शहरं
Join us  
Trending Stories
1
Sindhudurg: शिरोडा वेळागर समुद्रात आठ पर्यटक बेपत्ता, तिघांचे मृतदेह सापडले
2
"तुम्ही आम्हाला शिकवू नका..."; भारताने पाकिस्तानला चांगलंच सुनावलं, UN मध्ये काय घडलं?
3
नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाला दि.बा. पाटलांचे नाव; PM मोदींची राज्य सरकारच्या निर्णयाला मंजुरी
4
राज्यात अतिवृष्टी, पूरस्थिती; अकरावी ऑनलाइन प्रवेश प्रक्रियेची ४-६ ऑक्टोबरला अंतिम विशेष फेरी
5
शेतकऱ्यांसाठी काँग्रेस रस्त्यावर; नुकसानग्रस्तांना तत्काळ मदत मिळण्यासाठी राज्यभर आंदोलन
6
“बावळट-मूर्ख, मनोज जरांगेंसारखा नेता मिळणे मराठ्यांचे दुर्दैव”; लक्ष्मण हाकेंचा हल्लाबोल
7
IND vs AUS : तिलक वर्माचं शतक थोडक्यात हुकलं; ऑस्ट्रेलियाविरुद्ध अभिषेकवर 'गोल्डन डक'ची नामुष्की
8
RSS च्या पथसंचलनात ढोल वाजवणाऱ्या स्वयंसेवकाचा हृदयविकाराने मृत्यू; व्हिडिओ व्हायरल
9
वैभव खेडेकरांचा तीनदा भाजपा प्रवेश रखडला, आता शिवसेनेत जाणार? शिंदे गटाचे नेते स्पष्टच बोलले
10
आशाबाई, अंबिका अन् सुनीता... सोलापुरात दोन दिवसांत तीन महिलांची हत्या, कारण एकच
11
काँग्रेसनेही निवडणुकांसाठी कंबर कसली! नागपुरात ४, ५ ऑक्टोबरला विचारमंथन कार्यशाळा
12
बेडरूममध्ये कॅमेरा बसवून खासगी व्हिडीओ काढले अन् परदेशात...; पत्नीने समोर आलं पतीचे किळसवाणं कृत्य
13
IND vs WI: ‘ध्रुव तारा’ चमकला! पहिल्या सेंच्युरीनंतर बॅटची बंदूक करून 'बाप-माणसाला' सेल्युट! (VIDEO)
14
Business: २ मित्रांनी सोडली कॉर्पोरेट नोकरी, दूध विकून झाले कोट्यधीश, तयार केला मोठा ब्रँड!
15
सणासुदीच्या तोंडावर सोन्या-चांदीचे दर घसरले! तुमच्या शहरात आज एका तोळ्याची किंमत किती?
16
POKमध्ये पाकचे अत्याचार, भारताची पहिली प्रतिक्रिया; असीम मुनीर यांचा घेतला खरपूस समाचार
17
'आता संयम ठेवणार नाही; पाकिस्तानला जगाच्या नकाशावरुन मिटवू...', लष्करप्रमुखांचा पाकला थेट इशारा
18
भारीच! महागडे प्रोडक्ट सोडा... गळणाऱ्या केसांवर रामबाण उपाय; एकदा करून बघाच
19
“मुंबईच्या गरब्यात सेलिब्रिटींवर लाखोंची उधळण, तेच पैसे शेतऱ्यांना दिले असते”: रोहित पाटील
20
Video: अमानवीय! आधी टक्कर मारली, मग गाडीखाली चिरडले; बैलाची अतिशय क्रुर हत्या...

महाबोधी महाविहार मुक्त करा ; संविधान चौकात ३१ दिवसांपर्यंत धरणे आंदोलन

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 2, 2025 13:40 IST

Nagpur : दीक्षाभूमीच्या सौंदर्गीकरणासाठी धरणे आंदोलन

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : महाबोधी महाविहार (बोधगया) मुक्त करा आणि नागपूरच्यादीक्षाभूमीचे विनाविलंब सौंदर्गीकरण करा, या मागणीसाठी भारतीय बौद्ध महासभा, समता सैनिक दल आणि भिक्खुसंघ यांच्या वतीने मंगळवार, १ जुलैपासून संविधान चौकात धरणे आंदोलन सुरू करण्यात आले आहे. हे आंदोलन ३१ जुलैपर्यंत ३१ दिवस चालणार आहे.

हे धरणे आंदोलन भन्ते प्रियदर्शी, भन्त डॉ. चंद्रकीर्ती, पदमाकर गणवीर, शंकरराव ढेगरे, प्रकाश दार्शनिक, विजय मेश्राम यांच्या नेतृत्वात ३१ जुलैपर्यंत चालणार आहे. भंते डॉ. चंद्रकीर्ती यांनी आंदोलनाद्वारे, बौद्ध समाजाच्या वतीने महाबोधी महाविहार मुक्त करण्याची, बिहार सरकारचा १९४९ चा बीटी कायदा रद्द करण्याची आणि दीक्षाभूमीचे सौंदर्याकरण करण्याची मागणी असल्याचे सांगितले. या आंदोलनात पपीता खोब्रागड़े, उषा बौद्ध, वीणा नगरारे, सरोज राजवर्धन, विनय ढाके, नरेंद्र थूल, लक्ष्मीकांत मेश्राम, बी. के. हिवराळे, गंगाधर कांबळे, विशाल वानखेडे, माया पाटील, रजनी पिल्लेवान, डॉ. तक्षशीला वासनिक, अविनाश कठाने यांच्यासह अनेक नागरिक उपस्थित होते. 

दीक्षाभूमीच्या सौंदर्गीकरणासाठी धरणे आंदोलनदीक्षाभूमी बचाव-विकास सौंदर्गीकरण समितीच्यावतीने मंगळवारी दीक्षाभूमी परिसरात धरणे आंदोलन करण्यात आले. दीक्षाभूमीच्या लगत असलेल्या सीआरसी (कॉटन रिसर्च सेंटर) च्या जमिनीचे हस्तांतरण करून दीक्षाभूमीचा विकास व सौंदर्याकरण करण्यात यावे, अशी मागणी करण्यात आली. वर्षभरापासून समितीने विविध पातळ्यांवर प्रशासनासोबत चर्चा केली. एनआयटी अध्यक्ष, जिल्हाधिकारी, मनपा आयुक्त यांना निवेदन दिले, पण समाधानकारक उत्तरे मिळाली नाही. शेवटी आंदोलनाची भूमिका घ्यावी लागली. या आंदोलनात आंबेडकरी जनतेने मोठ्या उत्स्फूर्त सहभाग घेतला. संपूर्ण दीक्षाभूमीचा विकास व सौंदर्याकरण त्वरित करावे अन्यथा आंबेडकरी जनता रस्त्यावर उतरल्याशिवाय राहणार नाही, असा इशारा आंदोलकांनी सरकारला दिला.

टॅग्स :nagpurनागपूरDiksha Bhoomi Nagpurदीक्षाभूमी