शहरं
Join us  
Trending Stories
1
पंतप्रधान नरेंद्र मोदी तिसऱ्यांदा सरकार स्थापन करणार, बहुतांश एक्झिट पोलचा अंदाज
2
धक्कादायक! ११ प्रवाशांनी भरलेली बोट नदीत उलटली; ७ जणांचा बुडून मृत्यू, ४ जण बचावले
3
Today Daily Horoscope: आजचे राशीभविष्य - २ जून २०२४; यश, प्रतिष्ठा वाढेल, वरिष्ठ खूश असल्याने पदोन्नतीची शक्यता
4
नरेंद्र मोदींच्या तिसऱ्या टर्मला महाराष्ट्राची अपेक्षित साथ नाही !
5
उत्तरेत पुन्हा मोदी लाट, राहुल-अखिलेश भुईसपाट, भाजप पुन्हा जिंकणार रेकॉर्डब्रेक जागा
6
USA vs CAN : वर्ल्ड कपचा श्रीगणेशा! कॅनडा विरूद्ध अमेरिका म्हणजे IND vs PAK, जाणून घ्या कारण
7
पश्चिम बंगालमध्ये भाजप तृणमूलला देणार धक्का, २०१९च्या तुलनेत सरस कामगिरी करणार
8
हिटमॅनचा फॅन मैदानात शिरला! अमेरिकेच्या पोलिसांनी इंगा दाखवला; रोहितही अवाक्, Video
9
अनंत अंबानी-राधिका मर्चंट यांच्या प्री-वेडिंगचे इटलीत सेलिब्रेशन
10
पंतप्रधान मोदींची ४५ तास ध्यान साधना, संतकवी तिरुवल्लुवर यांना वाहिली पुष्पांजली
11
जावई-सासऱ्यातील समेटासाठी मुलाचा आधार, संवाद साधण्याचा उच्च न्यायालयाचा सल्ला 
12
आजही अडचणींचा डोंगर, वेळेत काम पूर्ण करण्याचे नियोजन
13
एमएचटी-सीईटीच्या चुकीच्या उत्तरांची दखलच नाही, एक प्रश्न अभ्यासक्रमाबाहेरील फॉर्म्युल्यावर आधारित 
14
भारतीय फलंदाजांनी निडरपणे खेळावे - सौरव गांगुली
15
स्कूलबसच्या अपघाताला शाळा संचालकही जबाबदार, पंजाब आणि हरयाणा हायकोर्टाने सुनावले
16
अकरावी प्रवेशासाठी ५ जूनपासून पसंतिक्रम, पहिल्याच फेरीचेच वेळापत्रक जाहीर
17
‘धूप से बचने के लिए टोपी तो दिजीए’, रणरणत्या उन्हात कामगार मेटाकुटीला
18
‘एअर टर्ब्युलन्स’ची माहिती मिळणार, प्रवासी सुरक्षेसाठी विशेष सॉफ्टवेअरची ‘इंडिगो’कडून चाचणी
19
उत्तर प्रदेशमध्ये पुन्हा मोदी लाट, राहुल-अखिलेश भुईसपाट, भाजपा पुन्हा जिंकणार रेकॉर्डब्रेक जागा 
20
Lok Sabha Election Exit Poll Results 2024 : कर्नाटकात इंडिया आघाडीला धक्का? एक्झिट पोलचे आकडे आले समोर, एनडीएसाठी खुशखबर

अशांतता पसरविणाऱ्यांचा नीट बंदोबस्त करू; गृहमंत्र्यांचा नागपुरात इशारा 

By ऑनलाइन लोकमत | Published: April 20, 2022 5:57 AM

वळसे-पाटील म्हणाले,  अमरावती, अकोटमध्ये काय घडले याची पोलीस चौकशी करीत आहेत. या भागांत दंगली घडत आहेत. एका विशिष्ट परिसरामध्ये या सर्व घटना घडतात.

