शहरं
Join us  
Trending Stories
1
Siraj, IND vs ENG: 'तो' एक शब्द अन् सिराजने फिरवला अख्खा सामना... टीम इंडियाच्या विजयानंतर उघड केलं गुपित
2
राज ठाकरेंच्या 'मराठी'नंतर नितीश कुमारांची 'बिहारी' घोषणा; शिक्षक भरतीत नोकरी बिहारींनाच मिळणार
3
१ तास सीबीआयला चकवा दिला, पैशांनी भरलेली बॅग कचराकुंडीत फेकली; नवी मुंबईत फिल्मी स्टाईल 'थरार'
4
"केंद्रातील मोदी सरकार व्हेंटिलेटवर…’’, सबळ कारणं देत इंडिया आघाडीच्या नेत्याचा मोठा दावा
5
IND vs ENG : सिराज-प्रसिद्ध कृष्णाचा जलवा! टीम इंडियानं रचला इतिहास; पहिल्यांदाच असं घडलं
6
मंत्रिपद जाऊनही धनंजय मुंडेंनी सरकारी बंगला का सोडला नाही? भरावा लागणार दंड
7
MSRTC Recruitment: एसटी महामंडळात नोकरीची संधी, जाणून घ्या पात्रता आणि अर्ज करण्याची पद्धत!
8
IND vs ENG 5th Test : टीम इंडियानं हातून निसटलेली मॅच जिंकून दाखवली! मालिकेत बरोबरी
9
'बिग बॉस १९'साठी 'तारक मेहता'लाच ऑफर? मेकर्सने केली विचारणा; अभिनेत्याच्या होकाराची प्रतीक्षा
10
Mangalagauri 2025: पूजा होईपर्यंत बोलायचे नाही, असा मंगळागौरीच्या पूजेचा नियम का?
11
"हे बंद करा"; परिणय फुकेंच्या विधानावर बोलताना CM फडणवीसांनी माध्यमांचे टोचले कान, काय म्हणाले?
12
मुंबई घडवण्यात हिंदी भाषिकांचं मोठं योगदान, मराठी केवळ ३० टक्के...: निशिकांत दुबेंनी पुन्हा डिवचलं
13
बाजारात जोरदार 'कमबॅक'! सेन्सेक्स-निफ्टीमध्ये मोठी वाढ, हिरो मोटर्ससह 'या' शेअर्सचा बंपर परतावा
14
एका शेअरवर १५६ रुपयांचा डिविडंड देणार ही कंपनी, रेकॉर्ड डेट १५ ऑगस्टपूर्वीच, तुमच्याकडे आहे का?
15
“आपला पक्ष मुंबईत सर्वांत जास्त बलवान आहे, यंदा महापालिकेत मनसेचीच सत्ता येणार”: राज ठाकरे
16
एक दिवस एमजी टाटाला मागे टाकणार? जुलैमध्ये एवढ्या विकल्या इलेक्ट्रीक कार... ह्युंदाई क्रेटा...
17
Viral Video: पाठीमागून आला अन् मिठी मारली, छातीलाही केला स्पर्श; भररस्त्यात महिलेसोबत घाणेरडं कृत्य!
18
भारतातील एकमेव रेल्वे स्टेशन, ज्याला नावच नाही, तरीही थांबते ट्रेन, लोक करतात प्रवास
19
पंतप्रधान मोदींनंतर चार तासांनी अमित शाह राष्ट्रपतींना भेटले; ५ ऑगस्टला काहीतरी मोठे घडणार....
20
IND vs ENG :मियाँ मॅजिक! बॅक टू बॅक ओव्हरमध्ये विकेट; KL राहुलनं एक कॅच सोडला

लॉकडाऊनमुळे रिटेल व्यवसायाचे ५.५० लाख कोटींचे नुकसान : ‘कॅट’चा अंदाज

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 5, 2020 20:27 IST

रिटेल व्यावसायिकांचा ५.५० लाख कोटींचा व्यवयाय ठप्प राहिला असून हे व्यवसाय नव्याने उभे राहण्यासाठी केंद्र सरकारने आर्थिक पॅकेज द्यावे, अशी मागणी देशातील रिटेल व्यापाऱ्यांची शिखर संघटना कन्फेडरेशन ऑफ ऑल इंडिया ट्रेडर्स (कॅट)चे राष्ट्रीय अध्यक्ष बी.सी. भरतीया यांनी केली आहे.

