारपासून राज्यभर खळबळ उडाली आहे. हादरलेल्या पोलीस प्रशासनाने संबंधित व्यक्तीची चौकशी चालवली आहे. सागर काशीनाथ मांढरे (४०) असे त्याचे नाव असून ते नागपूर जिल्ह्यातील उमरेड पोलीस ठाण्याच्या हद्दीत राहतात.

सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, मुंबई येथील मंत्रालयात बॉम्ब पेरण्यात आला असून मंत्रालय उडवून देणार असल्याचा फोन कॉल रविवारी दुपारी मुंबईत करण्यात आला. त्यामुळे सुरक्षा यंत्रणांमध्ये प्रचंड खळबळ उडाली. चौकशीत हा फोन कॉल नागपूर जिल्ह्यातील उमरेड येथून करण्यात आल्याचे लक्षात आल्यानंतर मुंबईतील पोलिस अधिकाऱ्यांनी नागपूर ग्रामीणचे पोलिस अधीक्षक राकेश ओला यांच्याशी संपर्क साधला. पोलीस अधिक्षक ओला यांनी लगेच आपली यंत्रणा कामी लावली.

उमरेड परिसरातील सागर मांढरे यांना शोधून काढून सायंकाळी त्यांची चौकशी सुरू केली. सूत्रांच्या माहितीनुसार, तो फोन आपणच केल्याचे मांढरे यांनी कबूल केले. त्यामागची पार्श्वभूमी सांगतांना ते म्हणाले की, जिल्ह्यातील उमरेड जवळच्या मकरधोकडा येथे आमची शेतजमीन होती. जी १९९६ मध्ये शासनाने (वेकोली) अधिग्रहित केली. परंतु त्याचा योग्य तो मोबदला मिळाला नाही.

या संबंधाने गेल्या २४ वर्षांपासून ते शासनासोबत पत्रव्यवहार करत आहे.संबंधित अधिकाऱ्यांकडे अपिलही केले. मात्र कुठूनच न्याय मिळत नसल्यामुळे आपल्याला प्रचंड नैराश्य आल्याचे आणि त्यातूनच हा फोन कॉल केल्याचे मांढरे यांनी पोलिसांना सांगितल्याचे समजते. मांढरे यांच्या चौकशीचा प्राथमिक अहवाल मुंबईला कळविण्यात आला असून तेथील अधिकाऱ्यांची एक चमू मांढरे यांची चौकशी करणार असल्याचे समजते.

टॅग्स :Mantralayaमंत्रालयMaharashtraमहाराष्ट्रnagpurनागपूरPoliceपोलिस