शहरं
Join us  
Trending Stories
1
Kamchatka Krai earthquake Russia: समुद्राच्या खाली एकामागोमाग एक ३० धक्के! अमेरिकेच्या समुद्र किनाऱ्यावर सहा फूट लाटा उसळल्या, जगभरात हाहाकार... 
2
१९५२ नंतरचा सर्वात शक्तिशाली भूकंप, रिंग्ज ऑफ फायर'ला बोलतात खरा खलनायक'
3
कृषिमंत्री कोकाटे किती मिनिटे रमी खेळत होते?, विधिमंडळ चौकशी अहवालात उघड, रोहित पवारांचा दावा
4
IND vs PAK 1st Semi Final : जे नको तेच घडलं! या स्पर्धेत जुळून आला भारत-पाक सेमीचा योग
5
दोन मोर्चांवर वेगळे लढले...! विरूच्या निधनानंतर महिन्याभराने जयनेही प्राण सोडले; गीरचे जंगल आता त्यांच्या मैत्रीच्या गोष्टी सांगणार...
6
Aditya Infotech IPO: इश्यू उघडताच GMP मध्ये तुफान तेजी; गुंतवणुकदारांना मिळू शकतो जबरदस्त नफा
7
महाराष्ट्रासाठी काँग्रेसने रणनीती आखली; रमेश चेन्नीथेला आणि हर्षवर्धन सपकाळ यांच्यावर मोठी जबाबदारी
8
"हा माझा नवरा"; इन्स्पेक्टरच्या मृत्यूनंतर हायव्होल्टेज ड्रामा; मृतदेहासाठी २ बायका भिडल्या, अखेर...
9
NSDL IPO: ८०० रुपये प्राईज बँड, १२७ रुपये GMP; LIC नं केली गुंतवणूक, तुमचा विचार काय?
10
सलमान खानला भेटण्यासाठी ३ अल्पवयीन मुलांनी केला मोठा कांड; २ राज्यांची पोलीस झाली हैराण
11
रश्मिका मंदानाची कॉपी? छत्रपती संभाजीनगरची लेक, विजय देवरकोंडासोबत करणार रोमान्स
12
'ऑपरेशन महादेव'नंतर आता 'ऑपरेशन शिवशक्ती' सुरू! भारतीय सैन्याने दोन दहशतवाद्यांना घातलं कंठस्नान
13
थंडबस्त्यात गेला अनुष्का शर्माचा 'चकदा एक्सप्रेस' सिनेमा, रेणुका शहाणे म्हणाल्या - "मला धक्काच बसला.."
14
कमाल! स्मार्टफोन App द्वारे आतड्यांतील बॅक्टेरियावर नियंत्रण, आली ओरल कॅप्सूल, कसा होणार फायदा?
15
Kamchatka Earthquake: ५ जुलैचे भविष्य ३० जुलैला खरे होणार? रशियातील भुकंपाच्या उंच लाटा जपानच्या किनाऱ्यावर धडकू लागल्या...
16
"दीड लाख देऊन इथं आलोय, मला बोलू द्या..."; संसदेत हजेरी लावणं खासदार राशीद यांना इतकं महाग का पडलं?
17
Reliance Jio ची आपल्या ग्राहकांना मोठी भेट; फक्त ₹५९९ मध्ये घरच्या TV ला बनवा कॉम्प्यूटर
18
PM किसान योजनेचा २० वा हप्ता जाहीर! २००० रुपये थेट बँक खात्यात, लगेच 'असं' तपासा तुमचं नाव!
19
UPI मध्ये १ ऑगस्टपासून होणार बदल; बॅलन्स चेक ते ऑटो-पे पर्यंत सर्वकाही बदलणार, पाहा तुमच्यासाठी काय नवं?
20
भीक मागणाऱ्या व्यक्तीच्या दोन बायका, आता त्याची तक्रार तर ऐका; कलेक्टरकडे पोहोचला अन् म्हणाला...

लॉयडस्-उत्तम गलवाने बेरोजगारांवर उगवला सूड; कोट्यवधींची मलई ओरबडली

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 9, 2022 12:16 IST

सरकारी नियमानुसार, ७० ते ८० टक्के स्थानिक बेरोजगारांना आणि उर्वरित रोजगार बाहेरच्या मंडळीला मिळायला हवा. मात्र, हा कारखाना चालविणाऱ्यांनी वर्धा जिल्ह्यातील बेरोजगारांवर सूड उगविणे सुरू केले.

