शहरं
Join us  
Trending Stories
1
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
2
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
3
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
4
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
5
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
6
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
7
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
8
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
9
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
10
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
11
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
12
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
13
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
14
सावधान! तुमच्या आधार कार्डवर भलत्याच व्यक्तीचं सिम कार्ड? एक चूक आणि थेट पोलीस कोठडी
15
'दृश्यम' पाहून खतरनाक प्लॅनिंग; बायकोनेच घेतला नवऱ्याचा जीव, पण 'QR कोड'मुळे पर्दाफाश
16
Gmail युजर्ससाठी गुड न्यूज! आता हवा तसा बदलता येणार जीमेल आयडी; २२ वर्षांनंतर गुगलचा मोठा निर्णय
17
Suryakumar Yadav Fifty : कॅप्टन्सीची तिसरी संधी! MI चा संघ अडचणीत असताना सूर्याची बॅट तळपली
18
महागड्या क्रीम कशाला? उन्हाळ्यात 'ही' फळं देतील चेहऱ्यावर नॅचरल ग्लो, दिसाल अतिसुंदर
19
Ravindra Erande: खळबळजनक! १२१ आक्षेपार्ह Video, २ पेनड्राईव्ह...; नोकरीचं आमिष दाखवून महिलांवर अत्याचार
20
डोनाल्ड ट्रम्प यांची सुट्टी रद्द! व्हाईट हाऊसमध्ये युद्धाची तयारी? इराणच्या एका चालीने अमेरिका हादरली!
Daily Top 2Weekly Top 5

लोकसभा नागपूर १९८४; अपक्षांच्या भाऊगर्दीत प्रस्थापित पक्षांचीच सरशी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 20, 2019 11:12 IST

१९८४ च्या निवडणुका दोन कारणांसाठी चर्चेत राहिल्या. इंदिरा गांधी यांच्या हत्येनंतर काँग्रेसबाबत देशभरात सहानुभूतीची लाट होती.

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर: १९८४ च्या निवडणुका दोन कारणांसाठी चर्चेत राहिल्या. इंदिरा गांधी यांच्या हत्येनंतर काँग्रेसबाबत देशभरात सहानुभूतीची लाट होती. निवडणुकांत इतर सर्व मुद्दे बाजूला पडले होते. तर दुसरीकडे प्रथमच निवडणुकांमध्ये अपक्षांचे प्रमाण हे २०हून अधिक दिसून आले. अनेक हौसे गवसेदेखील निवडणुकीत उतरले होते. मात्र अपक्षांच्या भाऊगर्दीत ९५ टक्क्यांहून अधिक मते ही तीन प्रस्थापित पक्षांच्याच पारड्यात गेली होती. मतदारांनी परत एकदा कॉंग्रेसवर विश्वास टाकला व बनवारीलाल पुरोहित हे पहिल्यांदाच लोकसभेत गेले.१९८० ते १९८४ या कालावधीत देशात अनेक स्थित्यंतरे घडली. महाराष्ट्रात बॅ.अंतुले यांना तर न्यायालयीन आदेशानंतर राजीनामा द्यावा लागला होता.१९८४ साली इंदिरा गांधी यांची आॅक्टोबर महिन्यात हत्या झाली व डिसेंबर महिन्यात राजीव गांधी यांच्या नेतृत्वात निवडणुका झाल्या. विदर्भात कॉंग्रेसचे संघटन आणखी मजबूत झाले होते. कॉंग्रेसने बनवारीलाल पुरोहित यांना तिकीट दिले. तर खोरिपातर्फे श्याम खोब्रागडे यांनी अर्ज भरला होता. १९८० च्या निवडणुकीतदेखील श्याम खोब्रागडे हे उभे होते व ते दुसऱ्या स्थानी आले होते. त्यामुळे या निवडणुकीत त्यांच्या समर्थकांना जास्त अपेक्षा होत्या. तर भाजपातर्फे रामप्रकाश आहुजा हे मैदानात होते. भाजपाने पहिल्यांदाच नागपुरात आपला उमेदवार उतरविला होता. याशिवाय चंद्रकांता कांबळे, दिनकर बेंडेकर, टिकाराम पेंदाम, महेश पुरोहित, रामरतन जानोरकर, विठ्ठलदास दिवेचा, आनंदराव कुबेटकर, एन.एल.राव, कामरान खान, प्रकाश चाफले, प्रमोद पटेल, हरिभाऊ तभाने, रमण मूर्ती, भगवंतसिंह भसिन, अरविंद जोहरापुरकर, नत्थू शोरटे, राहुल रामटेके, शब्बीर अहमद, मुकुंद गजवे, बाळासाहेब अग्ने, विठ्ठलराव मासुरकर हे २२ अपक्षदेखील निवडणुकीत उतरले होते.अपेक्षेप्रमाणे बनवारीलाल पुरोहित जिंकून आले. त्यांना ५२.९९ टक्के मते प्राप्त झाली. तर श्याम खोब्रागडे हे २९.४१ टक्के मतांसह परत दुसऱ्या स्थानी राहिले. १९८० च्या तुलनेत त्यांना मिळालेल्या मतांमध्ये मात्र तीन टक्क्यांची वाढ झाली. भाजपाचे रामप्रकाश आहुजा हे १४.१५ टक्के मतांसह तिसऱ्या स्थानी होते. या तीन उमेदवारांना मिळून ९६.५५ टक्के मते होती. तर २२ अपक्षांच्या पदरी केवळ ३.४५ टक्के मते आली.

काँग्रेसने विदर्भाचा बालेकिल्ला राखलाइंदिरा गांधी आपल्या मृत्यूच्या सात दिवस अगोदर विदर्भाच्या दौऱ्यावर आल्या होत्या. २३ आॅक्टोबर रोजी त्या नागपुरात आल्या व तेथून चंद्रपूर जिल्ह्यातील सुपर थर्मल पॉवर स्टेशनच्या लोकार्पण सोहळ्यासाठी गेल्या होत्या. ‘आज भारतावर विविध बाजूंनी संकटे येत आहेत. बाहेरच्यापेक्षा घरातून होणारी कटकारस्थाने जास्त धोकादायक आहे व हीच चिंतेची बाब आहे. माझ्या जीवाला धोका असला तरी मी या शक्तींसोबत शेवटपर्यंत लढेल असे त्या चंद्रपुरात म्हणाल्या होत्या. त्यानंतर सातच दिवसात ३१ आॅक्टोबर रोजी राजधानीत त्यांच्याच सुरक्षारक्षकांनी त्यांची हत्या केली होती. इंदिरा गांधी यांच्या मृत्यूनंतर देशात एक सहानुभूतीची लाट आली. विदर्भात तर कॉंग्रेसला सर्वच्या सर्व जागा मिळाल्या व कॉंग्रेसचा बालेकिल्ला ही ओळख या क्षेत्राने कायम ठेवली.

टॅग्स :Banvarilal Purohitबनवारीलाल पुरोहित