शहरं
Join us  
Trending Stories
1
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
2
Latest Marathi News LIVE Updates: काँग्रेसने बारामतीत उमेदवार देणं चुकीचे नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका
3
कच्च्या तेलाबाबत सौदी अरेबियानं घेतला डोकेदुखी वाढवणारा निर्णय; पेट्रोल-डिझेलचे दर भडकणार?
4
...त्यामुळेच अमेरिका-इराण युद्ध संपत नाहीये; चीन-रशियाची पडद्यामागून मदत पडतेय भारी?
5
Travel : खिशात फक्त १० हजार? टेन्शन सोडा! भारतातल्या 'या' ७ सुंदर जागांना द्या स्वस्तात भेट
6
टाटा Punch चा धमाका Nexon ला मागे टाकत बनली देशातील नंबर-१ SUV; बघा टॉप १० कारची यादी
7
Delhi Assembly: दिल्ली विधानसभा परिसरात मोठी खळबळ, VIP गेट तोडून घुसली अज्ञात कार, तपास सुरू!
8
रन आऊटचा वाद अन् अंपायरचीच केली हत्या! क्रिकेट सामन्यातील भांडणाचा रक्तरंजित शेवट
9
फायद्याची गोष्ट! हेल्मेट घातल्याने खरंच केस गळतात का? जाणून घ्या, यामागचं 'ते' सत्य
10
IIT बाबाने गुपचूप लग्न उरकले! जोड्याने सरप्राईज द्यायला गावी गेले, संन्यास सोडून संसारातील 'अध्यात्म' सांगणार?
11
IPL दरम्यान ICC ची मोठी घोषणा! जसप्रीत बुमराह आणि संजू सॅमसन यांच्यात तगडी फाईट
12
Astro Tips: तुमच्या हाताची ५ बोटं आहेत ५ ग्रहांचे प्रतिनिधी; कोणत्या बोटात अंगठी घालणे अधिक लाभदायी?
13
चीनकडून काहीतरी वेगळेच सुरु आहे...! अमेरिका-इराण युद्धाच्या सावटात सोन्या-चांदीची प्रचंड खरेदी; डॉलरला शह देण्यासाठी नवी चाल?
14
पाकिस्तानचा शांतता प्रस्ताव इराणने फेटाळला; राष्ट्रीय हितांवर तडजोड नाही, इराणची स्पष्टोक्ती...
15
Delhi Assembly: दिल्ली विधानसभेत कार घुसल्यानंतर पुढील ५ मिनिटं काय घडलं? प्रत्यक्षदर्शीनं सांगितला संपूर्ण थरार!
16
सकाळी रडवले, दुपारी हसवले! शेअर बाजाराची 'रॉकेट' भरारी; 'या' ४ कारणांमुळे गुंतवणूकदारांची चांदी
17
जगातील भल्याभल्या देशांना 'या' बाबतीत तगडी टक्कर देतो इराण; अमेरिका तर त्यांच्या आसपासही नाही!
18
इराणचा 'डिजिटल' बॉम्ब! जगाचा इंटरनेट संपर्क तोडण्याची धमकी; समुद्राखालील केबल्स कापल्यास महाभयंकर संकट?
19
Video: शिंदेसेनेच्या ज्योती वाघमारेंना खासदारकीची शपथ घेताना मध्येच थांबवले; संसदेत काय घडलं?
20
Astro: सावधान! नशिबाला दोष देण्यापूर्वी एकदा 'हे' वाचा; तुमच्या कोणत्या साध्या चुकीमुळे कोणता ग्रह कोपतोय?
Daily Top 2Weekly Top 5

लॉकडाऊनमुळे रिटेल व्यवसायाचे ५.५० लाख कोटींचे नुकसान : ‘कॅट’चा अंदाज

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 5, 2020 20:27 IST

रिटेल व्यावसायिकांचा ५.५० लाख कोटींचा व्यवयाय ठप्प राहिला असून हे व्यवसाय नव्याने उभे राहण्यासाठी केंद्र सरकारने आर्थिक पॅकेज द्यावे, अशी मागणी देशातील रिटेल व्यापाऱ्यांची शिखर संघटना कन्फेडरेशन ऑफ ऑल इंडिया ट्रेडर्स (कॅट)चे राष्ट्रीय अध्यक्ष बी.सी. भरतीया यांनी केली आहे.

