शहरं
Join us  
Trending Stories
1
३१ जानेवारीपर्यंत निवडणुका पार पाडा; सर्वोच्च न्यायालयाचा आदेश, राज्य निवडणूक आयोगाला सुनावले खडेबोल
2
मोदी हाच जगातील सर्वांत मोठा ब्रँड; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस : भाजप कार्यकर्त्यांचा ब्रँड निर्माण करून देणारा पक्ष
3
छगन भुजबळांना कोर्टाचा दणका, बेनामी मालमत्तेचा खटला पुन्हा चालविण्याचे आदेश
4
विना‘आधार’ आडमुठेपणा...ती नामुष्की निवडणूक आयोगामुळे सरकारवर ओढवेल
5
स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुका तीन टप्प्यांत? जाणून घ्या सविस्तर
6
एकनाथ शिंदेंवरील टीकेला प्रत्युत्तर देणार; खा. नरेश म्हस्के यांचा मंत्री नाईकांना अप्रत्यक्ष इशारा
7
परवाना मिळण्याआधीच मोडले नियम; ई-बाईकऐवजी चक्क पेट्रोलवरील गाडी हजर
8
रेसकोर्सवरील थीम पार्कवर पुन्हा ‘इव्हेंट’; काम सुरू होईपर्यंत कार्यक्रमांसाठी देणार भाड्याने
9
“बेस्ट निवडणुकीत हसे करून घेतले, ब्रँडचा बँड वाजला”; CM फडणवीसांची ठाकरे बंधूंवर बोचरी टीका
10
“लिहून घ्या, काही झाले तरी आता मुंबईत...”; CM फडणवीसांनी मुंबई मनपा निवडणुकीचे रणशिंग फुंकले
11
Asia Cup 2025 : बांगलादेशनं मॅच जिंकली; अफगाणिस्तानला अजूनही स्वबळावर बाजी पलटण्याची संधी, पण...
12
'आपण दहशतवादी नाही… पाकिस्तानसाठी लढलो'; काय म्हणाला जैश कमांडर? भारताविरुद्धही ओकली गरळ
13
West Indies Squad For India Test Series : दिग्गजाच्या पोराला संधी; माजी कर्णधाराचा पत्ता कट
14
लाखो लोकांची फसवणूक, दीड वर्षांपासून फरार; अखेर ‘ज्ञानराधा’च्या अर्चना कुटे यांना अटक
15
७ तास चालली चर्चा, भारतावर लादलेला ट्रम्प टॅरिफ अमेरिका कमी करणार? पाहा, बैठकीत काय झाले...
16
दोन मुंबईकरांसोबत नेट प्रॅक्टिस करताना दिसला हिटमॅन रोहित शर्मा; फोटो व्हायरल
17
“सध्याचे वातावरण सरकारला पोषक नाही, पराजयाच्या भीतीने निवडणुका पुढे ढकलल्या”: विजय वडेट्टीवार
18
BAN vs AFG : 'चमत्कारी' खानचा हिट शो! भुवीचा विक्रम मोडला; हार्दिक पांड्यालाही संधी, पण...
19
म्युच्युअल फंड असावा तर असा...! ₹10000 ची SIP गुंतवणूक ₹1.79 कोटींवर पोहोचली, गुंतवणूकदारांना केलं मालामाल
20
इस्रायलचा येमेनच्या बंदरावर मोठा हवाई हल्ला, हुथी बंडखोरांचा दावा!

लॉयडस्-उत्तम गलवाने बेरोजगारांवर उगवला सूड; कोट्यवधींची मलई ओरबडली

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 9, 2022 12:16 IST

सरकारी नियमानुसार, ७० ते ८० टक्के स्थानिक बेरोजगारांना आणि उर्वरित रोजगार बाहेरच्या मंडळीला मिळायला हवा. मात्र, हा कारखाना चालविणाऱ्यांनी वर्धा जिल्ह्यातील बेरोजगारांवर सूड उगविणे सुरू केले.

