शहरं
Join us  
Trending Stories
1
विधान परिषदेच्या एका जागेसाठी राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये ४ नावांवर चर्चा, विक्रम काकडे यांचं नाव आघाडीवर
2
'चंद्रकांता' फेम भरत कपूर यांचं निधन, वयाच्या ८६ व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास; अभिनयाचा चार दशकांचा प्रवास थांबला
3
"न कळत सारं घडलं..." लाजिरवाण्या पराभवानंतर अक्षर पटेल झाला 'कावरा बावरा', म्हणे...
4
वेगळ्या घोषणेची गरज नाही, भारत आधीपासूनच हिंदूराष्ट्र - सरसंघचालक मोहन भागवत
5
Bhuvneshwar Kumar : स्विंगचा किंग भुवीची पॉवरप्लेमध्ये कमाल! एकाच डावात दोन खास विक्रमांना गवसणी
6
मुंबई सीएसएमटीवरून सोलापूरला जाणाऱ्या वंदे भारत ट्रेनचा डबा घसरला, सुदैवाने सर्व प्रवासी सुरक्षित!
7
चंद्रपुरातील किडनी विक्री प्रकरणात रविंद्रपाल सिंग यांना जामीन नाहीच, हायकोर्टाचा निर्णय; सखोल तपासासाठी अर्ज फेटाळला
8
एमआयडीसीतील फॅक्टरींमध्ये अनेक कामगारांचे पोलिस व्हेरिफिकेशनच नाही; ना कागदपत्र, ना कुणाची नोंद
9
Virat Kohli New Record : किंग कोहलीचा 'विराट' पराक्रम! IPL मध्ये ९००० धावांसह रचला नवा विक्रम
10
२६ कामगारांचा बळी घेणाऱ्या एसबीएल कंपनीतील पाच पदाधिकाऱ्यांना दणका; उच्च न्यायालयाचा अटकपूर्व जामिनास नकार
11
यवतमाळ जिल्हा बँकेचे मुदतवाढ मिळालेले संचालक मंडळ अखेर बरखास्त; उपनिबंधकांकडे कारभार, संचालक मंडळाच्या मनसुब्यावर पाणी 
12
विदर्भातील सहा शहरांमध्ये ‘सन’ताप कायम, आणखी २४ तास उष्णतेची लाट; मात्र अर्धे जिल्हे अवकाळीच्या सावटात
13
DC vs RCB : हिशोब चुकता! दिल्ली कॅपिटल्सच्या घरच्या मैदानात रॉयल चॅलेंजर्सनं ३९ चेंडूत संपवली मॅच
14
Top Marathi News Live: मुंबई सीएसएमटीवरुन सोलापूरला जाणाऱ्या वंदे भारत ट्रेनचा डबा पुणे स्थानकात घसरला
15
"५१ अंशांच्या उन्हातही काही होणार नाही, माझ्या गाडीत AC चालत नाही"; ज्योतिरादित्य शिंदेंनी सांगितला उष्णतेच्या लाटेपासून बचावाचा देशी उपाय!
16
महाराज आला रे! मोठ्या धक्क्यातून सावरण्यासाठी Mumbai Indians नं खेळली 'ही' चाल
17
१ मे पासून LPG गॅसचे नियम बदलणार? सिलिंडर हवा असेल तर 'DAC' कोड द्यावा लागणार; पाहा नवे बदल
18
DC vs RCB: ८ धावांत ६ विकेट्स! भुवी-हेजलवूडमध्ये विकेट घेण्याची स्पर्धा; दिल्लीकरांसाठी भयावह स्वप्न
19
भसाभस वाढतंय वीज बिल... एसी सोबत पंखा किती फायदेशीर? फक्त AC च्या 'या' आकड्याकडे लक्ष द्या; सरकारनं दिला खास 'मंत्र'
20
वॉशिंग मशीन लावून झाल्यानंतर ४० मिनिटांनी अंघोळ करायचे लक्षात ठेवा...; नाहीतर ठरू शकते जीवघेणे!
Daily Top 2Weekly Top 5

भूखंडाचे लीज ४०० पटींनी वाढणार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 15, 2021 04:07 IST

महापालिकेला उत्पन्नवाढीची अपेक्षा : सभागृहाच्या पटलावर ठेवणार प्रस्ताव लोकमत न्यूज नेटवर्क नागपूर : महापालिकेने लीजवर दिलेल्या भूखंडधारकांना लवकरच रेडिरेकनरच्या ...

