शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी बातमी: दहशतवादी हल्ल्यात भारताचा १ जवान शहीद, एकाची प्रकृती गंभीर, तर तिघं..
2
नरेंद्र मोदी हे आठवडामंत्री झाले आहेत, कारण...; शरद पवारांचा घणाघात
3
रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूने सहज जिंकला सामना, गुजरात टायटन्सला नमवून Mumbai Indians ला दिला धक्का 
4
२५ धावांत ६ विकेट्स ! RCB ने पायावर धोंडा मारला, जॉश लिटल GT चा नायक ठरला 
5
विराट कोहलीचा भीमपराक्रम! उत्तुंग षटकार पाहताच भारी होती अनुष्का शर्माची रिॲक्शन, Video
6
मोठी बातमी: लैंगिक शोषण आणि अपहरण प्रकरणात एचडी रेवन्ना यांना SITकडून अटक
7
विझण्यापूर्वी RCB ची फडफड! गुजरात टायटन्सविरुद्ध दाखवली 'पॉवर'; यंदाच्या पर्वात रचला इतिहास
8
अरे तुला फरक पडत नाही, मग कशाला उत्तर देतोस? सुनील गावस्कर संतापले, विराट कोहलीला सुनावले
9
PHOTOS : क्रिकेट म्हणजे जीवन आणि क्रिकेट हेच जीवन; IPL मध्ये जान्हवी कपूरचा जलवा!
10
'घेऊद्या तारीख, ईडीच्या प्रकरणात कुठे जामीन मिळतो'; न्यायाधिशांचे कोर्टरुमबाहेर धक्कादायक वक्तव्य
11
"अरविंद केजरीवालांनी वाराणसीतून नरेंद्र मोदींच्या विरोधात निवडणूक लढवावी"; सपा नेत्याची मागणी
12
मला धमक्या देऊ नका, मी मनात आणलं तर..., नारायण राणे यांचा उद्धव ठाकरेंना इशारा
13
पाकिस्तानच्या माजी मंत्र्यांकडून दुसऱ्यांदा राहुल गांधींचं कौतुक; भाजपानं घेरलं
14
IPL 2024 मधील दोन भारतीय स्टार गोलंदाज स्पर्धेत आता पुढे कदाचित नाही खेळू शकणार 
15
NSE Share : एकावर ४ बोनस शेअर्स, ९०००% डिविडंड; 'या' एक्सचेंजनं गुंतवणूकदारांना दिलं डबल गिफ्ट
16
"हार्दिक पांड्याबद्दल आदर दिसत नाही", इरफान पठाणकडून MI च्या कॅप्टनची बिनपाण्याने धुलाई
17
T20 World Cup : यजमान विडिंजने उतरवला तगडा संघ; IPL गाजवणाऱ्यांना संधी, नवे चेहरेही मैदानात!
18
रोहित शर्माबद्दल 'ती' अफवा पसरवली; आकाश चोप्रा भडकला, दिली संतप्त प्रतिक्रिया
19
कांदा निर्यातबंदी उठवण्याच्या निर्णयावर काँग्रेसची टीका, बाळासाहेब थोरात म्हणाले...
20
Kotak Mahindra Bank Q4: नफा वाढून ४१३३ कोटींवर, व्याजातून होणारी कमाई १३.३% वाढली

Maharashtra Assembly Election 2019 : भाजपच्या चुकीच्या धोरणांनी बजेट बिघडविले : आशीष देशमुख

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 15, 2019 12:34 AM

महागाई, सरकारची चुकीची धोरणे व या परिसराकडे दुर्लक्ष केल्यामुळे हे सरकार अयशस्वी ठरले असून जनतेमध्ये रोष आहे, असे वक्तव्य दक्षिण-पश्चिम नागपूर विधानसभा क्षेत्राचे काँग्रेस आघाडीचे उमेदवार डॉ. आशिष देशमुख यांनी केले.

ठळक मुद्देसर्वसामान्य जनतेने मांडल्या व्यथा

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : मतदार संघात जनसंपर्क करीत असताना भाजप सरकारविरोधी जनआक्रोश सर्वत्र दिसून येत आहे. महागाई, सरकारची चुकीची धोरणे व या परिसराकडे दुर्लक्ष केल्यामुळे हे सरकार अयशस्वी ठरले असून जनतेमध्ये रोष आहे, असे वक्तव्य दक्षिण-पश्चिम नागपूर विधानसभा क्षेत्राचे काँग्रेस आघाडीचे उमेदवार डॉ. आशिष देशमुख यांनी केले.सुभाषनगर, अंबाझरी ले-आऊट, डागा ले-आऊट, गांधीनगर, बजाजनगर, अभ्यंकरनगर, लक्ष्मीनगर, दीक्षाभूमी, तकिया, धंतोली या मार्गालगतच्या परिसरात आशिष देशमुख यांनी सोमवारी प्रचार केला. या जनसंपर्क दौऱ्यात गृहिणी, छोटे व्यापारी, बेरोजगार युवक-युवती, मजुरांनी त्यांच्याशी चर्चा केली. सायंकाळी दंतेश्वरी व धनगरपुरा झोपडपट्टी, आॅरेंजसिटी, खामला येथे पदयात्रा व रात्री छत्तीसगडचे मुख्यमंत्री भूपेश बघेल यांची जाहीर सभाही पार पडली.या सरकारने दक्षिण-पश्चिम क्षेत्राचा काहीच विकास केला नाही. फक्त घोषणा केल्या, असा आरोप आशिष देशमुख यांनी केला. नागपुरातील महिलांची सुरक्षा वाढवून सशक्तीकरणासाठी प्रयत्न करणे, गृहोद्योगासाठी विशेष प्रशिक्षण, गुन्हेगारीवर आळा, नागपूरमध्ये महिला पोलिसांची संख्या वाढविणे, घनकचºयाची इकोफ्रेंडली विल्हेवाट, दूषित पाण्यावर प्रक्रिया प्रकल्प, रेन वॉटर हार्वेस्टिंग यंत्रणा, झोपडपट्टीमधील नाल्या, पाण्याचे लिकेज बंद करणे व रस्ते दुरुस्ती, उद्योगधंद्यांमध्ये गुंतवणूक व रोजगारनिर्मिती, नागपूर शहराचे स्मार्ट सिटीमध्ये रूपांतर करून औद्योगिक नगरी व आर्थिक विकासावर भर आणि आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून २१ व्या शतकातील जागतिक दर्जाच्या सुविधा जनतेला उपलब्ध करून देणे, हा आपला संकल्प असल्याचे डॉ. आशिष देशमुख यांनी यावेळी जाहीर केले. २०१४ मध्ये दिलेल्या आश्वासनाचे उत्तर सरकारकडे नाही, अशा शब्दात त्यांनी संताप व्यक्त केला.

टॅग्स :Maharashtra Assembly Election 2019महाराष्ट्र विधानसभा निवडणूक 2019Ashish Deshmukhआशीष देशमुखnagpur-south-west-acनागपूर दक्षिण पश्चिम