ठळक मुद्देप्रदूषणाची विषारी मगरमिठी जीवाचा धोका पत्करून अनेकजण अल्प पगारात करतात कामकंपनी प्रशासनाची मुजोरी

नरेश डोंगरे - कमल शर्मा

नागपूर : आधी लॉयडस् आणि नंतर उत्तम गलवा असे नामकरण झालेल्या स्टील प्लांटने कोट्यवधींची मलाई ओरबडून घेतल्यानंतर कारखान्याचे प्रशासन आणखी काही निष्ठूर हातात दिले. त्यानंतर रोजगाराचा लाॅलीपॉप दाखविणाऱ्या या कारखान्याच्या प्रशासनाने वर्धा जिल्ह्यातील बेरोजगारांवर अक्षरश: सूड उगविणे सुरू केले.

वर्धा जिल्ह्यातील बेरोजगारांना रोजगारांचे स्वप्न दाखविणाऱ्या भूगावच्या या स्टील प्लांटमध्ये सत्तांतराचे आतापर्यंत तीन अंक घडले. प्रत्येक वेळी नवा गडी नवा राज सुरू झाल्याने शेतकरी आणि बेरोजगारांची आशा पल्लवित झाली. आता आपल्या मुलाबाळांना चांगल्या हुद्याची अन् चांगल्या पगाराची नोकरी मिळेल, अशी आशा भोळ्या-भाबड्या जनतेला वाटू लागली. मात्र, कसले काय.. कारखान्याचा कारभार चालविणाऱ्या प्रशासनाने या भागातील शेतकरी-गावकऱ्यांच्या जीवावर उठून त्यांचे जगणे धोक्यात आणले. केवळ अन् केवळ वर्षाला शेकडो कोटींची मलाई ओरबडून खाण्याचा सपाटा लावला. दुसरीकडे बेरोजगारांच्या ताटात माती टाकण्याचेही धोरण राबविले.

निर्ढावलेल्या कंत्राटदारांनी बेरोजगारांना दाखविला बाहेरचा रस्ता

सरकारी नियमानुसार, ७० ते ८० टक्के स्थानिक बेरोजगारांना आणि उर्वरित रोजगार बाहेरच्या मंडळीला मिळायला हवा. मात्र, हा कारखाना चालविणाऱ्यांनी वर्धा जिल्ह्यातील बेरोजगारांवर सूड उगविणे सुरू केले. येथे निर्ढावलेले कंत्राटदार आणून बसविले. प्रशासनाच्या इशाऱ्यानुसार वर्धा शहरच काय, कारखान्याच्या आजूबाजूच्या १०० मैलांवरील अंतराच्या आतमधील कोणत्याही रहिवाशाला येथे कामावर घ्यायचे नाही, असा पवित्रा या कंत्राटदारांनी घेतला, त्यामुळे स्थानिक बेरोजगारांना डावलणे सुरू झाले.

तरुणांच्या जीवाशी खेळ

जेथे बाहेरचे कुणीच काम करायला तयार नाही, अशा धोक्याच्या ठिकाणी स्थानिक बेरोजगारांना काम दिले जाते. लोखंड पिघळवणाऱ्या भट्ट्यांजवळ आणि तशाच अत्यंत धोक्याच्या ठिकाणी त्यांना जाणीवपूर्वक कामाला ठेवून त्यांच्या जीवाशी खेळ केला जातो. काम करायचे असेल तर करा नाहीतर निघून जा, असे सांगितले जाते. जीवापेक्षा दुसरे काही मोलाचे नाही, असे मानत अनेकजण कारखान्याच्या दाराकडे पुन्हा फिरकत नाही. मात्र, अनेकजण पोटाची आग विझविण्यासाठी जीवाचा धोका पत्करून अल्प पगारात येथे काम करतात.

सुरक्षेची प्रभावी साधनेही नदारद

विशेष म्हणजे, येथील कामगारांना आतमध्ये रक्षेची प्रभावी साधनेही उपलब्ध करून दिली जात नसल्याचा आरोप आहे. जुजबी साधनांच्या आधारे धोक्याच्या ठिकाणी कामावर जुंपले जाते. येथे सुरक्षा वाऱ्यावर असल्याने मोठा बॉयलर स्फोट होऊन कामगारांचा मृत्यू झाला होता. सर्वात मोठ्या कामगार संघटनांचे प्रतिनिधी कारखाना संचालकांच्या ताटाखालचे मांजर बनल्याने आणि इतर दुसऱ्या लढवय्या कामगार संघटनांना येथे स्थान नसल्याने कामगारांची मुस्कटदाबी सुरू झाली.

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीpollutionप्रदूषणenvironmentपर्यावरणnagpurनागपूर