ठळक मुद्देकोरोनापेक्षा आर्थिक महामारी जास्त भयावह

लोकमत  न्यूज  नेटवर्कनागपूर : अर्थव्यवस्थेचा कणा असलेले देशात सात कोटीपेक्षा जास्त रिटेल व्यावसायिक आहेत. यामध्ये सर्व प्रकारच्या वस्तूंच्या व्यवसायाचा समावेश आहे. लॉकडाऊनच्या काळात जीवनावश्यक वस्तू वगळता अन्य व्यावसायिक दुकाने आणि शोरूम बंद आहेत. त्यामुळे रिटेल व्यावसायिकांचा ५.५० लाख कोटींचा व्यवयाय ठप्प राहिला असून हे व्यवसाय नव्याने उभे राहण्यासाठी केंद्र सरकारने आर्थिक पॅकेज द्यावे, अशी मागणी देशातील रिटेल व्यापाऱ्यांची शिखर संघटना कन्फेडरेशन ऑफ ऑल इंडिया ट्रेडर्स (कॅट)चे राष्ट्रीय अध्यक्ष बी.सी. भरतीया यांनी केली आहे. कोरोना महामारीपेक्षा आर्थिक महामारी जास्त भयावह ठरल्याचे भरतीया म्हणाले.संपूर्ण देशात २४ मार्चपासून लॉकडाऊन करण्यात आले. तेव्हापासून ३० एप्रिलपर्यंत देशात रिटेल व्यवसायात जवळपास ५.५० लाख कोटींचा व्यवसाय झाला नाही. व्यवसाय न झाल्याने किमान २० टक्के व्यापारी आणि त्यांच्यावर अवलंबून असणारे १० टक्के अन्य व्यापारी व्यवसाय बंद करण्याची शक्यता आहे. जवळपास ३ कोटी विक्रेत्यांचे शटर पूर्णपणे बंद आहे. लॉकडाऊनने भारतीय रिटेल विक्रेत्यांचाा काही महिन्यांचा व्यवसाय पूर्णपणे संपुष्टात आला आहे. या व्यावसायिकांचा व्यवसाय उभा राहण्यासाठी आणि त्यांच्या अस्तित्वासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि वित्तमंत्री निर्मला सीतारामन यांनी पर्याप्त आर्थिक पॅकेज देण्याची मागणी कॅटने पूर्वीच केली आहे. भरतीया म्हणाले, कोरोनाने भारतीय रिटेल विक्रे त्यांचा व्यापार पूर्णपूर्ण बंद झाला आहे. त्याचा देशातील अर्थव्यवस्थेवर परिणाम झाला आहे. देशातील रिटेल व्यावसायिक दररोज १५ हजार कोटींचा व्यवसाय करतात. ४० दिवसांपेक्षा जास्तच्या टाळेबंदीमुळे संपूर्ण व्यावसायिक संकटात आहेत. या व्यावसायिकांवर अवलंबून असणाऱ्या जवळपास २५ कोटी लोकांच्या रोजगारावर संकट आले आहे.भरतीया म्हणाले, भारतातील कमीतकमी अडीच कोटी व्यापारी सूक्ष्म आणि लघु स्वरूपाचे आहेत. दुकाने दीर्घकाळ बंद असल्याने त्यापैकी अनेकांकडे पुढे व्यवसाय टिकवून ठेवण्यासाठी भांडवल नाही. लॉकडाऊननंतर किमान ८ ते ९ महिने व्यवसाय रुळावर येण्यास लागतील. तोपर्यंत सर्वच विक्रेत्यांना मंदीचा सामना करावा लागेल. व्यवसाय सुरू झाल्यानंतर त्यांना नोकरांचे पगार, दुकानाचे भाडे आणि इतर मासिक खर्च द्यावे लागतील आणि दुसरीकडे त्यांना कठोर सामाजिक अंतराच्या नियमांसह ग्राहकांना सेवा प्रदान कराव्या लागतील. त्याचा व्यवसायाला फटका बसण्याची भीती आहे. आर्थिक पॅकेजअभावी विक्रेत्यांच्या पुनरुज्जीवनाच्या सर्व आशा धुळीस मिळाल्या आहेत. आर्थिक महामारी ही कोरोना महामारीपेक्षा भयंकर ठरणार काय, अशी भीती भरतीया यांनी व्यक्त केली.

टॅग्स :businessव्यवसायnagpurनागपूर