शहरं
Join us  
Trending Stories
1
देशव्यापी 'मतदार यादी दुरुस्ती मोहिम' का गरजेची? निवडणूक आयोगाने सांगितले SIR चे महत्व....
2
Phaltan Doctor Death: फोटोवरून प्रशांतसोबत वाद, मंदिराजवळ गेली; डॉक्टर तरुणी हॉटेलवर जाण्यापूर्वी घरी काय घडले?
3
अरुणाचल हादरलं! HIV आणि दोन आत्महत्या; फरार आयएएस अधिकारी अटकेत; नेमकं प्रकरण काय?
4
Video: फलटणच्या २ सख्ख्या बहिणींचा भाजपाचे माजी खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकरांवर गंभीर आरोप
5
थरारक ट्रेन अपघात; लोकमान्य तिळक भागलपूर एक्सप्रेसचे डबे वेगळे झाले, सुदैवाने मोठा अनर्थ टळला
6
कुठल्याही कोचिंगविना २१ व्या वर्षी पहिल्याच प्रयत्नात UPSC उत्तीर्ण; 'ही' IAS तरूणी आहे कोण?
7
मोठी घडामोड! श्रेयस अय्यरचे आई-वडील ऑस्ट्रेलियाला जाणार, तातडीच्या व्हिसासाठी केला अर्ज
8
शंकर महादेवन यांनी खरेदी केलं चलतं-फिरतं लक्झरीअस हॉटेल! 'मसाज सीट'सह मिळतात या खास ५ स्टार सुविधा
9
अर्ध्या तासाच्या अंतराने कोसळले अमेरिकेचे हेलिकॉप्टर आणि विमान, दक्षिण चीन समुद्रात नेमकं काय घडलं?
10
वर्ल्डकप विजेता कर्णधार MS Dhoni केंद्रीय मंत्री रक्षा खडसेंच्या भेटीला, Video केला शेअर
11
अजित पवारांच्या राष्ट्रवादीच्या कार्यालयात 'वाजले की बारा' लावणी; सुनेत्रा पवारांचा थेट शहराध्यक्षांना कॉल
12
"व्हायरल होईल माहित होतं पण...", आर्यन खानच्या सीरिजमधील कॅमिओवर इम्रान हाश्मी म्हणाला...
13
ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या सेमीफायनलपूर्वी भारतीय महिला संघाला मोठा धक्का, दुखापतीमुळे आघाडीची फलंदाज स्पर्धेबाहेर 
14
निवडणूक आयोगाने देशात 'मतदार यादी दुरुस्ती' मोहिमची घोषणा केली; या १२ राज्यांमध्ये होणार सुरुवात, असे असणार वेळापत्रक
15
घराणेशाहीचं राजकारण आता चालणार नाही; ठाकरे बंधूंवर अमित शाहांचा निशाणा, म्हणाले...
16
शेअर बाजार 'रॉकेट'! PSU बँक, रियल्टी आणि ऑटो स्टॉक्सला मागणी; पहा सेन्सेक्सच्या टॉप ५ कंपन्या
17
दोन जणांची आत्महत्या, सुसाईड नोटमध्ये लैंगिक छळ अन् 'HIV'चा उल्लेख...! अरुणाचल पोलिसांकडून फरार IAS अधिकाऱ्याला अटक 
18
कंगना रणौत भटिंडा न्यायालयात हजर, शेतकरी आंदोलनादरम्यान केलेल्या 'त्या' टिप्पणीबद्दल मागितली माफी
19
धक्कादायक! तूप, दारू आणि स्फोट...UPSC विद्यार्थ्याच्या लिव्ह-इन पार्टनरकडून भीषण हत्या
20
३ दिवसांपासून रॉकेट बनलाय 'हा' शेअर; सातत्यानं लागतंय अपर सर्किट, आता डिविडेंड देण्याचीही तयारी

विकासाच्या नावे जैवविविधतेचे नुकसान मान्य नाही

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 4, 2020 22:10 IST

कोणताही परिसर किंवा भूभाग हा त्या ठिकाणी वाढणाऱ्या, जगणाºया पशुपक्षी, वनस्पती अशा सर्व जैवविविधतेसाठी महत्त्वाचा असतो. त्यामुळे कोणतेही विकासाचे प्रकल्प किंवा उद्योग उभारताना त्या पर्यावरणाचा व तेथील जैवविविधतेचा विचार होणे आवश्यक आहे.