महापालिकेला उत्पन्नवाढीची अपेक्षा : सभागृहाच्या पटलावर ठेवणार प्रस्ताव

लोकमत न्यूज नेटवर्क

नागपूर : महापालिकेने लीजवर दिलेल्या भूखंडधारकांना लवकरच रेडिरेकनरच्या ८ टक्के किंवा बाजारभावानुसार निश्चित होणारे वार्षिक भाडे यापैकी जी अधिक असेल ती रक्कम द्यावी लागणार आहे. म्हणजेच तब्बल ४०० पटींनी ही वाढ होणार आहे. याबाबतचा प्रस्ताव १९ मार्चला होणाऱ्या मनपाच्या सर्वसाधारण सभेत नोंदीसाठी पटलावर ठेवण्यात येणार आहे.

महाराष्ट्र शासनाच्या नगर विकास विभागाने १३ ऑक्टोबर २०१९ रोजी प्रसिध्द केलेल्या राजपत्रातील अधिसूचनेनुसार महाराष्ट्र महानगरपालिका (स्थावर /मालमत्ता, भाडेपट्टा नुतनीकरण अथवा हस्तांतरण )नियम २०१९ मधील तरतुदीनुसार नवीन नियमावली लागू केली जाणार आहे. सध्या लीजधारकांना रेडिरेकनरच्या ०.०२ टक्के भाडे आकारले जाते. नवीन नियमावलीनुसार रेडिरेकनरच्या ८ टक्के भाडे आकारले जाणार आहे. भूखंडधारकांना भाडेपट्ट्याचे नुतनीकरण करावयाचे असल्यास करारनाम्याची मुदत संपण्यापूर्वी तीन महिने आधी मनपाला लेखी कळविणे आवश्यक आहे. भाडेपट्ट्याचे नुतनीकरण हे कमाल दहा वर्षासाठी असेल. नियमानुसार लीज हस्तांतरण झाले नसल्यास नवीन नियमावलीनुसार भूखंड परत घेतला जाणार आहे.

...

४३०० लीज धारक

महापालिकेने विविध उपयोगासाठी जवळपास ४३०० भूखंड ३० वर्षांच्या लीजवर, भाडेपट्ट्याने दिले आहेत. यातून मनपाला फारसे उत्पन्न मिळत नाही. मात्र नवीन नियमावली लागू झाल्यास १० वर्षासाठी भूखंड लीजवर दिला जाईल. यामुळे मनपाच्या उत्पन्नात वाढ होईल. अशी माहिती मनपाच्या स्थावर विभागाच्या अधिकाऱ्यांनी दिली.

....

नवीन नियमावलीतील ठळक तरतुदी

-भूखंडधारकाने मनपाला देय रकमा विहित कालावधीत अदा न केल्यास भूखंड परत घेतला जाईल.

-अटी व शर्तीचा भंग केल्यास नुतनीकरण व हस्तांतरण अपात्र ठरविले जाईल.

-मनपाचे स्थावर विभागाची अनुमती न घेता वारस हक्काने किंवा खरेदी खताने हस्तांतरण करता येणार नाही.

-भाडेपट्टा नुतनीकरण संपुष्टात येण्यापूर्वी भाडेपट्टाधारकाला तीन महिने आधी अर्ज द्यावा लागेल.

-भाडेपट्टेधारकाने वापर बदल केल्यास भूखंड परत घेतला जाईल.

....

सत्ताधाऱ्यांची अडचण

नवीन नियमावली लागू केल्यास मनपाच्या लीजवरील भूखंडधारकांना जादा रक्कम भरावी लागणार आहे. पुढील वर्षात होणारी महापालिका निवडणूक विचारात घेता भूखंडधारकांच्या नाराजीला सामोरे जावे लागणार असल्याने सत्तापक्षाची अडचण होणार आहे.