शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Nagar Parishad Election Results 2025 Live: चांदा ते बांदा आज नगरपरिषद अन् नगरपंचायतीचा निकाल; दहा वाजता मतमोजणीस होणार सुरुवात
2
नगरांवर सत्ता कोणाची? आज फैसला; एक्झिट पोल काय सांगतात? महाविकास आघाडीचे काय होणार...
3
बांगलादेशात उग्र आंदोलन! जमावाने ७ वर्षाच्या मुलीलाही जिवंत जाळलं; हिंसाचारात माणुसकी मेली
4
'माझ्यावर वारंवार बलात्कार केला, मला न्याय द्या'; हाजी मस्तानची मुलगी हसीन मस्तानने पीएम मोदी आणि अमित शहा यांच्याकडे मागितली मदत
5
रहस्यमय! २४ तासांत गायब झाल्या १६ एपस्टीन फाईल्स; डोनाल्ड ट्रम्प यांच्या फोटोचाही समावेश
6
अंबरनाथमध्ये ५४.५०% मतदान; या ठिकाणी निवडणुका झाल्या बिनविरोध
7
नोरा फतेहीच्या कारचा मुंबईत अपघात; मद्यधुंद चालकाने दिली धडक, अभिनेत्रीची प्रकृती कशी?
8
हृदयद्रावक! कळपाला धडकली 'राजधानी'; ७ हत्ती चिरडले, पिल्लू जखमी
9
लालसा, अहंकारामुळे भावंडांमध्ये दुरावा; उच्च न्यायालयाचे निरीक्षण; बहिणीविरोधात ज्येष्ठ नागरिकाचा मानहानी दावा
10
'टी-२०' विश्वचषकासाठी संघ जाहीर : गिलचा पत्ता कट; इशान, रिंकूला संधी
11
इशानने घेतला गिलचा बळी,  गोल्डन बॉय म्हणून किती दिवस संघात राहणार...
12
एपस्टीन फाइल्समध्ये 'मालिश तंत्र' अन् भारतीय आयुर्वेदाचा उल्लेख
13
अंबरनाथमधील हॉलमधून १७३ संशयित व्यक्तींना घेतले ताब्यात, बोगस मतदार असल्याचा काँग्रेस, भाजपचा आरोप
14
मुंबईत काँग्रेसला आता धर्मनिरपेक्ष मते आठवली, ठाकरेंची साथ नको, एकटे लढणार; वंचितसाठी दरवाजे खुले ?
15
Ishan Kishan इतके दिवस टीम इंडियात का नव्हता? 'त्या' दोघांची नावं घेत आगरकरने दिलं उत्तर
16
१५०हून जास्त कॉम्प्युटर्स लुटले, कँटीनची तोडफोड; बांगलादेशात जमावाचा मीडिया हाऊसवर हल्ला
17
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ९४ व्या वर्षी निधन
18
मुंबईप्रमाणे सर्व मनपात काँग्रेस स्वबळावर लढणार की महाविकास आघाडीत? रमेश चेन्नीथला म्हणाले…
19
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
20
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
Daily Top 2Weekly Top 5

वैतागलेल्या शेतमालकाकडून मंत्रालय उडवून देण्याचा फोन; प्रशासनाची उडाली होती खळबळ

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 30, 2021 20:31 IST

पोलिसांकडून उमरेडच्या व्यक्तीची चौकशी

नागपूर : शासनाने अधिग्रहित केलेल्या शेत जमिनी संदर्भातील वादात न्याय मिळत नसल्याची भावना झाल्याने वैतागलेल्या एका शेतजमीन मालकाने थेट मंत्रालय उडवून देण्याचा मुंबईत फोन केला. त्यामुळे रविवारी दुपारपासून राज्यभर खळबळ उडाली आहे. हादरलेल्या पोलीस प्रशासनाने संबंधित व्यक्तीची चौकशी चालवली आहे. सागर काशीनाथ मांढरे (४०) असे त्याचे नाव असून ते नागपूर जिल्ह्यातील उमरेड पोलीस ठाण्याच्या हद्दीत राहतात.

सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, मुंबई येथील मंत्रालयात बॉम्ब पेरण्यात आला असून मंत्रालय उडवून देणार असल्याचा फोन कॉल रविवारी दुपारी मुंबईत करण्यात आला. त्यामुळे सुरक्षा यंत्रणांमध्ये प्रचंड खळबळ उडाली. चौकशीत हा फोन कॉल नागपूर जिल्ह्यातील उमरेड येथून करण्यात आल्याचे लक्षात आल्यानंतर मुंबईतील पोलिस अधिकाऱ्यांनी नागपूर ग्रामीणचे पोलिस अधीक्षक राकेश ओला यांच्याशी संपर्क साधला. पोलीस अधिक्षक ओला यांनी लगेच आपली यंत्रणा कामी लावली.

उमरेड परिसरातील सागर मांढरे यांना शोधून काढून सायंकाळी त्यांची चौकशी सुरू केली. सूत्रांच्या माहितीनुसार, तो फोन आपणच केल्याचे मांढरे यांनी कबूल केले. त्यामागची पार्श्वभूमी सांगतांना ते म्हणाले की, जिल्ह्यातील उमरेड जवळच्या मकरधोकडा येथे आमची शेतजमीन होती. जी १९९६ मध्ये शासनाने (वेकोली) अधिग्रहित केली. परंतु त्याचा योग्य तो मोबदला मिळाला नाही.

या संबंधाने गेल्या २४ वर्षांपासून ते शासनासोबत पत्रव्यवहार करत आहे.संबंधित अधिकाऱ्यांकडे अपिलही केले. मात्र कुठूनच न्याय मिळत नसल्यामुळे आपल्याला प्रचंड नैराश्य आल्याचे आणि त्यातूनच हा फोन कॉल केल्याचे मांढरे यांनी पोलिसांना सांगितल्याचे समजते. मांढरे यांच्या चौकशीचा प्राथमिक अहवाल मुंबईला कळविण्यात आला असून तेथील अधिकाऱ्यांची एक चमू मांढरे यांची चौकशी करणार असल्याचे समजते.

टॅग्स :Mantralayaमंत्रालयMaharashtraमहाराष्ट्रnagpurनागपूरPoliceपोलिस