शहरं
Join us  
Trending Stories
1
नगरांवर सत्ता कोणाची? आज फैसला; एक्झिट पोल काय सांगतात? महाविकास आघाडीचे काय होणार...
2
अंबरनाथमध्ये ५४.५०% मतदान; या ठिकाणी निवडणुका झाल्या बिनविरोध
3
हृदयद्रावक! कळपाला धडकली 'राजधानी'; ७ हत्ती चिरडले, पिल्लू जखमी
4
लालसा, अहंकारामुळे भावंडांमध्ये दुरावा; उच्च न्यायालयाचे निरीक्षण; बहिणीविरोधात ज्येष्ठ नागरिकाचा मानहानी दावा
5
'टी-२०' विश्वचषकासाठी संघ जाहीर : गिलचा पत्ता कट; इशान, रिंकूला संधी
6
इशानने घेतला गिलचा बळी,  गोल्डन बॉय म्हणून किती दिवस संघात राहणार...
7
मीरा भाईंदर: "...त्यातूनच लाडकी बहीण योजनेचा जन्म झाला"; एकनाथ शिंदे यांनी सांगितली कहाणी
8
अमेरिकेचं ‘ऑपरेशन हॉकआय स्ट्राइक’, इस्लामिक स्टेटच्या 70 ठिकाणांवर US चे मोठे हल्ले; प्रकरण काय?
9
"नीतीश वडिलांप्रमाणे, बाप-लेकीत..."; बिहार 'नकाब' वादावर राज्यपाल आरिफ मोहम्मद खान स्पष्टच बोलले
10
Ishan Kishan इतके दिवस टीम इंडियात का नव्हता? 'त्या' दोघांची नावं घेत आगरकरने दिलं उत्तर
11
१५०हून जास्त कॉम्प्युटर्स लुटले, कँटीनची तोडफोड; बांगलादेशात जमावाचा मीडिया हाऊसवर हल्ला
12
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ९४ व्या वर्षी निधन
13
मुंबईप्रमाणे सर्व मनपात काँग्रेस स्वबळावर लढणार की महाविकास आघाडीत? रमेश चेन्नीथला म्हणाले…
14
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
15
७०० वर्षांनी शनिचे ३ नवपंचम योग, २०२६ करणार भरभराट; ७ राशींना अकल्पनीय लाभ, चौपट कमाई-पैसा अन्…
16
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
17
“भ्रष्ट महायुती सरकार विरोधात काँग्रेसचा वैचारिक लढा, मनपा निवडणुकीत...”: हर्षवर्धन सपकाळ
18
BMC Elections : "मुंबई महानगरपालिका निवडणूक स्वबळावर लढणार!"; काँग्रेसची मोठी घोषणा, केले गंभीर आरोप
19
"जोवर बांगलादेश अस्तित्वात आहे, तोवर..."; हादी यांच्या अंत्यसंस्कारावेळी युनूस यांचे विधान
20
“मनरेगा योजनेवर सरकारने बुलडोजर चालवला, आम्ही लढणार, २० वर्षांपूर्वी…”; सोनिया गांधींची टीका
Daily Top 2Weekly Top 5

वैतागलेल्या शेतमालकाकडून मंत्रालय उडवून देण्याचा फोन; प्रशासनाची उडाली होती खळबळ

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 30, 2021 20:31 IST

पोलिसांकडून उमरेडच्या व्यक्तीची चौकशी

नागपूर : शासनाने अधिग्रहित केलेल्या शेत जमिनी संदर्भातील वादात न्याय मिळत नसल्याची भावना झाल्याने वैतागलेल्या एका शेतजमीन मालकाने थेट मंत्रालय उडवून देण्याचा मुंबईत फोन केला. त्यामुळे रविवारी दुपारपासून राज्यभर खळबळ उडाली आहे. हादरलेल्या पोलीस प्रशासनाने संबंधित व्यक्तीची चौकशी चालवली आहे. सागर काशीनाथ मांढरे (४०) असे त्याचे नाव असून ते नागपूर जिल्ह्यातील उमरेड पोलीस ठाण्याच्या हद्दीत राहतात.

सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, मुंबई येथील मंत्रालयात बॉम्ब पेरण्यात आला असून मंत्रालय उडवून देणार असल्याचा फोन कॉल रविवारी दुपारी मुंबईत करण्यात आला. त्यामुळे सुरक्षा यंत्रणांमध्ये प्रचंड खळबळ उडाली. चौकशीत हा फोन कॉल नागपूर जिल्ह्यातील उमरेड येथून करण्यात आल्याचे लक्षात आल्यानंतर मुंबईतील पोलिस अधिकाऱ्यांनी नागपूर ग्रामीणचे पोलिस अधीक्षक राकेश ओला यांच्याशी संपर्क साधला. पोलीस अधिक्षक ओला यांनी लगेच आपली यंत्रणा कामी लावली.

उमरेड परिसरातील सागर मांढरे यांना शोधून काढून सायंकाळी त्यांची चौकशी सुरू केली. सूत्रांच्या माहितीनुसार, तो फोन आपणच केल्याचे मांढरे यांनी कबूल केले. त्यामागची पार्श्वभूमी सांगतांना ते म्हणाले की, जिल्ह्यातील उमरेड जवळच्या मकरधोकडा येथे आमची शेतजमीन होती. जी १९९६ मध्ये शासनाने (वेकोली) अधिग्रहित केली. परंतु त्याचा योग्य तो मोबदला मिळाला नाही.

या संबंधाने गेल्या २४ वर्षांपासून ते शासनासोबत पत्रव्यवहार करत आहे.संबंधित अधिकाऱ्यांकडे अपिलही केले. मात्र कुठूनच न्याय मिळत नसल्यामुळे आपल्याला प्रचंड नैराश्य आल्याचे आणि त्यातूनच हा फोन कॉल केल्याचे मांढरे यांनी पोलिसांना सांगितल्याचे समजते. मांढरे यांच्या चौकशीचा प्राथमिक अहवाल मुंबईला कळविण्यात आला असून तेथील अधिकाऱ्यांची एक चमू मांढरे यांची चौकशी करणार असल्याचे समजते.

टॅग्स :Mantralayaमंत्रालयMaharashtraमहाराष्ट्रnagpurनागपूरPoliceपोलिस