नागपूर:  देशात वेगवेगळ्या कारणांवरून जातीय भावना भडकविण्याचा प्रयत्न होतोय. महाराष्ट्रात सातत्याने अशांतता पसरविण्याचे काम केले जात आहे. काही लोक त्यात सामील आहेत. अशा लोकांचा योग्य बंदोबस्त केला जाईल, असा सज्जड इशारा गृहमंत्री दिलीप वळसे-पाटील यांनी मंगळवारी नागपुरातून दिला. 

पत्रकारांशी बोलताना -वळसे-पाटील म्हणाले,  अमरावती, अकोटमध्ये काय घडले याची पोलीस चौकशी करीत आहेत. या भागांत दंगली घडत आहेत. एका विशिष्ट परिसरामध्ये या सर्व घटना घडतात.  म्हणजे तिथे काही घटक ॲक्टिव्ह आहेत. त्यांचा बंदोबस्त करणे आवश्यक आहे. पोलीस महासंचालकांना सूचना देण्यात आल्या आहेत. पोलीस महासंचालक व पोलीस आयुक्त स्तरावर बैठक होईल. मग परत एकदा मुख्यमंत्र्यांसोबत या विषयावर चर्चा करू आणि अंतिम निर्णय घेऊ, असेही वळसे-पाटील म्हणाले.

३ मेसाठी पोलीस यंत्रणा सज्ज  -कायदा व सुरक्षाव्यवस्थेचा प्रश्न बिघडणार नाही.  कुठल्याही वक्तव्यामुळे समाजात तेढ निर्माण होत असेल, अशांतता निर्माण होत असेल अशी कोणतीही कृती कारवाईस पात्र ठरते. संबंधित व्यक्तींवर कारवाई करण्यात येईल.    - दिलीप वळसे-पाटील, गृहमंत्री 

केंद्राने सुरक्षा देणे हे राज्यावर अतिक्रमण -केंद्र सरकारकडून काहींना सुरक्षा पुरविली जात आहे.  राज्य सरकारच्या सार्वभौम अधिकाराला बाजूला सारून काही व्यक्तींना सुरक्षा पुरविली जाते, हे राज्य सरकारच्या अधिकारावर अतिक्रमण आहे, अशी टीका त्यांनी केली. 

तेव्हा भाजपने का नाही हटविले भोंगे : तोगडिया -भाजपशासित राज्यांतील भोंग्यांबाबत मौन बाळगून महाराष्ट्रात आंदोलनाची भाषा सुरू आहे. सत्तेत असताना भाजपने भोंगे का हटविले नाहीत, असा सवाल आंतरराष्ट्रीय हिंदू परिषदेचे अध्यक्ष डॉ. प्रवीण तोगडिया यांनी केला. ते म्हणाले की, सर्वोच्च न्यायालयाने आदेश दिले की, रात्री १० नंतर सकाळी सूर्योदयापर्यंत भोंगा वाजवू शकत नाही. याचे पालन सर्व राज्य शासनांनी करणे अपेक्षित आहे.

राज ठाकरेंचे समर्थन भाजपसाठी धोक्याचे : आठवले -मनसेची भूमिका ही अतिहार्ड असून, ही हार्ड भूमिका घेऊन भाजपला फायदा होणार नाही. राज ठाकरे यांचे समर्थन घेणे राजकीय पातळीवर भाजपला महागात पडेल, असे केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले येथे मंगळवारी म्हणाले. भाजप आणि मनसेची युती होऊच शकत नाही. रिपाइं पक्ष भाजपसोबत असताना त्यांना मनसेची गरज नाही, असेही ते म्हणाले.

मुंबईत ७२% मशिदींकडून पहाटे भोंग्यांचा वापर बंद -राज्यात भोंग्याचा प्रश्न तापला असताना, मुंबई पोलिसांनी केलेल्या सर्वेक्षणात मुंबईतील ७२ टक्के मशिदींकडून पहाटे भोंग्यांचा वापर बंद केला असल्याची माहिती समोर आल्याचे एका वरिष्ठ अधिकाऱ्याने सांगितले.  

टॅग्स :Dilip Walse Patilदिलीप वळसे पाटीलnagpurनागपूरRamdas Athawaleरामदास आठवले