शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तान एलओसीवर मोठ्या प्रमाणावर शस्त्रास्त्रे जमवू लागला; भारताची तयारी काय...
2
“लाल संविधान घेऊन फिरणारे राहुल गांधी...”; सावरकरांवरील विधान प्रकरणी CM फडणवीसांचा पलटवार
3
Pahalgam Terror Attack : "माझा एक भाऊ जेलमध्ये, दुसरा मुजाहिदीन, सरकारने त्याला पकडावं"; दहशतवाद्याच्या बहिणीचा Video
4
खिशातच आयफोनचा स्फोट, तरूण गंभीर जखमी; थरारक घटनेचा व्हिडीओ समोर
5
महात्मा गांधीही इंग्रजांना पत्र लिहिताना "आपला विश्वासू सेवक" लिहायचे, मग त्यांनाही...; राहुल गांधींची सुप्रीम कोर्टाकडून कानउघाडणी
6
Pahalgam Terror Attack: सरकारने पाकिस्तानला सडेतोड उत्तर द्यावं, पण कुठलाही निर्णय घेताना...; शरद पवार यांनी मांडले स्पष्ट मत
7
शरद पवारांच्या विधानावर CM फडणवीसांचं प्रत्युत्तर, म्हणाले- "ज्यांचे आप्तेष्ट मारले गेले..."
8
भारत- पाकिस्तान तणावादरम्यान बलुचिस्तानमध्ये बॉम्ब स्फोट, ४ सैनिकांचा मृत्यू
9
पर्यटकांना वाचवताना जीव गमावला; काश्मिरी युवकाच्या कुटुंबाला DCM शिंदेकडून ५ लाखांची मदत
10
अटारी जोधपूरपासून ९०० किमी दूर, ४८ तासांत कसे जाणार? पाकिस्तानात दिलेल्या महिला भारतात माहेरी आलेल्या
11
शनिवारी शिवरात्रि स्वामी पुण्यतिथी: ५ राशींनी ‘हे’ करा, साडेसातीत दिलासा; शनिची कायम कृपा!
12
मारुती सुझुकीला मोठा धक्का! सर्वाधिक गाड्या विकूनही तोटा, नेमकं काय आहे कारण?
13
Swami Samartha: स्वामीकृपा झाल्यावर आपल्या आयुष्यात 'हे' बदल घडतात; तुम्हीदेखील अनुभवले का?
14
भारताच्या कारवाईने पाक सैन्य घाबरले; लष्करप्रमुखाचे कुटुंब खाजगी विमानाने देश सोडून पळाले
15
स्वामी पुण्यतिथी शिवरात्रि एकाच दिवशी: शिवकृपा, गुरुबळ लाभण्याची सुवर्ण संधी; ‘असे’ करा व्रत
16
पाकिस्तानविरोधात भारताची मोठी कारवाई! गृहमंत्री अमित शाहांचे सर्व मुख्यमंत्र्यांना 'हे' निर्देश...
17
दिवसभर उड्या मारतात, एका जागी बसतंच नाहीत... हायपर एक्टिव्ह मुलांशी नेमकं वागायचं तरी कसं?
18
स्मरण दिन: स्वामींचे स्वप्नात दर्शन झाले? काय असू शकतात संकेत? जाणून घ्या नेमका अर्थ...
19
ऐतिहासिक कामगिरीच्या उंबरठ्यावर सीएसकेचा कर्णधार महेंद्रसिंह धोनी, एलिट लिस्टमध्ये सामील होणार
20
'ते पुन्हा एकत्र येण्याची सध्या कुठलीही परिस्थिती नाही'; CM फडणवीसांचं पवार, ठाकरे बंधूंबद्दल राजकीय भाष्य

लोकसभा नागपूर १९८४; अपक्षांच्या भाऊगर्दीत प्रस्थापित पक्षांचीच सरशी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 20, 2019 11:12 IST

१९८४ च्या निवडणुका दोन कारणांसाठी चर्चेत राहिल्या. इंदिरा गांधी यांच्या हत्येनंतर काँग्रेसबाबत देशभरात सहानुभूतीची लाट होती.