लोकमत  न्यूज  नेटवर्कनागपूर : कोणताही परिसर किंवा भूभाग हा त्या ठिकाणी वाढणाऱ्या, जगणाºया पशुपक्षी, वनस्पती अशा सर्व जैवविविधतेसाठी महत्त्वाचा असतो. त्यामुळे कोणतेही विकासाचे प्रकल्प किंवा उद्योग उभारताना त्या पर्यावरणाचा व तेथील जैवविविधतेचा विचार होणे आवश्यक आहे. मात्र विकास प्रकल्पांच्या नावाने पर्यावरणीय परिणामांच्या विचारांना हरताळ फासण्याचा प्रयत्न एन्व्हायर्नमेंट इम्पॅक्ट असेसमेंट (ईआयए) च्या माध्यमातून सुरू आहे. या विरोधात पर्यावरण प्रेमींनी मोर्चा उघडला आहे.केंद्रीय पर्यावरण मंत्रालयाने मार्च २०२० मध्ये आणलेल्या ईआयएच्या नव्या परिपत्रकावर जनतेकडून आक्षेप व सूचना मागविण्याची मुदत ऑगस्टपर्यंत वाढविली आहे. त्यामुळे या ईआयएमध्ये झालेल्या बदलाविरोधात देशातील पर्यावरणप्रेमी संस्था, संघटनांनी व्यापक जनजागृतीचा प्रयत्न चालविला आहे. नागपूर शहरातही विविध संस्थांकडून याबाबत प्रयत्न होत आहेत. तरुण पर्यावरणप्रेमी व ग्रोव्हिल फाऊंडेशनसह विविध एनजीओशी जुळलेले अभिषेक पालिवाल यांनी केंद्र शासनाच्या या नव्या परिपत्रकावर आक्षेप घेतला. हे बदल म्हणजे माकडाच्या हाती कोलित देण्याचा प्रकार असल्याची टीका पालिवाल यांनी केली. कोणताही प्रकल्प उभारताना त्या परिसरातील पर्यावरण प्रभावाचे आकलन होणे गरजेचे आहे. मात्र नव्या धोरणामुळे उद्योजकांना ईआयएच्या निर्बंधातून पळवाटा शोधण्याची संधी मिळेल, अशी चिंता त्यांनी व्यक्त केली. आसामच्या बागजान येथे तेलाच्या विहिरीतून गॅस लिक होऊन आग लागली व काही किमी परिघातील लोकांना इतरत्र हलविण्यात आले. प्राणी, पक्षी व जैवविविधतेचे नुकसान झाले ते वेगळे. विशाखापट्टणमच्या पॉलिमर कंपनीत विषारी वायू लिक झाल्याने मोठे नुकसान झाले. या घटनांचा उल्लेख करीत अशा प्रकल्पातून एखादी घटना घडल्यास होणाऱ्या जैवविविधतेच्या नुकसानीसाठी कुणाला जबाबदार धरणार, असा सवाल त्यांनी केला. विकास महत्त्वाचा असला तरी पर्यावरण संवर्धन ही काळाची गरज असल्याची भावना त्यांनी व्यक्त केली.परिपत्रकाविरोधात डिजिटल लढाकोविड १९ चा संक्रमण काळ असल्याने कोणत्याही लढ्यात सक्रिय होत येत नाही, त्यामुळे डिजिटल लढा चालविला जात असल्याचे पालिवाल यांनी स्पष्ट केले. ग्रो-व्हील फाऊंडेशनतर्फे फेसबुक, ट्विटर, इन्स्टा आदी सोशल मीडियावर या परिपत्रकाविरोधात जनजागृती केली जात आहे. नव्या ईआयए परिपत्रकाचा ड्राफ्ट पोस्ट करून हे नवे धोरण पर्यावरणाच्या दृष्टीने कसे, हानीकारक आहे, याबाबत जागृत केले जात आहे. या माध्यमातून पर्यावरण मंत्रालयाला हजारो ई-मेल पाठविल्याचे त्यांनी सांगितले.का आहे आक्षेपकोणत्याही ठिकाणी प्रकल्प उभारण्याआधी स्थानिक लोकांकडून आक्षेप व सूचना मागविण्यासाठी काही दिवसांची मुदत दिली जायची. आता मुदतीचा काळ घटविण्याची तरतूद करण्यात आली.एखाद्या प्रकल्प किंवा उद्योगासाठी ईआयएअंतर्गत प्रमाणपत्र घेतले नसेल तरी प्रकल्पावर कारवाई होणार नाही किंवा काम थांबविण्यात येणार नाही. त्याऐवजी नाममात्र दंड भरून पुन्हा क्लीअरन्ससाठी अर्ज करण्याची मुभा देण्यात आली आहे.नियमित मॉनिटरिंगची मुदत सहा महिन्यावरून एक वर्ष करण्यात आली आहे.अशा अनेक तरतुदी पर्यावरण व जैवविविधतेच्या दृष्टीने हानीकारक असल्याचे पालीवाल यांनी सांगितले.

टॅग्स :Bio Diversity dayजैव विविधता दिवसnagpurनागपूर