ठळक मुद्देप्रदूषणाची विषारी मगरमिठी जीवाचा धोका पत्करून अनेकजण अल्प पगारात करतात कामकंपनी प्रशासनाची मुजोरी

नरेश डोंगरे - कमल शर्मा

नागपूर : आधी लॉयडस् आणि नंतर उत्तम गलवा असे नामकरण झालेल्या स्टील प्लांटने कोट्यवधींची मलाई ओरबडून घेतल्यानंतर कारखान्याचे प्रशासन आणखी काही निष्ठूर हातात दिले. त्यानंतर रोजगाराचा लाॅलीपॉप दाखविणाऱ्या या कारखान्याच्या प्रशासनाने वर्धा जिल्ह्यातील बेरोजगारांवर अक्षरश: सूड उगविणे सुरू केले.

वर्धा जिल्ह्यातील बेरोजगारांना रोजगारांचे स्वप्न दाखविणाऱ्या भूगावच्या या स्टील प्लांटमध्ये सत्तांतराचे आतापर्यंत तीन अंक घडले. प्रत्येक वेळी नवा गडी नवा राज सुरू झाल्याने शेतकरी आणि बेरोजगारांची आशा पल्लवित झाली. आता आपल्या मुलाबाळांना चांगल्या हुद्याची अन् चांगल्या पगाराची नोकरी मिळेल, अशी आशा भोळ्या-भाबड्या जनतेला वाटू लागली. मात्र, कसले काय.. कारखान्याचा कारभार चालविणाऱ्या प्रशासनाने या भागातील शेतकरी-गावकऱ्यांच्या जीवावर उठून त्यांचे जगणे धोक्यात आणले. केवळ अन् केवळ वर्षाला शेकडो कोटींची मलाई ओरबडून खाण्याचा सपाटा लावला. दुसरीकडे बेरोजगारांच्या ताटात माती टाकण्याचेही धोरण राबविले.

निर्ढावलेल्या कंत्राटदारांनी बेरोजगारांना दाखविला बाहेरचा रस्ता

सरकारी नियमानुसार, ७० ते ८० टक्के स्थानिक बेरोजगारांना आणि उर्वरित रोजगार बाहेरच्या मंडळीला मिळायला हवा. मात्र, हा कारखाना चालविणाऱ्यांनी वर्धा जिल्ह्यातील बेरोजगारांवर सूड उगविणे सुरू केले. येथे निर्ढावलेले कंत्राटदार आणून बसविले. प्रशासनाच्या इशाऱ्यानुसार वर्धा शहरच काय, कारखान्याच्या आजूबाजूच्या १०० मैलांवरील अंतराच्या आतमधील कोणत्याही रहिवाशाला येथे कामावर घ्यायचे नाही, असा पवित्रा या कंत्राटदारांनी घेतला, त्यामुळे स्थानिक बेरोजगारांना डावलणे सुरू झाले.

तरुणांच्या जीवाशी खेळ

जेथे बाहेरचे कुणीच काम करायला तयार नाही, अशा धोक्याच्या ठिकाणी स्थानिक बेरोजगारांना काम दिले जाते. लोखंड पिघळवणाऱ्या भट्ट्यांजवळ आणि तशाच अत्यंत धोक्याच्या ठिकाणी त्यांना जाणीवपूर्वक कामाला ठेवून त्यांच्या जीवाशी खेळ केला जातो. काम करायचे असेल तर करा नाहीतर निघून जा, असे सांगितले जाते. जीवापेक्षा दुसरे काही मोलाचे नाही, असे मानत अनेकजण कारखान्याच्या दाराकडे पुन्हा फिरकत नाही. मात्र, अनेकजण पोटाची आग विझविण्यासाठी जीवाचा धोका पत्करून अल्प पगारात येथे काम करतात.

सुरक्षेची प्रभावी साधनेही नदारद

विशेष म्हणजे, येथील कामगारांना आतमध्ये रक्षेची प्रभावी साधनेही उपलब्ध करून दिली जात नसल्याचा आरोप आहे. जुजबी साधनांच्या आधारे धोक्याच्या ठिकाणी कामावर जुंपले जाते. येथे सुरक्षा वाऱ्यावर असल्याने मोठा बॉयलर स्फोट होऊन कामगारांचा मृत्यू झाला होता. सर्वात मोठ्या कामगार संघटनांचे प्रतिनिधी कारखाना संचालकांच्या ताटाखालचे मांजर बनल्याने आणि इतर दुसऱ्या लढवय्या कामगार संघटनांना येथे स्थान नसल्याने कामगारांची मुस्कटदाबी सुरू झाली.

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीpollutionप्रदूषणenvironmentपर्यावरणnagpurनागपूर