ठळक मुद्देकोरोनापेक्षा आर्थिक महामारी जास्त भयावह

लोकमत  न्यूज  नेटवर्कनागपूर : अर्थव्यवस्थेचा कणा असलेले देशात सात कोटीपेक्षा जास्त रिटेल व्यावसायिक आहेत. यामध्ये सर्व प्रकारच्या वस्तूंच्या व्यवसायाचा समावेश आहे. लॉकडाऊनच्या काळात जीवनावश्यक वस्तू वगळता अन्य व्यावसायिक दुकाने आणि शोरूम बंद आहेत. त्यामुळे रिटेल व्यावसायिकांचा ५.५० लाख कोटींचा व्यवयाय ठप्प राहिला असून हे व्यवसाय नव्याने उभे राहण्यासाठी केंद्र सरकारने आर्थिक पॅकेज द्यावे, अशी मागणी देशातील रिटेल व्यापाऱ्यांची शिखर संघटना कन्फेडरेशन ऑफ ऑल इंडिया ट्रेडर्स (कॅट)चे राष्ट्रीय अध्यक्ष बी.सी. भरतीया यांनी केली आहे. कोरोना महामारीपेक्षा आर्थिक महामारी जास्त भयावह ठरल्याचे भरतीया म्हणाले.संपूर्ण देशात २४ मार्चपासून लॉकडाऊन करण्यात आले. तेव्हापासून ३० एप्रिलपर्यंत देशात रिटेल व्यवसायात जवळपास ५.५० लाख कोटींचा व्यवसाय झाला नाही. व्यवसाय न झाल्याने किमान २० टक्के व्यापारी आणि त्यांच्यावर अवलंबून असणारे १० टक्के अन्य व्यापारी व्यवसाय बंद करण्याची शक्यता आहे. जवळपास ३ कोटी विक्रेत्यांचे शटर पूर्णपणे बंद आहे. लॉकडाऊनने भारतीय रिटेल विक्रेत्यांचाा काही महिन्यांचा व्यवसाय पूर्णपणे संपुष्टात आला आहे. या व्यावसायिकांचा व्यवसाय उभा राहण्यासाठी आणि त्यांच्या अस्तित्वासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि वित्तमंत्री निर्मला सीतारामन यांनी पर्याप्त आर्थिक पॅकेज देण्याची मागणी कॅटने पूर्वीच केली आहे. भरतीया म्हणाले, कोरोनाने भारतीय रिटेल विक्रे त्यांचा व्यापार पूर्णपूर्ण बंद झाला आहे. त्याचा देशातील अर्थव्यवस्थेवर परिणाम झाला आहे. देशातील रिटेल व्यावसायिक दररोज १५ हजार कोटींचा व्यवसाय करतात. ४० दिवसांपेक्षा जास्तच्या टाळेबंदीमुळे संपूर्ण व्यावसायिक संकटात आहेत. या व्यावसायिकांवर अवलंबून असणाऱ्या जवळपास २५ कोटी लोकांच्या रोजगारावर संकट आले आहे.भरतीया म्हणाले, भारतातील कमीतकमी अडीच कोटी व्यापारी सूक्ष्म आणि लघु स्वरूपाचे आहेत. दुकाने दीर्घकाळ बंद असल्याने त्यापैकी अनेकांकडे पुढे व्यवसाय टिकवून ठेवण्यासाठी भांडवल नाही. लॉकडाऊननंतर किमान ८ ते ९ महिने व्यवसाय रुळावर येण्यास लागतील. तोपर्यंत सर्वच विक्रेत्यांना मंदीचा सामना करावा लागेल. व्यवसाय सुरू झाल्यानंतर त्यांना नोकरांचे पगार, दुकानाचे भाडे आणि इतर मासिक खर्च द्यावे लागतील आणि दुसरीकडे त्यांना कठोर सामाजिक अंतराच्या नियमांसह ग्राहकांना सेवा प्रदान कराव्या लागतील. त्याचा व्यवसायाला फटका बसण्याची भीती आहे. आर्थिक पॅकेजअभावी विक्रेत्यांच्या पुनरुज्जीवनाच्या सर्व आशा धुळीस मिळाल्या आहेत. आर्थिक महामारी ही कोरोना महामारीपेक्षा भयंकर ठरणार काय, अशी भीती भरतीया यांनी व्यक्त केली.

टॅग्स :businessव्यवसायnagpurनागपूर