शहरं
Join us  
Trending Stories
1
"१०% लोकसंख्येचं सैन्यावर नियंत्रण...!", बिहारमध्ये मतदानापूर्वी राहुल गांधींचं वादग्रस्त विधान; भाजप म्हणाला, "आता जातीच्या आधारावर..."
2
टीव्ही, रेफ्रिजरेटर आणि मोबाईल फोन दुरुस्त करण्याचा त्रास संपला; या सरकारी योजनेमुळे लोकांचे हजारो रुपये वाचणार
3
पाकिस्तानच्या हरिस रौफवर दोन सामन्यांसाठी बंदी; ICC ची मोठी कारवाई, बुमराहासह सूर्यकुमारलाही ठोठावला दंड
4
पैलवान सिकंदर शेखला मोठा दिलासा! कोर्टाने जामीन मंजूर केला; सुप्रिया सुळेंनी मुख्यमंत्र्यांचे मानले आभार
5
"तळपायाची आग मस्तकात गेली आणि आता १०० टक्के खात्री पटली की..."; राज ठाकरेंचा निवडणूक जाहीर करताच पारा चढला
6
लोको पायलटने रेड सिग्नल दुर्लक्ष केला, छत्तीसगडमध्ये झालेल्या प्रवासी ट्रेन आणि मालगाडी अपघातामागील कारण काय?
7
आठवीत शाळा सोडली; मुलांसोबत टेनिस बॉलवर खेळत ‘क्रांती’ घडवली, आणि आज ती वर्ल्ड चॅम्पियन!
8
"मुख्यमंत्री होताच...!"; योगी आदित्यनाथ यांच्या 'टप्पू-पप्पू-अप्पू' विधानावरून तेजस्वी यादव यांचा मोठा पलटवार
9
बिहार विधानसभा निवडणुकीत PK यांच्या जनसुराजला किती जागा मिळणार? ओवेसींच्या पक्षाचं काय होणार? असा आहे सर्व्हेचा अंदाज
10
'...हे निवडणूक आयोगाने लक्षात ठेवावं'; मनसे नेते संदीप देशपांडेंचा थेट इशारा, कोणते प्रश्न विचारले?
11
अजित पवारांची बिहार विधानसभा निवडणुकीत वेगळी चूल; तेजस्वी यादवांविरोधात उतरवला उमेदवार, १५ उमेदवार कोण?
12
पलंगावर कुजलेल्या अवस्थेत पडलेले होत पती-पत्नीचे मृतदेह, पोटच्या मुलांनीच संपवले  
13
बिलासपूरजवळ भीषण रेल्वे अपघातात १० जणांचा मृत्यू ! जखमींच्या किंकाळ्यांनी परिसर थरारला; महाराष्ट्रातील प्रवासी किती?
14
जगाचे लक्ष अमेरिकेकडे! अणु क्षेपणास्त्र चाचणीसाठी हालचाली सुरू, ट्रम्प यांच्या विधानानंतर सैन्याने दिली मोठी अपडेट
15
बिहारमध्ये पुन्हा 'NDA राज', सर्व्हेत छप्परफाड जागा मिळण्याचा अंदाज; भाजप 'टॉप', कोण-कोण ठरणार 'फ्लॉप'?
16
महाराष्ट्रात निवडणुकीचा शंखनाद! २४६ नगरपरिषदा, ४२ नगरपंचायतींसाठी मतदान; वाचा जिल्हानिहाय यादी...
17
Bilaspur Train Accident: एक जण डब्यात अडकल्याची माहिती, बाहेर काढण्यासाठी प्रयत्न सुरू!
18
Divorce laws: 'या' देशांमध्ये घटस्फोटाचे नियम आहेत खूपच कडक; दोन ठिकाणी तर थेट बेकायदेशीर!
19
'दुधाचा अभिषेक घालायला हा काय देव आहे का?', रामराजेंचा रणजितसिंह निंबाळकरांवर निशाणा
20
Municipal Corporation Election: राज्यातील महापालिकांच्या निवडणुका कधीपर्यंत होणार? निवडणूक आयोगाने दिले उत्तर 