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर: १९८४ च्या निवडणुका दोन कारणांसाठी चर्चेत राहिल्या. इंदिरा गांधी यांच्या हत्येनंतर काँग्रेसबाबत देशभरात सहानुभूतीची लाट होती. निवडणुकांत इतर सर्व मुद्दे बाजूला पडले होते. तर दुसरीकडे प्रथमच निवडणुकांमध्ये अपक्षांचे प्रमाण हे २०हून अधिक दिसून आले. अनेक हौसे गवसेदेखील निवडणुकीत उतरले होते. मात्र अपक्षांच्या भाऊगर्दीत ९५ टक्क्यांहून अधिक मते ही तीन प्रस्थापित पक्षांच्याच पारड्यात गेली होती. मतदारांनी परत एकदा कॉंग्रेसवर विश्वास टाकला व बनवारीलाल पुरोहित हे पहिल्यांदाच लोकसभेत गेले.१९८० ते १९८४ या कालावधीत देशात अनेक स्थित्यंतरे घडली. महाराष्ट्रात बॅ.अंतुले यांना तर न्यायालयीन आदेशानंतर राजीनामा द्यावा लागला होता.१९८४ साली इंदिरा गांधी यांची आॅक्टोबर महिन्यात हत्या झाली व डिसेंबर महिन्यात राजीव गांधी यांच्या नेतृत्वात निवडणुका झाल्या. विदर्भात कॉंग्रेसचे संघटन आणखी मजबूत झाले होते. कॉंग्रेसने बनवारीलाल पुरोहित यांना तिकीट दिले. तर खोरिपातर्फे श्याम खोब्रागडे यांनी अर्ज भरला होता. १९८० च्या निवडणुकीतदेखील श्याम खोब्रागडे हे उभे होते व ते दुसऱ्या स्थानी आले होते. त्यामुळे या निवडणुकीत त्यांच्या समर्थकांना जास्त अपेक्षा होत्या. तर भाजपातर्फे रामप्रकाश आहुजा हे मैदानात होते. भाजपाने पहिल्यांदाच नागपुरात आपला उमेदवार उतरविला होता. याशिवाय चंद्रकांता कांबळे, दिनकर बेंडेकर, टिकाराम पेंदाम, महेश पुरोहित, रामरतन जानोरकर, विठ्ठलदास दिवेचा, आनंदराव कुबेटकर, एन.एल.राव, कामरान खान, प्रकाश चाफले, प्रमोद पटेल, हरिभाऊ तभाने, रमण मूर्ती, भगवंतसिंह भसिन, अरविंद जोहरापुरकर, नत्थू शोरटे, राहुल रामटेके, शब्बीर अहमद, मुकुंद गजवे, बाळासाहेब अग्ने, विठ्ठलराव मासुरकर हे २२ अपक्षदेखील निवडणुकीत उतरले होते.अपेक्षेप्रमाणे बनवारीलाल पुरोहित जिंकून आले. त्यांना ५२.९९ टक्के मते प्राप्त झाली. तर श्याम खोब्रागडे हे २९.४१ टक्के मतांसह परत दुसऱ्या स्थानी राहिले. १९८० च्या तुलनेत त्यांना मिळालेल्या मतांमध्ये मात्र तीन टक्क्यांची वाढ झाली. भाजपाचे रामप्रकाश आहुजा हे १४.१५ टक्के मतांसह तिसऱ्या स्थानी होते. या तीन उमेदवारांना मिळून ९६.५५ टक्के मते होती. तर २२ अपक्षांच्या पदरी केवळ ३.४५ टक्के मते आली.

काँग्रेसने विदर्भाचा बालेकिल्ला राखलाइंदिरा गांधी आपल्या मृत्यूच्या सात दिवस अगोदर विदर्भाच्या दौऱ्यावर आल्या होत्या. २३ आॅक्टोबर रोजी त्या नागपुरात आल्या व तेथून चंद्रपूर जिल्ह्यातील सुपर थर्मल पॉवर स्टेशनच्या लोकार्पण सोहळ्यासाठी गेल्या होत्या. ‘आज भारतावर विविध बाजूंनी संकटे येत आहेत. बाहेरच्यापेक्षा घरातून होणारी कटकारस्थाने जास्त धोकादायक आहे व हीच चिंतेची बाब आहे. माझ्या जीवाला धोका असला तरी मी या शक्तींसोबत शेवटपर्यंत लढेल असे त्या चंद्रपुरात म्हणाल्या होत्या. त्यानंतर सातच दिवसात ३१ आॅक्टोबर रोजी राजधानीत त्यांच्याच सुरक्षारक्षकांनी त्यांची हत्या केली होती. इंदिरा गांधी यांच्या मृत्यूनंतर देशात एक सहानुभूतीची लाट आली. विदर्भात तर कॉंग्रेसला सर्वच्या सर्व जागा मिळाल्या व कॉंग्रेसचा बालेकिल्ला ही ओळख या क्षेत्राने कायम ठेवली.

टॅग्स :Banvarilal Purohitबनवारीलाल पुरोहित