शहरं
Join us  
Trending Stories
1
अधीर रंजन यांना खडसावणाऱ्या खर्गेंवर बंगालमधील काँग्रेस कार्यकर्ते नाराज, काँग्रेस अध्यक्षांच्या फोटोवर फासली शाई 
2
'आरक्षणाची मर्यादा वाढवणार की नाही?', काँग्रेसचा पंतप्रधान नरेंद्र मोदींना थेट सवाल
3
"प्रभू श्रीराम हृदयात आहेत, पण राम मंदिर..."; मेनका गांधी यांचे निवडणूक प्रचारादरम्यान विधान
4
'...तर मी तेव्हाच मुख्यमंत्री झालो असतो', छगन भुजबळ यांचा मोठा गौप्यस्फोट
5
एक दिवस फॅन्स अन् क्रिकेटपटू यांच्यातल्या विश्वासाला तडा जाईल, Rohit Sharma चं विधान
6
"एकनाथ शिंदे यांच्या मुख्यमंत्रीपदाला संजय राऊतांचाच विरोध होता", अजित पवार गटाचा पलटवार
7
मुस्लिम कट्टरतावाद्यांच्या मतांसाठी संतांचा अपमान..; PM मोदींचा ममता बॅनर्जींवर हल्लाबोल
8
‘मोदींचं गुणगान गाऊन योगींकडून भगव्या वस्त्राचा अपमान, भगवे कपडे घालून संतांसारखे…’ नाना पटोलेंचा सल्ला
9
"भाजपला डिस्टर्ब करू नका, निवडणूक संपताच...", हिमंता यांचा माजी IPS अधिकाऱ्याला इशारा
10
आमदार पी.एन. पाटील यांची प्रकृती बिघडली; खासगी रुग्णालयात दाखल, तातडीने शस्त्रक्रिया सुरु
11
ऑल दी बेस्ट, रोहित अँड... ! Mumbai Indians च्या अपयशानंतर असं का म्हणाल्या नीता अंबानी?
12
राहुल गांधी आणि अखिलेश यादव यांच्या सभेत गोंधळ; बॅरिकेड्स तोडल्यामुळे चेंगराचेंगरी
13
RCB चे अभिनंदन न करता MS Dhoni ड्रेसिंग रुममध्ये का परतला? समोर आलं कारण 
14
पंजाब किंग्सची जोरदार फटकेबाजी, सनरायझर्स हैदराबादसमोर दोनशेपार लक्ष्य
15
Video:'भारतीय लहेजाची लाज वाटते?'; Cannes च्या रेड कार्पेटवर इंग्रजी बोलण्याने कियारा ट्रोल
16
Swati Maliwal Case : दिल्ली पोलिसांनी मुख्यमंत्र्यांच्या निवासस्थानातून सीसीटीव्ही डीव्हीआर जप्त केला
17
श्रेयस अय्यर, इशान किशन यांना BCCI कडून सेकंड चान्स; घेतला गेला मोठा निर्णय 
18
यावेळीही ट्रॉफी जिंकण्याचे RCB चे स्वप्न भंगणार? एक योगायोग अन् चाहत्यांचे टेन्शन वाढले
19
तुमको मिरची लगी तो मैं क्या करू? ठाण्यासाठी ‘करो या मरो’च्या लढाईला सिद्ध व्हा - देवेंद्र फडणवीस 
20
१% ते १००% पर्यंतचा प्रवास! RCB ची गाडी सुस्साट; ५ खेळाडूंमुळे मिळाले प्ले ऑफचे तिकीट

Maharashtra CM : तुम करो तो पुण्य...हम करे तो पाप : गिरीराज सिंह

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 23, 2019 10:31 PM

काँग्रेस-शिवसेनेकडून आता हे पापाचे सरकार असल्याची टीका होत आहे. मात्र तुम्ही कराल तर पुण्य व आम्ही केले तर पाप हा कुठला न्याय आहे, असा प्रश्न उपस्थित करीत सिंह यांनी चिमटा काढला.

ठळक मुद्देराज्याच्या विकासाला आणखी चालना मिळेल

लोकमत  न्यूज  नेटवर्कनागपूर : महाराष्ट्रात सत्तास्थापनेसंदर्भात घडलेल्या नाट्यमय घडामोडींचे केंद्रीय पशुसंवर्धन मंत्री गिरीराज सिंह यांनी स्वागत केले आहे. महाराष्ट्राच्या हितासाठी उचललेले हे पाऊल आहे. यामुळे राज्याच्या विकासाला आणखी चालना मिळेल. हे स्वार्थाचे नव्हे तर जनतेच्या हिताचे राजकारण आहे. काँग्रेस-शिवसेनेकडून आता हे पापाचे सरकार असल्याची टीका होत आहे. मात्र तुम्ही कराल तर पुण्य व आम्ही केले तर पाप हा कुठला न्याय आहे, असा प्रश्न उपस्थित करीत सिंह यांनी चिमटा काढला.‘अ‍ॅग्रोव्हिजन’ राष्ट्रीय कृषी प्रदर्शनात सहभागी होण्यासाठी गिरीराज सिंह नागपुरात आले होते. यावेळी प्रसारमाध्यमांशी त्यांनी संवाद साधला. महाराष्ट्राच्या हितासाठी व अपूर्ण कामे पूर्ण करण्यासाठी नि:स्वार्थीवृत्तीच्या स्थायी सरकारची आवश्यकता होती. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वात हे सरकार राष्ट्रहितात काम करेल व राज्याच्या जनतेला याचा फायदा पोहोचेल. भाजपाकडे १०५ चे संख्याबळ आहे. लोकशाहीत ज्याची संख्या जास्त त्याचाच मुख्यमंत्री होईल, असे बाळासाहेब ठाकरेदेखील एकदा म्हणाले होते. बाळासाहेबांप्रति आम्हाला आदरच आहे. जे काही राजकारण मागील काही दिवसांत झाले ते देशाने पाहिले. काँग्रेस-राष्ट्रवादी काँग्रेस व शिवसेना एकमेकांना पाण्यात पाहात होते, ते केवळ सत्तेचा अजेंडा घेऊन आता सोबत आले आहे. राज्याला अशा नव्हे तर विकासाचा अजेंडा असलेल्या सरकारची आवश्यकता आहे, असेदेखील सिंह म्हणाले.

टॅग्स :Maharashtraमहाराष्ट्रChief Ministerमुख्यमंत्री