शहरं
Join us  
Trending Stories
1
Video: मोठी बातमी! एकनाथ शिंदेंकडून पुण्यात 'जय महाराष्ट्र' पाठोपाठ 'जय गुजरात'चा नारा; आधीच मराठी-हिंदी वाद...
2
Sanjay Raut : "अमित शाह यांच्या डुप्लिकेट शिवसेनेचं खरं रूप...", संजय राऊतांचं एकनाथ शिंदेंवर टीकास्त्र
3
“आता काय, राज तुमच्यात येणार, तुमची पॉवर वाढणार”; शिंदेंच्या मंत्र्यांची ठाकरे गटाला कोपरखळी
4
“‘लाडकी बहीण’साठी आम्ही ४१० कोटींचा निधी देतो, पण अजितदादांनी कबूल केले की...”: संजय शिरसाट
5
भारताचा बुद्धीबळपटू डी. गुकेशचा मोठा पराक्रम; वर्ल्ड नंबर वन कार्लसनची जिरवली!
6
२ दिवसांच्या धक्क्यातून बाजार सावरला, पण टाटा-महिंद्रासह 'या' कंपनीला मोठा फटका! तुमचे पैसे सुरक्षित आहेत का?
7
"राज ठाकरेंचं मराठीवर नाही तर राजकारणावर प्रेम", काँग्रेसच्या ज्येष्ठ नेत्याची टीका
8
प्राडाला मोठा झटका! कोल्हापुरी चप्पलवरून थेट कोर्टात खेचले, वाचा काय घडले?
9
ऑनलाईन शॉपिंगमध्ये फसवणूक झाली? 'या' एका नंबरवर कॉल करा, तुमचे पैसे परत मिळतील!
10
धुळे हादरले! मित्रांनी घरातून नेलं, गाडीत बसवले अन् कन्नड घाटात नेऊन घातल्या गोळ्या
11
'चला हवा येऊ द्या'मध्ये अभिजीत खांडकेकरने रिप्लेस केल्यावर निलेश साबळेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला...
12
सूडाची भावना! उधार दिलेले पैसे मागितले म्हणून थेट पेटवून दिलं घर; थरकाप उडवणारा Video
13
PC Jewellers Share Price: कर्जमुक्त होणार ही ज्वेलरी कंपनी, शेअरमध्ये १६ टक्क्यांची तुफान तेजी; गुंतवणूकदार सुखावले, तुमच्याकडे आहे का?
14
'पाकिस्तानात ९ नाही, २१ दहशतवादी अड्डे...', ऑपरेशन सिंदूरबाबत उपसेनाप्रमुखांचा मोठा खुलासा
15
“कुठलीही ताकद ठाकरे ब्रँड संपवू शकणार नाही, दोघे भाऊ एकत्र येत असतील तर...”: सुप्रिया सुळे
16
UIDAI चा मोठा निर्णय! 'या' चुका केल्यास तुमचं आधार कार्ड रद्द होईल, आताच तपासा!
17
मराठ्यांचा इतिहास लोकांपर्यंत पुरेसा पोहचला नाही, इंग्रजांसह स्वकीयही जबाबदार- मुख्यमंत्री फडणवीस
18
“कोकणच्या हिताचे चांगले काम करा, टीकेत अडकून राहू नका”; भास्कर जाधवांचा योगेश कदमांना सल्ला
19
Maharashtran Rains: दक्षिण मध्य महाराष्ट्रातील अनेक भागात मुसळधार पावसाची शक्यता 
20
तब्बल ५ लाख २१ हजार ३५४ विद्यार्थ्यांनी घेतला ‘ST पास थेट शाळेत’ योजनेचा लाभ: प्रताप सरनाईक

महाबोधी महाविहार मुक्त करा ; संविधान चौकात ३१ दिवसांपर्यंत धरणे आंदोलन

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 2, 2025 13:40 IST

Nagpur : दीक्षाभूमीच्या सौंदर्गीकरणासाठी धरणे आंदोलन

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : महाबोधी महाविहार (बोधगया) मुक्त करा आणि नागपूरच्यादीक्षाभूमीचे विनाविलंब सौंदर्गीकरण करा, या मागणीसाठी भारतीय बौद्ध महासभा, समता सैनिक दल आणि भिक्खुसंघ यांच्या वतीने मंगळवार, १ जुलैपासून संविधान चौकात धरणे आंदोलन सुरू करण्यात आले आहे. हे आंदोलन ३१ जुलैपर्यंत ३१ दिवस चालणार आहे.

हे धरणे आंदोलन भन्ते प्रियदर्शी, भन्त डॉ. चंद्रकीर्ती, पदमाकर गणवीर, शंकरराव ढेगरे, प्रकाश दार्शनिक, विजय मेश्राम यांच्या नेतृत्वात ३१ जुलैपर्यंत चालणार आहे. भंते डॉ. चंद्रकीर्ती यांनी आंदोलनाद्वारे, बौद्ध समाजाच्या वतीने महाबोधी महाविहार मुक्त करण्याची, बिहार सरकारचा १९४९ चा बीटी कायदा रद्द करण्याची आणि दीक्षाभूमीचे सौंदर्याकरण करण्याची मागणी असल्याचे सांगितले. या आंदोलनात पपीता खोब्रागड़े, उषा बौद्ध, वीणा नगरारे, सरोज राजवर्धन, विनय ढाके, नरेंद्र थूल, लक्ष्मीकांत मेश्राम, बी. के. हिवराळे, गंगाधर कांबळे, विशाल वानखेडे, माया पाटील, रजनी पिल्लेवान, डॉ. तक्षशीला वासनिक, अविनाश कठाने यांच्यासह अनेक नागरिक उपस्थित होते. 

दीक्षाभूमीच्या सौंदर्गीकरणासाठी धरणे आंदोलनदीक्षाभूमी बचाव-विकास सौंदर्गीकरण समितीच्यावतीने मंगळवारी दीक्षाभूमी परिसरात धरणे आंदोलन करण्यात आले. दीक्षाभूमीच्या लगत असलेल्या सीआरसी (कॉटन रिसर्च सेंटर) च्या जमिनीचे हस्तांतरण करून दीक्षाभूमीचा विकास व सौंदर्याकरण करण्यात यावे, अशी मागणी करण्यात आली. वर्षभरापासून समितीने विविध पातळ्यांवर प्रशासनासोबत चर्चा केली. एनआयटी अध्यक्ष, जिल्हाधिकारी, मनपा आयुक्त यांना निवेदन दिले, पण समाधानकारक उत्तरे मिळाली नाही. शेवटी आंदोलनाची भूमिका घ्यावी लागली. या आंदोलनात आंबेडकरी जनतेने मोठ्या उत्स्फूर्त सहभाग घेतला. संपूर्ण दीक्षाभूमीचा विकास व सौंदर्याकरण त्वरित करावे अन्यथा आंबेडकरी जनता रस्त्यावर उतरल्याशिवाय राहणार नाही, असा इशारा आंदोलकांनी सरकारला दिला.

टॅग्स :nagpurनागपूरDiksha Bhoomi Nagpurदीक्षाभूमी