नागपूर जिल्ह्यातही आता लोकल मेट्रो रेल्वे धावणार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 28, 2018 10:36 IST

नागपूर शहरात मेट्रो रेल्वे धावणार असताना आता नागपूरहून बुटीबोरी, वर्धा, कामठी, कळमेश्वर, काटोल, रामटेक व भंडारा या शहरांपर्यंत ‘लोकल मेट्रो रेल्वे’ सुरू करण्याचा प्रस्ताव केंद्रीय भूपृष्ठ वाहतूक व जहाजबांधणी मंत्री नितीन गडकरी यांनी सुचविला आहे.

ठळक मुद्देगडकरींनी दिला रेल्वेला प्रस्ताव वर्धा, कामठी, कळमेश्वर, काटोल, रामटेक, भंडारापर्यंत सेवा पॅसेंजर बंद होणार

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : नागपूर शहरात मेट्रो रेल्वे धावणार असताना आता नागपूरहून बुटीबोरी, वर्धा, कामठी, कळमेश्वर, काटोल, रामटेक व भंडारा या शहरांपर्यंत ‘लोकल मेट्रो रेल्वे’ सुरू करण्याचा प्रस्ताव केंद्रीय भूपृष्ठ वाहतूक व जहाजबांधणी मंत्री नितीन गडकरी यांनी सुचविला आहे. त्यांच्या सूचनेनुसार मेट्रो रेल्वेने प्रस्ताव सादर केला असून, तो आता लवकरच रेल्वे विभागाकडे सादर केला जाणार आहे. हा प्रस्ताव मंजूर झाल्यास या मार्गावरील पॅसेंजर रेल्वे बंद केल्या जातील व रेल्वेच्या लाईन वापरून महामेट्रो त्यावर लोकल मेट्रो रेल्वे चालवेल. यामुळे वेळेची बचत होऊन प्रवाशांना उत्तम सुविधा उपलब्ध होईल.केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी मंगळवारी नागपूर शहर व जिल्ह्यातील विविध प्रश्न सोडविण्यासाठी आढावा बैठक घेतली. तीत पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे, महापौर नंदा जिचकार, जि.प. अध्यक्ष निशा सावरकर, आ. कृष्णा खोपडे, आ. मल्लिकार्जुन रेड्डी, आ. समीर मेघे, प्रवीण दटके, संदीप जोशी यांच्यासह महापालिका, नासुप्र, रेल्वे, महामेट्रो, सिंचन, बांधकाम आदी विभागांचे अधिकारी उपस्थित होते. यावेळी महामेट्रोचे व्यवस्थापकीय संचालक बृजेश दीक्षित यांनी सांगितले की, रेल्वेचे स्टेशन व रुळ वापरून लोकल मेट्रो रेल्वे चालविण्याची महामेट्रोची योजना आहे.सद्यस्थितीत या शहरांसाठी नागपूरहून पॅसेंजर ट्रेन चालविल्या जातात. मात्र, त्यांची गती सरासरी ४० किलोमीटर प्रति तासाहून कमी आहे. त्यामुळे प्रवाशांना बराच वेळ लागतो, शिवाय पॅसेंजर ट्रेनच्या वेळाही गैरसोयीच्या आहेत. याच मार्गांवर मेट्रोरेल्वेच्या धर्तीवर लोकल मेट्रो रेल्वे चालविली तर ताशी १२० किलोमीटरपर्यंतची गती मिळू शकते. वेळेची बचत होईल, शिवाय प्रवाशांना एसी प्रवास करण्याची सुविधा मिळेल. वेळ कमी लागणार असल्यामुळे रेल्वेकडून स्लॉट सहज उपलब्ध होतील. त्याचा नियमित रेल्वेसेवेवर कुठलाही परिणाम होणार नाही. गडकरी यांनी या प्रस्तावाचे भक्कमपणे समर्थन केले.

टॅग्स :Metroमेट्रोIndian Railwayभारतीय रेल्वे