शहरं
Join us  
Trending Stories
1
उद्धवसेनेशी युतीच्या शक्यतेवर CM फडणवीस स्पष्टच बोलले; म्हणाले, "सध्याची महायुती..."
2
IND vs ENG 5th Test Day 3 Stumps: मियाँ मॅजिक! परफेक्ट यॉर्करसह थांबला खेळ; सलामी जोडी फुटली
3
हार्दिक पटेल यांनी आळवले बंडाचे सूर, मुख्यमंत्र्यांना पत्र लिहून दिला असा इशारा, गुजरातमध्ये भाजपाला धक्का बसणार?
4
Asia Cup 2025 Venues : भारत-पाक 'हायहोल्टेज' सामना दुबईत; या ठिकाणी रंगणार आशिया कप स्पर्धेतील सामने
5
Mumbai LocaL: तिकीट तपासणीवरून लोकलमध्ये वाद, प्रवाशाचा कर्मचाऱ्यांवर हल्ला, कार्यालयाचीही तोडफोड!
6
"मोदी, योगी आणि मोहन भागवतांवर आरोप कर, नाहीतर…’’, प्रज्ञा सिंह यांचा ATS वर गंभीर आरोप
7
रिलेशनमध्ये असतानाही ५० टक्के महिला ठेवतात बॅकअप पार्टनर, सर्वेतून धक्कादायक माहिती समोर
8
बेकरीत काम करणाऱ्या २५ वर्षीय तरुणाची आत्महत्या, ६ जणांविरुद्ध गुन्हा दाखल
9
आम्ही पुन्हा प्रयत्न करतोय...; सायना नेहवालचे Ex-पती पारूपल्ली कश्यपची 'पॅच-अप'; २० दिवसांत 'यू-टर्न'
10
VIDEO : एकदम कडक! ओव्हलच्या स्टेडियमवर दिसली हिटमॅन रोहितची झलक; अन्...
11
Amravati: अमरावतीत जागेच्या वादावरून महिला सरपंच अन् सदस्यांमध्ये फ्रीस्टाईल हाणामारी!
12
धनश्री वर्माशी शेवटचं बोलणं केव्हा झालं? क्रिकेटर युजवेंद्र चहलने सांगितला 'त्या' वेळचा किस्सा
13
माजी पंतप्रधानांचा नातू प्रज्वल रेवण्णाला जन्मठेपेची शिक्षा; मोलकरणीवर अत्याचार केल्याप्रकरणी दोषी
14
२० हजारांपेक्षा कमी किंमतीत वनप्लस, सॅमसंग आणि आक्यूओओचे 5G फोन!
15
Yashasvi Jaiswal Century : यशस्वी 'सेंच्युरी रोमान्स' अगेन्स इंग्लंड! जशी सुरुवात तसाच शेवट
16
"आम्ही स्वतः कारवाई केली नाही, माधुरीच्या भविष्यासाठी..."; वाढत्या विरोधानंतर वनताराकडून स्पष्टीकरण
17
"ती माझी चूकच..."; युजवेंद्र चहलने दिली प्रामाणिक कबुली, सांगितलं धनश्रीशी नातं तुटण्याचं कारण
18
 Crime: दोस्त दोस्त ना रहा! दारुसाठी मित्राच्या डोक्यात चाकू खुपसला, जालन्यातील घटना
19
Mumbai: आयआयटी मुंबई कॅम्पसमध्ये विद्यार्थ्याचा मृतदेह आढळल्याने खळबळ, पोलीस तपास सुरू!
20
Mumbai: मुंबईतील चारकोपच्या राजाचे १७७ दिवसांनी विसर्जन; ढोल-ताशांच्या गजरात बाप्पाला निरोप!

Maharashtra Assembly Election 2019 : नागपुरात टक्केवारी घटली, धाकधूक वाढली

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 21, 2019 21:00 IST

२०१४ च्या तुलनेत यंदा मतदानाची टक्केवारी काहीशी घटल्याचे दिसून आले. २०१४ मध्ये जिल्ह्यात सरासरी ६१.६५ टक्के मतदान झाले होते. यंदा निवडणूक आयोगाच्या प्राथमिक अंदाजानुसार ५८ ते ५९ टक्के मतदान झाले.

ठळक मुद्देमुख्यमंत्र्यांसह नेत्यांचे मतदान : किरकोळ अपवाद वगळता मतदान शांततेत

लोकमत  न्यूज  नेटवर्कनागपूर : पावसाच्या सावटाखाली सोमवारी पार पडलेल्या मतदान प्रक्रियेला संपूर्ण जिल्ह्यात मतदारांचा संमिश्र प्रतिसाद मिळाल्याचे चित्र दिसून आले. २०१४ च्या तुलनेत मतदानाची टक्केवारी व काही किरकोळ अपवाद वगळता मतदान शांततेत पार पडले. २०१४ च्या तुलनेत यंदा मतदानाची टक्केवारी काहीशी घटल्याचे दिसून आले. २०१४ मध्ये जिल्ह्यात सरासरी ६१.६५ टक्के मतदान झाले होते. यंदा निवडणूक आयोगाच्या प्राथमिक अंदाजानुसार ५८ ते ५९ टक्के मतदान झाले. सर्वच पक्षांतील दिग्गज नेत्यांसह जिल्ह्यात एकूण १४६ उमेदवारांचे भाग्य ‘ईव्हीएम’मध्ये बंद झाले व गुरुवारी निकाल समोर येणार आहे. नागपूर शहराच्या तुलनेत नागपूर ग्रामीणमधील सहा जागांवर मतदानाचा जास्त उत्साह पहायला मिळाला.जिल्ह्यातील सर्वच मतदानकेंद्रांवर सकाळी ७ वाजल्यापासून मतदानाला सुरुवात झाली. सकाळच्या सुमारास अनेक ठिकाणी मतदारांच्या रांगा दिसून आल्या. ढगाळलेले वातावरण असल्याने थंडावा होता व अनेकांनी ‘मॉर्निंग वॉक’नंतर लगेच मतदान केले. दुपारच्या सुमारास मतदानाचा उत्साह नक्कीच थोडा कमी झाला. मात्र दुपारनंतर मतदारांची पावले मतदान केंद्रांकडे वळली. विद्यार्थ्यांपासून ते नामवंत व्यक्तीपर्यंत अनेकांनी सकाळीच मतदानासाठी हजेरी लावली. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, केंद्रीय मंत्री नितीन गडक री, राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक डॉ.मोहन भागवत, सरकार्यवाह भय्याजी जोशी, खा.विकास महात्मे, माजी खासदार अजय संचेती यांच्यासह प्रशासनातील वरिष्ठ अधिकाऱ्यांनीदेखील मतदानाचा हक्क बजावला. संपूर्ण जिल्ह्यात ‘ईव्हीएम’ खराब झाल्यासंदर्भातील काही तक्रारी प्राप्त झाल्या. किरकोळ अपवाद वगळता जिल्ह्यात मतदान शांततेत पार पडले.सर्वाधिक उत्साह उमरेडमध्ये 

नागपूर जिल्ह्यातील विधानसभेच्या १२ जागांसाठी जिल्ह्यात सरासरी सुमारे ५८ ते ५९ टक्के मतदान झाले. सर्वाधिक मतदान उमरेडमध्ये (६८.०३ %) तर सर्वात क मी पश्चिम नागपूर मतदारसंघात (४८.४५ % ) मतदान झाले. याशिवाय जिल्ह्यात काटोल (६४.५५ %), हिंगणा (५७.१५ %), रामटेक (६२.६९ %), कामठी (५७.२० %), सावनेर (६६.२५ %) येथे इतके मतदान झाले. तर नागपूर शहरात नागपूर दक्षिण-पश्चिम (४९.५१ %), नागपूर दक्षिण (४८.९४ %), नागपूर पूर्व (५३.१८ %), नागपूर मध्य (५०.१३ %), नागपूर उत्तर (५०.७१ %) इतके मतदान झाले. मतदानाची टक्केवारी संबंधित निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांकडून अंतिम झाल्यानंतर मतदानाची टक्केवारी जाहीर करण्यात येईल, असे निवडणूक आयोगाने स्पष्ट केले आहे.

टॅग्स :Maharashtra Assembly Election 2019महाराष्ट्र विधानसभा निवडणूक 2019Votingमतदानnagpurनागपूर